Skip to main content

चालू घडामोडी: जानेवारी २०२६

लेखक कांदा लिंबू यांनी गुरुवार, 01/01/2026 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना. या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की. * कांदा लिंबू

वाचने 22920
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

चिश्तींचा दर्गा अनेक वर्षांपासून मुस्लमानांसोबत बऱ्याच हिंदूंचेही श्रद्धास्थान आहे. आजचा कॉन्टेक्स्ट सोडून इतके मागचे मुर्दे उखाडणे हे कोणत्याही दिशेस जाऊ शकते.

In reply to by कॉमी

चिश्तींचा दर्गा अनेक वर्षांपासून मुस्लमानांसोबत बऱ्याच हिंदूंचेही श्रद्धास्थान आहे. त्याने इतिहास आणि सत्य दोन्ही बदलत नाही. आजचा कॉन्टेक्स्ट सोडून इतके मागचे मुर्दे उखाडणे हे कोणत्याही दिशेस जाऊ शकते. :))) यापुढे माझ्या बाजुने मी तुमच्या कोणत्याच प्रतिसादास उत्तर देणार नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNES

In reply to by मदनबाण

सध्याचा धनानंद वयाची ७५ पूर्ण करुन देखील पद सोडण्यास तयार नाही.> सदर व्यक्तीला तिच्या समर्थकांचा, मातृसंस्थेचा जबरदस्त पाठिंबा असेल आणि दोन्हीही कुठल्याही विधिनिषेधांची फारशी तमा न बाळगणारी मंडळी असतील तर संबंधित व्यक्ती आपणहून पदत्याग करील ही अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे. आणि जोरात चाललेला व्यवसाय स्वतःहून बंद करण्याची किती उदाहरणं आपल्याला व्यवहारात दिसतात?

In reply to by रामचंद्र

पुढच्या निवडणुकीत ते नसणार. काळजी करू नका. इतर खासदारांचेही तिकिट पुढच्या वेळी कापले होते. मुद्दा आपल्या सैन्याचा सेनापती कोण हा आहे.

In reply to by कंजूस

देशाचं भवितव्य हा मुद्दा बाजूला ठेवल्यास, जर शरद पवार अजूनही राजकारणात सक्रिय राहण्यात काही गैर नाही तर नरेंद्र मोदीही त्यांच्या पाठिराख्यांच्या बळावर सक्रिय राहिले तर त्याला नाही कसं म्हणायचं?

In reply to by रामचंद्र

हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात ७५ नंतर शाल नारळ द्यायची पद्धत आहे, त्यात भेदभाव का?

In reply to by आग्या१९९०

हरकत नसावीच. त्यांच्या पक्षात ७५ नंतर शाल नारळ द्यायची पद्धत आहे, त्यात भेदभाव का? पूर्व ग्रह असला कि सगळं उलटंच दिसतं Atal Bihari Vajpayee[1] (25 December 1924 – 16 August 2018) Prime Minister of India In office 19 March 1998 – 22 May 2004 श्री अटल बिहारी याना कुणी कुठे नारळ दिला Lal Krishna Advani (born 8 November 1927) is an Indian politician and statesman who served as the Deputy Prime Minister of India from 2002 to 2004 under Atal Bihari Vajpayee. केवळ मोदी द्वेष सोडला तर काहीही दिसत नाही

वैफल्यग्रस्त मंडळींचं अरण्यरुदन नव्या वर्षात पण जोरात चालू असल्याचे दिसते आहे. चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

अशा लोकांना पेनी वाईज अ‍ॅन्ड पाऊंड फुलिश म्हणता येईल. हे लोक मुद्दे मांडत आहेत ते सगळे चुकीचे आहेत असे कोणीच म्हणू शकणार नाहीत- कदाचित बरेचसे बरोबरही असतील- म्हणजे ते पेनी वाईज झाले. पण सध्याच्या परिस्थितीत मोदींना पर्याय आहेत ते त्यापेक्षा कितीतरी वाईट आहेत हे ते लक्षातच घेत नाहीत- म्हणजे ते पाऊंड फुलिश झाले. असल्या लोकांना समजावायचा पूर्वी बराच प्रयत्न करायचो पण आता तो प्रयत्न सोडून दिला आहे. एकूणच सुशिक्षित/इंटलेक्च्युअल वर्ग सतत कुरकुर करत असतो. जर असल्या वर्गाच्या तोंडाला सगळेच पक्ष पाने पुसत असतील तर त्यांचे वर्तन पाहता त्या पक्षांचे काही चुकते असे वाटतही नाही. त्यापेक्षा फार बुध्दीची झेप नसलेल्या सामान्य लोकांना नक्की काय योग्य आहे आणि अयोग्य आहे याचे भान अधिक चांगले असते. ते पेनी फुलिश असतील पण पाऊंड वाईज नक्कीच असतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

>> अशा लोकांना पेनी वाईज अ‍ॅन्ड पाऊंड फुलिश म्हणता येईल. अगदीच बरोबर आहे सर तुमचे. बघा ना, हे लोक या सरकारच्या धोरणांमुळे डॉलर ची किंमत ९० रूपयाला गेली अशा फालतू बाबीचा कांगावा करत आहेत आणि खाकर्‍यावरील वस्तू सेवा कर कमी करून सर्व देशबांधवांचे केवढे मोठे भले केले ते विसरत आहेत.

In reply to by सुबोध खरे

नवीन वर्षात हॉटेलातील गिऱ्हाईके मोजण्याचे कंत्राट रद्द झाले का? सध्या शेजारच्या हॉटेलात जास्त आहात असे आढळून आले आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कुठले हॉटेल?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys

In reply to by मदनबाण

खांद्याखाली बळकट असलेल्या लोकांशी कुठे वितंडवाद घालायचा? बाकी इथलेच धागे तिथे (मायबोलीवर) प्रकशित केले म्हणू काही लोकांची जळजळ होते आहे हे पाहून अधिक मौज वाटली

In reply to by सुबोध खरे

इथलेच धागे तिथे (मायबोलीवर) प्रकशित केले ओक्के, मला वाटलं कुठले नविन मराठी संकेतस्थळ सुरु झाले आणि तिथे देखील तुम्ही लिखाण करत आहात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RANU BOMBAI KI RANU... : | RAMU RATHOD | LIKHITHA | KALYAN KEYS | PRABHA | RATHOD TUNES

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सध्या 6 सदस्य हजर आहेत. सुबोध खरे कपिलमुनी प्रकाश घाटपांडे कानडाऊ योगेशु आग्या१९९० प्रचेतस

In reply to by सुबोध खरे

कोण मिपाची हेळसांड करत आहे? हॉटेलचे ग्राहक कमी का झाले हा प्रश्न ग्राहकांचा नसून मालकांचा आणि ते चालवणाऱ्या व्यवस्थापनाचा असतो इतका मूलभूत नियम माहिती नाही का?

In reply to by सुबोध खरे

पण मायबोलीवर धागे काढायचे नी मिपावर फक्त भाजप प्रचाराला यायचं ही हेळसांड नाही तर काय? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तिथे त्यांच्या एका धाग्यावर त्यांची चूक निदर्शनास आणून दिली तर त्यांनी चिडचिड केली. वैतागून तेथून काढता पाय घेऊन आता पुन्हा येथे माणसं मोजणी करू लागले. :)

In reply to by सुबोध खरे

निवडणूक प्रचारासाठी घरात का घुसलात अशी विचारणा करणाऱ्या दहिसरमधील मराठी आदिवासी कुटुंबाला एका उमेदवाराच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. #LokmatMumbai #MumbaiNews #election #dahisar #socialmedia #Viralvideo #CrimeNews https://www.facebook.com/share/r/1DhzwZcUcw/

पाच वर्षापूर्वी लादलेली बंधने काढून टाकल्याने आता भारतातील सरकारी कंत्राटे चीनसाठी खुली झाली आहे. मेक इन इंडियाचे यश आहे हे. आता चीनच्या सीमेवरील खोड्या बंद पडतील. खूप दिवसांनी दोन दिवसात माझा पोर्टफोलिओ एक लाखापेक्षा अधिक नुकसान दाखवत होता. नुकसान सहन करून १००% कॅश हातात ठेवली. तीस वर्षात प्रथम पूर्ण पोर्टफोलिओ विकला. Enter The Dragon ची भीती वाटतेय.

In reply to by आग्या१९९०

मागील दहा वर्षापासून आपल्या केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल मी कायम साशंकच होतो, आता जवळजवळ खात्रीच झाली आहे की हे सरकार चालत नसून दुसरेच कोणी चालवत आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे खरे सत्य सामोरे येण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना मी कायम दीर्घकालीन नफ्याचा विचार करत होतो, आता भीतीपायी मी जवळजवळ ह्या बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार सोडून दिला आहे. आतापर्यंतचे सर्वात कमकुवत सरकार देशाला लाभले आहे.

In reply to by आग्या१९९०

आपल्या मताशी सहमत आहे. दुर्दैवाने संपूर्ण र्‍हास झाल्याशिवाय धर्मांध, उजवे व भाजप समर्थक आपली मते उदारमतवादी व पुरोगामी सरकार येऊ देणार नाहीत. म्हणून या वेळी ही पडझड एक दोन वर्षांची नसावी अशी वाईट शंका येत आहे. कदाचित २०४७ पर्यंत असेच राहील. शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक करण्यासाठी काही मार्ग तरी उरले आहेत का? म्युचअल फंड, सरकारी रोखे किंवा मुदत ठेवी?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म साहेब दुर्दैवाने उदारमतवादी आणि पुरोगामी विचारांचे समर्थन करणारा कुठला राजकीय पक्षच आज अस्तित्वात नाही... विरोधी पक्ष नामक जे काही अस्तित्वात आहे ते एवढे नालायक आणि कुचकामी आहेत की मतदान करण्याची इच्छाच होत नाही...

In reply to by टर्मीनेटर

विरोधी पक्ष नष्ट करण्याचे सुनियोजित काम गेल्या १० वर्षात झाल्यामुळे तुंम्हाला तसे वाटत असावे. खरोखरच विरोधी पक्ष संपूर्ण नष्ट झाला तर काय होईल असे आपणांस वाटते?

In reply to by स्वधर्म

खरोखरच विरोधी पक्ष संपूर्ण नष्ट झाला तर काय होईल असे आपणांस वाटते?
बेबंदशाही (तशी ती सध्याही आहेच म्हणा 😀)

In reply to by टर्मीनेटर

कॉमी यांना विचारले होते की बाजारातील गुंतवणूक धोक्यात येत आहे असे वाटत असेल तर इतर काही मार्ग आहेत का. बाजाराचा अभ्यास नाही पण असे भीतीचे वातावरण आहे काय?

In reply to by स्वधर्म

शेअर्स विकून इतरत्र गुंतवणूक करण्यासाठी काही मार्ग तरी उरले आहेत का? म्युचअल फंड, सरकारी रोखे किंवा मुदत ठेवी? फार मोठा फंड असेल आणि दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर टॅक्स आणि महागाईचा विचार केल्यास तुम्ही विचारलेले पर्याय फार काही परतावा देऊ शकणार नाही. परंतु अभ्यास असेल आणि थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल तर, कमोडिटी, एक्विटी डेरीवेटीव , आणि क्रिप्टो करन्सी ह्यात सट्टा लावून थोडेफार पैसे कमावता येतील. दीर्घकालीन मंदी असताना derivatives मधून पैसे कमावणे फार कठीण नसते.

In reply to by आग्या१९९०

परंतु अभ्यास असेल आणि थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल तर, कमोडिटी, एक्विटी डेरीवेटीव , आणि क्रिप्टो करन्सी ह्यात सट्टा लावून थोडेफार पैसे कमावता येतील. दीर्घकालीन मंदी असताना derivatives मधून पैसे कमावणे फार कठीण नसते. हे म्हणजे नेसूचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. असे केवळ डोक्यावर पडलेली माणसे करू शकतात

In reply to by सुबोध खरे

सोनेही खूप महाग झालेले आहे. राहता राहिले फ्लॅट किंवा जागेतील गुंतवणूक. सगळीकडून आत आलेल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूकीचे पर्याय काय असतात?

In reply to by स्वधर्म

दीर्घकालीन मंदीत सोने ठीक आहे, फ्लॅट किंवा जागेतील गुंतवणूक फार काही परतावा देऊ शकत नाही

In reply to by आग्या१९९०

मागील दहा वर्षापासून आपल्या केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल मी कायम साशंकच होतो, आता जवळजवळ खात्रीच झाली आहे की हे सरकार चालत नसून दुसरेच कोणी चालवत आहे. इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून भारत माघार घेत आहे. कोणाच्या दबावाखाली ही माघार घेत आहे सरकार? कोण चालवत आहे भारत सरकार?

In reply to by आग्या१९९०

इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून भारत माघार घेत आहे. हे कोणी तुमच्या कानात सांगितलं? India Says Exiting Iran's Chabahar Port Is "Not An Option" https://www.ndtv.com/world-news/india-says-exiting-irans-chabahar-port-…

In reply to by सुबोध खरे

विगुंनी सांगितले. रशियन तेल आणि चाबाहर बंदरचे डमरू ट्रम्प वाजवत आहे. आपला नागोबा डसायचे सोडून त्यावर नाचत आहे. एप्रिल अखेरपर्यंत हा नाच चालू राहील. :) :) :)

व्हेनेझ्येलाचे कित्येक टन सोने इबँक ऑफ इंग्लंड मधे पडून आहे. त्याची मालकी कोणाची यावर आता वाद सुरू आहेत

हे जर खरं असेल तर आज माझ्या इतका आनंदी कुणीही नाही! अन्याय विरुद्ध लढणाऱ्या ममता बनर्जींबद्दल आणखी आदर वाढला! उद्धव ठाकरेंनी वेळीच अशी पाऊले उचलली असती तर त्यांच्या विरुद्ध अनैतिक लोक जिंकू शकले नसते! जशा तसे उत्तर देण्याची धमक ममता बॅनर्जींमध्ये आहे हे पाहून ममतांबद्दल अभिमान वाटला. जिओ ममता दीदी! धाडी वर धाड आज बंगाल मध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या आयटीसेल ऑफिस वर इडीने रेड टाकली. काहीही करुन, जमल्यास #घरेलु_युद्ध करून, भाजपच्या पश्चिम बंगाल मध्ये सत्ता पाहिजे आहे त्या साठी ते पुरावे शोधत आहेत दहशत पसरवत आहेत. ममता पण काही कमी नाही, तिने रेड चालु असताना 25000 हजार पक्ष कार्यकर्ते 100 गाड्या आणि 2000 हत्यारबंद पोलीस घेऊन, ज्या दोन बिल्डींग मध्ये रेड चालली होती, त्याना घेराव घातला. ती स्वतः आत गेली आणि इडीने ताब्यात घेतलेले रेकॉर्ड ताब्यात घेऊन इडी कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवल. या **व्याना जशास तसेच उत्तर दिले पाहिजे परिणामांची तमा बाळगुन उपयोग नाही. (आधारित) Arun Dixit https://www.facebook.com/share/1D8RWQr2Wo/

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ममता दिदिंना सुप्रिम कोर्टाने वैयक्तिक नोटीस पाठवण्याचा आदेश दिलाय. काही पोलीस अधिकाऱ्यांनाही नोटीसा जारी होणार आहेत. परिणामांची तमा न बाळगता ममतादीदी या नोटीसा कचऱ्याच्या टोपलीत टाकणार का? ते आता बघायचं. :)

In reply to by शाम भागवत

ममता दीदीनी निवडणूक रणनीती चोरण्याचा डाव उधळून लावला, अश्या नोटिसीना घाबरणाऱ्या त्या नाहीत! :)

इराणमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खालील बातमी वाचनात आली. इराणमधल्या घडामोडींची वास्तव माहिती देऊ शकणाऱ्या मिपाकरांनी इथे लिहावे ही विनंती. AppBodies Piling Up, Morgues Full: Iran's Hospitals Under Pressure Amid Protests

In reply to by कांदा लिंबू

इराणमधल्या {आणि जगातल्या} घडामोडींची वास्तव माहिती देणाऱ्या...... या साईट्सवर भरपूर माहिती मिळते. यांचे टीवी चानेल्सही आहेत. France 24 site https://www.france24.com/en/ Al Jazeera site https://www.aljazeera.com/ Hindustan Times app सुद्धा पाहता येईल. निवडक बातम्या भारतातील आणि जगातील सर्व क्षेत्रातील.

उद्या महापालिका निवडणुकांसाठी मतदान आहे. राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या मुंबई महापालिका सगळ्यात महत्वाची. माझे स्वतःचे मतदार म्हणून नाव मुंबईत नाही. तरीही त्या कारणाने मला आमच्या मनपापेक्षा मुंबई मनपामध्ये जास्त रस आहे. मुंबई महापालिकेत कोणीही निवडून आले तरी कंत्राटे देताना कमिशन खाणे, बिल्डरांशी संगनमत करून बेसुमार अनधिकृत बांधकामे करणे वगैरे प्रकार चालूच राहणार आहेत. महापालिकेत कोणीही निवडून आले तरी मुंबई शहर ४०-५० वर्षात बुडणार आहे असे म्हणतात ते काही बदलेल असे वाटत नाही. तरीही २०१९ मध्ये उबाठा सेनेने केलेला विश्वासघात पुढच्या जन्मीही विसरणे अशक्य असल्याने दोन्ही ठाकर्‍यांच्या सेनांचा पुरता धुव्वा उडावा अशी मनोमन इच्छा आणि उबाठासेना आणि मनसे ही दुर्गंधी महाराष्ट्रातून कायमची हद्दपार व्हावी ही सदिच्छा. १६ तारखेला मतमोजणीत मला जे व्हायला हवे ते झाल्यास अन्यथा भरपूर पेढे आणले असते. पण गेल्या आठवड्याभरापासून आमचा बोका हरवला आहे. आजूबाजूला सगळीकडे शोधूनही तो मिळालेला नाही. तो आमच्या घरचा एक सदस्य असल्याप्रमाणेच असल्याने तो हरविल्याचे अपार दु:ख आहे. तो जर आज रात्री-उद्यापर्यंत परतला नाही तर मात्र पेढे आणणार नाही :(

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण गेल्या आठवड्याभरापासून आमचा बोका हरवला आहे. मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ईश्वरकृपेने आमचा बोका थोड्या वेळापूर्वी सुखरूप घरी परतला आहे. तो ७ तारखेला संध्याकाळी हरवला होता म्हणजे जवळपास ८ दिवस तो बाहेर होता. अर्थात ही काही ताज्या घडामोडींमध्ये लिहायची बातमी नाही पण तो हरविल्याचा उल्लेख वर केला होता आणि त्यावर थोडीफार हलकीफुलकी चर्चा झाली म्हणून इथे लिहित आहे. आता उद्या मनासारखे निकाल लागल्यास पेढे आणायचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेही पेढे आणणारच आहे- बोका परत आल्याचे. मनासारखे निकाल लागल्यास दुप्पट पेढे :)
मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे असते :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे असते :) निदान बोक्यासाठी का होईना, पण तुम्ही सत्याची साथ धरली, मशाल पंजा इंजिनाला साथ दिली त्यामुळे बोका परत मिळाला. :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसुर्यकुमार, मतदान गुप्त असले तरी आपण कोणाला मत दिले हे सांगणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन नसावे असा माझा समज आहे. (तो चुकीचा देखील असू शकेल.) ज्याला आपण कोणाला मत दिले हे सांगण्याची भिती वाटत असेल त्याने नाही सांगीतले तर समजण्यासारखे आहे. मी नगरभक्षक पदाच्या निवडणूकीत नेहमी नोटा ला मतदान करतो आणी शक्यतो त्याचा प्रचार देखील करतो. एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या डबल पेढे वाटपाला अनुमोदन देत आहेत. उद्या काय ते समजेलच.

In reply to by धर्मराजमुटके

सहमत! मतदान विचारू नये म्हणतात, पण आपण कुणाला मत दिले हे सांगू शकतो की, मागे मला सांगू नये असा संकेत आहे असे कुणीतरी सांगितले होते, पण असे संकेत मी पायदळी तुडवतो. आता हेच पहा ना. ह्यावेळी मी ४ वेगवेगळ्या पक्षांना मत दिले, १) घड्याळ २) मशाल, ३ ) पंजा चौथे कुणाला द्यावे हे सुचत नव्हते धनुष्यबाण नी कमळ दाबणार नव्हतोच मग गैस सिलेंडर दाबायला बोट सरसावले पण त्याच्या वरच झाडू दिसला, केजरीवाल आठवले नी चौथे मत झाडूला दिले. :)

In reply to by धर्मराजमुटके

एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या डबल पेढे वाटपाला अनुमोदन देत आहेत. 'फुल घोटाळा चालू आहे' घड्याळचं बटण दाबलं अन् कमळासमोर..., पिंपरीतला VIDEO व्हायरल https://dhunt.in/138L16 By News 18 लोकमत via Dailyhunt गडबड??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बातमी पाहिली पण घड्याळाचं बटन दाबल्यावर कमळाला मत जातयं अस काही दिसलं नाही. एखादी चित्रफीत असती तर काही जास्तीची माहीती मिळाली असती.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजप व शिंदे सेना या दोघांना उबाठा मनापासून संपवायची आहे. शिंदेंना उबाठा परत उभी राहिली तर भविष्य फारसं राहाणार नाही. तर भाजपाला आपली हिंदू व्होट बॅंक वाढवायची फार मोठी संधी उबाठानी मिळवून दिली आहे. त्यामुळे शिंदेची मते भाजपाला व भाजपाची मते शिंदेंना परफेक्ट हस्तांतर होणार यात वाद नाही. परिणामी शिंदेसेना व भाजपाचा स्ट्राईक रेट जबरदस्त असणार आहे. जर मतदान टक्केवारी वाढली तर अफलातून निकाल येतील असं वाटतंय.

In reply to by शाम भागवत

भाजप व शिंदे सेना या दोघांना उबाठा मनापासून संपवायची आहे. चूक भाजपला सेना, शिंदे सेना, आपा राष्ट्रवादी, श प राष्ट्रवादी हे सगळ संपवायचा आहे हा बकासुर आहे . याला सगळच खायच आहे.

In reply to by कपिलमुनी

हो:) पण सध्याची प्रायोरिटी उबाठा एकावर एक फ्री योजनेत मनसेपण संपणारेय. बाकीचं बघू पुढच्या निवडणुकांत. काय घाई आहे. :)

नाही बरंका. त्यांचा बोक्याला राजकीय समज असेल तर तो नक्कीच भाजपा नाहितर शिंदेसेनेच्या वळचणीला जाऊन सत्तेचे लोणी खाईल. सो कॉल्ड मराठी असेल तर उबाठा आणी मनसे कडे गेल्याची शक्यता आहे. १६ तारखेनंतर बोक्याची घरवापसी होईल असा अंदाज आहे.

In reply to by धर्मराजमुटके

जो पंजा, मशाल किंवा रेल्वे इंजिन दाबेल त्याचा बोका परत येईल, जो दाबणार नाही त्याची मांजर पळेल.

In reply to by कंजूस

महाराष्ट्रात काही ठिकाणी मतदारांच्या बोटाला शाईऐवजी मार्करनी शाई लावली जाते, जी सहज पुसली जाते. चांदी महाग झाल्याने हा निर्णय घेतला की काय अशी शंका येतेय. " आमची श्याई " :)

In reply to by आग्या१९९०

आधी त्यानी विकास करू सांगून जनतेला चूना लावला, मग निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नेमायची पद्धत बदलून “आपला माणूस” बसवला, तरीही हरू लागल्या मूळ गुजरातहून मागवलेली मतदान यंत्रे सेट केली, मतदान यंत्र बनवणाऱ्या कंपनीत आपले डायरेक्टर बसवले व निवडणूक जिंकल्या, विरोधक हुशार झाले व मतदान यंत्रणांवर लक्ष देऊ लागले, मतदान यंत्रे ठेवलीत तिथे पहारा देऊ लागले, मग मतदान यंत्रे सेट करणे जमेना, मग आता तलवारीने हल्ला, गोळीबार, करोडोंची ऑफर अश्या प्रकारे विरोधक संपवू लागले, तरीही विरोधक लढलेच, मग शाई ऐवजी मार्कर आणला म्हणजे पुसून डुप्लिकेट वोटिंग करता यावी, हाही प्रयत्न विरोधक हाणून पाडतील. आता नवीन काय आयड्या आणतात पाहूयात! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एखाद्या अशिक्षित माणसाने असा प्रतिसाद दिला असता तर काहीही वाटले नसते. ईव्हीएम मध्ये काहीही गडबड करता येत नाही. मतदान पूर्वी पन्नास पन्नास शंभर शंभर मते एजंट टाकून पाहतात. सर्वपक्षीय एजंट संतुष्ट झाल्यानंतरच वटिंग होते. वोटिंग झाल्यावर पुन्हा सील होते. ईव्हीएम मध्ये गडबड करणे अशक्य आहे. खरे कारण लोकांना विकास दिसतो. नागपूर मध्ये झालेला विकास लोकांना दिसत होता म्हणून तिथे 20% मुस्लिम असूनही भाजपला मतदान केले. मुंबईमध्ये मेट्रो जाणारे मध्यमवर्गीय मराठी लोक भाजपाला मत देतील किं ज्याने मेट्रो थांबून ठेवली त्यांना मत देतील. तुम्हीच विचार करा. जर मुंबईकरांनी 50 टक्के ऐवजी 60 टक्के मतदान केले असते तर महायुतीला १७५ जागाही मिळाल्या असत्या.

In reply to by विवेकपटाईत

ईव्हीएम मध्ये काहीही गडबड करता येत नाही. तसे आहे तर भाजप नेत्यांच्या गाड्यांमध्ये ईव्हीएम का सापडतात?