Skip to main content

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

लेखक चिर्कुट यांनी गुरुवार, 13/12/2012 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा दिवाळीच्या काळात १ आठवड्याच्या सुट्टीवर घरी गेलो होतो. माझे वाढलेले आकारमान पाहुन बरेच टोमणे बसत होते, तरीही फराळ/इतर खाणं हादडणे चालूच होते. :) पण एके दिवशी अचानक लक्षात आलं की माझा मलाच मी उचलत नाहीये.. :( त्यात माझ्या घरी शुगरची हिस्ट्री आहे, त्याची भीती आहेच. मग ठरवलं की आता शेंडी तुटो वा पारंबी, वजन कमी करणारच.. मी असं बोलून दाखवायचा अवकाश की सल्ल्यांचा भडीमार सुरु झाला. 'एक वेळचं जेवण बंद कर', हे खाणं सोड, ते खाणं सोड, असा व्यायाम कर, तसा प्राणायाम कर, नुसतं हैराण करुन सोडलं होतं सगळ्यानी. शेवटी गुगलबाबाला शरण गेलो आणि माझ्या समजाप्रमाणे आणि जितकं शक्य आहे त्यानुसार खालील प्लॅन बनवला.. १. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास २. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल ३. १० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा ४. १२:३० वा जेवण (४ छोटे फुलके आणि भाजी) ५. ३:३० / ४:०० वा फळं (टरबूज/कलींगड/चिक्कू/पेरु/सफरचंद - मिक्स) ६. ४:३० ते ६:०० जिम (२० मि ट्रेडमिल १७५ कॅ. बर्न + २० मि. इलिप्टिकल १७५ कॅ. बर्न + सायकलिंग ५० कॅ. बर्न + १०मि. वजन/अ‍ॅब्स) ७. ७-७:३० वा स्प्राऊट्स / एखादं फळ / उकडलेली अंडी २ (मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का?) ८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात) या सगळ्याबरोबर दिवसभर जवळपास ४ लिटरपेक्षाही जास्त पाणी पिणे, दिवसातून दोन -तीन वेळा ३ मजले पाय-या चढणे-उतरणे.क्वचित रात्री बॅडमिंटन खेळणे इ. चालूच आहे. आठवड्यातून ५ दिवस जिम जातोच जातो. विकांताला खेळणे/फिरणे इ. होतं. अर्थात अजून एकटा जीव सदाशीव असल्यामुळे आणि माझे पाककौशल्य वादातीत असल्यामुळे 'किती खायचं' यावर असला तरी 'काय खायचं' यावर कंट्रोल थोडा कमीच आहे. :) शक्यतो तेलकट पदार्थ खात नाही. बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स एकदम बंद. स्मोकिंग आणि ड्रिंक सुदैवाने मी करतच नाही. गेल्या १२-१५ दिवसांत वजन १.५ किलो कमी झाले आहे. अजून १० किलो कमी करायचा प्लॅन आहे. घाई अजिबात नाही तरीही ६ महिन्यात गोल अचिव्ह व्हावं असं वाटतय. वरील वेळापत्रकामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? अजून काही टिप्स असतील तर प्लीज सुचवा..

वाचने 64636
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

तुम्हाला डांस करायला आवड्तो का ? उत्तर हो असेल तर तात्काळ एखादा डांस क्लास लावा भरपुर व्यायाम होतो त्याने डाएटींग्ची जरज इल्ले :)

सध्या पाण्याचा दुष्काळ असल्याने कमी पाणी प्या आणी १ दिवसाआड जेवन करा १०१ % फायदा होइल व्यायामाच्या फंदात नका पडु उगीच हात पाय गळायचा

टीपा १.येथील पा.कृ . वाचू नये. (गणपा , सानिका , अपर्णा हे प्रमुख शत्रू मानून राहावे. ह्याचे प्रतिसादही वाचू नये !) २.विषय काहीही असला तरी काही धागे चवी ने खाण्याच्या उच्च शोकाचे गुणगान करणारे असतात तेंव्हा कोणताही धागा साशंकतेने उघडावा. (नाममात्र अपवाद - अकुपेडिया ) ३.शक्यतो तेलकट पदार्थ खात नाही. बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स एकदम बंद. मग येथे मिपा काय कार्तुसा रे .... ४.स्मोकिंग आणि ड्रिंक सुदैवाने मी करतच नाही. हो का बर्र .... ५.अर्थात अजून एकटा जीव सदाशीव असल्यामुळे क्र. चार आणि पाच शादी .कॉम वरून चुकून कॉपी - पेस्त झालेत का ? असो निग्रह राहु दे .म्हणजे (.....पुढच्या दिवाळी पर्यंत २ चे ४ नकोत )

In reply to by तर्री

>>गणपा , सानिका , अपर्णा हे प्रमुख शत्रू मानून राहावे. यांच्या तर पाकृ असतात. आपले तर नावदेखील वर्ज्य केले पाहिजे नाही का? :) कृ.ह.घ्या. आणि चवीने (अती) खाणे, मिसळीसारखे पदार्थ जीव की प्राण असणे यामुळेच ही वेळ आली आहे.. :)

मी माझ्यासाठी हे दलिया तयार केले होते. मला चांगला फायदा झाला. अर्थात वैद्यकिय सल्याने मी हे घेतले नाही. दलियासाठी वापरलेले साहीत्यःमूग, बाजरी, तांदुळ, गहू चारही धान्ये प्रत्येकी पाव कि. घेतली. ती वेगवेगळी थोडी भाजून रवाळ दळली. हा तयार दलिया दोन खाण्याचे चमचे पाण्यात किंवा ताकात शिजवावा. रात्रीच्या जेवणाऐवजी घ्यावा. यात मिठाबरोबर स्वादासाठी जिरेपूड आणि आवडत असल्यास लसुण घालावी. दिवाळी झाली की नोव्हेंबर ते एप्रिल सहा महीने गोड बंद आणि दलिया सुरू.. वजन आटोक्यात आणि मे महिन्यात मनसोक्त आंबे खायला मोकळीक... आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत सगळे सण व्यवस्थित भरपेट साजरे करावे. संतुलित आहार वर्षासाठी!!!!

१)सकाळी उठल्यावर १ ग्लास गरम पाणी १च.मध व १/४ लिंबु पिळुन घेणे त्यानंतर १ तास चालणे. २)फिरुन आल्यावर १ कप चहा/कॉफी/दुध(साय काढलेले)साखर(sugar free)कमी घालुन घेणे. ३)सकाळचा नाश्ता:९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका,१ चहाचा चमचा साजुक तुप,२ चहाचे चमचे कोणतीही चटणी. ४)दुपारचे जेवणःजेवणापुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके,१ नैवद्याची वाटी कोणतीही भाजी(बटाटा सोडुन ),१ फुलपात्र वरणाचे पाणी,डाळ अजिबात नको,काकडी ,गाजर्, कोवळा मुळा , टोमॅटो,बीट्, कांद्याची पात्,सॅलेड पान,कोबीची कोशिंबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते. ५)भात पुर्णपने बंद करावा. ६)संध्याकाळचा नाश्ता:४ वाजता १ कप चहा/कॉफी/दुध(साय काढलेले)साखर(sugar free)कमी घालुन घेणे. ७)रात्रीचे जेवण :दुपारप्रमाणेच घ्यावे. ८)जेवणात गोड पदार्थांचा समावेश करु नये.तसेच चिक्कु, केळी,द्राक्ष,आंबा ही फळ सोडुन बाकी सर्व फळ खावीत. चॉकलेट,बेकरी प्रॉडक्ट्स ,शितपेय्, फास्ट फुड , हॉटेल, मिठाई बंद करावी... ९)मांसाहार्,मत्स्याहार्, अंड पुर्णपने बंद... १०)योग्य आहाराला,योग्य व्यायामाची जोड दिल्यास दर आठवड्याला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही. ११)१ ग्रम मिठ शरिरीरात साधारणतः ६० मिली पाणी धरुन ठेवते त्यामुळे मिठ जितके कमी खाल्ले जाईल तितकी सूज व स्थूलपणा कमी होतो त्यामुळे जेवणात मिठ कमी घ्यावे. १२)महत्वाचे: वरिल माहिती सामान्य प्रकृतीच्या रुग्नांकरीता आहे,जर काही इतर शाररीक तक्रारी असतील तर जवळच्या डॉक्टरकडुन किंवा वैद्याकडुन उपचार करुन घ्यावेत....

संध्याकाळी ४:३० ला घरी परत येवू शकता ..... आहाहा काय ते सुख !!!! आम्ही सकाळी ९:३० ला हापिसात गेलो कि डायरेक्ट बायकोने आता घरी येतोस कि कसे म्हणे पर्यंत नो time .........

पियुशा, अनन्या, बाबा धन्यवाद. शक्य तेवढे सल्ले पाळण्याचा प्रयत्न करेन. खबो (मस्त नाव आहे :) ), ४:३० ला घरी नाही हो, कचेरीमध्येच जिम आहे. ४:३० ला जातो कारण नंतर कॉल्स असतात. तसे सध्या सगळे इंग्रज ख्रिसमसच्या तयारीमध्ये गुंग असल्याने तुलनेने काम कमी आहे इतकेच. म्हणूनच तर मिपावर येऊन टंकण्याइतका वेळ मिळतोय.

नुकताच व्हायरल थ्रोट इन्फेक्शन मधून बरा झालोय. पण त्यामुळं चिक्कार वीकनेस आलाय.. काय बरं करावं तो जाण्यासाठी..??

१. भूक लागेल तेंव्हाच खा २. अन्नपदार्थांच विश्लेषण अजिबात करू नका, जे आवडेल ते खा. ३. मजा येईल इतपत व्यायाम करा (किंवा पुरेसा व्यायाम होईल असा कोणताही खेळ शिका आणि खेळा) ४. वजन करणं किंवा सतत ते कमी करण्याचा विचार करणं सोडून द्या यथावकाश तुमचं वजन नॉर्मल होईल.

एक साधं गणित सांगतो. १ पौंड (जवळ जवळ १/२ किलो ) वजन कमी करण्यासाठी शरीराला ३५०० कॅलरीज जाळाव्या लागतात. आपल्या शरीराला आहे तेच वजन राखण्यासाठी वजनाच्या गुणिले १८ एवढ्या कॅलरीज लागतात. वजन पौंडात घ्या. हा थंबरूल आहे पण उत्तर अचूक येते. बॉडी मास इंडेक्स च्या गणितात नेत नाही तुम्हाला त्यापेक्षा वरचा फॉर्मूला सोपाय. उत्तर अगदी किंचित फरकाने सारखेच येते. आणि खूप आकडेमोड वाचते. समजा माझे वजन ६० किलो आहे तर मला ते तेवढेच राखण्यासाठी ६०x २.२x १८ = २३७६ कॅलरीज ची रोज आवश्यकता आहे. आठवड्याला १ पौंड कमी करायचं असेल तर मला २३७६ कॅलरीज मधून ५०० कॅलरीज वजा करायला लागतील. म्हणजे १८७० कॅलरीजच रोज घ्याव्या लागतील. किंवा ५०० कॅलरीज जळतील इतका व्यायाम करावा लागेल. आपण कमी केलेल्या ५०० कॅलरी ची उर्जा आपले शरीर साठवलेली चरबी जाळून मिळवते. याला कॅलरी डेफीसीट चा नियम म्हणतात. तुम्ही डायेट आणि व्यायाम दोन्हीही करताहात हे एकदम भारी. बाकी हे गणित लक्षात ठेवा , वजनाची नोंद ठेवा, आंतरजालावर कशामध्ये किती कॅलरीज असतात याचे तक्ते मिळतील ते वापरा, प्रगतीचा आढावा घेत राहा आणि १ ते १ १/२ पौंड आठवड्याला यापेक्षा जास्त कमी करण्याचा अट्टहास करू नका. अजून आणखीन एक कुठल्याही एरोबिक व्यायाम प्रकारात (उदा. सायकल चालवणे , पळणे , चालणे , इलिप्टिकल,पोहणे यात चरबी जळण्यास सुरवात तो व्यायाम सुरु केल्याच्या २० मिनिटांनंतर होते त्यामुळे किमान चाळीस मिनिटे तो व्यायाम करणे फायद्याचे ठरेल ) वजन हळूहळू वाढलेले असते ते एक दोन आठवड्यात जादू झाल्यासारखे कमी होईल अशी अपेक्षा शरीरावर दुष्परिणाम घडवते . Bestluck.

In reply to by हारुन शेख

. वजन पौंडात घ्या. हा थंबरूल आहे पण उत्तर अचूक येते. बॉडी मास इंडेक्स च्या गणितात नेत नाही तुम्हाला त्यापेक्षा वरचा फॉर्मूला सोपाय. उत्तर अगदी किंचित फरकाने सारखेच येते. आणि खूप आकडेमोड वाचते. समजा माझे वजन ६० किलो आहे तर मला ते तेवढेच राखण्यासाठी ६०x २.२x १८ = २३७६ कॅलरीज ची रोज आवश्यकता आहे. आठवड्याला १ पौंड कमी करायचं असेल तर मला २३७६ कॅलरीज मधून ५०० कॅलरीज वजा करायला लागतील. म्हणजे १८७० कॅलरीजच रोज घ्याव्या लागतील. किंवा ५०० कॅलरीज जळतील इतका व्यायाम करावा लागेल. आपण कमी केलेल्या ५०० कॅलरी ची उर्जा आपले शरीर साठवलेली चरबी जाळून मिळवते. याला कॅलरी डेफीसीट चा नियम म्हणतात.
पौन्ड आणि किलोत काय तर गफलत होतीय काय हो म्हणलो मी.६०x २.२x १८ = २३७६ च्या ऐवजी १२०x२.२१८ =४५७२ असे हवे काय?

मी मध्यंतरी माझ्या नवर्‍याच वजन घटवल होत. ( मला गरज नाही काही असल काही करण्याची, मी अजुन चवळीच्या (भरलेल्या जून ) शेंगेसारखी आहे हो!) कस ते सांगते. कुछ नही, दुपारच्या डब्यात सरळ सरळ तडका मारुन सॅलड. यात लेट्युस, कोबी, पनिर्(प्रोटीन) बारिक चिरलेल गाजर्(जरा जाड असल की तस्स परत यायच) टॉमॅटो, स्नो पिज, असा काही बाही रतिब असायचा. नुसत्या भा़ज्यांनी पोट भरायच नाही म्हणुन पनिर अ‍ॅड करायचे मी. एकुण काय तर एक वेळच्या जेवणातून कार्बो बंद. चार आठवड्यात ६ किलोज. काहीही थकवा न जाणवता. अर्थात नवरोबा पुर्वी सरळ सरळ आखाड्यात जायचे. वस्तादाच्या हाताखाली लाल मातीत व्यायाम करायचे त्यामुळे असेल पण वजन झटक्यात उतरल एव्हढ मात्र खर. संध्याकाळी नेहमीच जेवण. आठवड्यातुन एकदा नॉनव्हेज. आम्ही बाहेरच विशेष खात नाही. अगदी मला कंटाळा आला माझ्या हातच खाउन तरच आम्ही बाहेर जेवतो. मला चार लिटर पाणी जास्त वाटतय. आपली गरज दोन लिटर दिवसाला पाण्याची असते. तर सांगायचा मुद्दा एकच, भात भाकरी चपाती थोड कमी करुन भाज्या दही दुध जास्त घ्या. फार फरक जाणवेल. अन हो आठवड्याच्या शेवटी मिपावरची एक तरी डीश बन्वुन हाणाच. तब्येतीला एकदम भारी!!

In reply to by स्पंदना

मला चार लिटर पाणी जास्त वाटतय. आपली गरज दोन लिटर दिवसाला पाण्याची असते. >>>> होय ४ लीटर जास्ती होतंय. अति सर्वत्र वर्जयेत. जास्ती पाणी मूत्रपिंडांवर ताण निर्माण करू शकते. २ १/२ लिटर योग्य आहे. शिवाय चहा , ज्यूस फळे यातून आपल्याला पाणी मिळत असतेच. शरीरातील पोषक द्रव्ये खूप जास्ती पाणी पिल्याने लवकर ड्रेन आउट होतात.

In reply to by हारुन शेख

शरीरातील पोषक द्रव्ये खूप जास्ती पाणी पिल्याने लवकर ड्रेन आउट होतात.
त्यालाही डिहायड्रेशनच म्हणतात. पाणी धरुन ठेवायचे क्षार विरघळ्उन गेल्याने डीहायड्रेट होतो आपण.

आपण " एकटाजीव" असल्याने सोपा उपाय सांगत आहे. आपले वजन सर्व उपवर मुलींच्या बापावर कसे पडेल ते पहा ! दोन महिन्यात फरक जाणवेल.

In reply to by चौकटराजा

त्यापेक्षा आपल्याला पसंत न पडलेल्या मुलीच्या वडिलांना तिच्यासाठी स्थळे शोधण्यास मदत, पायपीट करणे हा एक उपाय असू शकतो. याने वजन नक्कीच कमी होईल. ;)माझ्या मित्राच्या भावाचे वजन बरेच वाढले आणि लग्नाळू झाल्यावर काही केल्या कमी होईना, म्हणून त्या भावाने त्याच्यासारख्याच मुलीशी लग्न केले. सोपा मार्ग. कोणी काही बोलायला नको. ;)

मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का? >>>>>>> दुष्परिणाम नाहीत पण जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करताहात तर बलक टाळलेला बरा. कारण त्यात शुदध कर्बोदके असतात व जास्तीची कर्बोदके शरीर चरबीच्या स्वरूपात साठवते. त्याउलट अंडयाच्या पांढरया भागात प्रथिने असतात जी हळूहळू पचतात पर्यायाने शरीराला ती पचविण्यासाठी जास्त उर्जा आणि वेळ लागतो. शिवाय प्रथिनयुक्त आहार जास्त घेतल्यास पोट जास्ती वेळ भरल्यासारखे राहते आणि मेंदूकडून येणारी भूक लागण्याची सूचना लांबते. fish Oil Supplement पण चालू करा. त्यामुळे रक्तातला tryglisaride नावाचा घाणेरडा कोलेस्टेरोल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारेल.

बाब्बौ! व्यायाम बराच करताय आणि वर जास्त पाणी पिताय असं वाटतय. सध्या ऋजुता दिवेकरबाईंचा बराच बोलबाला आहे. त्यांची पुस्तके वाचून बघा. त्या बाईंचे एक पुस्तक, 'डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट' एवढ्यात वाचनात आले. त्यात त्यांनी दर दोन तासांनी थोडे खायला सांगितल्यामुळे मला पुस्तक भयंकर आवडले. ;)

तुमच्या डाएट मधे थोडे बदल सुचवतेय, जे तुम्हाला वजन कमी करायला उपयोगी पडतील. १. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास या ऐवजी सकाळी उठल्यावर साधारण व्यायामाच्या पाउण ते १ तास आधी १ कुठलेही सिझनल फळ खा. २. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल या सकाळी केलेल्या व्यायामानंतर लगेच १० ते १५ मिनिटात ब्रेकफास्ट करा जो तुम्ही १० वाजता करता.फक्त यातुन चहा वगळा. ३. १० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा या वेळी तुम्ही चहा + काही हलका आहार (शेंगदाणे, पिस्ता, बदाम, खारीक, कुरमुरे इ. उत्तम) घेउ शकता. ४. १२:३० वा जेवण (४ छोटे फुलके आणि भाजी) इथे वरण भात, सॅलेड व एखादी हिरवी भाजी जेवणात घ्या. ५. ३:३० / ४:०० वा फळं (टरबूज/कलींगड/चिक्कू/पेरु/सफरचंद - मिक्स) ऑफिसात मिळणारी फ्रुट्प्लेट खात असाल तर त्याएवजी १ अख्खे फळ खा. अगदिच भुकेची जाणीव होत असल्यास हलके सॅडविच, खाकरा, मनुका इ. खा. ६. ४:३० ते ६:०० जिम (२० मि ट्रेडमिल १७५ कॅ. बर्न + २० मि. इलिप्टिकल १७५ कॅ. बर्न + सायकलिंग ५० कॅ. बर्न + १०मि. वजन/अ‍ॅब्स) सकाळी व्यायाम केला असेल तर परत ते पण दीड तास व्यायामाची गरज नाही. हा व्यायाम तुम्ही सकाळीच करुन घ्या. ७. ७-७:३० वा स्प्राऊट्स / एखादं फळ / उकडलेली अंडी २ (मी बलक सुद्धा खातो. याचा नक्की दुष्परिणाम काही आहे का?) या वेळी एखादे सूप किंवा ताक पण घेउ शकता. ८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात) यातही हिरवी भाजी, सॅलेड, चटण्या, कोशिंबीर, बीट, दही अ‍ॅड करा. हे बदल केलेत तर वजन हळू हळूच कमी होइल, पण परत वाढणार नाही.

In reply to by michmadhura

१० वा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/ब्रेड ओम्लेट) + चहा या वेळी तुम्ही चहा + काही हलका आहार (शेंगदाणे, पिस्ता, बदाम, खारीक, कुरमुरे इ. उत्तम) घेउ शकता. हा सगळा आत्यंतीक गुरु आणी बृहणिय आहार आहे, याने मेद वाढतो कमी होत नाही...

In reply to by बाबा पाटील

अहो हे सगळे quality eating आहे, जे रोजच्या आहारात असेल तर पोषक तत्वे मिळतात. शरीरातली चरबी जाळण्यासाठी पण हा मेद आवश्यक आहे. नाहीतर कमी वयात केस गळून टक्कल पडणे, सांधेदुखी अशा तक्रारी चालू होतील. याच बरोबर रोज सकाळी चीझचा अर्धा तुकडा खावा, याने वजन वाढणार नाही, चेहेर्‍यावर तजेला येइल, सुरकुत्या येण्याची प्रक्रिया लांबेल, तसेच वजन कमी झाल्यावर जाणवणारे strech marks कमी होतील. वजन कमी करायला घेतले की सगळे जण फॅट कमी करायच्या चूकिच्या पद्धती अवलंबतात तिथेच चुकतात.

In reply to by michmadhura

तुम्ही जो आहार सांगत आहात हा स्वस्थ व्यक्तीलाही चालणार आहे,मात्र मेदस्वी व्यक्तीच्या बाबतीत् आपन जो आहार घेतो त्यापासुन पुढे रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणी शुक्र या क्रम बिघडुन मधला जो मेद आहे तो अतिरिक्त प्रमाणात उत्पन्न होत असतो,वरिल पैकी थोडा जरी आहार त्याला गेला की परत ती प्रक्रिया सुरु होते.दुसरी गोष्ट जी केस गळणे हे पित्त प्रकृती आणी प्रकुपित पित्त या कारणांमुळे होते,तर सांधे दुखी ही वात प्रकृती व धातुक्षय्,तसेच भारवृध्दी असणार्‍या व्यक्तींना गुढगे वरती अत्याधीक भार पडणे यामुळे होते.त्यामुळे स्थुल व्यक्तीला मेद वाढवणार आहार वर्जच...

In reply to by बाबा पाटील

तुम्ही सांगत आहात ते ही बरोबर आहे, पण हा मेद त्यांची चरबी जाळण्यासाठी आवश्यक आहे. भज्या, वेफर्स, वडापाव, बर्गर आणि असे अरबट चरबट खाणे यातुन शरीराला नको असलेला मेद मिळतो जो नक्कीच टाळायचा आहे. एकदमच शरीरातून सगळी चरबी नाहीशी करायला गेलो तर शरीर चालणार कसे? अजुन एक म्हण्जे बटाटा तळून न खाता तो उकडून खावा. नक्की काय , कसे आणि किती खावे हे माहीत असायला हवे.

In reply to by बाबा पाटील

The potato is best known for its carbohydrate content (approximately 26 grams in a medium potato). The predominant form of this carbohydrate is starch. A small but significant portion of this starch is resistant to digestion by enzymes in the stomach and small intestine, and so reaches the large intestine essentially intact. This resistant starch is considered to have similar physiological effects and health benefits as fiber: It provides bulk, offers protection against colon cancer, improves glucose tolerance and insulin sensitivity, lowers plasma cholesterol and triglyceride concentrations, increases satiety, and possibly even reduces fat storage Due to carbohydrate content, potatoes are considered to make a person obese if used in excess म्हणूनच सांगते की काय आणि किती खावं ते माहीत असायला हवं.

In reply to by michmadhura

पुस्तक जे सांगतात ते सगळच खर नसत्,काही शेकड्यात बटाट्यांच्यावर उपचार केलेत म्हणुन सांगतोय बटाट्यांना बटाटा वर्ज्य.....

In reply to by बाबा पाटील

तुमचा अनुभव नक्कीच माझ्यापेक्षा जास्त असेल. शिजवण्याच्या पद्धती आणि खाण्याचे प्रमाण यात संतूलन ठेवले तर बटाटा खायला हरकत नसावी. मुळात सांगायचा मुद्दा हा, की वजन कमी करण्यासाठी करत असलेले डाएट तुम्ही किती दिवस, किती महीने पाळू शकता? ते सोडल्यावर परत वजन वाढेल की. आणि इतके दिवस डाएटवर आहे म्हणून न खाल्लेले पदार्थ खाल्लेत तर वजन दुप्पटीने वाढेल. उलट तारतम्य ठेवून सर्वसमावेशक आहार घेतला तर हळू हळू पण नक्कीच (परत न वाढणारे) वजन कमी होइल.

In reply to by बाबा पाटील

अहो माझा तुम्हाला विरोध नक्कीच नाही. मी फक्त माझं मत मांडलं. प्रत्येकाचं शरीर, अनुवंशिकता, दिनचर्या, राहणीमान, झोपेचे तास, कामाचे स्वरूप, ताण हे वेगवेगळे असते.त्यावरच त्याचं वजन अवलंबून असते.

In reply to by michmadhura

८. ९ वा डिनर (२ छोटे फुलके + भाजी + थोडासा वरण-भात) यातही हिरवी भाजी, सॅलेड, चटण्या, कोशिंबीर, बीट, दही अ‍ॅड करा. येथे २ छोते फुलके खाण्याएवजी भाकरी(नाचणी, ज्वारी, तांदूळ किंवा मिक्स पिठं) खा.

इतर सर्वांचे आभार. >> चरबी जळण्यास सुरवात तो व्यायाम सुरु केल्याच्या २० मिनिटांनंतर होते त्यामुळे किमान चाळीस मिनिटे तो व्यायाम करणे फायद्याचे ठरेल. हे माहिती नव्हतं. मग एका वेळी ट्रेडमिल, इलिप्टिकल आणि सायकलिंग न करता यापैकी एकच ४०-४५ मि. रोज आलटून पालटून करावे का? आधी सांगितल्याप्रमाणे 'काय खायचं' याचा चॉईस थोडा कमी आहे, तरीही मीचमधुरा नी सांगितलेले बदल झेपतील असे वाटताहेत. प्रयत्न करेनच. :) इतर 'जनोबा रेगे' टाईप सल्ल्यांबद्दलही आभार. करमणूक झाली.. :) 'वजनाचा मार्ग या देखील काट्यांतून जातो' हे कळालं. - चिर्कुट

In reply to by चिर्कुट

हे माहिती नव्हतं. मग एका वेळी ट्रेडमिल, इलिप्टिकल आणि सायकलिंग न करता यापैकी एकच ४०-४५ मि. रोज आलटून पालटून करावे का? >>>>>>>>>>>>एकदम बरोबर. तसाही व्यायाम आलटून पालटून करावाच. एकाच प्रकारचा व्यायाम खूप दिवस करत राहिल्याने हळूहळू शरीराला त्याची सवय होते आणि मग त्यातून इच्छित परिणाम उशिरा मिळतात. Crossfit हया सध्या चालती असलेल्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये असेच रोज वेगवेगळे व्यायाम करून घेतले जातात. अत्यंत सक्षम शरीर मिळते यातून. अनुभवाचे बोल.

सगळं पटलं . पण १. सकाळी ७:३० वा उठून कोमट पाणी + लिंबू - १ ग्लास २. त्यानंतर थोडं स्ट्रेचिंग + प्राणायाम + वजन उचलणे - ३० मिनिट टोटल ह्या दोन मुद्द्यांमध्ये दोन गोष्टी प्लस त्यातनं एक मायनस केलियेत राव :( समजायला लै अवघड गेलं :(

मी जसा रात्री झाडावर उलटा लटकतो त्याप्रमाणे तुम्हीही लटका. बघा नक्की वजन कमी होईल.

वजन कमी करण्यासाठी सोप्पा उपाय पण तितकाच कठीण करायला ते म्हंजे ताटात जे काही जेवायला येईल ते नाक न मुरडता खावे म्हंजे मन प्रसन्न असेल तर अन्न लवकर पचत व भरपुर चालाव.

रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट्स टाळावेत. तसेच, ते जेवण रात्री न घेता सूर्यास्तापूर्वी घ्यावे. सूर्यास्ता नंतर घेतलेल्या कुठल्याही आहारातील उष्मांक (कॅलरीज) तिन पट होतात असं आयुर्वेद मानतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठेकर काका अस कुठल्या संहितेत आल आहे हो ? सुर्यास्तानंतर भोजन केल्यावर कफपित्तांची वृद्धी होते.अन्न अपाचित राहत्,त्याचा व तुमच्या कॅलरीजचा फारसा संबद्ध नाही.स्थूलतेच्या अनेक कारणांपैकी ते एक आहे....

In reply to by बाबा पाटील

दूरदर्शनवरील एका आयुर्वेदाचार्याच्या मुलाखतीत वरील माहीती कळली. बाकी, माझा उपहारगृहाचा व्यवसाय मुख्यतः सूर्यास्तानंतर जोर धरतो. त्यामुळे लोकं माझा सल्ला न ऐकतील तर मला आनंदच होईल.

सूर्यास्ता नंतर घेतलेल्या कुठल्याही आहारातील उष्मांक (कॅलरीज) तिन पट होतात असं आयुर्वेद मानतं
मेलो!!!!!!!!!!! व्हिस्कीच्या एका पेगात एरवी १४० कॅलरी असतात. सुर्यास्तानंतर ४२० होणार???????????

अरे वा ! वजन उतरवावंसं वाटलं आणि कार्यवाहीही सुरू केलीत याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा ! मला यातलं कळत नाही पण वजनाच्या आकड्यांचा बाऊ करू नका असं सुचवावंसं वाटतं. एकटा जीव वरून वय कमी असेल असा अंदाज आहे. दोरीवरच्या उड्यांनी वजन लवकर कमी होते. हा व्यायाम कुठेही आणि कधीही करता येण्यासारखा आहे. व्यायाम असा असावा ज्यात भापूर घाम तर यायला हवा पण गळून गेल्यासारखेही वाटणार नाही. असा अनुभव आला तर जाणकारांचा सल्ला घ्यावा.

छान. मलाही वजन कमी करायचं आहे, पण व्यायाम म्हटलं की खूपच आळस येतो. बाहेर जाऊन फिरुन यायचा कंटाळा आल्यावर ट्रेडमिलवर चालायचं ठरवलं. नवीन नवीन उत्साहानं सहाएक महिने २० ते ४० मिनिटे चाललोही. जरा उत्साहही वाटायला लागायचा. आता पुन्हा कंटाळा. :( लेख वाचून कुछ हो सकता है असं वाटलं पुन्हा एकदा मनाशी निश्चय करुन पाहतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ नियमित सायकलवरुन घर ते कॉलेजला जात जा. तेवढाच व्यायाम होईल. सध्या मी तरी तोच मार्ग अवलंबला आहे. रोज २० किमीपर्यंत सायकल चालवणे मला फायदेशीर ठरत आहे. - पिंगू

In reply to by पिंगू

रोज २० किमीपर्यंत सायकल चालवणे मला फायदेशीर ठरत आहे. >>> खोटारडा !! मागल्या वेळेपेक्षा चांगला फुगला होतास तु कट्ट्याला पाहिले तेव्हा ;)

In reply to by ५० फक्त

खोट्टं काय, २० किमी म्हणजे २० वयाची किमी असेल शेजारच्या गल्लीतली.
समजा असेल.. पण तिचा वजन कमी करायला काय उपयोग? तेव्हा वीस किलोमीटर हेच अधिक वास्तविक वाटतं आहे.

In reply to by गवि

आता थोड्याच दिवसांत "२०किमी" किंवा "२०_किमी" किंवा "किमी२०" किंवा किमी_२०_फक्त, "मी_२०_कि_मी" असा काही आयडी आल्यास लक्ष ठेवणे आले.

मी कमी केले नाही वजन , पण आहे ते ठेवले आहे ! काही गोष्टी मी करतो त्या १ ) भुक लागली तरच खायचे. ते ही पोट भरेपर्यंत ( डॅड म्हणतात, जेवण्याची सर्वात उत्तम वेळ कुठली ? भुक लागली की ) २ ) पोटापुरतच खायचे, फळ-फळावळ जास्त आणि त्याचा रस ! टिट-बिट्स अजिबात नाही..मी आजवर मॅगी/बिस्किटे/वेफर्स/कुरकुरे खाल्लेली नाहीत, भाज्यांचा वापर जास्त, त्यातल्या त्यात ज्या कडवट असतात त्या. नॉनव्हेज मध्ये मोस्टली अंडेच. ३ ) ड्रिंक्स आणि स्मोकिंग ला नेहमीच लिमीट द्यायची. ( अर्थात कॉकटेल कट्ट्याला नो कंट्रोल !! ;) ) ४ ) शक्य तेव्हढा बाईक/कार/लिफ्ट चा वापर टाळणे. ५ ) वजन कमी करणे वा माझ वजन वाढलयं आणि ते कमी/जास्त करायचे आहे याचा अजिबात विचार न करणे.

आणि ते कमी/जास्त करायचे आहे याचा अजिबात विचार न करणे. = सौ बातोंकी एक बात! वजन शरीराला आहे, आपल्याला नाही हे कळल्याक्षणी एकदम हलकं वाटायला लागतं आणि सगळं लाइनीत येतं

In reply to by संजय क्षीरसागर

लई भारी वजन शरिराचं आणि आपण म्हणजे आत्मा, त्याला काय वजन बिजन नसतं. बरोबर आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आधी तर चुकून मुस्लिम मुलीशी लग्न कर असं वाचलं.. :) मी लाख तयार होईन हो स्लिम मुलीशी लग्न करायला, तिने तयार व्हायला हवे ना..

काही नाही वो सोपा उपाय आहे फक्त दर रविवारी शेतात जाउन भरपुर काम करायचे ज्यांना शेत नसेल त्यांनी माझ्याशि संपर्क साधावा माझे शेत जवळ्च आहे

In reply to by शिवप्रसाद

आमचे शेत आहे गावाकडे.. दर रविवारी नसलो तरी महिन्यातून एकदा जाणे होते. २-३ वेळा मळणी, सोयाबीन, भुईमूग काढणे इ. कामांसाठी गेलो होतो.. नंतर ३-४ दिवस झोपून काढावे लागले :)

किरकिर्‍या पोरीशी लग्न करावे व तिला पाठराखण म्हणुन सोबत तिच्या आईला पन घरी आणावे,महिन्याभरात आहे नाही ते वजन कायमचे कमी होईल.....हि हा हा हा हा.....

In reply to by अत्रुप्त आत्मा

गुर्जी जास्त हालू नका, तो पोटाचा दोर सुटून वर सरकला तर पंचाइत होऊन जाइल हो :) -(साचलेल्या चरबीची लागलेला) सोकाजी