मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे. https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत. https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html

वाचने 92337 वाचनखूण प्रतिक्रिया 362

In reply to by Rajesh188

श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 18:38
लभेत् सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः । कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥ अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एकवेळ वाळू रगडून तेल काढता येईल, वाळवंटातील भासमान मृगजळाने तृषार्त मृगाची तहान भागेल, सशाच्या टाळूवर शिंग सापडेल, पण मुर्खाचे समाधान करणे अशक्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

+१ आघाडी सरकारची कामे सांगा मदन शर्मा ला मारहाण करमुसे मारहाण आणी तेच तेच वाचून विट येतो. बंगाली बाबा वर मात्र मौन पाळनार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी Fri, 04/23/2021 - 23:57
नाही, अजून बरीच भरीव कामे केलीत. कंगनाचे घर तोडणे, साधूंची हत्या, पूजा चव्हाणची आत्महत्या (?), दरमहा १०० कोटींची खंडणी, मनसुख हिरेनचा खून, सरकारचे (म्हणजे जनतेचे) ४०० कोटी वापरून वडिलांचे स्मारक, संपूर्ण राज्याची वाट लावणे . . . यादी फार मोठी आहे.

विरारला हॉस्पिटलमध्ये आग लागून त्यात १३ रूग्णांचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही राष्ट्रीय पातळीवरील बातमी नाही (‘नैशनल न्यूज नहीं है ये’) असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. हो बरोबर आहे. विरारला झालेला भयानक प्रकार ही नॅशनल न्यूज नाही पण उत्तर प्रदेशातील कोणत्यातरी जिल्हा परिषदेचा टिनपाट सदस्य काही बरळला तर मात्र ती लगेच नॅशनल न्यूज होते, त्याचे मोदींकडून स्पष्टीकरण मागितले जाते इतकेच नव्हे तर त्या कारणासाठी मोदींच्या राजीनाम्याची पण मागणी होते. आग लागून १३ जण मरण पावले ही नॅशनल न्यूज कशी होईल?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 Fri, 04/23/2021 - 18:04
वसई मधील आग म्हणजे देशातील दुर्मिळ मधील दुर्मिळ घटना आहे काय. अशा आगी दिवसातून किती तरी देशात लागत असतात. कॉमन गोष्ट आहे. नॅशनल काय राज्य स्तरावरील पण न्यूज नाही ही.

In reply to by Rajesh188

प्रसाद_१९८२ Fri, 04/23/2021 - 18:10
लागुन १३ लोक मेली. तुमच्या मते किती माणसे आगीत होरपळून मेली तर त्याची नॅशनल न्युज होईल ? एक तर मुर्खासारख्या प्रतिक्रिया महावसुली आघाडीचे नेते टिव्हीवर देतात व त्यांचे भाट इथे त्यांचे समर्थन करतात.

In reply to by प्रसाद_१९८२

Rajesh188 Fri, 04/23/2021 - 18:24
प्रतेक व्यक्ती चा जीव अमूल्य आहे. स्थानिक शासन प्रशासन त्या वर तोडगा काढण्यास सक्षम आहे ,दोषी ना शिक्षा देण्यास पण सक्षम आहे. आणि अशा घटना परत होवू नयेत म्हणून उपाय योजना करण्यास पण सक्षम आहे. देशातील सर्वात चांगले प्रशासन आणि शासन महाराष्ट्र मध्ये आहे (, भले वासरात लंगडी गाय शहाणी असेल ) जी घटना दुर्मिळ असते देशात कधी तरी च घडते त्या घटनेची नॅशनल न्यूज होवू शकते. वसई मध्ये जी घटना घडली आहे ती त्या प्रकारची नाही. आग आणि त्या मध्ये जीवित हानी देशात सर्रास घडणारी घटना आहे.

In reply to by Rajesh188

प्रसाद_१९८२ Fri, 04/23/2021 - 18:32
देशातील सर्वात चांगले प्रशासन आणि शासन महाराष्ट्र मध्ये आहे -- गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात, हॉस्पिटलना आग लागण्याच्या किती घटना घडल्यात ? आणि त्या आगीत किती निष्पाप लोकांचे जीव गेले ! उगा 'लंगड्या' सरकारचे समर्थन करायला काहीही बोलू नका.

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत Sat, 04/24/2021 - 08:37
आणि अशा घटना परत होवू नयेत म्हणून उपाय योजना करण्यास पण सक्षम आहे.
३ महिन्यापूर्वी भंडार्‍याच्या रूग्णालयात आग लागून १० जीव गेले होते, नंतर काय उपाय योजना केल्या?

यश राज Fri, 04/23/2021 - 16:12
आजच्या पं.प्र मोदी यांच्या सर्व राज्यातील मु.मं च्या मीटींग मध्ये दिल्ली चे मु.मं केजरीवाल यांनी इनहाउस प्रोटोकॉल तोडला व खाजगी मीटींग चालु असताना लाइव प्रसारण केले. https://maharashtratimes.com/india-news/pm-cm-conference-pm-narendra-modi-chided-cm-kejriwal-at-covid-meet-over-protocol-break/articleshow/82213902.cms पंप्र मोदींनी त्याना टोकल्यानंतर केजरीवाल यांनी माफी मागितली. केजरीवाल हा माणुस पहिल्या दिवसापासुन डोक्यात जातो.. या अगोदरच्या मीटींग मध्ये सुद्धा पंप्र मोदींचे संबोधन सुरु असताना २ मु.मं चे चाळे सुरु होते.. त्यात केजरीवाल हे जांभया देत आळोखे पिळोखे देत होते व दुसरे 'बेष्ट षिएम' मोबाइलशी खेळताना दिसत होते.

In reply to by यश राज

सुबोध खरे Fri, 04/23/2021 - 19:15
केजरीवाल हा माणुस पहिल्या दिवसापासुन डोक्यात जातो असं म्हणायचं नाही येथील आपटार्ड लोकांच्या नाजूक संवेदनशील मनाचा कोंडमारा होतो. ते युगपुरुष आहेत आणि ते म्हणतील तीच पूर्व असते.

कॉमी Fri, 04/23/2021 - 20:26
केरळने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची मॅनेजमेंट चांगली केली असे म्हणायला वाव आहे. पहिल्या वेव्ह पासून केरळने आपल्या व्हेंटिलेटर्सचा आकडा दुप्पट केला आहे. केवळ पब्लिक हॉस्पिटल्स मधले ICU बेड सुद्धा ५०% ऑक्युपाय झाले आहेत. २६५० पब्लिक बेड्स आहेत. आणि जर प्रायव्हेट स्केक्टर्सना जे २०% बेड कोव्हिड साठी राखीव ठेवण्यास सांगितले आहे, ते धरून ९७३५ बेड आहेत. व्हेंटिलेटर ओक्युप्नसी फक्त २०% आहे. ऑक्सिजन साठी केरळ ने वाढती मागणी नजरेत ठेवली आणि आज त्यांच्या कडे सरप्लस ऑक्सिजन आहे जो इतर राज्यांना पुरवला जातो आहे. केरळ सध्या २१९ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित करत आहे तर त्यांची आवश्यकता ७५ मेट्रिक टन आहे. केरळच्या कॉम्रेड्सना लाल सलाम. चांगले काम केले आहे तुमच्या राज्यासाठी आणि देशाला सुद्धा हातभार लावत आहात. https://www.thehindu.com/news/national/kerala/no-oxygen-crisis-in-kerala-cm/article34378488.ece https://www.bbc.com/news/uk-56841381.amp

In reply to by कॉमी

Rajesh188 Fri, 04/23/2021 - 20:36
अभिनंदनास पात्र आहे.उत्तम काम केरळ सरकार नी केले आहे. केंद्रीय राजकारणात स्वतः ल कधीच केरळ नी गुंतवून ठेवले नाही . फक्त राज्याचे हित आणि राज्याचे च प्रश्न ह्यांना प्राधान्य दिले. महाराष्ट्र नी सुद्धा केंद्रीय राजकारणात आणि राष्ट्रीय प्रश्नात स्वतल गुंतवून घेवू नये. तर च महाराष्ट्र पण प्रगती करेल.

In reply to by Rajesh188

+१ राष्ट्रहीत वगैरे शब्द वापरून राष्ट्रातील नागरीकाना वार्यावर सोडून दाढीवाले बाबा बंगालात फिरत आहेत. आणखी किती मुर्ख बनवनार जनतेला? ऊद्याच भाषण असेल.. “मित्रो, बचपन से मै जादूगार बनना चाहता था, मै बंगाल मे बंगाली जादूसिखने गया था..... :) ह्यावरून एक कायप्पा विनोद आठवला. मै पुनावाला बनना चाहता था लेकीन चुनावाला बनगया :)

मुक्त विहारि Fri, 04/23/2021 - 22:35
"esakal | 'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी" https://www-esakal-com.cdn.ampproject.org/v/s/www.esakal.com/amp/mumbai/bombay-hc-pulls-up-maharashtra-govt-over-remdesivir-supply?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16191955574684&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fesakal.com%2Fmumbai%2Fbombay-hc-pulls-up-maharashtra-govt-over-remdesivir-supply काय बोलावं ते सुचेना .....

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 Sat, 04/24/2021 - 00:31
विनंती केली आहे जो साठा लपवून ठेवला आहे तो ध्या पाहिजे पैसे दुप्पट घ्या. शेवटी त्यांची पण मेहनत आहे ना

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद पवारांनी १९० साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मितीचे आदेश http://dhunt.in/emSNh?s=a&uu=0x06abeb81ccd2b5a5&ss=wsp Source : "लोकमत"

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुक्या Sat, 04/24/2021 - 02:49
साखर कारखाने ऑक्सिजनचा निर्मिती करु शकतात हे सरकार मधे कुनालाच माहीत नव्हते काय? केंद्रा च्या नावाने गळे काढुन काढुन थकले होते काय ? पार रेल्वे ने विशाखापट्ट्नम / बोकारो वरुन ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला म्हणुन विचारतोय. साखर कारखाने ऑक्सिजनचा निर्मिती करु शकत असतील तर महारष्ट्राला गरज पडणार नाही बाहेरुन मागवायची ...

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

प्रदीप Sat, 04/24/2021 - 06:19
अगोदरच चर्चा झालेली आहे. तेव्हा ती नीट वाचावी. मधूनच काहीतरी नवे असल्यासारखे टाकू नये. आणि, 'इथेपण इतर संस्थळावरासारखेच सुरू आहे, तेव्हा आता हेही सोडून जायची वेळ येते आहे' असा त्रागा करता करता, स्वतः त्यात भर घालू नये.

कॉमी Sat, 04/24/2021 - 09:02
राणा आय्युब ने टाईम मध्ये लेख लिहिला आहे. त्यातला कुंभ मेळ्याचा भाग - १. ११ मार्च ला कुंभ मेळ्याचे शाही स्नान सुरु झाले. मार्च मध्ये भाजपने कुंभ मेळा 'स्वच्छ आणि सुरक्षित' आहे म्हणून पानभर जाहिराती छापल्या. उत्तराखंडाचे cm म्हणाले, कोव्हिडच्या नावाने भाविकांना थांबवले जाणार नाही. आपली ईशवराप्रति श्रद्धा कोव्हिड वर मात करेल. २. एप्रिल दरम्यान मेळ्यातल्या भाविकांमध्ये १६०० पर्यंत केसेस आढळल्या. (आणि एकूण २१६७ भाविक पूर्ण कालावधीमध्ये.) ३. त्याच (एप्रिल मध्य.) दरम्यान मोदीजींनी कुंभ मधला सहभाग 'सिम्बॉलीक' ठेवा असे सांगितले. https://time.com/5957118/india-covid-19-modi/ दिल्लीत २५ रुग्णांचा ऑक्सिजन अभावे मृत्य. https://news.abplive.com/news/india/25-sickest-patients-die-at-sir-ganga-ram-hospital-in-delhi-after-oxygen-shortage-1454315

In reply to by कॉमी

प्रदीप Sat, 04/24/2021 - 09:45
इतरही अनेक मेळावे, जत्थे वगैरे ह्या काळात भरत होते व अजूनही भरत आहेत. त्यांबद्दल काहीही चर्चा का नाही? * करोनाचा धुमाकूळ सुरू असतांना हरयाणा, दिल्ली, उ.प्र. ह्यांच्या सीमांवर, 'शेतकर्‍यांच्या निषेधा'च्या नावाखाली जे काही गेली अनेक महिने सुरू आहे, त्याचे काय? * अजमेर- शरीफचा उत्सवही ह्या काळातच अलिकडेच्ध साजरा झाला. * हैद्राबादेतही रमझानच्या सुरूवातीच्या निमीत्ताने मोठ्ठा मेळा भरला होता. * बंगालच्या प्रचारसभा ह्या दरम्यान सुरू होत्याच, इतकेच नव्हे, किमान एका पक्षाच्या त्या सभा व पदयात्रा वगैरे अजूनही सुरू आहेच. जाता जाता, महाराष्ट्रांत परवाच मुख्यमंत्र्यांनी लग्नासंबंधी काढलेला नवा कायदा/ गाईडलाईन अतिशस्य रास्त आहे. त्याविषयी कुरकुरणे माझ्या मते बेजबाबदारीचे आहे.

In reply to by प्रदीप

कॉमी Sat, 04/24/2021 - 09:56
त्याबद्दल पण व्हावी चर्चा. माझया वाचनात हे आले म्हणून हे टाकले. प्रचारसभांबाबत तर कडवे मत आहेच. TMC भाजप आणि काँग्रेस तिघेही अगदी शेवटच्या घडीपर्यंत बेजबाबदार पणे वागलेत. आज बंगाल भाजपचा नेता रॅलीज मुळे कोव्हिडचा मोठ्याप्रमाणावर प्रसार झाला हे खरे नाही असे म्हणत होता. शेतकऱ्यांच्या निषेधाबाबत सेम मत. तात्पुरता थांबवावा. कुंभ मेळ्याबद्दल लिहायचे कारण म्हणजे फक्त तिथे गर्दी झाली हे नसून , राज्यातले अधिकारी ऍक्टिव्हली तिथे येण्यास हरकत नाही असे सांगत होते. ही गोष्ट लोकांना भ्रामक माहिती देऊन त्यांचे प्राण धोक्यात घालण्याची आहे. ही गोष्ट स्टेट स्पॉन्सर्ड असल्याने माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाची ठरते. इतर ठिकाणी असे होते किंवा नाही पाहावे लागेल. पाहातो.

In reply to by प्रदीप

मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 09:59
अतिशस्य रास्त आहे.... ---------- कमी माणसांच्या उपस्थितीत लग्न होणे शक्य आहे पण कमी वेळांत लग्न उरकणे, ही तारेवरची कसरत आहे ...

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 Sat, 04/24/2021 - 11:24
लग्न समारंभ दोन तासात ऊर्जा हा सरकारी आदेश आहे. पण सरकार चा तो आदेश कुठे लागू आहे. लग्नाचे हॉल जिथे आहेत तिथे . लग्नाच्या हॉल मध्ये,रिसॉर्ट मध्ये जिथे लग्न लावली जातात त्या आस्थापना ना तशा सूचना दिल्या असतील . Pvt जागेत,घरात,तुम्ही किती वेळात लग्न लावत आहात हे बघायला कोण येणार आहे. फक्त उपस्थिती लोकांची अट तंतोतंत पाळणे,बाकी जी काळजी घ्यायची आहे ती गंभीर पने घेणे.

In reply to by Rajesh188

मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 11:33
अशी पळवाट काढली आहे का? भलतंच डोकेबाज सरकार आहे.... थोडक्यात आता, समारंभ कार्यालयांना पण वाढीव टॅक्स लागू करण्याची शक्यता आहे.... मी टॅक्सची गोष्ट करत आहे, टॅक्स म्हणजे, सरकारी खजिन्यात जमा होणारा, पांढरा पैसा...

In reply to by मुक्त विहारि

प्रदीप Sat, 04/24/2021 - 12:54
मग उरकू नये, ना? एका व्यक्तिचे लग्न सर्वसाधारणपणे काही एकाद्या दिवशी/ महिन्यात/ तिमाहीतच लागले पाहिजे असे कुठे आहे? थोडे थांबता येत नाही का? अथवा घरच्या घरीच लावून नंतर आयुष्य सुरळीत झाल्यानंतर जेवणावळी / रिसेप्शन करता येत नाही का? आणि नाहीतरी आजकाल, मराठी मध्यमवर्गीय लोकांची लग्ने आपल्या पारंपारीक पद्धतीने कुठे लावली जातात? म्हणजे नावापुरता भटजी असतो, तो काहीबाही 'हे करा, ते करा' वगैरे सांगत असतो, त्याच्या प्रयत्नांची शिकस्त करत, त्याला ठावूक आहे, अशा पारंपारीक पद्धतीने, मंत्र वगैरे म्हणत विधी पार पाडत असतो, तेव्हा दोन्ही घरची माणसे, इतर पंजाबी पद्धतीच्या बाबी करण्यात गुंतलेली असतात--- वधू अथवा वर, वाजतगाजत पालखीतून हॉलमधे येतो/ येते; मंत्रपुष्पांजलि सुरू असतांना नवर्‍या मुलाचे मित्र त्याच्या मागे येऊन उभे रहातात. व हार घालायची वेळ येताच त्याला वरती उंच उचलून धरतात, आणि 'ये खाली, ये खाली' असे काहीबाही ओरडतात. हा खरे तर विधींचा व त्याहीपेक्षा, भटजींचा अपमान आहे, बिचारे मूग गिळून सहन करतात. आणि आता, लग्नात आधल्या दिवशी 'संगीत' नावाचे खास पंजाबी प्रकरण असते. हा सगळा मूर्ख सोहळा व खेळ करण्यास काही दिवसही पुरणार नाहीत, खरे तर. तेव्हा ह्या सगळ्या मूर्खपणाला सध्या फाटा द्या. ह्या सर्व प्रकरणांत गुंतलेल्या धंदेवाल्याचे सोडून, ज्यांचे लग्न आहे, त्यांचे २ तासात करण्यातून, अथवा शक्य तर सध्या काहीही न करण्यावरून काय बिघडते आहे?

मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 09:26
.....मोदी सरकारचा मोठा निर्णय.... https://www.tv9marathi.com/national/central-government-will-provide-free-food-grain-in-may-and-june-mnoth-under-pm-garib-kalyan-anna-yojana-amid-corona-pandemic-443544.html/amp महाराष्ट्र राज्यातील, तांदूळ घोटाळा आठवला....

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 Sat, 04/24/2021 - 11:29
सरकार जे अन्नधान्य शेतकऱ्या कडून विकत घेते आणि त्याचा साठा करून ठेवते तोच साठा अशा आणीबाणी च्या प्रसंगात उपयोगी पडतो. आणि हीच पद्धत मोदी सरकार बंद करायला निघाले आहे कृषी कायद्या नी. विचार करा असा साठा आता सरकार कडे नसता तर खासगी उद्योग पती लोकांनी किती भाव वाढवला असता. ऑक्सिजन,आणि बाकी औषधांचा कसा काळाबाजार चालू आहे तसाच अन्नधान्य च झाला असता

In reply to by Rajesh188

मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 11:45
आधी इतकी उत्सुकता न्हवती, पण हे इतक्या आत्मविश्वासाने सांगत आहात, म्हणून विचारले.... अन्न पुरवठा मंत्रालय, नावाचे एक केंद्रीय खाते आहे ...थोडं त्या खात्या बद्दल वाचलेत तर बरे होईल... ------------ बाय द वे, परमपूज्य राहुल गांधी आणि माननीय शरद पवार, यांनी आत्ता जे कायदे आले आहेत, त्याचेच समर्थन, त्यांचे राज्य असतांना केले होते... माननीय शरद पवार यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे ...

Rajesh188 Sat, 04/24/2021 - 09:43
आता सर्व राज्य आणि केंद्र सरकार ह्यांच्यात समन्वय हवा.मतभेद असले तरी सरकारी पातळीवर च असावेत आणि ते त्यांनी च सोडवावेत. जे काही निवेदन द्यायचे असेल covid विषयी तर केंद्र सरकार तर्फे पंतप्रधान नी द्यावे आणि रज्यातरफे मुख्यमंत्र्यांनी द्यावे. बाकी सर्व नेते,अभिनेते ह्यांना मीडिया मध्ये बोलायला सक्त मनाई करावी. सर्व च माहिती जनतेला देणे गरजेचे नाही. जी आवश्यक आहे तेवढीच द्यावी. उकळ्या पाकळ्या काढायची ही वेळ नाही. बघा पटतंय का.

प्रसाद_१९८२ Sat, 04/24/2021 - 09:51
वसुली मॅन अनिल देशमुख यांच्यावर आक सिबिआयने गुन्हा दाखल केला. -- https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cbi-registers-fir-against-former-home-minister-anil-deshmukh-in-connection-with-allegations-made-by-param-bir-singh/articleshow/82226669.cms

In reply to by प्रसाद_१९८२

Rajesh188 Sat, 04/24/2021 - 09:57
असल्याचं बातम्या वाचत असता का.करा positive विचार नी दिवसाची सुरुवात करत जा. योगा,जॉगिंग, थोडा व्यायाम हे सकाळी केले जातात.मन फ्रेश राहते . पण तुम्हाला ती सवय नाही वाटत उठले की पाहिजे राजकीय आतषबाजी करायची सवय आहे . सर्व फुसके बॉम्ब,भुई चक्र,फुलबजे असतात तुमच्या कडे. पण आमचा एकच बाण धमाका करतो आणि बरोबर वेध घेतो लक्षाचा.

In reply to by प्रसाद_१९८२

Rajesh188 Sat, 04/24/2021 - 09:58
असल्याचं बातम्या वाचत असता का.जरा positive विचार नी दिवसाची सुरुवात करत जा. योगा,जॉगिंग, थोडा व्यायाम हे सकाळी केले जातात.मन फ्रेश राहते . पण तुम्हाला ती सवय नाही वाटत उठले की पाहिली राजकीय आतषबाजी करायची सवय आहे . सर्व फुसके बॉम्ब,भुई चक्र,फुलबजे असतात तुमच्या कडे. पण आमचा एकच बाण धमाका करतो आणि बरोबर वेध घेतो लक्षाचा.

In reply to by Rajesh188

डॅनी ओशन Sat, 04/24/2021 - 10:56
"श्रीशुपाला, तुझे १०० टॉन्ट मी झेलले, १०१ वा झेलणार नाही." असे म्हणून प्रभूंनी कुदर्शन चक्र फेकले. पण आश्चर्य, ते चक्र पलटून प्रभूंच्या आयडीचा शिरच्छेद झाला ! प्रभूंची लीला अपारंपरिक ! _/\_

In reply to by श्रीगुरुजी

Rajesh188 Sat, 04/24/2021 - 10:52
अजीर्ण होईल इथपर्यंत आनंद देण्याची जबाबदारी आम्ही नीट पार पाडू. तुमच्या इच्छेला मान देवून.

कॉमी Sat, 04/24/2021 - 11:26
अमेरिका फर्स्ट ही ट्रम्प कंम्पेन ची घोषणा आहे. तीच यूएस स्टेट डिपार्टमेंट लस रॉ मटेरियलच्या एक्स्पोर्ट बंदीच्या समर्थनासाठी पुन्हा वापरत आहे. यावरून ट्रम्प प्रेसिडेंट असता तर त्याने यापेक्षा वेगळे केले नसते याची कल्पना यावी. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन च्या वेळेस सुद्धा ट्रम्प ने भारत सरकार वर दबाव आणून हे ड्रग्ज एक्स्पोर्ट करायला लावले होते. अमेरिकेचा मस्तवाल रवय्या पुनः एकवार अधोरेखित झाला आहे. आम्ही धाक दाखवून तुमच्यावर औषध पाठवण्याची जबरदस्ती करू, पण तुम्ही अडचणीत असाल तेव्हा... वेल..... खड्ड्यात जावा. अमेरिकन जहाजाने भारताच्या EEZ मध्ये भारताची परवानगी न मागता प्रवेश केला. या बाबतीतील नेव्ही टेर्मीनॉलॉजी कोणाला सांगता येत असेल तर सांगावी. https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/india-news/americans-first-us-defends-export-ban-on-covid-vaccine-raw-materials-to-india-2420686%3famp=1&akamai-rum=off#scso=_Mq-DYNXzH4H8rQHuhJ2wDQ19:0 https://www.tribuneindia.com/news/nation/us-navy-sails-in-indian-exclusive-economic-zone-asserts-it-is-right-indias-claim-wrong-236827 https://www.thehindu.com/news/international/would-be-surprised-if-india-doesnt-allow-export-of-hydroxychloroquine-to-us-trump/article31276161.ece

In reply to by कॉमी

सुबोध खरे Sat, 04/24/2021 - 11:51
अमेरिका हा देश डाम्बरटच आहे. सर्वच्या सर्व हक्क अधिकार लोकशाही फक्त अमेरिकेसाठीच आहे या अहंगंडात ते कायम असतात. त्यामुळे जगभरात कोणत्याही देशात काड्या करण्यासाठी ते पुढे मागे पाहत नाहीत. अमेरिकेच्या हिताविरुद्ध काम करणारी सरकारे उलथवून टाकणे हे तर दशकानुदशके करत आले आहेत. आज भारताने रशिया कडून S -४०० हि क्षेपणास्त्रे घेऊन नये म्हणून ते साम दाम दंड भेद हे सर्व उपाय करत आहेत. सुदैवाने भारत अमेरिकेच्या दबावाला साधारणपणे कधीच बळी पडला नाही. विशेषतः लष्करी सामग्री बद्दल ( यात काँग्रेसची सरकारे सुद्धा येतील) याचे कारण अमेरिका हा अत्यंत बेभरवशी देश आहे. युद्ध झाले तर संरक्षण सामग्रीच्या निर्यातीवर ते सर्वप्रथम बंदी घालतात. यामुळे त्या देशाला नाक मुठीत धरून अमेरिका म्हणेल ते धोरण लागू करावे लागते. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तान ने F १६ विमाने भारताविरुद्ध वापरली त्याबद्दल पाकिस्तानला अमेरिकेला जाब द्यावा लागला होता. अमेरिकेच्या परवानगीशिवाय पाकिस्तानF १६ विमाने भारताविरुद्ध वापरू शकत नाही असे त्यांच्या करारात आहे. मग पाकिस्तानने F १६ विमाने काय एअर शो साठी विकत घेतली आहेत का? याच कारणास्तव लष्करी तज्ज्ञ शक्यतो उच्च तंत्रज्ञान अमेरिकेकडून नकोच म्हणत आले आहेत. आज अमेरिकेने लसनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालून आपला खरा चेहरा दाखवला आहे. मानवते पेक्षा आपल्या कंपन्यांचा नफा त्यांना महत्त्वाचा आहे. भारतातील लस निर्मितीला खीळ घालून त्यांच्या फायझर आणि मॉर्डरना लसी भारतात आणि इतर आफ्रिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील गरीब देशात विकल्या जाव्यात यासाठी हा नीचपणा ते करत आहेत. भारताने सर्व बाबतीत आत्मनिर्भर होणे का आवश्यक आहे हे यावरून सिद्ध होते आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रदीप Sat, 04/24/2021 - 13:03
एक तांत्रिक प्रश्न आहे, जो डॉ. आनंद रंगनाथन ह्या वैज्ञानिकाने पूनावाला ह्यांना विचारला होता. त्याचे उत्तर तिथे मिळाल्याचे काही पाहिले नाही. मी काही त्या क्षेत्रांतील नाही. कुणाला इथे माहिती आहे, सीरमला नक्की कुठली रॉ मटेरियल्स कोव्हिशिल्डसाठी अमेरिकेतून आयात करावी लागतात? .

In reply to by प्रदीप

कॉमी Sat, 04/24/2021 - 13:08
इथे उल्लेख आहे. व्हायल्स आणि फिल्टर्स. पुनावाला म्हणाले की शॉर्ट टर्म मध्ये अडचण आहे कारण सप्लायर बदलला की पुन्हा चाचपणी प्रक्रियेतून जावे लागते. सहा महिन्यांनंतर अमेरिकेच्या बंदीचा फरक पडणार नाही, पण आत्ता अडचण आहे. https://theprint.in/theprint-essential/us-embargo-on-exporting-covid-vaccine-raw-materials-and-how-it-could-impact-india/643374/

In reply to by सुबोध खरे

कॉमी Sat, 04/24/2021 - 13:05
>>>सर्वच्या सर्व हक्क अधिकार लोकशाही फक्त अमेरिकेसाठीच ही मानसिकता वारंवार सिद्ध झाली आहे... भारतातील लस निर्मितीला खीळ घालून त्यांच्या फायझर आणि मॉर्डरना लसी भारतात आणि इतर आफ्रिकेतील आणि दक्षिण अमेरिकेतील गरीब देशात विकल्या जाव्यात यासाठी हा नीचपणा ते करत आहेत. भयानक आहे. NPR वरचा एक लेख दिसला त्यात सुद्धा आफ्रिकन देशांना लसीनपासून जाणून बुजून दार ठेवण्यात आल्याचे म्हणले आहे. US, UK, भारत, चायना आणि जर्मनी आहेत. ह्यांनी लस एक्स्पोर्ट करताना सरळसरळ आफ्रिकेला वंचित ठेवले आहे असे नामीबियाचे प्रेसिडेंट गेइंगोब यांनी आरोप केला. त्यांना ज्या काही लशी मिळाल्या त्या सगळ्या भारत आणि चायना तून मिळाल्या. युरोप आणि अमेरिकेने काहीही दिले नाही. लस घनता नकाशा (चायनाची माहिती दिसत नाही.) NPR लेख- https://www.npr.org/sections/goatsandsoda/2021/04/22/988814093/what-does-vaccine-inequality-look-like-see-chart

In reply to by कॉमी

कॉमी Sat, 04/24/2021 - 13:18
***US UK (...) हे प्रमुख लसउत्पादक देश आहेत. त्यातल्या भारत आणि चायना सोडून इतर सर्व लस निर्मात्यांनी आफ्रिका खंडास लस विकली नाही आहे, असे प्रेसिडेंट गेइंगोब म्हणतायत.

In reply to by कॉमी

प्रदीप Sat, 04/24/2021 - 13:34
फायझरची लस -७० डी. सें.च्या वातावरणात सदैव ठेवावी लागते, व तशीच ती एकीकडून दुसरीकडेही न्यावी लागते. (मॉडर्ना त्याच, mRNA) टेक्नॉलॉजीवर आधारीत असल्याने, तिच्या बाबतीतही हे खरे असावे, पण मला नक्की माहिती नाही). तेव्हा त्या दोन्हींसाठी म्हणून-- किमानप़क्षी फायझरसाठी तरी नक्कीच-- हा आटापिटा, आफ्रिकेच्या संदर्भात नसावा.

In reply to by प्रदीप

कॉमी Sat, 04/24/2021 - 13:39
बरोबर. ह्यावर खरे सरांनी आपली कारणीमीमांसा सांगितली तर बरे होईल. पण त्यानिमित्ताने आफ्रिकेला वेगळं पाडलं हे वाचनात आलं.