Skip to main content

चालू घडामोडी: जानेवारी २०२६

लेखक कांदा लिंबू यांनी गुरुवार, 01/01/2026 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना. या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की. * कांदा लिंबू

वाचने 22921
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

महाराष्ट्रात विवास्पद कारकीर्द सांभाळलेले, महापुरुषांबद्दल काहीच्या काही बोलून चर्चेत राहिलेले आणि अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असतांना पहाटे शपथविधीस उपस्थित झालेले माजी राज्यपाल कोश्यारी यांना आज पद्मभूषण देऊन गौरवण्यात् आले. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा ह्या पुरस्कारावरून विश्वास उडाला आहे! नीतिमत्ता वगैरे काही असते की नाही?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोश्यारी आणि धीरेंद्र या दोघांना पद्म पुरस्कार म्हणजे अवघड आहे. पण आताशा इतक्या नैतिक पडझडीचे आश्चर्यही वाटत नाही. तथापि इथे कोणी या दोघांचे समर्थन करणारे असतील तर त्यांचे मत वाचायला आवडेल.

माजी राज्यपाल कोश्यारीला ( महात्मा फुले आणि पत्नीस हिडीस पद्धतीने वक्तव्य फेम) - पद्मभूषण धीरेंद्र शास्त्री - भारतीय गणवेशधारी सैनिकांची सलामी बेशक मंदिर मस्जिद तोडो बुल्लेशाह ये कहता ... भारतात बुल्लेशाहची प्रतिकात्मक थडगे उखडले अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिन माफ़ करना भाईयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला गांxवर म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम, सलाम, सबको सलाम भाईयों और बेहेनों, सबको सलाम. कवी - मंगेश पाडगावकर

बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं आहे. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. अजित पवार हे आज सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे सभेसाठी बारामतीला येण्यासाठी निघाले होते. मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड होत असताना ते कोसळले. या अपघातात अजित पवारांसह इतर तीन जणांचा मृत्यू झाला. विमान अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह इतर जखमींना बारामतीतील रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु तत्पूर्वीच त्यांच्या प्राणज्योत मालवली होती

In reply to by सिद्धार्थ ४

अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

In reply to by सिद्धार्थ ४


In reply to by कपिलमुनी

प्रत्येक दुर्घटना ही सुरुवातीला घातपात म्हणूनंच धरायची असते. नंतर पुरावे मिळतील वा न मिळतील त्यानुसार धारणा बदलायची असते. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रत्येक दुर्घटना ही सुरुवातीला घातपात म्हणूनंच धरायची असते.
ते बरोबर असेल पण तुमचा एकंदर जालीय वावर पाहता तुम्हाला मुळ शंकेला चिकटून राहायचे आणि त्याभोवती नवनवीन थिअरीज मांडायचे आकर्षण जास्त आहे असे दिस्ते.

In reply to by गामा पैलवान

गामा, जर हा घातपात असेल तर कुणी केला असण्याची शक्यता आहे असे तुम्हाला वाटते? खरेतर सर्व महाराष्ट्राला हा घातपात आहे याची शंका आहेच.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

cui bono ? हा प्रश्न विचारायचा. इंग्रजीत ह्यास 'who benefits ?' असं म्हणतात. तर दादांच्या जाण्याने कोणाचा फायदा होणार आहे, हा प्रश्न विचारला पाहिजे. निदान सुरुवातीस तरी या प्रश्नाच्या उत्तराकडे संशयसूची वळणार. पुढचं पुढे. -गा.पै.

विमानांसाठी एकच इंधन न वापरता दोन वेगळी हवीत. इंधन अ आणि ब वेगवेगळे काहीच धोकादायक नसणारे पण दोन्ही एका जागी आणल्यावर जळणार असं काही स्पेस रॉकेटांत वापरतात तसं.

आज दि. ‌२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ‌ त्यांच्यासहित एकूण पाच जणांनी या अपघातात प्राण गमावले. ‌ अपघातातील मृतांना श्रद्धांजली. ॐ शांती. --- या विमान अपघाताची चौकशी होईलच. पण इथे मिपावर श्री गवि यांनी त्यासंबंधी लेख लिहावा, चर्चा सुरू करावी अशी अपेक्षा आहे.

आज सकाळी अचानक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची बातमी आली आणि धक्का बसला. विश्वास बसला नाही. नेमकं काय झालं हे कळण्यापूर्वीच धक्कादायक बातमीत दमदार नेत्याच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. प्रशसनावर जबर पकड, तळागाळातील कार्यकर्त्याचा कायम गोतावळा, आणि शरद पवारांच्या तालमीतून तयार होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक वेगळी छाप निर्माण केली. जाती-मातीच्या गटा-तटात मात्र अलिप्त राहिले असे वाटते. सर्वसमावेशक गोतावळा ही अजिदादा पवारांची ओळख महाराष्ट्रात झाली होती. एका दुर्दैवी विमान अपघातात काळाने त्यांना आपल्यात ओढून नेले. महाराष्ट्राच्या राजकारण-समाजकारणात दादा आपली आठवण कायम राहील. महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यास भावपूर्ण आदरांजली. 😌🙏 -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजितदादाना भावपूर्ण श्रद्धांजली! महाराष्ट्राला न लाभेलेल सर्वोत्तम मुख्यमंत्री असे अजितदादांबद्दल म्हणता येईल, दादा मुख्यमंत्री बनावेत अशी सुप्त ईच्छा मनात होती! सभेतील हजरजजाबीपणामुळे ते अनेक विनोद करायचे, आताच झालेल्या pcmc महापालिकेच्या निवडणुकीवेळी त्यांनी कुत्र्यांच्या नसबंदी वर झालेल्या भ्रष्टाचारावर, “ती कुत्री काय म्हणत असतील?” अशी भाषणात केलेली मिश्किलीची रील व्हायरल झाली होती त्यावर खळखळून हसू आले होते, प्रचंड फिरणारे अनेक सभा घेणारे म्हणून अजितदादा माहीत होते. सकाळीच एक सहकाऱ्याने अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी वाचून सांगितले, तेव्हा छोटामोठा अपघात झाला असावा असे वाटले पण नंतर अपघाताचा फोटो पाहून चर्र झाले, नी थोड्याच वेळात बातमी आली. काही नेते विचारांच्यापलीकडे जाऊन आपले झालेल असतात हे ते गेल्यावरच कळते! दादाना भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_

दादांना श्रद्धांजली. ( पूर्व मिपाकर कै• वरुण मोहीते यांच्याशी दादांची दोस्ती होती.)