Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 08:35
गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे. वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध. पण गुजराथ निवडणूक, मुंबईत उसळ्लेला जनसागर, मोदी करीश्मा या गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरणार असे दिसत आहे. आत्ताच म.टा.च्या इआवृत्तीत एक महत्वाची बातमी वाचण्यात आली. कसाबला पुण्यात देणार फाशी? त्यात म्हणले आहे की पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला असून कसाबला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ( जेल ) हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते . त्यामुळे कसाबच्या फाशीची अंमलबजावणी पुण्यामध्येच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे . पुढे असे म्हणले आहे की राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत कसाबच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली जाण्याची तसेच फाशीची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. म.टा.ने चे.पु.वर हद्द केली आहे. तीथे म्हणले आहे "दहशतवादी कसाबला पुण्यात दिली फाशी - आर आर पाटील". आत्ताच इसकाळनेसुध्दा चे.पु.वर बातमी अपलोड केली आहे "अजमल कसाबला लटकविले फासावर" - सूत्र बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
  • 28640 views

प्रतिक्रिया

Submitted by विकास on गुरुवार, 11/22/2012 - 01:26

In reply to ५०राव by चिंतामणी

Permalink

धीर धरा....

राष्ट्रपतींनी अफझल गुरूचा दया अर्ज परत गृहमंत्रालयाकडे फेरविचारासाठी पाठवलेला आहे. आज गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत; " “Afzal Guru’s file will not be kept pending for long. I will clear Afzal Guru’s file within 48 hours of its receipt.” वास्तवीक गृहमंत्रालयाने तो आधीच नाकारला होता आणि तसे राष्ट्रपतींना कळवले होते. पण मध्यंतरी गृहमंत्री बदलले म्हणून परत विचारासाठी पाठवला. ही नेहमीची पद्धत आहे असे संबंधीत अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 11/21/2012 - 10:23

Permalink

हुश्श... अ‍ॅट लास्ट.. शेवटी

हुश्श... अ‍ॅट लास्ट.. शेवटी झालं एकदाचं...सरकारी प्रलंबित ख्यालामधे शेवटी कार्यवाही झाली हेही थोडं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 11/21/2012 - 10:29

Permalink

अफजल गुरुला का ठेवलाय म्हणे?

अफजल गुरुला का ठेवलाय म्हणे?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 11/21/2012 - 10:36

Permalink

बाकीचे जाऊ दे. भडवा मेला ते

बाकीचे जाऊ दे. भडवा मेला ते खुप बरे झाले. आणि माणूस मेल्यावर शत्रुत्व संपते वगैरे म्हणणर्‍यांना इथे नको त्या जागी मारण्यात आले आहे हे सामजुन घ्या,
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Wed, 11/21/2012 - 10:54

Permalink

खुप चांगली बातमी.

आज सकाळी हि बातमी चहा टपरीवर ऐकायला आली, आधी वाटल अफवाच असेल पण नंतर खात्री केली आणी आनंद झाला. --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by सन्दीप on Wed, 11/21/2012 - 11:39

Permalink

आनंद झाला.

आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Wed, 11/21/2012 - 13:05

Permalink

सकाळी सकाळी हि बातमी वाचुन

सकाळी सकाळी हि बातमी वाचुन परम संतोष जाहला
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 11/21/2012 - 13:06

Permalink

डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या

डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या कसबाला फाशी देऊन हरामी कॉंग्रेस ने अचूक वेळ साधली आहे.एरवी फाशीच्या पूर्ततेसाठी महिनाभर तयारी करत असतात...गुन्हेगाराच्या मापाचा दोर तयार करणे,त्याची एका डमी पुतळ्या बरोबर चाचणी घेणे ई. पण ह्या वेळी मात्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मात्र माफीचा अर्ज फेटाळून ८ दिवसाच्या आताच त्याला फाशी दिली? कॉंग्रेस ने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. १) कसाब तसाही मरणारच होता,पण डासाला क्रेडीट मिळू नये म्हणून घाई करून त्याला फाशी दिली गेली. २)बाळासाहेबांच्या महानिर्वानामुळे शिवसेना बद्दलची सहन्भूतीची लाट थोडी दूर ढकलली जाईल. ३)२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला हा मुद्दा जोरदारपणे वापरता येईल. ४) सध्या भ्रष्टाचाराच्या गर्तेत पूर्णपणे बुडालेल्या कॉंग्रेसला लोकांचे लक्ष दूर करता येणे सहन शक्य होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 11/21/2012 - 13:12

In reply to डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या by अविनाशकुलकर्णी

Permalink

प्रतिसादाशी असहमत आहे.

प्रतिसादाशी असहमत आहे. १. राष्ट्रपतींनी परवानगी ५ तारखेला दिली. तेव्हा ८ दिवसात फाशी दिली ही माहिती चुकीची आहे २. कसाबला काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या सरकारने फाशी दिलेली नाही. भारतीय न्याय व्य्वस्थेने फाशी दिली आहे ज्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 11/21/2012 - 14:01

In reply to डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या by अविनाशकुलकर्णी

Permalink

निव्वळ तांत्रिक मुद्दा

काथ्याकूटप्रेमापोटी निव्वळ तांत्रिक मुद्दा काढतो आहे.. ;) :- डेंग्यूने अर्धमेला नसावा. पूर्ण बरा झाला असावा. कारण फाशी देण्याच्या नियमानुसार (ऐकीव / वाचीव माहिती) ज्याला फाशी द्यायची तो कैदी फाशी देतेवेळी सर्वसाधारण दृष्ट्या रोगग्रस्त नसावा, अर्थात मेडिकली फिट असावा अशी पूर्वअट किंवा नियम आहे. (अर्थात पूर्वीपासूनचे विकार, मधुमेह, रक्तदाब, एड्स वगैरे यात धरले जात नसणार, केवळ अ‍ॅक्यूट प्रकारचे इन्फेक्शन, सर्दीताप, जखमा आदि रोग धरले जात असणार असा अंदाज आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 11/21/2012 - 14:51

In reply to निव्वळ तांत्रिक मुद्दा by गवि

Permalink

सगळे नियम नेहमी पाळले जातात

सगळे नियम नेहमी पाळले जातात असे सुचवायचे आहे का तुम्हाला ? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 11/21/2012 - 16:45

In reply to निव्वळ तांत्रिक मुद्दा by गवि

Permalink

अर्थात मेडिकली फिट असावा अशी

अर्थात मेडिकली फिट असावा अशी पूर्वअट किंवा नियम आहे.
असं असताना माझाही एक भाबडा पण तांत्रीक प्रश्न. :) एखाद्या एड्स ग्रस्त अपराध्याला (ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे असा) लटकवणार की तो बरा होई पर्यंत वाट पहाणार?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 11/21/2012 - 17:29

In reply to अर्थात मेडिकली फिट असावा अशी by गणपा

Permalink

हॅ हॅ..

सर्व मिसळपावीय शंका गृहीत धरुनच आम्ही प्रतिसाद लिहीतो.. ;) माझ्या मूळ कमेंटीतला खालचा कंस वाचा.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 11/21/2012 - 20:50

In reply to हॅ हॅ.. by गवि

Permalink

सॉरी

गडबडीत कंस वाचलाच नाही. :P
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 11/22/2012 - 19:53

In reply to डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या by अविनाशकुलकर्णी

Permalink

हास्यास्पद विधान

डेंग्यू नि [डंगीने] अर्धमेला झालेल्या कसबाला [कसाबला]
तो डंगीने अर्धमेला झाला नव्हता तर त्यातून तो बाहेर पडला होता, हे आपण तूर्तास सोडून देऊ. पण तो डंगीग्रस्त होता असे वादासाठी जरी मान्य केले, तरी त्यामुळे नक्की सरकारचा काय फायदा झाला असे आपणास म्हणायचे आहे? म्हणजे तो डंगीग्रस्त नसता तर 'कौन माई का लाल मुझे फाँसी पे चढाता है बे?' असे म्हणून त्याने जेलमध्ये धुमाकूळ घातला असता, तेव्हा घाबरून सरकारने त्याच्या डंगीचा फायदा उठवला,जेणेकरून त्याला असे काही करता आले नाही, असे ह्यातून ध्वनित होते आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 11/21/2012 - 13:21

Permalink

कसाबची फाशी एक गौडबंगाल .....

कसाबची फाशी एक गौडबंगाल ....... १. कोणालाही फाशी देताना सूर्योदयापूर्वी फाशी दिली जाते पण कसाब ला सूर्योदय होवून एक दीड तासाने फाशी देण्याचे कारण काय ? २.कसाब च्या आधी ७/८ लोकांनी दयेचा अर्ज केला होता त्यांच्या अर्जावर सुनावणी न होता अचानक कसाब च्या अर्जावर निर्णय कसा ? ३.दया अर्ज फेटाळल्याची बातमी गुप्त ठेवण्याचे कारण काय कि अर्ज फेटाळलाच नाही ४.सुर्योदयानंतर फाशी देऊन सुद्धा त्याचा मृतदेह घाईगडबडीत दफन करण्याचे काय कि पुरावे नष्ट करायचे होते ? ५. CAG चे रिपोर्ट लिक करणारी कॉंग्रेस ची रखेल असणाऱ्या भारतीय मिडिया ला दया अर्ज फेटाळल्याची बातमी कशी काय मिळाली नाही ? ६.कसाब ला डेंगू झाला होता मग त्याचे पुढे काय झाले ? ७.यश चोप्रा सारखा कोट्यावधी माणूस लीलावती मध्ये उपचार घेऊन सुद्धा मृत्युमुखी पडतो तर वैद्यकीय सुविधा नसताना कसाब बरा कसा झाला ? ८.कोणत्याही आजारी व्यक्तीला फाशी देता येत नाही मग कसाब ला फाशी कशी काय दिली ? ९.कसाब ला फाशी देणार आहेत हि बातमी पाकिस्तान ला जर पत्राने आणि फ्याक्स ने दिली होती तर पाकिस्तान च्या मिडिया मध्ये तशी बातमी का आली नाही ? १०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ? . . मित्रांनो कॉंग्रेस जनतेला जनतेला मूर्ख बनवत आहे, उद्या जर कोणी माहितीच्या अधिकारात कसाब च्या मृत्यूचे रिपोर्ट मागितले तर ते सुरक्षेचे कारण सांगून माहिती नाकारली जाईल आणि कसाब च्या मृत्यू चे खरे कारण कसाब सोबतच दफन होऊन जाईल —
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 11/21/2012 - 13:28

In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी

Permalink

एकच आणि शेवटची विनंती करतो

एकच आणि शेवटची विनंती करतो आहे: कसाबला काँग्रेसने मारले असा बोभाटा करून त्याचे श्रेय एकट्या काँग्रेसला देऊन उगाच काँग्रेसला मोठे आणि भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस, नागरीकांच्या संयमाला लहान करू नका. वर म्हटल्याप्रमाणे कसाबला भारतीय न्यायप्रणालीने फाशी सुनावली होती कारण तो दोषी होता हे सप्रमाण सिद्ध झाले होते. राष्ट्र्पतींनी (जे पक्षनिरपेक्ष पद आहे)या निर्णयावर शिकामोर्तब केले. मग असे असताना काँग्रेसला श्रेय का द्यावे? श्रेय द्यायचेच असेल भारतीय संघराज्याला द्यावे लागेल
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 11/21/2012 - 13:31

In reply to एकच आणि शेवटची विनंती करतो by ऋषिकेश

Permalink

+१

हेच म्हणतो. शंका कशावरही घेतली जाऊ शकते म्हणून प्रत्येक ठिकाणी शंकाच घेत राहणे योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 11/21/2012 - 14:22

In reply to एकच आणि शेवटची विनंती करतो by ऋषिकेश

Permalink

तडफडीचे कारण

ऋषिकेशभौ, रोज सकाळ संध्याकाळ जप करण्याचा मंत्र इनव्हॅलिड झाल्यामुळे होत असलेली चिडचिड बाहेर येत असावी. कदाचित या काहींची कसाब फाशी जावा अशी इच्छा नसेल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 11/21/2012 - 15:14

In reply to तडफडीचे कारण by नितिन थत्ते

Permalink

काय सुचवू पाहत आहात ? कसाब

काय सुचवू पाहत आहात ? कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, हे? कसाब जिवंत राहिल्यास काँग्रेस वर टीका करता आली असती म्हणून त्याला फाशी झाल्याचे दु:ख येथील कुणाला वाटत असेल ? कसाबच्या फाशीने दु:खी होण्यासाठी आम्ही काय काँग्रेसचे समर्थक आहोत काय हो ? फॉर द रेकॉर्ड्स, काँग्रेसला शिव्या देण्यासाठी अजूनही अनेक विषय तयार करून ठेवले आहेत त्यांनीच. मी काय म्हणतो, अफझल गुरु ला तत्काळ फाशी देऊन आणि सगळ्या घोटाळ्यांची पूर्ण चौकशी करून आणि दोषींना शिक्षा देऊन तुमचे कॉंग्रेस येथील विरोधक मिपाकरांना पूर्ण नि:शस्त्र का नाही करून टाकत ? सुचवून बघा जरा...
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 11/21/2012 - 15:29

In reply to काय सुचवू पाहत आहात ? कसाब by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता,

एक्झॅक्टली हेच सुचवायचे आहे. हा धागाप्रस्तावच पहा ना. कसाबला फाशी देण्याविषयी आनंद किंवा तत्सम काहीतरी भावना व्यक्त करायच्या ऐवजी त्यात कसे राजकारणच आहे वगैरे दिशेनेच धाग्यातला मजकूर आहे. सरकार कसाबला फाशी देणारच नाही आणि आपण त्यावरून एकसारखा ओरडा करू अशी खूणगाठ बांधलेल्या सदस्यांनी मग "डिनायल मोड"मध्ये जाऊन तो डेंग्यूनेच मेला असावा; डेंग्यूने मरण्यापूर्वी घाईने फासावर लटकावले वगैरे मुक्ताफळे उधळली आहेत. [बाळासाहेबांनी प्रणवमुखर्जींशी डील केले होते वगैरे प्रतिसादांबाबत वरील प्रतिपादन नाही. ते प्रतिसाद मला ओके वाटतात].
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 11/21/2012 - 15:51

In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते

Permalink

सरकार कसाबला फाशी देणारच नाही

सरकार कसाबला फाशी देणारच नाही आणि आपण त्यावरून एकसारखा ओरडा करू अशी खूणगाठ बांधलेल्या सदस्यांनी मग "डिनायल मोड"मध्ये जाऊन सुखद धक्का बसला आहे हो लोकांना. एवढ्या अपेक्षा नव्हत्या सरकारकडुन लोकांच्या. बादवे अफझल गुरु निर्दोष आहे काय? नाही म्हणजे कसाब आधी सुप्रीम कोर्टाकडुन फाशीवर शिक्कामोर्तब होउन देखील अजुन राष्ट्रपती त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब करत नाहीत म्हणुन विचारले. बाकी कसाबला डेंग्यु झाला आणि मग त्याला फाशी झाली हा योगायोग असु शकतो. पण मग काय आता गुरुलाही डेंग्यु होण्याची वाट बघत बसावी की काय? परत असा गोड योगायोग जुळुन यावा म्हणुन? बाकी मी काय म्हणतो. या धाग्यावरच्या काही प्रतिक्रिया "बघा आमच्या सरकारने कसाबला फाशी देउन दाखविली आणि तरीही देशद्रोही शंका काढतात" या छापाच्या आहेत ते बघुन आश्चर्य वाटले. जणु काही कसाबला फाशी देउन सरकारने लोकांवर फार मोठे उपकार केले आहेत. ही म्हणजे " बघा सरकारी अधिकार्‍याने पैसे न खाता काम केले तरी त्याने एक दुसरे काम पैशासाठी अडवुन ठेवले आहे म्हणुन कपाळकरंटे उर बडवत आहेत " अश्या छापाची प्रतिक्रिया वाटते. अहो त्याने पैसे खाउन काम करु नये हे त्याचे कर्तव्यच आहे. फार अवाजवी अपेक्षा नाही ही. बाकी तुम्ही लक्ष नका हो देउ. मिपावरच्या करंट्यांना आपल्या काँग्रेसला शिव्या देण्याची वाइइट्ट सवय आहे. खुप खुप वाइट्ट लोक आहेत ही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/21/2012 - 15:55

In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते

Permalink

डेंग्यूने मरण्यापूर्वी घाईने

डेंग्यूने मरण्यापूर्वी घाईने फासावर लटकावले वगैरे मुक्ताफळे उधळली आहेत. Image removed. हे घ्या थत्ते चाचा डांस कुणी का मारेना डास किंवा सरकार किंवा न्यायपालीका आपल्याला काय, मेला एकदाचा सा...
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 22:39

In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते

Permalink

नितिन थत्ते

हा धागाप्रस्तावच पहा ना. कसाबला फाशी देण्याविषयी आनंद किंवा तत्सम काहीतरी भावना व्यक्त करायच्या ऐवजी त्यात कसे राजकारणच आहे वगैरे दिशेनेच धाग्यातला मजकूर आहे.
प्रथमतः नम्रपणे सांगु इच्छीतो की आपल्या संस्कृतीमुळे, संस्कारामुळे कोणाच्याही मृत्युबद्दल आनंद व्यक्त करणे जड जाते. दुसरी महत्वाची गोष्ट. ताकाला जाउन भांडे लपवणे असा प्रकार येथे केला नाही. लेखनविषय:: राजकारण असे धागा टाकताना स्पष्टपणे म्हणले आहे. त्यामुळे मजकुराची दिशा तीच असणार यात चुकीचे काय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 11/22/2012 - 11:07

In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते

Permalink

इथे वाचा:

लोकसत्तेचा ह्याच विषयावरील अग्रलेख आवडला:
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 11/22/2012 - 20:24

In reply to इथे वाचा: by प्रदीप

Permalink

सविस्तर

सकाळी घाईत हा दुवा फक्त दिला. आता सविस्तर लिहीतो आहे (मूळ प्रतिसादावर इतर कुठलीही प्रतिक्रिया नसतांना देखील, आता येथे प्रतिसाद संपादित करता येत नाही, सबब हे उत्तर लिहीत आहे). ऋषिकेशने इतरस्त्र कसाबच्या तात्काळ फाशीचे श्रेय केवळा एकट्या काँग्रेसचे नाही, तर त्यात भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस, नागरीकांच्या संयमाचेही महत्वाचे वाटे आहेत हे बजावले आहे. पण इथे थोडी गल्लत आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने, राष्ट्रपतिंनी माफी नाकारल्यावर लगेच फाशी देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याचे पालकत्व बहुतांश त्या सरकारकडे जाते. बाकी न्यायव्यवस्था, पोलिस, सरकारी यंत्रणेचे ह्या कमी लागलेले सर्व घटक निर्णयाचे फक्त execution करत होते, ते त्यांनी कसोशीने केले व उत्तम प्रकारे पार पाडले, हे व इतकेच काय ते ह्यातील त्यांचे 'योगदान' होय. लोकसत्तेचा अग्रलेख काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करतो. * कसाब परकीय नागरीक असल्याने त्याच्या फाशीमुळे देशातील कुठल्याही भागात काही विपरीत होण्याची शक्यता शून्य होती. * आंतरराष्ट्रीय स्तरावरही ह्यात काहीच धोका नव्हता. पाकिस्तानलाही खरे तर ह्यामुळे आता हायसे वाटले असावे, कारण एकार्थी ह्यामुळे २६/११ च्या दुर्घटनेवर पडदा पडला आहे. The event has been brought to a closure असे जागतिक स्तरावर समजले जावे. * कसाबच्या दयेच्या अर्जाच्याही अगोदर तीन महत्वाचे अर्ज दाखल झालेले आहेत -- (१) अफझल गुरू (२) राजीव गांधींच्या हत्येत कटात सामिल असलेले संथान, मुरूगन व पेरारीवेलन हे श्रीलंकन तामिळ (३)पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग ह्यांचा मारेकरी बलवंत सिंग रोजाना. ह्या तिन्ही केसेसमधे राजकारण गुंतलेले आहे. पहिल्या केसमधे जम्मू-काश्मिर, दुसर्‍या केसमधे तामिळनाडू (काँग्रेसच्या सध्याच्या आघाडीतील भागिदार द्रमुक दुखावला जाईल ही भीति) आणि तिसर्‍या केसमध्ये पंजाबचे राजकारण (काँग्रेस तसेच भाजपाचेही). तेव्हा, अग्रलेख पुढे म्हणतो की, अशा तर्‍हेने ह्या तिन्ही केसेसबाबत चालढकल करत राहून पण कसाबची झटपट विल्हेवाट लावून आपले सरकार (आपली सरकारे, असे म्हणणे जास्त इष्ट ठरावे)एक अत्यंत घातक संदेश दहशतवाद्यांना देत आहे-- तुम्ही भारतीय दहशतवादी असाल, तर तुमचा निकाल लावला जाणार नाही. परदेशस्थ दहशतवादी ह्याचा फायदा उचलण्याची भीति अग्रलेखात पुढे व्यक्त करण्यात आलेली आहे. बर्‍याच दिवसांनी भारतीय वर्तमानपत्रात चांगला, मुद्देसूद व माहितीचा नीट वापर करून लिहीलेला अग्रलेख वाचावयास मिळाला.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 11/23/2012 - 10:34

In reply to सविस्तर by प्रदीप

Permalink

अग्रलेख वाचनीय आहे. सर्वथा

अग्रलेख वाचनीय आहे. सर्वथा पटला नसला तरीही बहुतांश मुद्दे ग्राह्य आहेत. बाकी,
केंद्रातील काँग्रेस सरकारने, राष्ट्रपतिंनी माफी नाकारल्यावर लगेच फाशी देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याचे पालकत्व बहुतांश त्या सरकारकडे जाते.
हे चुकीचे आहे. राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळल्यावर फाशीची तारीख न्यायालयाने ठरविली आहे असे वाचले (शोधून दुवा देतो). राष्ट्रपतींनी कोणाचा अर्ज कधी फेटाळावा हा त्यांचा विषेशाधिकार आहे. यावर इतक्या जलद कायवाई होण्याचे कारण जनतेने हळू कारवाईवर वेळोवेळी दाखवलेला असंतोष, पत्रकारांनी या प्रकरणाचा सतत केलेला पाठपुरावा, पोलिसांनी तयार केलेली बर्‍यापैकी 'गॅपलेस' केस आहे असे दिसते. तेव्हा भारताने जलद न्याय दिल्यावरही तो केवळ काँग्रेसच्या कारकिर्दीत दिला गेला म्हणून त्याचा निषेध करणे मला न्यायव्यवस्थेचा, त्या घटनेतील बळींचा आणि नागरीकांचाही अपमान केल्यासारखे वाटते शिवाय कसाब हा अगदी 'तळातील' मोहरा असल्याने त्याच्याकडून हवी ती माहिती मिळवून झाली होती. इतर वरील व्यक्ती त्या त्यासंघटनांमधे इतक्या खालच्या दर्जाचे नाहित तेव्हा त्यांचा उपयोग साक्षीदार म्हणून होऊ शकतो याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. (राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळल्यावर जर त्यांच्यावर त्वरीत कारवाई झाली नाही तर सरकारला थेट दोष देता येईल.. इतर तिघांचेही अर्ज राष्ट्रपतींनी आपल्याकडेच ठेवले होते)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Wed, 11/21/2012 - 14:07

In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी

Permalink

अकुंबकुंम

५ मुद्दा लैच व्होल्टचा दिस्तोय.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Wed, 11/21/2012 - 14:18

In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी

Permalink

फाशी खरंच "कसाब"ला झाली का?

१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ?
हेच म्हणतो. फाशी खरंच "कसाब"ला झाली का? फाशी खरंच "कसाब"ला झाली की त्याच्या प्रेताला? तो डेंग्यू तापीने मेला आणि म्हणून त्याला फाशी दिली असे घाईघाईने जाहीर करण्यात आले असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 11/21/2012 - 14:25

In reply to फाशी खरंच "कसाब"ला झाली का? by वामन देशमुख

Permalink

फाशी

इकडे लक्ष वेधू इच्छितो. यात कसाबकडून त्याच्या डेथ वॉरंटवर सही घेण्यात आली असे म्हटले आहे. (अर्थात शंकाच घ्यायची तर कशावरही घेता येऊ शकते).
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 11/21/2012 - 14:26

In reply to फाशी by नितिन थत्ते

Permalink

बदनामी.

अशा शंका घेऊन आपण आपल्याच देशाला बदनाम करतो हे लक्षात घ्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 11/21/2012 - 16:42

In reply to बदनामी. by नितिन थत्ते

Permalink

+१

अशा शंका घेऊन आपण आपल्याच देशाला बदनाम करतो हे लक्षात घ्यावे.
+१ अगदी हेच म्हणायचे होते. काँग्रेसला विरोध करणे/न करणे हे वैयक्तीक राजकीय मत झाले. पण कॉग्रेसद्वेषाने (किंवा कोणाच्याही द्वेषाने) इतकेही आंधळे होऊ नये की आपण एखाद्या पक्षाचा द्वेष व्यक्त करण्यासाठी देशालाही बदनाम करत आहोत याचे भान सुटावे. बाकी, रेडीफच्या लाईव्ह बातम्यांच्या पानावरील १५:४४च्या अपडेट नूसार गृहमंत्री श्री. शिंदे म्हणाले आहेत "The government is working quickly on everything, but we want to say that the government will not take credit or claim political mileage for the hanging." हे मला स्वागतार्ह वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 11/22/2012 - 01:16

In reply to +१ by ऋषिकेश

Permalink

खरे आहे.

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, श्री. दिग्विजय सिंग यांच्या खालील ट्वीट केलेल्या वाक्यातून पॉलीटीकल मायलेज घेत नसल्याचे स्पष्टच होते. ;) Will Modi and BJP tell us why NDA Govt. didn't carry out death sentence to Rajiv Gandhi's killers, who were sentenced in 1998.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 11/22/2012 - 10:39

In reply to खरे आहे. by विकास

Permalink

दिग्विजय सिंग गृहमंत्र्यांचे

दिग्विजय सिंग गृहमंत्र्यांचे ऐकत नाहीत असे वाटते ;) (आणि ऐकत असल्यास अगदी तांत्रिक आधारावरच बोलायचे तर श्री सिंग 'Government मध्ये कुठायत? ;) ) ह घेणे. बाकी, माझा मुद्दा लक्षात आला असेलच. हा निर्णय पक्षाधारित नाहीत.. एका पक्षाल्;आ त्याचे श्रेय/अपश्रेय देण्यात काहीच हशील नाही. त्यावरील मत समजल्यास अधिक उत्तम!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 11/22/2012 - 19:10

In reply to दिग्विजय सिंग गृहमंत्र्यांचे by ऋषिकेश

Permalink

हे बरं आहे...

म्हणजे उद्या काँग्रेसच्या प्रचारसभेत राहूल-सोनीया आदी त्याचे श्रेय घ्यायला लागल्यावर म्हणणार, ते काँग्रेस घेत आहे, सरकारने घेतलेले नाही :-)
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 11/22/2012 - 13:41

In reply to खरे आहे. by विकास

Permalink

फरक आहे

राजीव गंधींवरील हल्ला जरी दहशतवादी असला, तरी तो धोरणांवरील हल्ला होता. हा देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान होते. लिट्टेपेक्षा ह्या हल्ल्याचे गांभीर्य नक्कीच जास्त होते.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 11/22/2012 - 14:16

In reply to फरक आहे by आनन्दा

Permalink

बरोबर.

सर्वात महत्वाची गोष्ट दिग्गीराजांना माहीत नाही का न्यायालयीन प्रक्रीया अजून चालू आहे आहे. आणि त्यांची दैवते असणा-या प्रियांकाने काय प्रतिक्रीया दिली होती त्या खुन्यांबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/21/2012 - 14:24

In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी

Permalink

दालमें कुछ काला जरूर है!

प्रणब मुकर्जींनी दयेचा अर्ज फेटाळल्याची बातमी काल (किंवा परवा) मी वाचली होती. कुठे ते आता आठवत नाही! (म्हणजे टाइम्स कीं डॉन ते आठवत नाहीं) पण सरकारकडून इतका "तडफदार" निर्णय होईल असे मात्र वाटले नव्हते! दालमें कुछ काला जरूर है!
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/21/2012 - 16:01

In reply to दालमें कुछ काला जरूर है! by सुधीर काळे

Permalink

दालमें कुछ काला जरूर है!नही

दालमें कुछ काला जरूर है!नही पुरी दालहीच काली है काळे अंकल पार जर्जर झालेय हो हे,थोडा डोस घेताहेत ते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 11/21/2012 - 15:21

In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी

Permalink

अविनाश काका जरा दमानं घ्या की....

ऑपरेशन x इज ओव्हर. १] सूर्योदयापूर्वी फाशी दिली. २] अनुक्रमे फाशी दिली पाहिजे, असं काही असल्याचे माहित नाही. ३] दया अर्ज अजिबात गुप्त ठेवला नाही. कार्यवाही चालूच होती. [बातमी] ४] सूर्यास्तापूर्वी येरवड्यातच दफन केले गेले आहे. [वृत्त वाहिन्या] ५] काँग्रेसची रखेल अशा शब्दप्रयोगाची काका आपल्याकडून अपेक्षित नाही. दया अर्ज फेटाळल्याची बातमी होती. ६] कसाबचा डेंग्यु बरा झाला असावा. 'फाशीची माहिती आईला द्यावी,असं कसाबनं म्हटलं होतं. [वृत्त वाहिन्या] ७] डॉक्टरांचं पथक त्याच्या आरोग्याची काळजी घेत होतेच. ८] डेंग्यु बरा झाला असावा. ९] पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी भारतानं कसाबच्या फाशीबाबत कळवलं होतं असं म्हटलं आहे. १०] तळागाळातील लोक आता काँग्रेसलाच मतदान करतील असं काही नाही. बातम्यांमधुन असे दिसते महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या २५ सप्टेंबरच्या कार्यवाहीनंतर, राष्ट्रपतीनी कसाबचा दयेचा अर्ज ५/७ नोव्हेंबरला फेटाळला. सुशीलकुमार शिंदे यांनी ८ नोव्हेंबरला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारला माहिती दिली. राज्याच्या गृह मंत्रालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेची तयारी पूर्ण करुन त्याला १९ नोव्हेंबरला रात्री येरवडा जेलमध्ये हलविण्यात आले होते. एकुणच काय कसाबला फाशी देण्यापूर्वी सर्व नियमांचे पालन करुन येरवड्यात ही प्रक्रिया पार पाड्ण्यात आली. आपण राजकीय पक्षांवर शंका व्यक्त करतांना व्यवस्थेवर संशय व्यक्त करत आहोत असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 11/21/2012 - 13:42

Permalink

पालीचं शेपूट वळवळायचं थांबलं

पालीचं शेपूट वळवळायचं थांबलं म्हणायचं.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 11/21/2012 - 13:48

Permalink

डेग्युने मेला असला तर कायदा

डेग्युने मेला असला तर कायदा हातात घेतल्याबद्दल डासांना अटक व्हायला हवी :-)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 11/21/2012 - 13:58

In reply to डेग्युने मेला असला तर कायदा by बाळ सप्रे

Permalink

सहमत. डासांना अटक करून ते

सहमत. डासांना अटक करून ते कारवाई पूर्ण होईपर्यंत डेंग्यूने मरू नयेत यासाठी त्याना ओडोमॉस लावण्यात यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 11/21/2012 - 14:01

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 11/21/2012 - 14:18

In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी

Permalink

हे बघा:http://ibnlive.in.com

हे बघा: http://ibnlive.in.com/news/decision-on-afzal-guru-expected-soon-govt-sources/306626-3.html
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/21/2012 - 14:15

Permalink

कसाब

सगळ्यात जास्त अभिनंदनास पात्र आहेत ते श्री. उज्ज्वल निकम! वा, पठ्ठे!! तसेच 'एअर इंडिया'चे आणखी एक विमान अपहृत करण्याआधीच तो लटकला हे बरे झाले. आता अफजल गुरूला (कुणाचा?) लटकवा!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 11/21/2012 - 14:18

Permalink

कसाब

सर्वात जास्त अभिनंदनास पात्र आहेत ते श्री. उज्ज्वल निकम! वा पठ्ठे!! शिवाय एअर इण्डियाचे आणखी एक विमान अपहृत होण्याआधी कसाब लटकला हे बरे झाले! आता पाळी अफजल गुरूची! (हा कुणाचा गुरू?)
  • Log in or register to post comments

Submitted by नक्शत्त्रा on Wed, 11/21/2012 - 14:30

Permalink

१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला

१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 11/21/2012 - 15:25

Permalink

चला पाकड्यांनी पाठवलेला आणि

चला पाकड्यांनी पाठवलेला आणि इतके दिवस आपण पोसलेल्या ह्या सापड्याला लटकवला एकदाचे ! :) आता नंबर अफजल्याचा ! बघुया त्याच्या गळ्यात फाशीचा फंदा कधी अडकतो ते ! पाकडे आणि त्यांनी पोसलेले हे असे आणि अगणित सापडे आपण ठेचुन ठेचुन मारले पाहिजेत.अजुन किती निरपराध नागरिकांचे आणि सैनिकांचे बळी आपण देणार आहोत ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 11/21/2012 - 15:55

Permalink

सरबजित सिंगांचे भवितव्य धोक्यात.

आता समस्या आहे ती पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या आणि हेरगिरीच्या आरोपांसाठी शिक्षा भोगत असलेल्या सरबजित सिंग ह्यांच्या भविष्याबद्दल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com