माझी पार्श्वभूमी :
१) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण.
२) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली.
३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
वाचने
42307
प्रतिक्रिया
275
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम दो हमारे बारा नाही
In reply to चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वयाच्या नवव्या वर्षापासून
हे सगळे अधिकारी सतत प्रवासात आणि संपर्कात असतात...
In reply to वयाच्या नवव्या वर्षापासून by पिशी अबोली
बुस्ल आय.
In reply to वयाच्या नवव्या वर्षापासून by पिशी अबोली
आपल्या घरी सरसंघचालक येऊन
In reply to वयाच्या नवव्या वर्षापासून by पिशी अबोली
राजू भारतीय
नसबंदीला समर्थन देणार्या
?
In reply to नसबंदीला समर्थन देणार्या by बॅटमॅन
सर्व प्रतिसाद मोजले
या लेखाचे लेखक हे कधीही
हेचं म्हणतो मी. ह्यांना संघ
In reply to या लेखाचे लेखक हे कधीही by श्रीगुरुजी
+१
In reply to हेचं म्हणतो मी. ह्यांना संघ by कॅप्टन जॅक स्पॅरो
जोक ऑफ द डे
In reply to +१ by श्रीगुरुजी
+१
In reply to या लेखाचे लेखक हे कधीही by श्रीगुरुजी
....सर्व मिपाकरान्ना
ज्ञान पाजळणे
वाचतोय
ब-याच मिपाकरांप्रमाणेच मी पण
नसबंदी ऐवजी खच्चीकरण असा शब्द वापरायचा असावा, असे वाटले..
ओके,बर, अच्छा, ठिक, .....!
असेच अनुभव येउद्यात...
**
लिंक द्या
In reply to ** by जेपी
व्यनि प्लीज
In reply to ** by जेपी
लिन्क
In reply to व्यनि प्लीज by इष्टुर फाकडा
लिन्क
In reply to व्यनि प्लीज by इष्टुर फाकडा
माफ करा
एका इझम वर भाष्य आहे !!
In reply to माफ करा by जेपी
तुम्हाला अद्याप संघाची स्थापना का झाली? हेच माहीत नाही आहे....
In reply to एका इझम वर भाष्य आहे !! by राजु भारतीय
संघ स्थापना.....
In reply to तुम्हाला अद्याप संघाची स्थापना का झाली? हेच माहीत नाही आहे.... by मुक्त विहारि
अभ्यास वाढवा ..
In reply to संघ स्थापना..... by राजु भारतीय
श्री विटेकर ....
In reply to अभ्यास वाढवा .. by विटेकर
>>> " मी सलग दहावर्षे संघाचे
In reply to एका इझम वर भाष्य आहे !! by राजु भारतीय
तसे नव्हे, गुर्जी,.....
In reply to >>> " मी सलग दहावर्षे संघाचे by श्रीगुरुजी
"सलग दहावर्षे संघाचे काम करतो
In reply to तसे नव्हे, गुर्जी,..... by राजु भारतीय
+१११
In reply to "सलग दहावर्षे संघाचे काम करतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
काइच्या काइ !
In reply to "सलग दहावर्षे संघाचे काम करतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
दसरा परेड ? परेड हा शब्द
In reply to काइच्या काइ ! by राजु भारतीय
सामान्य बॉ !!
In reply to दसरा परेड ? परेड हा शब्द by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे
In reply to सामान्य बॉ !! by राजु भारतीय
ह्म्म
In reply to त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे by ग्रेटथिन्कर
एकंदर संघ म्हणजे ठराविक लोकांना' सायकोलॉजिकल एडव्हांटेज 'मिळावा यासाठी जगवलेली संघटना आहेमना वीट मानू नको बोलण्याचा .....त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे
In reply to त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे by ग्रेटथिन्कर
@ ग्रे.थि.
In reply to त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे by ग्रेटथिन्कर
जरा चश्मा काढा
In reply to सामान्य बॉ !! by राजु भारतीय
प्रार्थनेत " त्वया हिन्दुभूमे …" असे का म्हणतात ?कारण अनादी कालापासून ही हिण्दुभूमी आहे म्हणून ! हिमालय्स्मारभ्यं याव हिण्दुसरोवरम | तं देव निर्मितं देशं हिण्दुस्थान प्रच़क्षते ( शुद्ध लेखन चु भु द्यावी घ्यावी)मुसलमानांची बाबरीमुसलमानांची बाबरी??? सर , जरा इतिहासाचा अभ्यास वाढ्वा . ते प्रभु रामचंद्राचे जन्मस्थान आहे !त्यावर बाबराने आक्रमण केले.. याला प्राज्ञ मराठीत चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ?अनेक वेळा चर्चा घडली आणि बिघडली.. नपुंसक सरकारने काही ही केले नाही. प्रभु रामचंद्र हा भारताचा राष्ट्र्पुरुष आहे आणि रामजन्मभूमी हा करोडो हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न होता. अनेक कारणांनी नाकरल्याच्या संतप्त भावनेचा उद्रेक हा बाबरी पतनाला कारणीभूत ठरला. विहिंप चे आंदोलन हे फक्त तात्कालिक कारण ठरले !मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ?तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थच समजला नाही. "हिंदू" आणि "कडवा" हे परस्पर विरोधी शब्द आहेत ! हिन्दू शब्दात मुसलमान च काय पण अखिलमानव जातिला सामावून घेण्याची शक्ती आहे.संघाचे ( भाजपचे नव्हे ) किती पदाधिकारी, किती प्रचारक मुसलमान आहेत ? मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ?संघाचे पदाधिकारी अथवा प्रचारक मुसल्मान नाहीत कारण त्यांची उपासना पद्दह्ती ते मान्य करणार नाही! त्यांचेच अन्य बांधव त्यांना जगणे मुष्किल करतील ! ईश्वर अल्ला तेरे नाम " हे म्हणण्यासाठी जी सहिष्णुता लागते , ती दुर्दैवाने त्यान्च्या उपासना पद्द्ध्तीत समाविष्ट होऊ शकत नाही ! पण त्या मर्यादेत राहून अनेक मुस्ल्मान संघाचे हितचिंतक आहेत च की! आणि सण साजरा करण्यासंदर्भात - संघ ही हिंदूचे सारे सण साजरे करत नाहीच , ज्यामुळे आपला विजिगिषु इतिहास आणि दिव्य परंपरांचे आणि पराक्रमी महापुरुषांचे स्मरण होते अश्याच सणांची संघात पद्ध्त आहे. रच्याकने तुम्ही कोणते मुस्लिम सण तुमच्या घरात साजरे करता ? (प्रामाणिक उत्तर अपेक्षित आहे )फार मुसलमानांचा पुळका येउन जर आपण संघविश्वात वावरलात तर बहिष्कृत व्हाल.कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला - अश्या बहिष्कृतांची संघट्ना आपण बांधावी. शुभस्य शीघ्रम !कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला -
In reply to जरा चश्मा काढा by विटेकर
दोन गोष्टी करा.
In reply to सामान्य बॉ !! by राजु भारतीय
शिरखुर्मा... आरेएसेसवाले
In reply to दोन गोष्टी करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ग्रेट थिन्कर
In reply to शिरखुर्मा... आरेएसेसवाले by ग्रेटथिन्कर
.
सगळ्या धोब्यांना हा शाप
In reply to . by उद्दाम
.
In reply to सगळ्या धोब्यांना हा शाप by मृत्युन्जय
तादाद बढाओ कौम खतरे मे है
.
In reply to तादाद बढाओ कौम खतरे मे है by होबासराव
@ उद्दाम
In reply to . by उद्दाम
.
In reply to @ उद्दाम by अनिरुद्ध प
तुमच्या
In reply to . by उद्दाम
२२४ आणखी एक.... २२५
आयला या धाग्याची नसबंदी करा
ना बट्ट्मण्ण़ ना
In reply to आयला या धाग्याची नसबंदी करा by बॅटमॅन
च्यामारी
तुम्ही तेच "उद्दाम " का हो?
In reply to च्यामारी by गजानन५९
.
In reply to च्यामारी by गजानन५९
.
In reply to . by उद्दाम
ऑ ?????
वाचनमात्र
या धाग्यावर आता कोणतीही विधायक चर्चा न होता फक्त उखाळ्यापाखाळ्या काढणे सुरू झाल्याने वाचनमात्र करत आहोत.