Skip to main content

२०१४-निवडणुकांची रणधुमाळी

लेखक सचीन यांनी बुधवार, 18/12/2013 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता. ब्रीटीशांनाही भारताला स्वातंत्र्य तर मिळालेय पण ते कुठपर्यंत टिकवता येईल ह्याबाबत शंका होती .पण आपल्या देशाने ती खोटी ठरवली व देशाचा कारभार यशस्वीरीत्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जे महान नेते होते त्यांचे आदर्श नवीन पिढी समोर होते. देशाची भक्कम घटना नि त्या घटनेला न्याय देणारे राज्यकर्ते भारताला लाभले हि आपल्या देशासाठी मोठी सुदैवाची बाब आहे. सत्ताधार्यांकडून काही प्रमाणात घटनेला धाब्यावर बसवण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होवू शकले नाही. भारताची घटना हि योग्य असल्यानेच आणि सुजाण राज्यकर्ते लाभल्यानेच भारताचा विकास झाला. अन्यथा आपला देश हा पाकिस्तानच्या वाटेने कधीच गेला असता.आपण आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालो पण आज पाकिस्तानची अवस्था काय आहे हे साऱ्या जगाला दिसतेय धर्मावर आधारित राजकारण केल्याची विषारी फळे आज तिथली जनता भोगतेय. आज आपण कॉम्पुटर युगात आहोत हेही राज्याकार्त्यांच्याच दूरदृष्टीचे परिणाम. याचा अर्थ देशात सारे आलबेल आहे असे नव्हे प्रश्न समस्या असायच्याच पण त्याच्याशी धैर्याने मुकाबला करण्यात येत आहे. जगात असा एकही देश नाही जेथे सारे आलबेल असेल. भारत स्वातंत्र्य होवून ६६ वर्षे उलटली ६६ वर्षाचा हा कालावधी मानवी जीवनासाठी मोठा कालावधी वाटत असला तरी देशासाठी हा अत्यंत लहान कालावधी आहे. ह्या इतक्या कमी कालावधीत देश सर्वच क्षेत्रात ज्या वेगाने मुसंडी मारत आहे ते पाहून सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला पाहिजे. देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अजूनही सर्व समस्या सुटलेल्या नाहीत पण पेला अर्धा भरलाय, ह्यात आनंद मानायचा कि अर्धा रिकामा आहे ह्याचे दुखः करत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने बरीच जनता पेला अर्धा रिकामा आहे म्हणून दुख करणारी आहे. देशाच्या विकासातही काही महाभाग भकास काय आहे हे शोधत बसतात. तर आदर्श राज्यकर्ते ते असतात जे भकासातून विकास करून दाखवतात. २०१४ च्या निवडणुकीत देशात पुढील प्रमाणे स्तिथी येवू शकते व त्यानुसार कोण प्रधानमंत्री बनू शकतो ह्याबद्दलचा हा अंदाज १)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी २)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव ३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात. प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीचा ह्या निवडणुकीवर प्रभाव राहील. आप सारखी नवीन पार्टी बरीच मते मिळवू शकते. परंतु सत्तेचे सोपान मात्र कॉंग्रेस किंवा तिसर्या आघाडीकडेच राहतील असे देशातील सध्याचे वातावरण आहे. भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते. शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22645
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

तुमचे अंदाज खरे ठरो यासाठी आमच्या तुम्हाला आणि तुमच्या मर्जीतल्या पक्षांना शुभेच्छा. अंदाज रोचक वाटले. - छोटा डॉन

भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते. हे वाचुन बसलेल्या धक्क्यातुन अजुन सावरलेलो नाही आहे. सचिन पिळगावकर नंतर तुम्हीच एक सचिन. तुम्हाला दोघांनाही तोड नाही.

सच्च्चिन...सच्च्चिन... मस्त विषय निवडला...आता शतकासाठी शुभेच्छा... बाकी हे पटले.
शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.

कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी
+१. असेच होणार. काँग्रेसला स्वबळावर कमितकमी साडेतीनशे जागा मिळणार.
भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत
-१. भाजपला १९८४ मध्ये २ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षाही कमी जागा मिळणार. एखादी जागा मिळाली तरी भाजपने स्वतःला धन्य समजावे.
तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव
ती वेळ येणारच नाही.वरच म्हटले आहे की काँग्रेसला कमीतकमी साडेतीनशे जागा मिळणार आहेत.
शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.
अगदी अगदी बाकी सचीनरावांचा हा लेख म्हणजे मी मिपावर आजपर्यंत वाचलेला सर्वोत्तम लेख आहे. मी आजपासून सचीनरावांचा मोठ्ठा फॅनच झालो आहे :)

In reply to by क्लिंटन

मराठीत "इन्फिनिटी" चे चिह्न कसे काढतात हो?

खालील ३ वाक्यांनी पार त्रिफळाचीतच झालो आहे... "१)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी २)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव ३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात."

In reply to by मुक्त विहारि

त्यात त्रिफळाचित व्हायचे कारण काय...दिल्लीत 'आप'ने बीजेपीचेला खिजगणीतही ठेवले नाही, सर्वात मोठा पक्ष असून....याला म्हणायचे क्लीन बोल्ड करणे.. फक्त आठ जागा असुनही काँग्रेस चर्चेत आहे व बीजेपीला दिल्लीत कुणीच विचारत नाही, याला म्हणायचे 'राजकारण'.. ते कधी भाजपला जमले नाही...

सचिन तुम्हाला आणि कॉंग्रेसला आगाऊ शुभेछा. तुमच्या प्रतिक्रिया आणि लेख फारच अभ्यासपुर्ण असतात, आपण हा लेख दिग्विजय किंवा राहुल गांधि ह्याना ईमेल केल्यास भारताचे पुढिल होम मिनिस्टर तुम्हिच असाल आणि रेल्वे मंत्रि आपले आदरणिय लालु प्रसाद असतिल. फारच रोचक महिति.

"लालूजी धर्मांधाना रोखण्यासाठी जनता तुमच्या बरोबर आहे. सत्ता कॉंग्रेस नाही तर तिसर्या आघाडीचीच येणार ह्यात शंका नाही." ईथे आपण जे भाकित वर्तवले त्यानुसार तिसरी आघाडि येणार आहे, तुमचे उद्याचे भाकित (भाबडे) मुस्लिम लीग (नवाज शरीफ) भारतात सरकार स्थापन करेल हे असणार आहे.

पप्पु पास हो गया असे म्हणावे लागेल असे झाले तर.. पण पहिले काँग्रेस राहुल किंवा सोनिया ह्यांचे नाव तर त्या पदा साठि जाहिर करु दे.

लेखकाने मुद्दे एकदम अचूक मांडले आहेत. फक्त अजून एक होईल याची मनोमन खात्री आहे... मा. राष्ट्रपती, हे श्री. लालूप्रसाद यादव यांना माफ करतील आणि जे काही धर्मांध शक्तींनी त्यांना (म्हणजे श्री. लालूप्रसाद यांना) खोट्या चाराघोटाळ्यात अडकवले आहे त्यातून बाहेर काढतील. एकदा का तो वाघ मोकळा झाला की काय विचारता! भाजपा, शिवसेना, मनसे आणि तमाम पक्ष आणि त्यातील कमकुवत नेत्यांची ऐशीतैशी होईल. त्यानंतर वडीलकीच्या आणि राजकीय गुरूच्या नात्याने श्री. लालूप्रसाद हे नवीन उमेदीच्या पंतप्रधान श्री. राहूलजी गांधी यांना नेतृत्वाचे मार्गदर्शन करतील. मग भारतवर्षात रामराज्यासारख्या खुळचट कल्पना लोप पावतील आणि लालूराज्य साकार होईल. (अवांतर - मालकांना विनंती: जसे नवे लेखन करताना विडंबन म्हणून वर्गीकरण करता येऊ शकते, तसेच प्रतिसादांचे पण विडंबन/उपरोध वगैरे म्हणून वर्गीकरण करणे अथवा टॅग लावणे शक्य करा की साहेब! ;) )

हसुन हसुन पुरेवाट झालिय हा लेख वाचुन.... आपण विनोदि कथा लेखन करावे अशी एक विनंति.

In reply to by होबासराव

होबास राव एका प्रतिक्रियेत तुम्ही लिहता कि माझे लेख अभ्यासपूर्ण असतात एकात लिहिता कि विनोदी असतात.तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या प्रतिक्रियाही मला विनोदी वाटू लागल्यात.

In reply to by सचीन

तमचे हे सर्व अंदाज म्हणजे तुमच्या द्रष्टेपणाचा खणखणीत पुरावा आहे ! त्यात काळानुसार ९६ दुरूस्त्या येऊ नयेत म्हणून मनापासून शुभेच्छा !

In reply to by चौकटराजा

मिपाचे भाग्य फार थोर आहे.... आजकाल हे असे जबरद्स्त..द्रष्टे मिळत नाहीत.... वरील प्रतिसाद हा चौरा काकांना असल्याने इतर जणांनी नाहक आपापला आणि माझा वेळ फुकट घालवू नये, ही नम्र विनंती.

In reply to by मुक्त विहारि

अहो भावी घटनाकार आहेत चौरा काका. द्रष्टे असायचेच. एकही चूक न करता बिनचूक अशी दुरुस्त्या न करावी लागणारी घटना लिहिणार आहेत ते देशासाठी .

In reply to by मुक्त विहारि

खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी

In reply to by सचीन

आपण अगदी घटनाकार वगैरे भूषवायला तयार नाही, पण सचिन शेठ कॉण्त्याही एका पक्षाला ( कारण आम्ही कोण्तीही एक टोपी डोक्यावर आंधळेपणाचे लावलेली नाही ) येत्या शंभर वर्षात " दो तिहाई" बहुमत मिळाले तर एकही नया पैसा न घेता घटनासमितीत काम करू व मुख्य म्हणजे त्या घटनेने काही विपरित परिंणाम झाले तर त्या प्रमाणात त्याचे उत्तरदायित्व आमचे असेल असे मृत्यू पत्रात आवर्जून लिहू !

In reply to by चौकटराजा

एकही नया पैसा न घेता घटनासमितीत काम करू व मुख्य म्हणजे त्या घटनेने काही विपरित परिंणाम झाले तर त्या प्रमाणात त्याचे उत्तरदायित्व आमचे असेल असे मृत्यू पत्रात आवर्जून लिहू ! >>>>>> नव घटनाकार काका मी गम्मत करत होतो गंभीर होवू नका .मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचे सरकार तुम्हाला विनामुल्याही घटना समितीत काम करायला घेईल.

In reply to by सचीन

मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचे सरकार तुम्हाला विनामुल्याही घटना समितीत काम करायला घेईल.
हे मात्र अगदी बरोब्बर बोललात साहेब . . विनामूल्य कसं कोणी समितीत घेईल . काही तरी "सेवा" करावीच लागेल .

In reply to by सचीन

अरे वा ! तुमचे सगळे धागे गमतीने घ्यायचे हे सांगितलेत हे बरे केलेत ! हाबिनंदण ! हे आलेले जोकपाल ठरले तर त्या पदावर मग तुमचीच नियुकी होणार ब्वा ! तय्यारी जोरात चालू आहे ब्याकग्रांउंडची ! परत येकदा हाबिनंदण .पण एका ड्रायव्हरने अर्धवट का होईना केला ना इतिहास निर्माण? कोठलेही रिझर्वेशन न मागता !

In reply to by सचीन

काका तुमच्या नेमके पोटात कशामुळे दुखते ते कळाले? हे आपले विधान आहे की प्रश्न ? बर असो, आरक्षणाला विरोध अशासाठी की तोच रोग आता किती पसरत चालला आहे हे आपण पहातच आहात ! एवढे करून " त्यांच्या" तोडीचा एक तरी नेता गेल्या साठ वर्षात आरक्षणाने जन्माला घातला का?

In reply to by चौकटराजा

" त्यांच्या" तोडीचा एक तरी नेता गेल्या साठ वर्षात आरक्षणाने जन्माला घातला का?
म्हणजे कुणाच्या?

In reply to by चौकटराजा

चौरा मला वाटाते प्रश्न चुकीचा आहे. तसा तर गांधीजींच्या तोडीचाही एकही नेता सवर्णांमधुन गेल्या ६० वर्षात निघालेला नाही. गेल्या ४०० वर्षात एकही शिवाजी निपजलेला नाही. महान नेता रोज जन्म घेतच नसतो.

In reply to by मृत्युन्जय

आमच्या वाक्यातून हेच ध्वनित करायचे आहे की प्रगतिसाठी जर नेता लागत असेल तर तो एकाद्या क्षेत्रात आरक्षण निर्माण करून होत नाही. कष्ट करण्याची वृती, मेधा, कल्पकता, सचोटी, हे गुण नैसर्गिकतः च येतात .ते ही आरक्षणातून येत नाहीत.आरक्षण तिथेच असावे जिथे वरील सर्व गुण समान असता संधी मर्यादित आहे तिथे गरीब माणसास प्रथम संधी मिळावी.जातीच्या आधारे नव्हे ! अशाने धर्म जात या कल्पना उलट गडद होत चालल्या आहेत.

In reply to by सचीन

क्रुपया कुणाच्याही नावाची जाहीर चिरफाड करू नका, ही विनंती आहे. त्यांचे नांव "होबासराव" असे आहे. (का कुणास ठावूक पण जुन्या मालकांची आठवण झाली.)

महाराणीजी असे जाहीर करतील की देशातले सर्व लोक समान आहेत. फक्त गांधी घराणे जास्त समान आहे त्यामुळे ह्यापुढे निवडणुका वगैरे भानगडी न ठेवता सर्वानुमते त्या जास्त समान घराण्यातला कोणीतरी सत्तेवर यावा. त्यामुळे खर्चिक निवडणुका टळतील आणि देशाची भरभराट होऊ लागेल. आणि देश ज्यांनी एकहाती घडवला आहे त्यांचीही! संपादित

अत्यन्त मनोरजंक लेख आवडला. एक प्रश्न विचारू का? ते जाक्पोट चित्रपट वाले सचीन आपणच का?

नॉस्टर् डंबस

In reply to by विनायक प्रभू

"नॉस्टर् डंबस" प्रभू काकांनी "आंजा"ला नविन शब्द बहाल केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...

आंधळ्या मोदीभक्तांनी कितीही उपरोधीक लिखाण केलं तरी सत्य बदलणार नाहि. उपरोध करताना देखील काहि क्वालिटी जपावी लागते. शरद पवार साहेबांना खड्यासारखं बाजुला काढलं प्रधानमंत्रीपदाच्या यादीतुन. तिसर्‍या आघाडीचं सरकार पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच बनेल.

In reply to by संग्राम कदम

साऱ्या गोरगरीब,धर्मनिरपेक्ष, अल्पसंख्यांक,देशाच्या विकासाच्या बाजूने असणार्यांमुळे काँग्रेसचेच राज्य येणार. ह्यात शंका नाही .

ई सकाळ व आता मिसळपाववरही प्रधानमंत्री हा हिंदी शब्द मराठी लोक सर्रास वापरताना दिसतात. मराठीत पंतप्रधान असा शब्द असताना लोक हिंदी माध्यमांचे अनुकरण करत प्रधानमंत्री हा शब्द का वापरायला लागलेत हे अनकालनीय आहे. प्रधान व मंत्री हे दोन्ही शब्द मराठीत अस्तित्वात असले तरीही प्रधानमंत्री हा शब्द हिंदीच आहे.

देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
याचे स्पष्टीकरण द्याल काय ?

In reply to by सचीन

म्हणजे कोन्ग्रेस ने नियोजनबद्ध विकास केला. आणि जो काही "विकास" केला त्यास ६० वर्षे लागली? आपल्या बरोबरच जपानलाही स्वातंत्र मिळाले (चू, भू, द्या घ्या) पण मला नाही वाटत जपानला आपला एवढा "विकास" करता आला. मागासलेलाच राहिला बिचारा नै.

पप्पूच्या निमित्ताने भारताला एक नवा विदूषक लाभला आहे. सत्ता कुणाचीही आली तरी राष्ट्रीय विदूषक या पदासाठी पप्पू आणि लालू यांच्यात पहिल्या व दुसर्‍या स्थानासाठी स्पर्धा राहील हे नक्की. ;)

In reply to by मंदार दिलीप जोशी

>>> पप्पूच्या निमित्ताने भारताला एक नवा विदूषक लाभला आहे. सत्ता कुणाचीही आली तरी राष्ट्रीय विदूषक या पदासाठी पप्पू आणि लालू यांच्यात पहिल्या व दुसर्‍या स्थानासाठी स्पर्धा राहील हे नक्की. दिग्विजयला विसरलात की काय? आणि चेहरा कोरा ठेवून विनोद करणारे म.मो.सिंग कितव्या क्रमांकावर असतील? भ्रष्टाचाराची कितीही गंभीर प्रकरणे बाहेर आली तरी चेहरा कोरा ठेवून "भ्रष्टाचार्‍यांची अजिबात गय करणार नाही", "आमच्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही", "दोषींना शिक्षा होईल" अशी छापील वाक्ये उच्चारतात तेव्हा खेदाने का होईना पण हसू आल्याखेरीज रहात नाही.