मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?

उपयोजक · · काथ्याकूट
प्रत्येकाला जीवनात लहान मोठी काहीतरी समस्या असते. सध्याची संपली की सुखी जीवन सुरु असे काही नसते. 'जब तक जीवन है तब तक संघर्ष है।' हे अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्यासारख्या अब्जाधीशाला संघर्ष चुकला नाही तर आपण कोण? तर मित्रहो, 'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? 'आपल्या' असे म्हणण्याचे कारण म्हणजे एखाद्याचे सुदैव हे कदाचित दुसर्‍याचे दुर्दैव किंवा अटळ असा तोटा/नुकसान असू शकतं. एखाद्याला मिळालेली चांगली संधी ही दुसर्‍याचं मन खट्टू करु शकते. यामुळेच ती चुटपुट मनाला लागू न देता आपल्या जीवनात सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? संधीसाधू(चांगल्या अर्थाने) कसे व्हावे? उपाय स्ट्रॅटेजिक, तार्किक किंवा अगदी विशिष्ट देवोपासना, स्त्रोत्रे, मंत्रे , वास्तुशास्त्र , फेंगशुई , रत्ने वापरणे , संत अध्यायवाचन वगैरे असले तरी चालतील. (उपाय कोणाला शारीरिक ,मानसिक इजा करणारे नसावेत) ज्यांचा विश्वास आहे ते लोक करतील. सुचवा उपाय तसेच सामायिक करा आपले या विषय अनुषंगाने असणारे अनुभव. _/\_

वाचन 24933 प्रतिक्रिया 0