कार्यक्रमाला अनेक शुभेच्छा!
>सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा>..
हे वाचल्यावर मात्र हिस्ट्री चॅनेलवर, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसिद्ध लढाया, प्रसंग डॉक्युमेंटरी, रि-एनॅक्टमेंट पहायला मिळावे ही इच्छा बळावली आहे.
सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे.
काही लोकांना एक - दोन महिने आधी पन्हाळ्याला वेढा घालून बसवून ठेवायला हवं होतं. इतिहास थोडा अधिक जिवंत वाटला असता बरं.
>>काही लोकांना एक - दोन महिने आधी पन्हाळ्याला वेढा घालून बसवून ठेवायला हवं होतं. इतिहास थोडा अधिक जिवंत वाटला असता बरं.
छान कल्पना.
तुम्ही करा सुरवात.
आम्ही येतो पालखी घेउन.
बिपिन,
एकंदरात कठीण दिसते आहे.
माझ्या कृश गुडघ्यांना माझे ११५ कि. वजन घेऊन पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमण जमविणे अवघड आहे. मनांत इच्छा आणि शिवरांयाबद्दल तसेच त्यांच्या मावळ्यांबद्दल अपार आदर आहे. पण मनीच्या इच्छेला शरीर साथ देणार नाही त्यामुळे क्षमा असावी.
इतर मावळ्याना माझीच पालखी खांद्यावर घेऊन धावावे लागू नये म्हणून आधीच माघार घेत आहे.
क्षमा असावी.
या ट्रेकच माझ हे ४थ वर्ष आहे. पन्हाळा - पावनखिंड ते विशाळगड हे अंतर सुमारे ९५ किमीच्या आसपास आहे. आणि वाट डोंगर,पठारे ओढे,चिखल आणि जळवा अशी अतिशय रम्य आहे,त्यामुळे नवख्या लोकांनी या फंदात पडू नये,अशी कळकळीची विनंती.
या ट्रेकच माझ हे ४थ वर्ष आहे. पन्हाळा - पावनखिंड ते विशाळगड हे अंतर सुमारे ९५ किमीच्या आसपास आहे. आणि वाट डोंगर,पठारे ओढे,चिखल आणि जळवा अशी अतिशय रम्य आहे,त्यामुळे नवख्या लोकांनी या फंदात पडू नये,अशी कळकळीची विनंती.
तुम्ही जेंव्हा केंव्हा सुरुवात केली तेंव्हा तुम्हीसुद्धा नवखेच होतात ना ? प्रत्येकजण कधी ना कधीतरी नवखा असतोच.
वाट खूप अवघड आहे. आधी पूर्वतयारी करा. किंवा एकदम एवढी हनुमान उडी मारु नका. या वर्षी इतर साधेसुधे ट्रेक करा आणि तयारी झाली की पुढच्या वर्षी जॉईन व्हा. असा सल्ला दिला असतात तर ते योग्य झालं असतं. त्याऐवजी तुम्ही इतरांना नाउमेद करत आहात.
कार्यालयीन सुट्टीची व्यवस्था झाल्यास नकी येईन!!
नुकताच फेब्रुवारी मध्ये हा ट्रेक केला. तेव्हा धमाल आली, आता पाऊस म्हणजे सोने पे सुहागा!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
कार्यक्रम इतिहासाचे भान ठेवून करावा. त्याची सहल होवू नये. कचरा, प्लाश्टिक, गुटखा खाणे, दारू पिणे, नैसर्गीक गोष्टी (जसे झाडे, नाले, आदिवासी / स्थानिक लोकांचे जगणे हे सुद्धा) यांचे प्रदूषण करणे आदी प्रकार टाळावेत ही इच्छा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अप्पासाहेब, माझा खरच कुणालाही खच्ची करण्याचा उद्देश नव्हता. गेली ८-१० वर्ष मी ट्रेक करतो आहे ७ हिमालयातील ट्रेक्स आणि सह्याद्रीतले असंख्य ट्रेक्स वेगवेगळ्या ग्रुप बरोबर केल्यानंतर माझ निरीक्षण अस आहे कि बरेसशे लोक अत्यंत उत्साहानं ट्रेकला येतात कारण त्यांचे मित्र येणार असतात पावनखिंड वगेरे वाचून उत्साह आलेला असतो,पण अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्यांचा उत्साह आणि ताकत संपते आणि तिथून परत फिरायला वाव नसतो. मी पावनखिंड ट्रेक आयोजित करणाऱ्या एका ग्रुपच्या व्यवस्थापन विभागात आहे,आणि प्रत्येक वेळेला मी लोकांना अक्षरशः दादा बाबा करत मुक्कामाच्या ठिकाणपर्यंत आणलेलं आहे. आणि दुसर्या दिवशी त्यांना मधल्या वाटेन उतरवून दिलेलं आहे. बरेसाशे ग्रुप लोकांना नक्की किती चालायचं आहे याचा सुद्धा अंदाज देत नाहीत आणि मग नवीन लोकांची वाट लागते.
माझ्याबरोबर हिमालयातले ट्रेक करणारे २ मित्रसुद्धा पन्हाळा पावनखिंड ट्रेक करताना ढेपाळले होते कारण वाट घोटाभर ते गुढघ्यापर्यंत अशा चिखलाने भरलेली होती. माझा कोणालाही नाउमेद करण्याचा उद्देश नव्हता माझ्या प्रतिसादातून असा अर्थ निघत असल्यास माफ करा.
ट्रेक्स मनाला आणि शरीराला ताजेतवाने करण्यासाठी असतात,ट्रेक करून आल्यानंतर पुढचे ४ दिवस जर झोपून राहण्यात जात असतील तर मूळ उद्देशच नाहीसा होतो अर्थात हे माझ स्वताच मत आहे. या ट्रेकसाठी सर्वाना शुभेच्छा.
प्रतिक्रिया
कल्पना
अरे वा!
स्तुत्य
..तसेच
सर्वांनाच
>>काही
कठीण दिसतय...
स्तुत्य कल्पना
चांगला
या ट्रेकच
या ट्रेकच
अरे वा..
यायला आवडेल..
कार्यक्रम
++++१
मी अमितला
त्यापेक्ष
सहमत आहे.
पी डी एफ
पी डी एफ
कृपया
स्तुत्य
अप्पासाहेब