Skip to main content

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 12/10/2023 17:13 या दिवशी प्रकाशित केले.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.

१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.

अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.

अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!

इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.

परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]

इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.

हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.

नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.

आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)

१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)

'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.

२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?

रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...

३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)

'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...

४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.

५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 50581
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

In reply to by टर्मीनेटर

पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे.

In reply to by Trump

मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही नाही. ज्या वेळी जे योग्य त्याची बाजू घेतो. पण सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>>सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो. आणि पुरोगाम्यांचा सनातनी द्वेष उफाळून आला की मुग गिळून गप्प बसता !! मजा आहे... चालु द्या !!!

In reply to by अहिरावण

पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड असतात. सनातनींसारखे आम्हीच ग्रेट असं पोथी पुरानांचे दाखले देत पुरोगामी फिरत नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)

In reply to by अहिरावण

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? चळवळ एवढी फोफावली असती का? भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. असं फक्त सनातनींना वाटतं. समाजाला माहीतीय की पुरोगामींनी काय केलंय ते. काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. पोथीपुरानांत दाखले देण्यासारखं काहीही नाही.दाखले फकित सनातनी देतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :) पुरोगाम्याने वयक्तिक काय करावे तो त्याचा प्रश्न. मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>> पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? अच्छा सगळे क्रेडीत पुरोगाम्यांचे का? बर बर >>सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? >>>चळवळ एवढी फोफावली असती का? >>>भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? हिंदू तालीबान ? अक्कल गहाण आहे का तुमची? असेल असेल अनेक पुरोगाम्यांची असते हे आम्ही स्वत: पाहिले आहे >>काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. काहींच्या ना? मग सगळे सनातनी का पुरोगाम्यंना डिवचतात? >>मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना? हेच सनातन्याने विचारले तर??

In reply to by अहिरावण

ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ

In reply to by अहिरावण

मान्य..... ------- ज्यू धर्मीयांना, असे म्हणायचे आहे का? कारण, इस्रायल म्हणजेच ज्यू , आणि पाकिस्तान म्हणजेच मुस्लिम, अशी माझी विचारसरणी आहे . पाकिस्तानला, इतर धर्मीय मान्य नाहीत....

In reply to by अहिरावण

ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ आमचा पाठिंबा आधीच देऊन झालाय, आम्ही तर सांगत आहोत की पॅलेस्टाईन बेचिराख करावा. गाझापट्टीवर गाढवाचा नांगर फिरवून स्वराज्यात (इस्राइलच्या) सामील करावी. एकेक हमासी वेचून वेचून ठाक मारावा. फक्त इथे जे हमासशी काहीबाही संबंधं जडून पुरोगाम्यांना बदनाम करायचे सनातनींचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हाणून पाडतोय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पन्नास लाख लोकांना बेघर करून मारण्याची भाषा करताय आणि स्वताला पुरोगामी समजताय... तुम्ही पण सनातनी लोकांच्यात बसले तर सुत जुळेल.

In reply to by कॉमी

तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू कशी घेतली नाही “त्यांची.” काॅमी साहेब, त्या पन्नास लाखांमूळे इस्राईलचा एकही माणूस मरत असेल तर पन्नासलाखच काय एक कोटी मारावेत इस्राइलने. बाकी तुम्ही हमास वाल्यांसोबत कींवा जिहादींसोबत बसल्यास चांगले सूत जुळेल. (तसे जुळलेही असावे म्हणा. )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाहीच आहे. बालवडीतल्या मुलासारखी समज आहे तुमची. तोंड दिले आहे त्यामुळे मत द्यायला का जाते होय की नाही ? :)

In reply to by कॉमी

पळ काढायचा चांगला मार्ग शोधलात. इस्राइलची बाजू घेणार्यांची बुध्दी बालवाडी सारखी असते नी अतिरेक्यांची बाजू घेणार्यांची ग्रॅज्यएटची असावी. हो की नाही ग्रॅज्यूएट काॅमी सर? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

छे छे गैरसमज झाला बाहुबली साहेब. मी इस्त्राईल समर्थकांच्या बुद्धीबाबत नाही बोललो. तुमच्या बुद्धी बद्दल स्पेसिफिकली बोलत होतो. गैरसमज नसावा :)

In reply to by कॉमी

असो. तुम्ही कितीही काहीही कुणालाही बोला. इस्राईल काही सूट्टी देत नाही गाझाला. तुमच्या दुखात मी सहभागी नाही हे आधीच सांगून ठेवतो. :)

In reply to by धर्मराजमुटके

पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते).
+१ काही लोकांना इतरांसाठी शीरा विनाकारण ताणायला आवडतात, भले समोरचा माणुस काहीही किंमत देतो नसो.

तुमचा प्रतिसाद म्हणजे साध्या सोप्या भाषेतील प्रतिसाद थोडक्यात व सटिक वाटला. टर्मिनेटर भौ नी सुद्धा सोप्या शब्दात सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. माझ्या मते IMEC वर फारसा परीणाम होईल असे वाटत नाही कारण हे धर्मयुद्ध बरेच वर्षापासून चालू आहे व चालू रहाणार आहे.

अभ्यासपूर्ण लेख व चर्चा.

In reply to by हेमंतकुमार

+१ अभ्यासपूर्ण लेख! प्रतिसादांतुन पण चांगली माहिती मिळत आहे!! imecच्या माहितीची प्रतिक्षा करतोय!!!

टर्मीनेटर https://www.washingtonpost.com/world/2023/israel-palestine-conflict-tim… हा लेख वाचलात तर तुमच्या विचरत कदाचित फरक पडू शकेल. आता १. ह्या वादात इस्रायल किंवा हमास कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत. २. मी जेव्हढे वाचाल आहे त्या प्रमाणे नेत्न्याहू हा तद्दन गुंड माणूस आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. त्यातून वाचण्यासाठी त्याने बरेच उपद्व्याप केले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. ३.इजिप्तच्या गुप्त हेर खात्याने इस्रायलला हमासच्या हल्ल्याची पूर्व कल्पना दिली होती पण नेतन्याहुने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले अशा बातम्या आहेत. ४. अल अक्सा मशिदीतील पावित्र्याचा भंग हे हि एक कारण आहेच.

In reply to by भागो

भागो शेठ, तुम्ही दिलेल्या लिंक मधली माहिती वाचली त्यात (आज वीशी-तिशीत असलेल्यांसाठी सोडून) नवीन असे फार काही अजिबात नाही! आता तुमच्या बाकीच्या मुद्द्यांकडे वळतो,
१. ह्या वादात इस्रायल किंवा हमास कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत.
अगदी अगदी... इस्त्रायल हा काही साधू संतांचा देश नाही तसेच हमास ही काही सुफी संतांची संघटना नाही.
२. मी जेव्हढे वाचाल आहे त्या प्रमाणे नेत्न्याहू हा तद्दन गुंड माणूस आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. त्यातून वाचण्यासाठी त्याने बरेच उपद्व्याप केले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे.
इस्त्रायल सारख्या (धर्मांध) शत्रुंनी घेरलेल्या देशाचा नेता गांधींवादी किंवा 'अहिंसा परमो धर्म' वगैरे तत्वज्ञान मानणाऱ्या विचारसरणीचा असावा अशी आपली अपेक्षा आहे का? 'ठकासी असावे महाठक' म्हणतात त्याप्रमाणेच ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेल्या देशाचे नेतृत्व असावे असे माझे वैयक्तिक मत! तुमचे मत वेगळे असल्यास त्याचाही अर्थातच आदर आहे.
३.इजिप्तच्या गुप्त हेर खात्याने इस्रायलला हमासच्या हल्ल्याची पूर्व कल्पना दिली होती पण नेतन्याहुने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले अशा बातम्या आहेत. ४. अल अक्सा मशिदीतील पावित्र्याचा भंग हे हि एक कारण आहेच.
ह्या दोन्ही मुद्द्यांचे एकत्र उत्तर देतो. युद्धकाळात किती प्रोपगंडा चालतो हे आता सर्वज्ञात आहे त्यामुळे काय खरे आणि काय खोटे हे ठरवणे सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन जाते. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना आठवा, अगदी मिपावारही हा प्रोपगंडा चालवण्याचे उद्योग झालेले आहेत. त्यात पुतीन ह्यांना कुठलासा रोग झाला असल्याने ते कसे इतरांपासून अंतर ठेऊन वावरत / वागत आहेत पासून अनेक विनोदी आणि धडधडीत खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. पण ते असो... १९६७ सालच्या सिक्स डे वॉर मध्ये झालेल्या पराभवातून इजिप्तने धडा घेऊन थोड्या कालावधीने का होईना पण इस्त्रयालला सार्वभौम राष्ट्र म्हणुन मान्यता देऊन आपला प्रदेश तर परत मिळवला होता पण इस्लामिक जगताचा रोष मात्र ओढवून घेतला होता. आणि तेव्हा शांतता करारावर स्वाक्षरी केल्या पासूनच त्याची प्रचंड कोंडी होत आहे, करारातल्या अटींचे पालन करण्यासाठी इस्त्रायल बरोबर सहकार्य करावे लागत आहे आणि एकीकडे आपण इस्लामिक - अरब जगता बरोबर आहोत हे सिद्ध होत नसले तरी तशी निदान बतावणी करावी लागत आहे. इजिप्तची ही द्विधावस्था इस्त्रायलला पण माहिती असल्याने अशा बातम्या आल्या तरी त्यातले तथ्य संबंधितांना माहिती असले तरी बाकीच्यांनी (म्हणजे वॉर प्रपोगंडाला बळी पडणाऱ्यांनी) त्याला किती महत्व द्यावे हा त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा प्रश्न असतो.... आणि अल अक्सा मशिदीचे निमित्त करूनच तर हा 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' नाव देऊन हा हल्ला केला आहे हे वर लेखात लिहिलेले आहे. असो, प्रतिसादसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍

IMEC बदल माहिती नव्हतं ते समजलं. बाकी सध्या इस्त्रायली ज्यू अत्यंत हुशार इतिहासकार, मानववंश अभ्य युवल हरारीचे लेक्चर ऐकत होते.तेव्हा या देशाविषयी व्हिडिओ पाहत होते.त्यात इथे युद्ध सुरू झाले.तेव्हा चाणक्यचे धर्माधिकारी यांचेही व्हिडिओ पाहण्यात आले.अत्यंत खतरनाक धाडसी आहे इस्त्रायली!चहू बाजूला अरब असताना आपल्या धर्माची मुळे पुन्हा जगभरातून इथे आणून वसवले.मला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच अनेक पराक्रमाची आठवण झाली.बाकी ब्रिटीशांनी ईथएपण काहीच्या काही भूमी डिस्ट्रिब्युटशन करून काड्या केल्या आहेत,हे पाहून चीड वाटली.पॅलेस्टाईनेपण गाजा पट्टी आग्रह सोडून इतर भाग घ्यावा.भारताच्या भुमी बाजूला अरब नसून चीन आहे हे कधीतरी नशीबच वाटतं. इस्त्रायलला माहिते होतं की इतरत्र वसले असतं तर सन्मानाने कधीच जगू शकले नसते.हक्काचे घर का सोडावं.गाजाला अनेक मोठ्या राष्ट्रांनी मदत केली आहे.अनेक राजकीय , आर्थिक वर्चस्वासाठी गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी रशिया-युक्रेन आणि आता इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आहे.जग तिसर्या महायुद्धाच्या वाटेवर आहे वाटतं...

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास मध्ये नाही. २. या युद्धाची सुरुवात मक्का मध्ये असलेल्या यहूदी टोळीचा संपूर्ण नाश करून त्यांच्या बायको मुलांना गुलाम बनविण्यार्या जगातील पहिल्या जिहाद सुरू झालेली आहे. ३. जो पर्यंत यहूदी जातीचा पूर्ण विनाश होत नाही आणि इस्लामचे राज्य येत नाही जिहाद सुरू राहणार. ४. बाकी भारतात ही वेगवेगळ्या स्वरूपात हे युद्ध हजार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. अकबर सारख्या बादशाह ने ही चित्तोड मधील सर्व ४० हजार नागरिकांची कत्तल केली होती. येत्या ५० वर्षांत याहून भयंकर दृश्य पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे आज भारतीयांना भविष्याची कल्पना नाही, इजरायला ही नव्हती. यात आश्चर्य काही नाही.

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास मध्ये नाही. २. या युद्धाची सुरुवात मक्का मध्ये असलेल्या यहूदी टोळीचा संपूर्ण नाश करून त्यांच्या बायको मुलांना गुलाम बनविण्यार्या जगातील पहिल्या जिहाद सुरू झालेली आहे. ३. जो पर्यंत यहूदी जातीचा पूर्ण विनाश होत नाही आणि इस्लामचे राज्य येत नाही जिहाद सुरू राहणार. ४. बाकी भारतात ही वेगवेगळ्या स्वरूपात हे युद्ध हजार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. अकबर सारख्या बादशाह ने ही चित्तोड मधील सर्व ४० हजार नागरिकांची कत्तल केली होती. येत्या ५० वर्षांत याहून भयंकर दृश्य पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे आज भारतीयांना भविष्याची कल्पना नाही, इजरायला ही नव्हती. यात आश्चर्य काही नाही.

गट क्रं. १ आणि गट क्रं. २ आम्ही आमच्या अन्य लेखनात , प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, लोकं काय लिहितात, काय बोलतात्, ह्यावरुन त्यांचा "गट" ठरवता येतो . तेच परत एकदा ह्या युध्दातुन आणि त्यावरील चाललेल्या संवादातुन दिसुन येत आहे हे पाहुन आनंद झाला :) तुम्ही गट क्रमांक १ मधील असाल तर तुमचा इस्त्रायलला झायॉन ला पाठिंबा असेल आणि व्हाईस वर्सा . अर्थात तुम्ही इस्त्रायलला, झायॉनला पाठिंबा देत असेल तर तुम्ही गट क्रं. १ मधील आहात असे म्हणावे लागेल. तसेच तुम्ही पॅलेस्टाईन , हमास ला समर्थन देत असाल तर तुम्ही गट क्र. २ मधील आहात हे निश्चीत. हा भयंकर संवेदनशील विषय असल्याने शाहु फुले आंबेडकर ह्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या विषयावर स्पष्टपणे न बोललेलेच बरं .

> इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. भारतीय सरकारची भूमिका ह्या विषयावर अत्यंत योग्य राहिली आहे. भारत सरकारने, मग कुणाचेही का असेना, पेलेस्टिनीं लोकांना जीवनावश्यक मदत केली आहे. भारताने मागील काही वर्षांत $२२ दशलक्ष डॉलर्स ची मदत ह्या लोकांना केली आहे. तुलनेने पाकिस्तान ने $८००० दिले आहेत. ह्याशिवाय विद्यार्थ्यांना मदत, एक्सचेंज प्रोग्रॅम्स, योगा दिवस असे विविध प्रकल्प वेस्ट बॅंक मध्ये राबवले आहेत. ह्यांत कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही. त्याच वेळी इस्राएल पैसे घेऊन भारताला संरक्षण सामुग्री देतो, विविध प्रकारची गोपनीय माहिती पुरवतो इत्यादी मुले इस्राएल बरोबर सुद्धा विविध सरकारांनी अत्यंत चांगले संबंध ठेवले आहेत. इस्राएल पॅलेस्टिन वर भारतीय विदेश नीती योग्य राहिली आहे. राहिला विषय IMEC चा. G२० च्या इतर विषयाप्रमाणेच हि सुद्धा धूळफेक आहे आणि आमच्या हयातीत हा प्रकल्प फक्त चर्चिला जाईल. 'बेल्ट अँड रोड' हा प्रकल्प सुद्धा ह्याच प्रकारे पूर्णतः अपयशी ठरणार आहे. IMEC प्रकल्पाला इराण आणि रशिया विविध प्रकारे साबोटेज करतील तो विषय वेगळा. पॅलेस्टिनी लोकांच्या दयनीय अवस्थेबद्दल मला खरोखर वाईट वाटते. पण त्याच वेळी अत्यंत मागासलेल्या अश्या लोकांत आणखीन वेगळे काही घडले असते असे मला वाटत नाही. इस्राएल यहुदी असले तरी तेथील १०% लोकसंख्या अरब आहे. अरब लोक तिथे सुरक्षित आणि आरामात राहतात. पॅलेस्टिनी लोकांनी इराणी मदतीने हमास ला पुढे काढण्याच्या ऐवजी जर अरब राष्ट्रांची मदत घेऊन आर्थिक समृद्धीवर लक्ष केंद्रित केले असते (उदाहरणार्थ तैवान) तर शांतता पूर्ण मार्गाने ह्या प्रदेशाला इतर जगाकडून जास्त मान्यता मिळाली असती. सध्या हे लोक इतके मागासलेले आणि हिंसक आहेत कि अरब राष्ट्रे सुद्दा ह्या देशांतून पुरुष शरणार्थी घेणार नाहीत. पण ह्या प्रदेशांतील लहान मुलांबद्दल वाईट वाटते. इस्राएल ने ह्या प्रदेशांतील प्रजनन दर २ पेक्षा खाली आणण्यावर भर दिला पाहिजे होता. तो सध्या ४ च्या आसपास आहे. भारताने काश्मीर मध्ये हा रेट १.४ म्हणजे देशांत गोवा आणि सिक्कीम च्या बरोबर आणला आहे आणि त्याचे चांगले परिणाम हळू हळू दिसत आहेतच.

बाकी इस्त्रायल, पॅलेस्टाईनशी कसे वागायचे ते मरु द्या... इथल्या अनेकांशी कसे वागायचे ते कळले. अनेकांचे मुखवटे मस्त उघडे पडलेले पाहून मजा आली.

उत्तम लेखन मांडणी. वाचत आहे. लेखन प्रतिसाद मातीपूर्ण आहेत. पुलेशु. -दिलीप बिरुटे

वर्तमान् पत्रातील बातम्या आणि तूनळीवरील चर्चा ह्यातुन मला समजले ते ईथे मांडतोय ज्यू लोकांना कधीच स्वतःची भूमि नव्हती. दुसर्‍या महायुद्धापर्यंत ज्यू लोकांनी तन मन धनाने अमेरिकेला आणि पर्यायाने दोस्त राष्ट्रांना जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणुन त्यानी एक जमिनीचा तुकडा मागितला. जेरुसलेम हे पुर्वापार त्यांचे श्रद्धास्थान असल्याने ही जमीन तिथेच कुठेतरी मिळावी ही त्यांची ईच्छा असावी(?). अमेरिकेलाही भौगोलिक दृष्टीने ते सोयीचे होते कारण लांब अंतर. मग पॅलेस्टीनी लोकांची फारशी पत्रास न बाळगता काही करार मदार करुन तिथला एक तुकडा ज्यू लोकांना च्तोडुन दिला गेला. साधारण ४४% ज्यू आणि ४८% पॅलेस्टीनी असा काहीसा करार होता. पण आधीच ज्यूनी तिथे हळूहळू आपली संख्या वाढवायला सुरुवात केली होती. इस्त्रायल देश तयार झाल्यावर वेळोवेळी आपले हात्पाय पसरुन ज्यू नी अजुन अजुन भूभाग काबीज केला. आता फक्त गाझा आणि वेस्ट बँक पॅलेस्टीन कडे आहेत. पॅलेस्टीन चे स्वतंत्र सैन्य नाही ते अगतिक आहेत, तर इस्त्रायल पुर्ण सज्ज आहे. असमान संघर्ष आहे. भारताने युद्ध नको--ह्याच बाजुने राहणे चांगले.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ज्यू लोकांनी आफ्रिकेच्या युगांडा का आणखी कोणत्या देशाकडे त्याच्यासाठी जमीन विकतही मागितलेली होती, जमीन विकत घेऊन ते त्यांचा देश तिथे स्थापन करणार होते. यूट्यूब वरील एका चर्चेत हे मी ऐकेल आहे.

हा विषय आधी थोडा फार माहित होताच .. या छान अभ्यासपूर्ण लेखामुळे (नकाशा सहित) आणि चर्चांमुळे ज्ञानात आणखी भर पडली. धन्यु टर्मी ! असे विषय साचत गेले की कोण जास्त बरोबर हे ति-हाईत लोक छातीठोकपणे सांगू शकत नाहीत ! कधी हा बरोबर तर कधी तो बरोबर असंच दिसतं... न्याय अन्यायाचा लढा सुरूच रहातो... युद्ध धगधगत राहतं .... आपल्यासाठी खलीस्तानचा मुद्दा धगधगत आहेच ! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !

भारत , युनायटेड स्टेट्स , संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, फ्रान्स , जर्मनी , इटली आणि युरोपियन युनियन या सरकारांद्वारे 2023 G20 नवी दिल्ली शिखर परिषदेदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. विकिमध्ये यात इस्रायलचे नाव नाही, व्हाईट हाऊस च्या प्रसिद्धी मध्ये ही तसा उल्लेख नाहीये. या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, भारतीय प्रजासत्ताक, संयुक्त अरब अमिराती (यूएई), फ्रेंच प्रजासत्ताक, जर्मनीचे फेडरल रिपब्लिक, इटालियन प्रजासत्ताक आणि संयुक्त राज्य सरकारे अमेरिका राज्ये ("सहभागी") भारत - मध्य पूर्व - युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) स्थापन करण्यासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहेत. इस्रायल या करारात नाहीये का?

In reply to by निनाद

निनाद, इस्रायल करारात नसला तरी तुम्ही दिलेल्या धवलगृहाच्या दुव्यावर लाभार्थी म्हणून दिसतो आहे :
.... enabling goods and services to transit to, from, and between India, the UAE, Saudi Arabia, Jordan, Israel, and Europe.
- नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

निनाद, मला वाटतं की इस्रायल संस्थापक नसल्यामुळे त्याने दिल्ली करारावर स्वाक्षरी केली नसावी. यथावकाश सदस्य म्हणून दाखल होईल. - नाठाळ नठ्या

इस्त्रायलने अत्यंत घातक व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब वापरल्याचा आरोप होत आहे.व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब हवेतल्या ओक्सिजनच्या संपर्कात आल्यावर पेट घेऊन ८०० डिग्री पर्यंत तापमान होते.
जी माणसं आगीत होरपळून मृत पडत नाहीत, त्यांचा श्वास कोंडून जीव जातो. पाणी टाकल्यानंतरही तो सहजासहजी विझत नाही. उलट धुराचे लोट तयार करत अधिक पसरतो. फॉस्फरस बॉम्ब १३०० डिग्री सेल्सिअसपर्यंत पेटू शकतो. त्यामुळे हाडंही वितळतात. या बॉम्बच्या संपर्कात आलेली व्यक्ती सुदैवानं वाचलीच, तरीही त्याला आयुष्यभर मरणयातना सहन कराव्या लागतात. त्याला सातत्यानं गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागतो. त्याचं आयुष्य कमी होतं. त्वचेवरील संसर्ग बऱ्याचदा रक्तापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हृदय, यकृत, किडनीचं नुकसान होतं. यामुळे शरीरातील अनेक अवयव बंद पडण्याची शक्यता वाढते. -मटा

In reply to by Bhakti

अजून तितके रीलायेबल नाहीये. ह्युमन राईट्स वॉच नामे संस्थेने ह्यावर रिपोर्ट केले आहे. इजरायल ने ह्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यामुळे खरे काय माहीत नाही.

In reply to by जेपी

तीथं पाणी नाय, वीज नाय, अन्न नाय. कधी इस्रायलचं राकेट येऊन पडंल ह्याचा भरवसा नाय, काय कराचं जाऊन?

हमास चे नेतृत्त्व हे चक्क कम्युनिस्ट आहे आणि पोलिट्ब्युरो ठरवेल तशी दिशा असते. यांना कम्युनिझम चे नेतृत्त्व चालते?

यांना कम्युनिझम चे नेतृत्त्व चालते?
कम्युनिझम पॅलेस्टाईनमध्ये तसा नवा नाही. १९८७ साली अस्तित्वात आलेल्या हमास ह्या दहशतवादी संघटनेच्या आधी दोन दशके म्हणजे सिक्स डे वॉर नंतर अवघ्या सहा महिन्यांनी १९६७ च्या डिसेंबर महिन्यात पॅलेस्टाईन मुक्तीसाठी 'मार्क्सवादी-लेनिनिस्ट पॉप्युलर फ्रंट'ची स्थापना झाली होती. पुढच्या दशकात ह्या डाव्या गटांनी केलेले अनेक रक्तरंजित हल्ले आणि विमानांचे अपहरण अशा घटनांतून पॅलेस्टाईनकडे जगाचे लक्ष वेधून घेतले होते. हमास हे मुस्लिम ब्रदरहूड ह्या जिहादी/दहशतवादी संघटनेचे अपत्य मानले जाते. मुस्लिम ब्रदरहूडच्या संस्थापकाच्या विचारांवर नाझीझम आणि फॅसिझमचा प्रभाव होता. हमास ह्या त्यांच्या अपत्याने 'इस्रायलचा सर्वनाश' हे आपले एकमेव ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या कार्यपद्धतीत त्या दोन विचारांबरोबरच कम्युनिस्ट कार्यपद्धतीचाही समावेश केला. पॉलिटब्युरोतील सर्वोच्च नेत्यांना स्वतः परदेशात (मुख्यत्वे टर्की मध्ये) सुरक्षित बसून स्थानिक दुय्यम नेतेमंडळी आणि आपला जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यकर्ते, अनुयायी, समर्थकांना आदेश देणे छान सोयीचे पडते. ग्राउंड लेव्हलवर काहीही होवो, ही नेतेमंडळी मात्र परदेशात सुरक्षित असतात 😀

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खबरबात तर आहे. तीच लिहायला मिपावर आलो होतो, पण ते पडले बाजुला, त्याऐवजी एक कथा टंकत बसलो आहे 😀

In reply to by अमरेंद्र बाहुबली

समाज माध्यमावर ज्यू विरोध आणि हिटलरचे समर्थन करणे पडले महाग! “No wonder why Hitler wanted to get rid of all of them,” असे इंस्टाग्राम वरील आपल्या स्टोरी मध्ये लिहिणे 'नोजिमा हुसाइनोवा' नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणीला महागात पडले आहे. ही तरुणी सिटी बँकेची कर्मचारी होती आणि इंस्टाग्राम आणि X (पूर्वाश्रमीचे ट्वीटर) अशा समाज माध्यमंवर व्हायरल झालेल्या तिच्या ज्यू-विरोधी विचाराच्या आणि हिटलरने केलेल्या हत्याकांडाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट्सवर उमटलेल्या वापरकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रियांच्या परिणामी तीला आपली नोकरी गमवावी लागली आहे. सिटी बँकेने ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीला कामावरून कमी केल्याची पोस्ट X वर केली आहे. तिच्या ह्या बेजवाबदार कॉमेंटमुळे जवळपास सर्वच समाज माध्यमांवरील तिच्या प्रोफाइल्स डिलीट करण्यात आल्या आहेत. आपली ओळख लपवून एखाद्या टोपणनावामागे लपून वाट्टेल त्या हिडीस गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांच्या पराक्रमाची तुलना ही शिखंडीच्या मागे लपून शरसंधान करणाऱ्या अर्जुनाच्या त्या निंदनीय पराक्रमाशीच होऊ शकते, परंतु आपली ओळख जाहीर असताना केलेल्या विधानाचे परिणाम भोगलेल्या ह्या तरुणीविषयी तिचे कृत्य चुकीचे असले तरी वर उल्लेख केलेल्या भेकड लोकांपेक्षा जास्त आदर वाटतो 😀

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आम्हाला मानवतेची काळजी वाटते. काय करणार सनातनी वृत्ती आहे आमची. पिंडच असा घडला आहे. जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें || दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

In reply to by अहिरावण

मी मानवतावादी असल्यानेच मला इस्रायल ची काळजी वाटते. आजूबाजूला सर्वच शत्रू आहेत त्यांच्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा। शत्रु बुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते। खरा मानवतावादी... अर्थात फक्त आणि फक्त सनातनी.

Canada भारत वितुष्ट हा एक ज्वलंत प्रश्न होत आहे. कालच्या ट्रुडोच्या वक्तव्याने जाळ वाढला आहे.

जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेझर यांनी घोषणा केलीय की हमासला पाठिंबा देणाऱ्यांना देशातून हद्दपार केले जाईल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेझर यांनी घोषणा केलीय की हमासला पाठिंबा देणाऱ्यांना देशातून हद्दपार केले जाईल. आणि पॅलेस्टीनला पाठिंबा दिला तर?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ईस्त्रायलच्या आड अ‍ॅग्लो सॅक्सनांच्या फुटीर आणि विद्वेषी वृत्तीला पाठिंबा दिला तर?