✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 04/22/2021 - 08:59  ·  लेख
लेख
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे. https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत. https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
92186 वाचन

💬 प्रतिसाद (362)

प्रतिक्रिया

लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः

श्रीगुरुजी
Fri, 04/23/2021 - 18:38 नवीन
लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः । कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥ अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एकवेळ वाळू रगडून तेल काढता येईल, वाळवंटातील भासमान मृगजळाने तृषार्त मृगाची तहान भागेल, सशाच्या टाळूवर शिंग सापडेल, पण मुर्खाचे समाधान करणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सहमत आहे ....

मुक्त विहारि
Fri, 04/23/2021 - 18:44 नवीन
त्यामुळे आजकाल अशा, परमपूज्य लोकांना, मी तरी जास्त मनावर घेत नाही ... --------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/23/2021 - 23:50 नवीन
+१ आघाडी सरकारची कामे सांगा मदन शर्मा ला मारहाण करमुसे मारहाण आणी तेच तेच वाचून विट येतो. बंगाली बाबा वर मात्र मौन पाळनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नाही, अजून बरीच भरीव कामे

श्रीगुरुजी
Fri, 04/23/2021 - 23:57 नवीन
नाही, अजून बरीच भरीव कामे केलीत. कंगनाचे घर तोडणे, साधूंची हत्या, पूजा चव्हाणची आत्महत्या (?), दरमहा १०० कोटींची खंडणी, मनसुख हिरेनचा खून, सरकारचे (म्हणजे जनतेचे) ४०० कोटी वापरून वडिलांचे स्मारक, संपूर्ण राज्याची वाट लावणे . . . यादी फार मोठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बाकी बंगालात मोदींच्या

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/24/2021 - 00:10 नवीन
बाकी बंगालात मोदींच्या चाललेल्या सभांवर मौन पाळनार म्हणजे पाळनारच होना???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नॅशनल न्यूज

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/23/2021 - 13:35 नवीन
विरारला हॉस्पिटलमध्ये आग लागून त्यात १३ रूग्णांचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही राष्ट्रीय पातळीवरील बातमी नाही (‘नैशनल न्यूज नहीं है ये’) असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. हो बरोबर आहे. विरारला झालेला भयानक प्रकार ही नॅशनल न्यूज नाही पण उत्तर प्रदेशातील कोणत्यातरी जिल्हा परिषदेचा टिनपाट सदस्य काही बरळला तर मात्र ती लगेच नॅशनल न्यूज होते, त्याचे मोदींकडून स्पष्टीकरण मागितले जाते इतकेच नव्हे तर त्या कारणासाठी मोदींच्या राजीनाम्याची पण मागणी होते. आग लागून १३ जण मरण पावले ही नॅशनल न्यूज कशी होईल?
  • Log in or register to post comments

चुकीचे वक्तव्य.

कॉमी
Fri, 04/23/2021 - 13:51 नवीन
एखादा व्यक्ती जरी चुकीने दगावला तरी ती नॅशनल न्यूज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

चंद्र सूर्य कुमार

Rajesh188
Fri, 04/23/2021 - 18:04 नवीन
वसई मधील आग म्हणजे देशातील दुर्मिळ मधील दुर्मिळ घटना आहे काय. अशा आगी दिवसातून किती तरी देशात लागत असतात. कॉमन गोष्ट आहे. नॅशनल काय राज्य स्तरावरील पण न्यूज नाही ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आग

प्रसाद_१९८२
Fri, 04/23/2021 - 18:10 नवीन
लागुन १३ लोक मेली. तुमच्या मते किती माणसे आगीत होरपळून मेली तर त्याची नॅशनल न्युज होईल ? एक तर मुर्खासारख्या प्रतिक्रिया महावसुली आघाडीचे नेते टिव्हीवर देतात व त्यांचे भाट इथे त्यांचे समर्थन करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

किती माणसं मेली हा विषय नाही

Rajesh188
Fri, 04/23/2021 - 18:24 नवीन
प्रतेक व्यक्ती चा जीव अमूल्य आहे. स्थानिक शासन प्रशासन त्या वर तोडगा काढण्यास सक्षम आहे ,दोषी ना शिक्षा देण्यास पण सक्षम आहे. आणि अशा घटना परत होवू नयेत म्हणून उपाय योजना करण्यास पण सक्षम आहे. देशातील सर्वात चांगले प्रशासन आणि शासन महाराष्ट्र मध्ये आहे (, भले वासरात लंगडी गाय शहाणी असेल ) जी घटना दुर्मिळ असते देशात कधी तरी च घडते त्या घटनेची नॅशनल न्यूज होवू शकते. वसई मध्ये जी घटना घडली आहे ती त्या प्रकारची नाही. आग आणि त्या मध्ये जीवित हानी देशात सर्रास घडणारी घटना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

काहिच्या काही थापा नका मारु !

प्रसाद_१९८२
Fri, 04/23/2021 - 18:32 नवीन
देशातील सर्वात चांगले प्रशासन आणि शासन महाराष्ट्र मध्ये आहे -- गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात, हॉस्पिटलना आग लागण्याच्या किती घटना घडल्यात ? आणि त्या आगीत किती निष्पाप लोकांचे जीव गेले ! उगा 'लंगड्या' सरकारचे समर्थन करायला काहीही बोलू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

.

अनन्त अवधुत
Sat, 04/24/2021 - 08:37 नवीन
आणि अशा घटना परत होवू नयेत म्हणून उपाय योजना करण्यास पण सक्षम आहे.
३ महिन्यापूर्वी भंडार्‍याच्या रूग्णालयात आग लागून १० जीव गेले होते, नंतर काय उपाय योजना केल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

बडे बडे देशो मे छोटी छोटी

आनन्दा
Sat, 04/24/2021 - 17:57 नवीन
बडे बडे देशो मे छोटी छोटी बनते होती रहती है.. काही आठवतंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

आठवले , त्यांना नाही तरी मला आठवले

स्वलिखित
Sat, 04/24/2021 - 22:23 नवीन
बोंबला !! ह ह पु वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

केजरीवाल..

यश राज
Fri, 04/23/2021 - 16:12 नवीन
आजच्या पं.प्र मोदी यांच्या सर्व राज्यातील मु.मं च्या मीटींग मध्ये दिल्ली चे मु.मं केजरीवाल यांनी इनहाउस प्रोटोकॉल तोडला व खाजगी मीटींग चालु असताना लाइव प्रसारण केले. https://maharashtratimes.com/india-news/pm-cm-conference-pm-narendra-modi-chided-cm-kejriwal-at-covid-meet-over-protocol-break/articleshow/82213902.cms पंप्र मोदींनी त्याना टोकल्यानंतर केजरीवाल यांनी माफी मागितली. केजरीवाल हा माणुस पहिल्या दिवसापासुन डोक्यात जातो.. या अगोदरच्या मीटींग मध्ये सुद्धा पंप्र मोदींचे संबोधन सुरु असताना २ मु.मं चे चाळे सुरु होते.. त्यात केजरीवाल हे जांभया देत आळोखे पिळोखे देत होते व दुसरे 'बेष्ट षिएम' मोबाइलशी खेळताना दिसत होते.
  • Log in or register to post comments

सकाळ मध्ये आलेली बातमी.....

नावातकायआहे
Fri, 04/23/2021 - 16:16 नवीन
https://www.esakal.com/desh/pm-modi-virtual-meeting-with-cm-arvind-kejriwal-oxygen
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

केजरीवाल हा माणुस पहिल्या

सुबोध खरे
Fri, 04/23/2021 - 19:15 नवीन
केजरीवाल हा माणुस पहिल्या दिवसापासुन डोक्यात जातो असं म्हणायचं नाही येथील आपटार्ड लोकांच्या नाजूक संवेदनशील मनाचा कोंडमारा होतो. ते युगपुरुष आहेत आणि ते म्हणतील तीच पूर्व असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

वन ऑफ द बेष्ट शीएम्

मुक्त विहारि
Fri, 04/23/2021 - 19:46 नवीन
.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केरळ

कॉमी
Fri, 04/23/2021 - 20:26 नवीन
केरळने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची मॅनेजमेंट चांगली केली असे म्हणायला वाव आहे. पहिल्या वेव्ह पासून केरळने आपल्या व्हेंटिलेटर्सचा आकडा दुप्पट केला आहे. केवळ पब्लिक हॉस्पिटल्स मधले ICU बेड सुद्धा ५०% ऑक्युपाय झाले आहेत. २६५० पब्लिक बेड्स आहेत. आणि जर प्रायव्हेट स्केक्टर्सना जे २०% बेड कोव्हिड साठी राखीव ठेवण्यास सांगितले आहे, ते धरून ९७३५ बेड आहेत. व्हेंटिलेटर ओक्युप्नसी फक्त २०% आहे. ऑक्सिजन साठी केरळ ने वाढती मागणी नजरेत ठेवली आणि आज त्यांच्या कडे सरप्लस ऑक्सिजन आहे जो इतर राज्यांना पुरवला जातो आहे. केरळ सध्या २१९ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित करत आहे तर त्यांची आवश्यकता ७५ मेट्रिक टन आहे. केरळच्या कॉम्रेड्सना लाल सलाम. चांगले काम केले आहे तुमच्या राज्यासाठी आणि देशाला सुद्धा हातभार लावत आहात. https://www.thehindu.com/news/national/kerala/no-oxygen-crisis-in-kerala-cm/article34378488.ece https://www.bbc.com/news/uk-56841381.amp
  • Log in or register to post comments

केरळ सरकार

Rajesh188
Fri, 04/23/2021 - 20:36 नवीन
अभिनंदनास पात्र आहे.उत्तम काम केरळ सरकार नी केले आहे. केंद्रीय राजकारणात स्वतः ल कधीच केरळ नी गुंतवून ठेवले नाही . फक्त राज्याचे हित आणि राज्याचे च प्रश्न ह्यांना प्राधान्य दिले. महाराष्ट्र नी सुद्धा केंद्रीय राजकारणात आणि राष्ट्रीय प्रश्नात स्वतल गुंतवून घेवू नये. तर च महाराष्ट्र पण प्रगती करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

+१

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/23/2021 - 23:57 नवीन
+१ राष्ट्रहीत वगैरे शब्द वापरून राष्ट्रातील नागरीकाना वार्यावर सोडून दाढीवाले बाबा बंगालात फिरत आहेत. आणखी किती मुर्ख बनवनार जनतेला? ऊद्याच भाषण असेल.. “मित्रो, बचपन से मै जादूगार बनना चाहता था, मै बंगाल मे बंगाली जादूसिखने गया था..... :) ह्यावरून एक कायप्पा विनोद आठवला. मै पुनावाला बनना चाहता था लेकीन चुनावाला बनगया :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

विनोद भारी आहे

Rajesh188
Sat, 04/24/2021 - 00:28 नवीन
भारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बास करा रे ;)

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 04/23/2021 - 22:29 नवीन
ताज्या घ्डामोडी राजकारणाचा आड्डा होत चालल्यात! मायबोली सारखं मिपा पण सोडायची वेळ आणताय तुम्ही.
  • Log in or register to post comments

'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी

मुक्त विहारि
Fri, 04/23/2021 - 22:35 नवीन
"esakal | 'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी" https://www-esakal-com.cdn.ampproject.org/v/s/www.esakal.com/amp/mumbai/bombay-hc-pulls-up-maharashtra-govt-over-remdesivir-supply?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16191955574684&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fesakal.com%2Fmumbai%2Fbombay-hc-pulls-up-maharashtra-govt-over-remdesivir-supply काय बोलावं ते सुचेना .....
  • Log in or register to post comments

फडणवीस साहेबाना

Rajesh188
Sat, 04/24/2021 - 00:31 नवीन
विनंती केली आहे जो साठा लपवून ठेवला आहे तो ध्या पाहिजे पैसे दुप्पट घ्या. शेवटी त्यांची पण मेहनत आहे ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/23/2021 - 23:53 नवीन
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद पवारांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मितीचे आदेश http://dhunt.in/emSNh?s=a&uu=0x06abeb81ccd2b5a5&ss=wsp Source : "लोकमत"
  • Log in or register to post comments

साखर कारखाने ऑक्सिजनचा

सुक्या
Sat, 04/24/2021 - 02:49 नवीन
साखर कारखाने ऑक्सिजनचा निर्मिती करु शकतात हे सरकार मधे कुनालाच माहीत नव्हते काय? केंद्रा च्या नावाने गळे काढुन काढुन थकले होते काय ? पार रेल्वे ने विशाखापट्ट्नम / बोकारो वरुन ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला म्हणुन विचारतोय. साखर कारखाने ऑक्सिजनचा निर्मिती करु शकत असतील तर महारष्ट्राला गरज पडणार नाही बाहेरुन मागवायची ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जे सर्वसामान्य अडाणी माणसांना समजते ....

मुक्त विहारि
Sat, 04/24/2021 - 05:13 नवीन
ते घराणेशाहीच्या पाईकांना समजेलच असे नाही .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

ऑक्सिजन प्लॅन्ट

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 04/24/2021 - 00:28 नवीन
त्या प्लॅन्टससाठी पैसे पण अलोकेट केले हिते म्हणे? https://pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1686271
  • Log in or register to post comments

तुम्ही पन

Rajesh188
Sat, 04/24/2021 - 00:33 नवीन
तुम्ही पण अड्ड्यावर. क्या बात है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

ह्याविषयी

प्रदीप
Sat, 04/24/2021 - 06:19 नवीन
अगोदरच चर्चा झालेली आहे. तेव्हा ती नीट वाचावी. मधूनच काहीतरी नवे असल्यासारखे टाकू नये. आणि, 'इथेपण इतर संस्थळावरासारखेच सुरू आहे, तेव्हा आता हेही सोडून जायची वेळ येते आहे' असा त्रागा करता करता, स्वतः त्यात भर घालू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

ध्न्यवाद

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 04/24/2021 - 19:30 नवीन
आभार. बाय बाय अन शुभेछा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

राणा आय्युब ने टाईम मध्ये लेख

कॉमी
Sat, 04/24/2021 - 09:02 नवीन
राणा आय्युब ने टाईम मध्ये लेख लिहिला आहे. त्यातला कुंभ मेळ्याचा भाग - १. ११ मार्च ला कुंभ मेळ्याचे शाही स्नान सुरु झाले. मार्च मध्ये भाजपने कुंभ मेळा 'स्वच्छ आणि सुरक्षित' आहे म्हणून पानभर जाहिराती छापल्या. उत्तराखंडाचे cm म्हणाले, कोव्हिडच्या नावाने भाविकांना थांबवले जाणार नाही. आपली ईशवराप्रति श्रद्धा कोव्हिड वर मात करेल. २. एप्रिल दरम्यान मेळ्यातल्या भाविकांमध्ये १६०० पर्यंत केसेस आढळल्या. (आणि एकूण २१६७ भाविक पूर्ण कालावधीमध्ये.) ३. त्याच (एप्रिल मध्य.) दरम्यान मोदीजींनी कुंभ मधला सहभाग 'सिम्बॉलीक' ठेवा असे सांगितले. https://time.com/5957118/india-covid-19-modi/ दिल्लीत २५ रुग्णांचा ऑक्सिजन अभावे मृत्य. https://news.abplive.com/news/india/25-sickest-patients-die-at-sir-ganga-ram-hospital-in-delhi-after-oxygen-shortage-1454315
  • Log in or register to post comments

त्याचबरोबर

प्रदीप
Sat, 04/24/2021 - 09:45 नवीन
इतरही अनेक मेळावे, जत्थे वगैरे ह्या काळात भरत होते व अजूनही भरत आहेत. त्यांबद्दल काहीही चर्चा का नाही? * करोनाचा धुमाकूळ सुरू असतांना हरयाणा, दिल्ली, उ.प्र. ह्यांच्या सीमांवर, 'शेतकर्‍यांच्या निषेधा'च्या नावाखाली जे काही गेली अनेक महिने सुरू आहे, त्याचे काय? * अजमेर- शरीफचा उत्सवही ह्या काळातच अलिकडेच्ध साजरा झाला. * हैद्राबादेतही रमझानच्या सुरूवातीच्या निमीत्ताने मोठ्ठा मेळा भरला होता. * बंगालच्या प्रचारसभा ह्या दरम्यान सुरू होत्याच, इतकेच नव्हे, किमान एका पक्षाच्या त्या सभा व पदयात्रा वगैरे अजूनही सुरू आहेच. जाता जाता, महाराष्ट्रांत परवाच मुख्यमंत्र्यांनी लग्नासंबंधी काढलेला नवा कायदा/ गाईडलाईन अतिशस्य रास्त आहे. त्याविषयी कुरकुरणे माझ्या मते बेजबाबदारीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

+१

कॉमी
Sat, 04/24/2021 - 09:56 नवीन
त्याबद्दल पण व्हावी चर्चा. माझया वाचनात हे आले म्हणून हे टाकले. प्रचारसभांबाबत तर कडवे मत आहेच. TMC भाजप आणि काँग्रेस तिघेही अगदी शेवटच्या घडीपर्यंत बेजबाबदार पणे वागलेत. आज बंगाल भाजपचा नेता रॅलीज मुळे कोव्हिडचा मोठ्याप्रमाणावर प्रसार झाला हे खरे नाही असे म्हणत होता. शेतकऱ्यांच्या निषेधाबाबत सेम मत. तात्पुरता थांबवावा. कुंभ मेळ्याबद्दल लिहायचे कारण म्हणजे फक्त तिथे गर्दी झाली हे नसून , राज्यातले अधिकारी ऍक्टिव्हली तिथे येण्यास हरकत नाही असे सांगत होते. ही गोष्ट लोकांना भ्रामक माहिती देऊन त्यांचे प्राण धोक्यात घालण्याची आहे. ही गोष्ट स्टेट स्पॉन्सर्ड असल्याने माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाची ठरते. इतर ठिकाणी असे होते किंवा नाही पाहावे लागेल. पाहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

मुख्यमंत्र्यांनी लग्नासंबंधी काढलेला नवा कायदा/ गाईडलाईन...

मुक्त विहारि
Sat, 04/24/2021 - 09:59 नवीन
अतिशस्य रास्त आहे.... ---------- कमी माणसांच्या उपस्थितीत लग्न होणे शक्य आहे पण कमी वेळांत लग्न उरकणे, ही तारेवरची कसरत आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

तुम्हाला तरी हा प्रश्न पडायला नको होता

Rajesh188
Sat, 04/24/2021 - 11:24 नवीन
लग्न समारंभ दोन तासात ऊर्जा हा सरकारी आदेश आहे. पण सरकार चा तो आदेश कुठे लागू आहे. लग्नाचे हॉल जिथे आहेत तिथे . लग्नाच्या हॉल मध्ये,रिसॉर्ट मध्ये जिथे लग्न लावली जातात त्या आस्थापना ना तशा सूचना दिल्या असतील . Pvt जागेत,घरात,तुम्ही किती वेळात लग्न लावत आहात हे बघायला कोण येणार आहे. फक्त उपस्थिती लोकांची अट तंतोतंत पाळणे,बाकी जी काळजी घ्यायची आहे ती गंभीर पने घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अच्छा ....

मुक्त विहारि
Sat, 04/24/2021 - 11:33 नवीन
अशी पळवाट काढली आहे का? भलतंच डोकेबाज सरकार आहे.... थोडक्यात आता, समारंभ कार्यालयांना पण वाढीव टॅक्स लागू करण्याची शक्यता आहे.... मी टॅक्सची गोष्ट करत आहे, टॅक्स म्हणजे, सरकारी खजिन्यात जमा होणारा, पांढरा पैसा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कमी वेळांत लग्न उरकणे

प्रदीप
Sat, 04/24/2021 - 12:54 नवीन
मग उरकू नये, ना? एका व्यक्तिचे लग्न सर्वसाधारणपणे काही एकाद्या दिवशी/ महिन्यात/ तिमाहीतच लागले पाहिजे असे कुठे आहे? थोडे थांबता येत नाही का? अथवा घरच्या घरीच लावून नंतर आयुष्य सुरळीत झाल्यानंतर जेवणावळी / रिसेप्शन करता येत नाही का? आणि नाहीतरी आजकाल, मराठी मध्यमवर्गीय लोकांची लग्ने आपल्या पारंपारीक पद्धतीने कुठे लावली जातात? म्हणजे नावापुरता भटजी असतो, तो काहीबाही 'हे करा, ते करा' वगैरे सांगत असतो, त्याच्या प्रयत्नांची शिकस्त करत, त्याला ठावूक आहे, अशा पारंपारीक पद्धतीने, मंत्र वगैरे म्हणत विधी पार पाडत असतो, तेव्हा दोन्ही घरची माणसे, इतर पंजाबी पद्धतीच्या बाबी करण्यात गुंतलेली असतात--- वधू अथवा वर, वाजतगाजत पालखीतून हॉलमधे येतो/ येते; मंत्रपुष्पांजलि सुरू असतांना नवर्‍या मुलाचे मित्र त्याच्या मागे येऊन उभे रहातात. व हार घालायची वेळ येताच त्याला वरती उंच उचलून धरतात, आणि 'ये खाली, ये खाली' असे काहीबाही ओरडतात. हा खरे तर विधींचा व त्याहीपेक्षा, भटजींचा अपमान आहे, बिचारे मूग गिळून सहन करतात. आणि आता, लग्नात आधल्या दिवशी 'संगीत' नावाचे खास पंजाबी प्रकरण असते. हा सगळा मूर्ख सोहळा व खेळ करण्यास काही दिवसही पुरणार नाहीत, खरे तर. तेव्हा ह्या सगळ्या मूर्खपणाला सध्या फाटा द्या. ह्या सर्व प्रकरणांत गुंतलेल्या धंदेवाल्याचे सोडून, ज्यांचे लग्न आहे, त्यांचे २ तासात करण्यातून, अथवा शक्य तर सध्या काहीही न करण्यावरून काय बिघडते आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पडदा टाकतो

मुक्त विहारि
Sat, 04/24/2021 - 13:02 नवीन
पडदा टाकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार,

मुक्त विहारि
Sat, 04/24/2021 - 09:26 नवीन
.....मोदी सरकारचा मोठा निर्णय.... https://www.tv9marathi.com/national/central-government-will-provide-free-food-grain-in-may-and-june-mnoth-under-pm-garib-kalyan-anna-yojana-amid-corona-pandemic-443544.html/amp महाराष्ट्र राज्यातील, तांदूळ घोटाळा आठवला....
  • Log in or register to post comments

हे नाही आठवलं का?

Rajesh188
Sat, 04/24/2021 - 11:29 नवीन
सरकार जे अन्नधान्य शेतकऱ्या कडून विकत घेते आणि त्याचा साठा करून ठेवते तोच साठा अशा आणीबाणी च्या प्रसंगात उपयोगी पडतो. आणि हीच पद्धत मोदी सरकार बंद करायला निघाले आहे कृषी कायद्या नी. विचार करा असा साठा आता सरकार कडे नसता तर खासगी उद्योग पती लोकांनी किती भाव वाढवला असता. ऑक्सिजन,आणि बाकी औषधांचा कसा काळाबाजार चालू आहे तसाच अन्नधान्य च झाला असता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आपण इतके अगाध ज्ञान नक्की कुठून आणता?

मुक्त विहारि
Sat, 04/24/2021 - 11:45 नवीन
आधी इतकी उत्सुकता न्हवती, पण हे इतक्या आत्मविश्वासाने सांगत आहात, म्हणून विचारले.... अन्न पुरवठा मंत्रालय, नावाचे एक केंद्रीय खाते आहे ...थोडं त्या खात्या बद्दल वाचलेत तर बरे होईल... ------------ बाय द वे, परमपूज्य राहुल गांधी आणि माननीय शरद पवार, यांनी आत्ता जे कायदे आले आहेत, त्याचेच समर्थन, त्यांचे राज्य असतांना केले होते... माननीय शरद पवार यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

खरे

Rajesh188
Sat, 04/24/2021 - 09:43 नवीन
आता सर्व राज्य आणि केंद्र सरकार ह्यांच्यात समन्वय हवा.मतभेद असले तरी सरकारी पातळीवर च असावेत आणि ते त्यांनी च सोडवावेत. जे काही निवेदन द्यायचे असेल covid विषयी तर केंद्र सरकार तर्फे पंतप्रधान नी द्यावे आणि रज्यातरफे मुख्यमंत्र्यांनी द्यावे. बाकी सर्व नेते,अभिनेते ह्यांना मीडिया मध्ये बोलायला सक्त मनाई करावी. सर्व च माहिती जनतेला देणे गरजेचे नाही. जी आवश्यक आहे तेवढीच द्यावी. उकळ्या पाकळ्या काढायची ही वेळ नाही. बघा पटतंय का.
  • Log in or register to post comments

महा वसुली गॅंगचा

प्रसाद_१९८२
Sat, 04/24/2021 - 09:51 नवीन
वसुली मॅन अनिल देशमुख यांच्यावर आक सिबिआयने गुन्हा दाखल केला. -- https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cbi-registers-fir-against-former-home-minister-anil-deshmukh-in-connection-with-allegations-made-by-param-bir-singh/articleshow/82226669.cms
  • Log in or register to post comments

सकाळी सकाळी

Rajesh188
Sat, 04/24/2021 - 09:57 नवीन
असल्याचं बातम्या वाचत असता का.करा positive विचार नी दिवसाची सुरुवात करत जा. योगा,जॉगिंग, थोडा व्यायाम हे सकाळी केले जातात.मन फ्रेश राहते . पण तुम्हाला ती सवय नाही वाटत उठले की पाहिजे राजकीय आतषबाजी करायची सवय आहे . सर्व फुसके बॉम्ब,भुई चक्र,फुलबजे असतात तुमच्या कडे. पण आमचा एकच बाण धमाका करतो आणि बरोबर वेध घेतो लक्षाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

सकाळी सकाळी

Rajesh188
Sat, 04/24/2021 - 09:58 नवीन
असल्याचं बातम्या वाचत असता का.जरा positive विचार नी दिवसाची सुरुवात करत जा. योगा,जॉगिंग, थोडा व्यायाम हे सकाळी केले जातात.मन फ्रेश राहते . पण तुम्हाला ती सवय नाही वाटत उठले की पाहिली राजकीय आतषबाजी करायची सवय आहे . सर्व फुसके बॉम्ब,भुई चक्र,फुलबजे असतात तुमच्या कडे. पण आमचा एकच बाण धमाका करतो आणि बरोबर वेध घेतो लक्षाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

"श्रीशुपाला, तुझे १०० टॉन्ट

डॅनी ओशन
Sat, 04/24/2021 - 10:56 नवीन
"श्रीशुपाला, तुझे १०० टॉन्ट मी झेलले, १०१ वा झेलणार नाही." असे म्हणून प्रभूंनी कुदर्शन चक्र फेकले. पण आश्चर्य, ते चक्र पलटून प्रभूंच्या आयडीचा शिरच्छेद झाला ! प्रभूंची लीला अपारंपरिक ! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कोणाचा आयडी गेला का?

श्रीगुरुजी
Sat, 04/24/2021 - 13:03 नवीन
कोणाचा आयडी गेला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन

जास्त विचार करू नका. चांगलं

श्रीगुरुजी
Sat, 04/24/2021 - 10:41 नवीन
जास्त विचार करू नका. चांगलं मनोरंजन होतंय. त्याचा आनंद घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा