Skip to main content

मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 16/01/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या. मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला. मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली.. मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या. मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या.. माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले.. परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल.... काही चुकल्यास क्षमस्व

वाचने 30991
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

याच्यावर एक रामबाण+ रहीमबाण उपाय आहे इथे एक माईसाहेब आहेत. त्यां / ते स्वतः काहीच लिहीत नाहीत. बहुधा वयोमानामुळे बोटे अडखळत असावीत. मात्र त्या कोणालाही म्हणजे वाजपाई अडवाणी याना देखील " तो अटल , अरे लालकृष्ण असे एकेरी संबोधतात. त्यांच्या प्रतिसादावर प्रतिसाद दिलेत तर नाना सुद्धा खूष होऊन तुम्हाला षास्बाकी देतील आणि त्या नंतर बघा तुम्हाला वेळ्गाच अनुभव येईल.

In reply to by विजुभाऊ

म्हंजे:
छान उपाय सुचवलास रे विजू.. नवीन उमेदवारांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे असं हे म्हणतात. काय ते तुमच्या कारपोरेट भाषेत म्हणतात ना मोटिव्हेशन की काय. तेच.
असंच का विजुभौ ?

चांगल्या गोष्टींचाही अतिरेक केल्यास दुष्परिणाम होतो असं म्हणतात ! तुमचे लेखन वाचकांना जरा श्वास घेण्यास मोकळीक मिळेस अश्या दमाने (कमीत कमी दोनचार दिवसांच्या अंतराने) टाकल्यास प्रतिसादांत सुधार होऊ शकेल. अहो, श्वास रोखला गेला की कोणीही हातपाय झाडतोच की :) बाकी थोडे दिवस वावरलात की मिपाकरांच्या खोचकपणातील खोडकरपणाची मजा ध्यानात येऊन इथे रुळून जाल !

तुमचे घागे पाहिले नाहित मी.. कदाचीत बर्याच सदश्यांना कामामुळे जास्त वेळ येथे देता येत नसेल. त्यामुळे आल्यावर ज्या गोष्टी आवडतात ते तिकडे जास्त लक्ष देतात, माझे म्हणाल तर भटकंती नंतर कलादालन आणि राजकारण - चर्चा मला आवडतात मिपावर आल्यावर मी भटकंती सर्वात पहिली पाहतो. नविन असल्यावर थोडा वेळ जावुन द्यावा.. दागा टाकण्यापेक्षा आपण दूसर्‍याचे धागे वाचुन त्याला कसे रिप्लाय देतो हे जास्त महत्वाचे.. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाचन करा.. रिप्लाय द्या .. नंतर तुमचे विचार पाण येवुद्या . आल्या आल्या लगेच लेख (काही प्रॉब्लेम नाही) पण लगेच रिप्लाय ची अपेक्षा कश्यासाठी .. असे असेल तर माझ्या धाग्यावर १०-१२ रिप्लाय असतात म्हणुन मी लगेच मिपाच वाईट म्हणावे का ? धागा हा रिप्लाय साठी नसुन आपले विचार मांडण्यासाठी असावा.. तसेच रिप्लाय चे पण . असो.. हळु हळु सरावताल

In reply to by गणेशा

मी मिपा ला वाईट म्हणत नाही आहे पण तुमच्या कंमेट्स ह्या नविन सदस्यांचा आत्मविश्वास कमी करण्यासारख्या नको यायला

In reply to by Sanjay Kokare

दोन्ही कविता वाचल्या ! छान आहेत.. वर्हाडी भाषेतली आर्त आहे एकदम .. एक कळकळीचे सांगतो! तुमचे वय धाग्यांवरुन अंदाचे २०-२५ च्या आस पास वाटते म्हणुन बोलतो .. ऑनलाईन वाद- संवाद .. त्यावर येणारे प्रतिसाद -- विचार यांना इतके पर्सनली घेवु नका .. लाईफ वेगळे असते.. इतक्यात आत्मविश्वास जात असेन तर तुम्ही त्याची आस बाळगु नका.. आपले विचार मांडण्याचा प्लॅटफॉर्म म्हणुन वापर करा.. मिळालेच एक दोन सोबती तर त्यांच्याशी गप्पा मारा. हे असले आत्मविश्वास वाढवा वगैरे खरेच छान नाही वाटत.. मुळात आत्मविश्वास लगेच गेलाच नाही पाहिजे .. मान्य तुम्ही कष्ट करुन लिहिताय .. त्या लिहिण्यातला आनंद घ्या .. लिहिल्या नंतर तो आनंद इतरांना देण्याचा प्रयत्न करा .. ज्यांना जमेल ते घेतील नाही तर सोडुन द्या .. वयक्तीक लेव्हल ला जर तुम्ही गोष्ट घेणार असताल .. तर एकदिवस तुम्ही या सोशल मायाजाळात तडफडत अडकलेच म्हणुन समजा .. असो.. हा माझा शेवटचा रिप्लाय असेन येथे. तुमचे इतर धागे मी आधी बघितले नव्हते .. कारण दिले आहे. पुन्हा असे धागे यायला नको असे वाटते .. लिहित रहा .. आम्ही वाचत आहे...

In reply to by गणेशा

धन्यवाद सर, तुमच्या प्रतीक्रियेबद्दल आभारी आहे व तुमचा सल्ला नेहमी लक्षात ठेवील

मिपा हे नवीन सदस्याकरीता मुळीच अडचणीचे ठरत नाही तर जिलब्यापाडू सदस्यांकरता अडचणीचे ठरते. आता थोडा गंभीर प्रतिसाद. पटतोय तर व्हय म्हणा नाहीतर सोडून द्या. मिपा हे नेहमीच जुन्या/नव्या लेखकांचे स्वागत करते. पण येथे येणारा बहुसंख्य वर्ग हा कोरडवाहू शेतकरी आहे. तो वर्षातून एक किंवा दोनच पिके घेतो आणि तुम्ही पडले बागायती शेतकरी एकाच वेळी चार चार पिके घेणारे. सांगायचा मुद्दा हा की एक / दोन दिवसांत एखादाच धागा / चर्चाप्रस्ताव / लेख टाकावा. तसे केले की एकाच लेखावर लक्ष केंद्रित करणे सदस्यांना सोयीचे पडते आणि सोईप्रमाणे प्रतिक्रिया, सुचना करता येतात. मराठी माणसाचे / जागतिकीकरणाचे विषय किंवा कोणताही मोठा आवाका असणारा विषय मांडण्याअगोदर त्या विषयावरील मिपावरील लेखांवर एक नजर टाका. काही सदस्यांचे प्रतिसाद खरोखरच माहितीपुर्ण असतात तर काही प्रतिसाद फक्त टिंगलटवाळीचे / मजेमजेचे असतात. मुख्य म्हणजे विषय मांडताना तुमची त्या विषयाप्रती कळकळ दिसू द्या. नुसतेच टाळ्या मिळविणारी / पुस्तकी छापाची वाक्ये इथल्या लोकांना आवडत नाहीत. जेव्हा तुम्ही (किंवा हवतर मी म्हणा) बाजारात माल विकायला आणतो (उदा. आंबे) तर चार जण तो दाबून बघतील, दोन जण नाकाला लावून वास घेऊन बघतील. एखादाच विकत देखील घेईल. तेव्हा हताश न होता बाजारात उभे राहत चला. अर्थात लिखाण चालू ठेवा. तुमचा माल चांगला असेल तर नक्कीच विकला जाईल. आज बर्‍याच जणांचा सुर हेटाळणीचा वाटला तरी नंतर तुम्हाला इथूनच तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण / मित्र सापडतील याची खात्री बाळगा. तेव्हा कीप ईट अप. निराश होऊ नका आणि आम्हालाही निराश करु नका.

In reply to by Sanjay Kokare

गैरसमज नसावा. ही मर्यादा मिपाच्या कायद्याची नाही तर सर्वसाधारण सारासारविवेकाची आहे.

In reply to by Sanjay Kokare

अहो,तुमच्यावर अनेक वस्तुंचा एकदम भडिमार केला किंवा एक एक थोड्या दिवसानी दिली तर काय फरक असेल विचार करा.पहिलाच लेख वाचुन लोकांना अंदाज घेऊ द्या.तुमचे लिखाण सकस असेल तर त्याला प्रतिसाद वाचनं मिळतीलच.हळूहळू एकेक धागा टाका.लहान मूल खेळण्याची टोपली एकदम उलटं करुन बसतं तसं सगळे साहित्य प्रकार एका दमात टाकून खेळू नका.अारामात.मिपा कुठे जात नाही.टाकत रहा एक एक प्रकार!

अरे बापरे तुम्ही तर एकदम षटकारच ठोकलात की.... तुंमच्या धाग्यांवर धिंगाणा घांलणारे नां हें पुंणेकर असावेत बरिक कांय संमजंले. ते असेच असतात नविन कोणी आलं की... :-))) जावुद्या तुम्हाला समजेल ह ळु ह ळू. तुम्ही तुमची ताठ ठेवा मान म्हणतोय मी. अजिबात घाबरु नका नाउमेद होवु नका. बाकी साहेबांनी किती दिवसांची रजा दिलेय तुम्हाला? नाही म्हणजे एका दिवसात एवढ्या जिल्ब्या पाडताव ते. बाजारातली साखर महागली की.

झालं ! जिथंतिथं पुण्याचीच लाल करा राव. मिपा पुणे पकडून होल वर्ल्ड मधे फेमस आहे म्हटलं. जरा क्रेडीट बाकीच्यांनाही द्या की !

कोकरे साहेब तुमच लिखाण वाचल आहे या पुर्वी . चांगल लिहिता . फ़क़्त वर्तमान पत्र वाचक आणि मिपा वाचक यांच्या प्रकृती मध्ये फरक आहे . तो तुम्हाला अनुभवाने कळेलच . फ़क़्त थोडा gap राहू द्या दोन लिखाणामध्ये . बाकी तुमच्यात क्षमता आहेच . Just keep floating .

तुम्ही भटकंती का नाही टाकलीत हो एखादी? मला भटकंतीसंबंधी लेख खूप खूप आवडतात. लिहा ना प्लीज.

In reply to by प्रचेतस

भटकंती साठी सुद्धा मि लेख लिहीला आहे पण आताच मिपा वर टाकत नाही

In reply to by Sanjay Kokare

मला उत्क्रांती आणि अध्यात्म यावर चर्चा करायला आवडते. या विषयांवरही काही लिहा ना. आणि तुमचे लेखन वर्तमानपत्रात छापून येत असेल तर त्याची कात्रणे इकडे चिकटवा. आमचे शेतागंमु सर तसेच करतात.

In reply to by सतिश गावडे

मला भयकथा वाचायला खूप आवडतात, लिहा न मस्त भयकथा

In reply to by यसवायजी

माझ्यासाठी एक बालगीत, ईसापनीतीतल्या गोष्टी टाईप गोष्ट, पंचतंत्र आणि मांजरीने बाईकच्या सीटवर नखे मारु नयेत म्हणून उपाय असलेला लेख, याहून मागणं लई न्हाई!! ;)

In reply to by सतिश गावडे

तो तुमच्या काव्याचा परिणाम आहे... उगाच बिचार्‍या सखूला दोष देऊ नका *unknw* ;) :)

In reply to by चेतन677

स्पा स्वतः भयकथा प्रसवतो. =)) उदा पुर्वीचे ते आणि आत्ताचे धागा पहावा.

In reply to by सतिश गावडे

मला उत्क्रांतीसाठी अत्यावश्यक असणार्या गोष्टीबद्दल वाचायला आवडेल ;)

In reply to by सतिश गावडे

च्यामारी कलादालनाकडे कुणी बगतच नै. तिथे काहीतरी टाका ना गडे. (म्या बी सुरुवात तिथंच केली व्हती. कोण बी फिरकले नाही :( पण कोण कंपूबाजी बी केली नै. रुळलो मग हळू हळू )

In reply to by कपिलमुनी

काहीतरी टाका ना गडे ?
हा हा हा.. ;-) ह्यावरुन "नवरा माझा नवसाचा" मधलं 'चला ना गडे, चला ना गडे' हे गाणं आठवलं. काव्यातला कोणता अलंकार आहे तो? "श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी" वाला? अनुप्रास का?

In reply to by Sanjay Kokare

मला युद्धकथा आणि गुप्तहेरकथा वाचायला आवडतात. एकेक लिहा ना (गडे) सखोल अभ्यास करुन =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एकेक लिहा ना (गडे) सखोल अभ्यास करुन
अर्रे...नया हय वह...त्यांनी "तशीच" लिहिली तर

In reply to by टवाळ कार्टा

अरे क्या नया हय वह नया हय वह लगाके रक्खा हय. उनका लेख पेपर मे छापके आया हय.

In reply to by सतिश गावडे

मग क्या हुवा...मिपावर नया हय वह...इदर सगळेच उनको टेम्प्युत बशीवते हय

In reply to by टवाळ कार्टा

अबी आपीच देखो. उनके अभ्यास पुर्ण लेखन की किसिको कदरच नय.

In reply to by सतिश गावडे

उनके अभ्यास पुर्ण लेखन की है हमको कदर... उनके अभ्यास पुर्ण लेखन की है हमको कदर... वाचनेका तो वाचो नै तो रस्ता सुधर... -कवीहृदयसम्राट तेच ते (स्पा चे ते नाही)-

In reply to by गवि

गवि तुम्ही पण सुरुवातीच्या काळात परा आणि मी कसा त्रास दिला याबद्दल कचकचुन शिव्या घालणारा एक लेख लिहा बरे.

In reply to by मृत्युन्जय

..अगदी अगदी..बोटं शिवशिवताहेत नुस्ती. संजयसाहेब... ..हा मृत्युन्जय तर फार फार वैट्टपैकी आहे.

In reply to by मृत्युन्जय

गविंचे लिहिणे जरा सोज्वळच हो ! त्यांच्याच्याने कचकचून शिव्या घालणारे लिखाण व्ह्यायचे नाही. किंबहूना त्यांनी शिव्या दिल्या तरी त्या कानाला गोडच लागतील. तेव्हा ते काम तुम्हीच करा बरे ! :)

रॅगिंग चाल्लय ओ ! थोड्या दिवसात अलिकड्च्या बाजूला येउन तुम्ही पण नव्या कोकरांची वाट बघाल ! ( नव्या मिपाकरांसाठी FAQ काढावा काय ;) )

In reply to by इरसाल

इथ काही कोकरं येताना शिंग पण घेवुन येतात कधी कधी.
ते कोकराचं कातडं "बळंच" पांघरलेले जुणे-जाणते बोकड असतात!!

वर गवि म्हणतात त्याच्याशी १००% सहमत. लै हलकट, टवाळ आणि डँबिस लोक्स आहेत हो इथे. मी नवीन असताना एका साडेचार अक्षरी, एका सव्वा अक्षरी, एका पंचाक्षरी वगैरे वगैरे लोकांनी मला पण पि़ळला होता ज्याम. पण नंतर जसा लिहित आणि वाचत गेलो तसं तसं मलाही ही लोकं कळत गेली आणि कदाचित त्यांनाही मी. एका लोकप्रिय मिपा सल्लागाराशी जब्राट वादही घातले होते. =)) पण हेचं लोकं तेवढेचं प्रेमळही आहेत. अतिशय उत्तम लेखक कवी आहेत. चार पावसाळे जास्त पाहिलेत त्यांनी बाहेर जगात आणि मिपावर. त्यांचा तेवढा अधिकार आहे. जरा गमतीनी घ्या. दोन-चार उलटी उत्तर मर्यादेत राहुन दिलीत तरी कोणी काहीही बोलणार नाही. एकदा सरावलात ना की मिपासारखं मोकळं वातावरण नाही. ३-४ महिन्यात सरावाल. तेव्हा जे नवीन येतील तेव्हा तुम्हीही त्याला असेचं रिंगणात घ्याल. लोकांना एक लेख पचायला वेळ लागतो. तस्मात लेखात अंतर ठेवा आणि इथे नक्की येतं चला. :)

वर्तमानपत्रात एकाच दिवशी तुमचं एवढं साहित्य छापून येईल का? त्यात मिपावर किंवा कुठल्याही अशा संस्थळावर लिहिल्यावर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतील, हे गृहीत धरायला हवे. त्यातून तुम्हाला तुमच्या लेखनातल्या मर्यादा कळतील. आणि सर्वात महत्वाचे, तुम्ही आधी विषयांचा नीट अभ्यास करा आणि मगच लिहा. केवळ कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम म्हणून याकडे बघू नका. आधी भरपूर वाचा, मिपावरच्या इतर लेखांवरही प्रतिकिया द्या आणि मग लिहायला सुरूवात करा. हे केवळ तुम्ही नाउमेद होऊ नये, यासाठी सांगितलंय. पटलं तर स्वीकारा.

In reply to by विशाखा पाटील

आपण लक्षात घ्या मी कोणताही विषय अभ्यास पुर्णच लिहीतो व कदाचित तो तुमच्या मताप्रमाणे तो चुकीचा असेलही...

In reply to by Sanjay Kokare

मी कोणताही विषय अभ्यास पुर्णच लिहीतो व कदाचित तो तुमच्या मताप्रमाणे तो चुकीचा असेलही
असा सर्वज्ञतेचा दावा करू नका हो दादा. असे कितीतरी मिपाकर मला माहीत आहेत जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अग्रणी आहेत, प्रचंड ज्ञानी आहेत, अनुभवसंपन्न आहेत, छंद म्हणून हाती घेतलेल्या उद्योगातही अतिकुशल आहेत. पण (काही सन्माननीय अपवाद वगळता) सर्वज्ञतेचा छातीठोक दावा ते मिपाकर करत नाहीत. "तुम्ही अभ्यासपूर्ण लिहिता" हे इतरांना म्हणूदे.

In reply to by Sanjay Kokare

कोकरे साहेब, खेद-प्रकटीकरणातदेखील उपरोध जास्त दिसतोय हो. तसे नसेल ही, पण तसे असेल तर खेदजनक आहे.

In reply to by Sanjay Kokare

कोकरे साहेब मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा " वयाच्या मानाने बरं लिहिलंय " म्हणणारे आहेत तेंव्हा तुम्ही आम्ही कुठे आहोत ते पहा आणि नाउमेद होऊ नका शेवटी पुलंनी म्हटले आहेच कि राज हंसाचे चालणे जगिया जाहले शहाणे म्हणोन काय कवणे चालोची नये काय ?

In reply to by सुबोध खरे

मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा " वयाच्या मानाने बरं लिहिलंय " म्हणणारे आहेत +D बघा, कोकरे साहेब, कळलं का मिपाकर मिपाकरांची कशी मापं काढतात ते ? :)

In reply to by सुबोध खरे

खरे काका, संदर्भ चुकला.
शेवटी पुलंनी म्हटले आहेच कि राज हंसाचे चालणे जगिया जाहले शहाणे म्हणोन काय कवणे चालोची नये काय ?
ही ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीतील ओवी आहे. "राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना ||" अशी काहिशी ओवी आहे ती. ओवीचा अध्याय क्रमांक आणि ओवी क्रमांक माझ्या लक्षात नाही. प्रगो कदाचित सांगू शकतील.

In reply to by प्रचेतस

दुसरे एक जण आहेत. परंतू त्यांची "दासबोध" ही स्पेशालिटी आहे. त्यांना ज्ञानेश्वरीतील संदर्भ माहिती नसावेत कदाचित. (असा माझा समज आहे. ;) )

In reply to by सतिश गावडे

गावडे साहेब आम्ही काही ज्ञानेश्वरी वाचली नाही पण पु ल वाचले आहेत आता त्यांनी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत दिला असेल. आमच्या अज्ञानाबाबत एक डाव माफी करा.

In reply to by सुबोध खरे

आमच्या अज्ञानाबाबत एक डाव माफी करा.
माफ केलं. पण इथून पुढे प्रतिसाद देताना धागाकर्त्यासारखे कोणताही प्रतिसाद अभ्यास पुर्ण द्या *lol*

In reply to by सुबोध खरे

" मिपाकर ज्ञानेश्वरांना सुद्धा " वयाच्या मानाने बरं लिहिलंय " म्हणणारे आहेत " *lol* *LOL*