एक तर लोक प्रचंड मूर्ख आहेत....
जो माणूस स्वतःच म्हणतो कि "मी परमेश्वर आहे" त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर "मी त्या परमेश्वराची खरी आई म्हणजे आदिमाया आहे "
आत्तापर्यंत टीव्हीवर, शाळेत इ. ठिकाणी विज्ञान परिषदेने आणि इतर वैज्ञानिकांनी कितीतरी अशा हातचलाख्या करून दाखवल्या आहेत आणि हे भोंदू जे काही करतात ते कसे खोटे आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे...आम्हालातर शाळेत पुस्तकात याविषयी धडा पण होता असे आठवते - भोंदू कसे पूर्ण बाह्यांचे सदरे घालून त्यात काय काय लपवून मग हातचलाखीने काढून दाखवतात वगैरे...
बाकी या राजकारण्याचे आणि समाजातील इतर "प्रतिष्ठितांचे " बोलायचे तर प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ दडलेला असणारच...किंवा या लोकांचा ते तस्करी किंवा इतर काही अवैध कामासाठी उपयोग करून त्यांना वाटा देत असणार...त्याबदल्यात लोकांसमोर मोठे लोक आमचे अनुयायी आहेत हे दाखवायचे फक्त...
अंधश्रद्धेचा पगडा, संकटाला बेधडक सामोरे जाण्याची वृत्ती, कामसूपणा नसणे अन कमी आत्मविश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत या भोन्दुंना काही मरण नाही.
आणि या कामात ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे माझे ठाम मत आहे. का संभाजी ब्रिगेडचा पुढाकार चालत नाही वाटतं? ;)
ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे.
जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका.
येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या.
जो माणूस असे विधान करू शकतो आणि त्या नंतर कुणीही फतवे काढत नाही, त्याला एकही अतिरेकी ठार मारत नाही यावरूनच तो दैवी असणार याची मला खात्री पटते. बाकी लेखांचे गुर्हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथे?
ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे.
जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका.
लेखकास तसे अजिबात म्हणायचे नाही. ते या भोंदूंचा दृष्टिकोन सांगत आहेत. गैरसमज करून घेउन नका.
गुंडोपंत,
मला वाटते आपण जरा लिहिण्यात घाई करताय. माझ्या या वाक्याचा अर्थ असा आहे की हे जे थोर संत होते त्यांची आठवण या ढोंगी भक्तांना होत नाही कारण यांची भक्ती करून संपत्ती गोळा करता येत नाही.
यात न समजण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही.
दुसरे आपण लिहिलेले शेवटचे वाक्य ---
// बाकी लेखांचे गुर्हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथ////
आपण हे इथेच वाचलेत ना ? मग हा विरोधाभास कशासाठी.
अहो शिवराज पाटिल कपडेपट फेमस याना गृहमंत्री , अशोक चव्हाण मुख्यमंत्री तसेच भक्तांच्या लायकिप्रमाणे म्हणजे गरीबाला विभुति, श्रीमन्ताला चेन, घड्याळ देण्याचे चमत्कार करणार्याला चमत्कार करीत नाही असे कसे म्हणता
जयंतराव,
सुरेख लेख. मलाही मनापासून वाटते कीं देवळे फक्त देवांची बांधावीत, मर्त्य मनुष्यरूपात अवतरलेल्या संतांची बांधू नयेत! (अर्थात् हे माझे वैयक्तिक मत!)
संतांसारखे देवपुरुष आपल्याला देव प्राप्त करून देण्याच्या कार्यात मार्गदर्शन करतात. पण शेवटी देव ते देव व त्यांचीच देवळे बांधावीत.
सध्या प्रवासात आहे. जकार्ताला परतल्यावर आपला आणि (प्रेसिडेंट) क्लिंटन यांचा लेख नीट वाचून पुन्हा लिहीन.
प्रतिक्रिया
एक तर लोक प्रचंड मूर्ख
सांभाळून
गुंडोपंत
गुंडोपंत, मला वाटते आपण जरा
असे कसे म्हणता
देवळे फक्त देवांची बांधावीत
उत्तम लेख