मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

बेसनलाडू ·

एक 08/04/2009 - 03:25
>> त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. >> १०००% सहमत.. उत्साहाने व्हिडीओ बघितला पण प्रचंड निराशा झाली. अगदीच पेद्रु थ्रो होता.लहान मुलाला कॅच देताना सुद्धा यापेक्षा जोरात बॉल टाकतो आपण.

In reply to by नाटक्या

धनंजय 08/04/2009 - 06:23
असेच म्हणतो. (लांबलचक ---------------------------- ---------------------------- रेघांमुळे लेख पडद्यावर मावत नाही. त्या रेघा लहान केल्यास सोय होईल.)

In reply to by धनंजय

बेसनलाडू 08/04/2009 - 09:42
टंकन हापिसच्या लॅपटॉपवर केले. त्याचे रेजोल्यूशन् नेहमीच्या पडद्यांपेक्षा जास्त असल्याने त्यानुसार लाम्बलचक ओळी काढल्या; ज्या त्या संगणकाच्या पडद्यावर त्यामानाने लांबलचक न वाटता व्यवस्थित दिसतात. मागे-पुढे, वर-खाली स्क्रॉलिंग करावे लागत नाही. (तंत्रज्ञ)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

एकदम जोरदार लिखाण, थ्रोच्यापेक्षा कायच्या काय जोरदार ... आडवं स्क्रोल करण्याच्या प्रश्नावर उपायः आडव्या रेघा मारायच्या ऐवजी साधारण मध्यात तीन ऍस्ट्रीक्स काढले तर? पण तुमची निवड!! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

चतुरंग 08/04/2009 - 06:03
बेला, सुरेख लेख! आज बरेच दिवसांनी सूर लागलेला दिसतोय. :) (अवांतर - तुझ्या माराच्या वर्णनावरुन लहानपणी पट्ट्याने मार खाल्लेला आठवला!) चतुरंग

प्राजु 08/04/2009 - 06:52
अतिशय हलका फुलका लेख खूप आवडला. शाब्दिक कोट्याही उत्तम . :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते
आहे. त्याच्याव काही ल्वॉक डोकॅलिटी लडवायचे. डावी चप्पल मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात आन उजवी उजव्या कोपर्‍यात. चोराला यका चप्प्लेचा काय उपेग ? मंग तो नेनार नाई. बूट घातलेल्या लोकांचा मोजे काढल्यावर चरणकमलगंधा मुळे डास पळुन जातील का? असा विचार मनात आला असता डास जागेवर रहातात पण माणस पळून जातात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद 08/04/2009 - 09:54
घोडे की धांसु ताकद आहे यात. अमाला पयले वाटल की "जेंव्हा तुझ्या बटांना " म्हंजे कायतरी गुदगूल्या होनार आमाला. - पाषाणभेद

अर्चिस 08/04/2009 - 11:21
त्या पत्रकाराला गृहमंत्र्यांवर बूट फेकल्याबद्दल २ लाख रुपये मिळाले !!!!!!!!!!!!!!! सर्व बेकार आणि जागतिक मंदिमुळे नोकरी गमावलेल्यांना सर्वाना त्या पत्रकाराने पैसे कमवंण्याचा सोपा मार्ग दाखवला. चला मग बूट घेउन तयार रहा. बाटा फ़ॅन अर्चिस

मैत्र 08/04/2009 - 11:46
सही लिहिले आहे... 'जुळले बुटाबुटाचे नाते तुझे नि माझे' 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' झकास!! अवांतरः आपल्या लेखात आम्हाला भाईकाका दिसले

श्रावण मोडक 08/04/2009 - 11:59
लेख चांगला. त्या पत्रकाराने निषेध व्यक्त करण्यासाठी तो बूट चक्क 'हा घे कॅच' असं म्हणत टाकला. त्या कृतीला "जोडा फेकून मारला" या स्तरावर नेले पत्रकारांनी. थोरच ते. अतिशयोक्ती अलंकार तो. बाकी काही नाही. तो पत्रकार अशा ठिकाणी बसला होता की, गृहमंत्र्यांना जोडा मारणे अशक्य नव्हते आणि त्याने तसा मारला असता तर चिदंबरम यांना तो चुकवता आलाही नसता. तीन-चार फुटांमध्ये काही करण्यासाठी लागणारी चपळता व जागरूकता आपल्या गृहमंत्र्यांमध्ये असेल असे वाटत नाही. बाकी या निमित्ताने इतरही काही प्रश्न निर्माण झाले. हा पत्रकार बदली कामगाराच्या भूमिकेत होता म्हणे. म्हणजे कॉंग्रेस पक्ष हे त्याचे बीट नाही. तरीही तो त्या पत्रकार परिषदेला गेला ते त्यांचा 'कॉंग्रेसमन' गैरहजर असल्याने. दुसरी बाब (अ)ज्ञानाची. सीबीआय गृह खात्याच्या कक्षेत येत नाही. ते येते पंतप्रधानांच्या अखत्यारित. या पत्रकाराचा अनुभव किमान दहा वर्षांचा असावा. त्याला हे ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल. त्यामुळे तर्कसंगतरित्या त्याने जोडा फेकायचाच असेल तर तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर फेकला पाहिजे. यापुढे पत्रकार परिषदेत जाताना पत्रकारांना चप्पल, बूट बाहेरच काढून ठेवण्यास सांगितले जाईल, असा एक एसएमएस काल घुमत होता.

In reply to by श्रावण मोडक

बेसनलाडू 08/04/2009 - 12:06
सीबीआय नि गृहखात्याचा काहीएक संबंध नाही, सीबीआय वर कोणत्याही मंत्रालयाकडून टायटलर यांची पाठराखण करण्याबाबत दबाव आणला गेलेला नाही, हे चिंदबरम यांनी एकदा नाही तर दोनदा सांगितल्याचे अंधुकसे आठवते (कदाचित एकदाच असेल) पण असे असतानाही पत्रकार महाशयांनी आपलेच आरोप/प्रश्न जे काही असेल ते पुढे रेटणे अनाकलनीयच वाटले; आणि अर्थातच यामुळे बूट फेकण्याचा बेत पूर्वनियोजित असावा, या संशयाला जागा उरते. एका बातमीत तर पत्रकार महोदय बुटाची नाडी सैल करूनच बसले असल्याचे वाचण्यात आले. अर्थात अशा मसालेदार बातम्या पुढचे दोन दिवस वाचायला मिळतीलच. जोडा 'हाणायचाच' होता तर किमान शेवटच्या बेन्च वर बसून कॉलेजातली पोरे कागदी बाणांची जी मारामारी करतात, तसे तरी करायला हवे होते, असे वाटले. हे म्हणजे अगदीच खोटेखोटे, लुटुपुटूचे झाले राव! आणि भारतात असा 'आवाज' उठवायला या स्टन्ट् करायची गरजच काय (आणि तो ही हा असा!), हा प्रश्नही उरतोच. इराक नंतर चीन, आता भारत अशा पद्धतीने पत्रकार समुदायात या नव्या निषेधपद्धतीचा अवलंब होऊ घातला आहे, असे वाटते. (वार्ताहर)बेसनलाडू

In reply to by श्रावण मोडक

श्रावण मोडक 08/04/2009 - 14:59
असा खुलासा वाचनात आला आहे की, त्या वृत्तपत्राचा कॉंग्रेस बीटवरचा बातमीदारही तेथे उपस्थित होताच. म्हणजे जर्नेलसिंग हे चक्क अवांतर तेथे गेले होते.

बेला, मस्त लेख!! "पादत्राण" या शब्दाला हसल्याबद्दल लहानपणी आम्हीही शाळेत छडी खाल्लीय!!!:) बाकी असा फर्मास लेख लिहिल्याबद्दल आमच्या कातड्याचेच जोडे करून तुमच्या पायात घातले पाहिजेत, तुमचा बुटाचा नंबर कळवा!!! :)

मदनबाण 09/04/2009 - 04:35
छान लेख... (एकदा पायात खडावा घालुन पाहिले पाहिजेत...कसं वाटतं ते तर कळेल) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

एक 08/04/2009 - 03:25
>> त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. >> १०००% सहमत.. उत्साहाने व्हिडीओ बघितला पण प्रचंड निराशा झाली. अगदीच पेद्रु थ्रो होता.लहान मुलाला कॅच देताना सुद्धा यापेक्षा जोरात बॉल टाकतो आपण.

In reply to by नाटक्या

धनंजय 08/04/2009 - 06:23
असेच म्हणतो. (लांबलचक ---------------------------- ---------------------------- रेघांमुळे लेख पडद्यावर मावत नाही. त्या रेघा लहान केल्यास सोय होईल.)

In reply to by धनंजय

बेसनलाडू 08/04/2009 - 09:42
टंकन हापिसच्या लॅपटॉपवर केले. त्याचे रेजोल्यूशन् नेहमीच्या पडद्यांपेक्षा जास्त असल्याने त्यानुसार लाम्बलचक ओळी काढल्या; ज्या त्या संगणकाच्या पडद्यावर त्यामानाने लांबलचक न वाटता व्यवस्थित दिसतात. मागे-पुढे, वर-खाली स्क्रॉलिंग करावे लागत नाही. (तंत्रज्ञ)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

एकदम जोरदार लिखाण, थ्रोच्यापेक्षा कायच्या काय जोरदार ... आडवं स्क्रोल करण्याच्या प्रश्नावर उपायः आडव्या रेघा मारायच्या ऐवजी साधारण मध्यात तीन ऍस्ट्रीक्स काढले तर? पण तुमची निवड!! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

चतुरंग 08/04/2009 - 06:03
बेला, सुरेख लेख! आज बरेच दिवसांनी सूर लागलेला दिसतोय. :) (अवांतर - तुझ्या माराच्या वर्णनावरुन लहानपणी पट्ट्याने मार खाल्लेला आठवला!) चतुरंग

प्राजु 08/04/2009 - 06:52
अतिशय हलका फुलका लेख खूप आवडला. शाब्दिक कोट्याही उत्तम . :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते
आहे. त्याच्याव काही ल्वॉक डोकॅलिटी लडवायचे. डावी चप्पल मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात आन उजवी उजव्या कोपर्‍यात. चोराला यका चप्प्लेचा काय उपेग ? मंग तो नेनार नाई. बूट घातलेल्या लोकांचा मोजे काढल्यावर चरणकमलगंधा मुळे डास पळुन जातील का? असा विचार मनात आला असता डास जागेवर रहातात पण माणस पळून जातात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद 08/04/2009 - 09:54
घोडे की धांसु ताकद आहे यात. अमाला पयले वाटल की "जेंव्हा तुझ्या बटांना " म्हंजे कायतरी गुदगूल्या होनार आमाला. - पाषाणभेद

अर्चिस 08/04/2009 - 11:21
त्या पत्रकाराला गृहमंत्र्यांवर बूट फेकल्याबद्दल २ लाख रुपये मिळाले !!!!!!!!!!!!!!! सर्व बेकार आणि जागतिक मंदिमुळे नोकरी गमावलेल्यांना सर्वाना त्या पत्रकाराने पैसे कमवंण्याचा सोपा मार्ग दाखवला. चला मग बूट घेउन तयार रहा. बाटा फ़ॅन अर्चिस

मैत्र 08/04/2009 - 11:46
सही लिहिले आहे... 'जुळले बुटाबुटाचे नाते तुझे नि माझे' 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' झकास!! अवांतरः आपल्या लेखात आम्हाला भाईकाका दिसले

श्रावण मोडक 08/04/2009 - 11:59
लेख चांगला. त्या पत्रकाराने निषेध व्यक्त करण्यासाठी तो बूट चक्क 'हा घे कॅच' असं म्हणत टाकला. त्या कृतीला "जोडा फेकून मारला" या स्तरावर नेले पत्रकारांनी. थोरच ते. अतिशयोक्ती अलंकार तो. बाकी काही नाही. तो पत्रकार अशा ठिकाणी बसला होता की, गृहमंत्र्यांना जोडा मारणे अशक्य नव्हते आणि त्याने तसा मारला असता तर चिदंबरम यांना तो चुकवता आलाही नसता. तीन-चार फुटांमध्ये काही करण्यासाठी लागणारी चपळता व जागरूकता आपल्या गृहमंत्र्यांमध्ये असेल असे वाटत नाही. बाकी या निमित्ताने इतरही काही प्रश्न निर्माण झाले. हा पत्रकार बदली कामगाराच्या भूमिकेत होता म्हणे. म्हणजे कॉंग्रेस पक्ष हे त्याचे बीट नाही. तरीही तो त्या पत्रकार परिषदेला गेला ते त्यांचा 'कॉंग्रेसमन' गैरहजर असल्याने. दुसरी बाब (अ)ज्ञानाची. सीबीआय गृह खात्याच्या कक्षेत येत नाही. ते येते पंतप्रधानांच्या अखत्यारित. या पत्रकाराचा अनुभव किमान दहा वर्षांचा असावा. त्याला हे ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल. त्यामुळे तर्कसंगतरित्या त्याने जोडा फेकायचाच असेल तर तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर फेकला पाहिजे. यापुढे पत्रकार परिषदेत जाताना पत्रकारांना चप्पल, बूट बाहेरच काढून ठेवण्यास सांगितले जाईल, असा एक एसएमएस काल घुमत होता.

In reply to by श्रावण मोडक

बेसनलाडू 08/04/2009 - 12:06
सीबीआय नि गृहखात्याचा काहीएक संबंध नाही, सीबीआय वर कोणत्याही मंत्रालयाकडून टायटलर यांची पाठराखण करण्याबाबत दबाव आणला गेलेला नाही, हे चिंदबरम यांनी एकदा नाही तर दोनदा सांगितल्याचे अंधुकसे आठवते (कदाचित एकदाच असेल) पण असे असतानाही पत्रकार महाशयांनी आपलेच आरोप/प्रश्न जे काही असेल ते पुढे रेटणे अनाकलनीयच वाटले; आणि अर्थातच यामुळे बूट फेकण्याचा बेत पूर्वनियोजित असावा, या संशयाला जागा उरते. एका बातमीत तर पत्रकार महोदय बुटाची नाडी सैल करूनच बसले असल्याचे वाचण्यात आले. अर्थात अशा मसालेदार बातम्या पुढचे दोन दिवस वाचायला मिळतीलच. जोडा 'हाणायचाच' होता तर किमान शेवटच्या बेन्च वर बसून कॉलेजातली पोरे कागदी बाणांची जी मारामारी करतात, तसे तरी करायला हवे होते, असे वाटले. हे म्हणजे अगदीच खोटेखोटे, लुटुपुटूचे झाले राव! आणि भारतात असा 'आवाज' उठवायला या स्टन्ट् करायची गरजच काय (आणि तो ही हा असा!), हा प्रश्नही उरतोच. इराक नंतर चीन, आता भारत अशा पद्धतीने पत्रकार समुदायात या नव्या निषेधपद्धतीचा अवलंब होऊ घातला आहे, असे वाटते. (वार्ताहर)बेसनलाडू

In reply to by श्रावण मोडक

श्रावण मोडक 08/04/2009 - 14:59
असा खुलासा वाचनात आला आहे की, त्या वृत्तपत्राचा कॉंग्रेस बीटवरचा बातमीदारही तेथे उपस्थित होताच. म्हणजे जर्नेलसिंग हे चक्क अवांतर तेथे गेले होते.

बेला, मस्त लेख!! "पादत्राण" या शब्दाला हसल्याबद्दल लहानपणी आम्हीही शाळेत छडी खाल्लीय!!!:) बाकी असा फर्मास लेख लिहिल्याबद्दल आमच्या कातड्याचेच जोडे करून तुमच्या पायात घातले पाहिजेत, तुमचा बुटाचा नंबर कळवा!!! :)

मदनबाण 09/04/2009 - 04:35
छान लेख... (एकदा पायात खडावा घालुन पाहिले पाहिजेत...कसं वाटतं ते तर कळेल) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.

पुष्पक यानात भानू आणि पार्वती

नरेंद्र गोळे ·
पुष्पक यानात भानू आणि पार्वती पुष्पक यानात भानू आणि पार्वती. मूळ हिंदी लेखक: गोरा चक्रबर्ती, अनुवादकः नरेंद्र गोळे पहिले सादरीकरणः श्री.अशोक चिटणीस व सौ.शुभा चिटणीस, १४-१२-२००८ रोजी भवन्स सभागृह अंधेरी येथे. सार्वजनिक सादरीकरणाच्या अनुमतीसाठी 'मिपाच्या पोस्ट हापिसाचा' उपयोग करून मला पत्र लिहा. प्रस्तावनाः भानू आणि पार्वती पुष्पक यानात बसलेले आहेत. गंतव्य स्थळः चंद्र. काही क्षणातच उपग्रह प्रक्षेपण वाहनातून, पुष्पकयान अवकाशात प्रक्षेपित होणार आहे. थुंबा प्रक्षेपण केंद्रात उलटी मोजणी सुरू झालेली आहे. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य ...

आरोग्य आणि स्वस्थता

नरेंद्र गोळे ·

विसोबा खेचर 06/04/2009 - 17:04
४. कमर/नितंब गुणोत्तर: हे सामान्यत: ०.८५ च्या आसपास असते. ते १ हून जास्त असेल तर पोट सुटलेले असल्याचे दर्शवते. आयला! गोळेकाका, अहो वस्तुस्थिती किंवा फॅक्ट्स अश्या चारचौघात उघडपणे सांगितल्याच पाहिजेत का? :) असो, आजपर्यंत मन जे चाहेल ते यथासांग खाल्लं. तूर्तास तरी काही त्रास नाही. उद्याचं माहीत नाही! जे होईल ते भोगायची अर्थातच तयारी आहे. 'योगापेक्षा भोग खूप खूप मोठे असतात!' यावर माझा पूर्ण विश्वास आहे! आपला, (खाण्यापिण्याच्या बाबतीत वाट्टेल तशी मनमानी करणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नमस्कार तात्या, गोळेकाका, अहो वस्तुस्थिती किंवा फॅक्ट्स अश्या चारचौघात उघडपणे सांगितल्याच पाहिजेत का? >> तात्या, तुमच्या बाबतीत तरी नक्कीच नाही! कट्ट्यावर माधवराव म्हणाले होते की, "मग, तुम्ही काढा ना 'जनोगत' एखादे!" त्यानंतर तुमच्याव्यतिरिक्त आणखी कुणीही 'जनोगत' काढल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. त्यामुळे वस्तुस्थिती सांगायचीच झाली तर मी, ही सांगेन की , "तात्यांनी चालवलेले मिसळपाव हॉटेल हेच एकमेव स्वदेशी बनावटीचे, स्वतंत्र बाण्याचे मराठी संकेतस्थळ आहे!"

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर 07/04/2009 - 07:42
त्यामुळे वस्तुस्थिती सांगायचीच झाली तर मी, ही सांगेन की , "तात्यांनी चालवलेले मिसळपाव हॉटेल हेच एकमेव स्वदेशी बनावटीचे, स्वतंत्र बाण्याचे मराठी संकेतस्थळ आहे!" धन्यवाद! असाच लोभ असू द्यावा.. आपले आरोग्यविषयक, आहारविषयक अजूनही काही लेखन मिपावर यावे.. तात्या.

नरेश_ 06/04/2009 - 17:15
छान लेख आहे, आपण वैद्य / योग शिक्षक आहात काय? जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

लिखाळ 06/04/2009 - 20:14
लेख छान आहे. पूर्वी मनोगतावरसुद्धा आपण जी आरोग्याविषयी लेखमाला लिहिली होती ती वाचली होती. शेवटची कविता-संदेश मस्त फुल जपतो. सुगंधी आहे. :) -- लिखाळ.

अतिशय उपयुक्त माहिती देणारा लेख. जिव्हाळ्याच्या विषयावरची माहिती नीट समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विक्षिप्त लोकांना 'उपयुक्त' वाटणे बरे की वाईट? हे मला उमगत नाही. मात्र मी जे काही लिहीले आहे त्याचा कुणाला तरी उपयोग आहे, हे वाचून आनंद झाला. जिव्हाळ्याचा विषयही समजला. मलाही तो जिव्हाळ्याचाच आहे. सांख्य शोधले की सापडते.

चतुरंग 06/04/2009 - 22:33
साध्या शब्दात अतिशय चांगली माहीती दिलीत गोळेकाका, धन्यवाद! हृदयाच्या क्षमतेवरुन आठवले - महान टेनीसपटू बीयॉन बोर्ग ह्याचा रेस्टिंग हार्ट रेट साधारण ५० ठोके प्रतिमिनिट असा आहे. अतिशय सशक्त हृदयाचं ते निदर्शक मानलं जातं. त्यामुळेच तो कित्येक तास चालणारे सामने लीलया खेळू शकत असे! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

चतुरंग, यावरून मी इथे हे नमूद करू इच्छितो की डोंबिवलीत एक 'प्रकाश वेलणकर' नावाचे गृहस्थ आहेत. एकदा पोटाच्या दुखण्याकरता त्यांना सायन हॉस्पिटलमधे भरती होण्याची पाळी आली होती. तेव्हा त्यांचा हृदयस्पंदनदर मिनिटाला ३२ ठोके असा आढळून आला. त्यापायी त्यांच्या अनेक तपासण्या होऊन पुढे तो निसर्गत:च तसा असून, त्यात काहीही वावगे नसल्याचे सिद्ध झाले. ती सारीच कहाणी त्यांनी "३२ हार्ट बीटस्" या त्यांच्या पुस्तकात नोंदवून ठेवलेली आहे. ते पुस्तकही वाचनीय असून आपण ते मुळातच, अवश्य वाचावे.

सर्व वाचकांस, प्रतिसादकांस आणि उपयोगकर्त्यांस 'अखंडारोग्यालंकृत सर्वोच्च स्वस्थता' लाभो हीच प्रार्थना!

विसोबा खेचर 06/04/2009 - 17:04
४. कमर/नितंब गुणोत्तर: हे सामान्यत: ०.८५ च्या आसपास असते. ते १ हून जास्त असेल तर पोट सुटलेले असल्याचे दर्शवते. आयला! गोळेकाका, अहो वस्तुस्थिती किंवा फॅक्ट्स अश्या चारचौघात उघडपणे सांगितल्याच पाहिजेत का? :) असो, आजपर्यंत मन जे चाहेल ते यथासांग खाल्लं. तूर्तास तरी काही त्रास नाही. उद्याचं माहीत नाही! जे होईल ते भोगायची अर्थातच तयारी आहे. 'योगापेक्षा भोग खूप खूप मोठे असतात!' यावर माझा पूर्ण विश्वास आहे! आपला, (खाण्यापिण्याच्या बाबतीत वाट्टेल तशी मनमानी करणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नमस्कार तात्या, गोळेकाका, अहो वस्तुस्थिती किंवा फॅक्ट्स अश्या चारचौघात उघडपणे सांगितल्याच पाहिजेत का? >> तात्या, तुमच्या बाबतीत तरी नक्कीच नाही! कट्ट्यावर माधवराव म्हणाले होते की, "मग, तुम्ही काढा ना 'जनोगत' एखादे!" त्यानंतर तुमच्याव्यतिरिक्त आणखी कुणीही 'जनोगत' काढल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. त्यामुळे वस्तुस्थिती सांगायचीच झाली तर मी, ही सांगेन की , "तात्यांनी चालवलेले मिसळपाव हॉटेल हेच एकमेव स्वदेशी बनावटीचे, स्वतंत्र बाण्याचे मराठी संकेतस्थळ आहे!"

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर 07/04/2009 - 07:42
त्यामुळे वस्तुस्थिती सांगायचीच झाली तर मी, ही सांगेन की , "तात्यांनी चालवलेले मिसळपाव हॉटेल हेच एकमेव स्वदेशी बनावटीचे, स्वतंत्र बाण्याचे मराठी संकेतस्थळ आहे!" धन्यवाद! असाच लोभ असू द्यावा.. आपले आरोग्यविषयक, आहारविषयक अजूनही काही लेखन मिपावर यावे.. तात्या.

नरेश_ 06/04/2009 - 17:15
छान लेख आहे, आपण वैद्य / योग शिक्षक आहात काय? जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

लिखाळ 06/04/2009 - 20:14
लेख छान आहे. पूर्वी मनोगतावरसुद्धा आपण जी आरोग्याविषयी लेखमाला लिहिली होती ती वाचली होती. शेवटची कविता-संदेश मस्त फुल जपतो. सुगंधी आहे. :) -- लिखाळ.

अतिशय उपयुक्त माहिती देणारा लेख. जिव्हाळ्याच्या विषयावरची माहिती नीट समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विक्षिप्त लोकांना 'उपयुक्त' वाटणे बरे की वाईट? हे मला उमगत नाही. मात्र मी जे काही लिहीले आहे त्याचा कुणाला तरी उपयोग आहे, हे वाचून आनंद झाला. जिव्हाळ्याचा विषयही समजला. मलाही तो जिव्हाळ्याचाच आहे. सांख्य शोधले की सापडते.

चतुरंग 06/04/2009 - 22:33
साध्या शब्दात अतिशय चांगली माहीती दिलीत गोळेकाका, धन्यवाद! हृदयाच्या क्षमतेवरुन आठवले - महान टेनीसपटू बीयॉन बोर्ग ह्याचा रेस्टिंग हार्ट रेट साधारण ५० ठोके प्रतिमिनिट असा आहे. अतिशय सशक्त हृदयाचं ते निदर्शक मानलं जातं. त्यामुळेच तो कित्येक तास चालणारे सामने लीलया खेळू शकत असे! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

चतुरंग, यावरून मी इथे हे नमूद करू इच्छितो की डोंबिवलीत एक 'प्रकाश वेलणकर' नावाचे गृहस्थ आहेत. एकदा पोटाच्या दुखण्याकरता त्यांना सायन हॉस्पिटलमधे भरती होण्याची पाळी आली होती. तेव्हा त्यांचा हृदयस्पंदनदर मिनिटाला ३२ ठोके असा आढळून आला. त्यापायी त्यांच्या अनेक तपासण्या होऊन पुढे तो निसर्गत:च तसा असून, त्यात काहीही वावगे नसल्याचे सिद्ध झाले. ती सारीच कहाणी त्यांनी "३२ हार्ट बीटस्" या त्यांच्या पुस्तकात नोंदवून ठेवलेली आहे. ते पुस्तकही वाचनीय असून आपण ते मुळातच, अवश्य वाचावे.

सर्व वाचकांस, प्रतिसादकांस आणि उपयोगकर्त्यांस 'अखंडारोग्यालंकृत सर्वोच्च स्वस्थता' लाभो हीच प्रार्थना!
आरोग्य आणि स्वस्थता
आरोग्य म्हणजे मनुष्याची निरोगी, अविकृत, प्राकृत अवस्था. प्रकृती. कुपोषण, अतिसेवन, अजीर्ण, जंतूसंसर्ग, विकार, रोग, अपघात ह्यांमुळे आरोग्य धोक्यात येते. हीच विकृत अवस्था. विकृती. प्रकृती सुदृढ असेल तर स्वस्थता आपसुकच येते. सुदृढ मनुष्य स्वस्थतेच्या निरनिराळ्या स्तरांवर राहू शकतो. निकोप जीवन जगू शकतो. मात्र असामान्य संकटास सामोरे जाण्याची त्याची प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक शक्ती स्वस्थतेवर ठरते.

(डास)

बेसनलाडू ·

प्राजु 01/04/2009 - 23:59
जोरदार आगमन!!! लगे रहो!! आवांतर : (डासांच्या त्रासाच्या वेदनेतून काव्य प्रसवलं असावं हे..) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मीनल 02/04/2009 - 00:04
मी `दासा`चे रसग्रहण केले. =D> आता या `डासा`चे मी काय रसग्रहण करणार. कारण डासच `रस` ग्रहण करतात ना! :)) मीनल.

नाटक्या 02/04/2009 - 00:44
बेलाशेठ आज काम नाही वाटतं? विकांतासाठी थोडा वेळ ठेवा...

अनिल हटेला 02/04/2009 - 06:23
एकदम मजेशीर विडंबन !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठमोळा 02/04/2009 - 07:47
काय पण ते डासांचे महाभाग्य म्हणावे.. बेलाच्या विडंबनात प्रभुचे स्थान मिळावे.. डासांच्या दुनियेत हे महाकाव्य ठरावे.. विडंबनाचे डास तुम्हास असेच चावत रहावे.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

मदनबाण 03/04/2009 - 04:41
हे हे हे... झक्कास्स्स्स्स्... :) मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...

प्राजु 01/04/2009 - 23:59
जोरदार आगमन!!! लगे रहो!! आवांतर : (डासांच्या त्रासाच्या वेदनेतून काव्य प्रसवलं असावं हे..) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मीनल 02/04/2009 - 00:04
मी `दासा`चे रसग्रहण केले. =D> आता या `डासा`चे मी काय रसग्रहण करणार. कारण डासच `रस` ग्रहण करतात ना! :)) मीनल.

नाटक्या 02/04/2009 - 00:44
बेलाशेठ आज काम नाही वाटतं? विकांतासाठी थोडा वेळ ठेवा...

अनिल हटेला 02/04/2009 - 06:23
एकदम मजेशीर विडंबन !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठमोळा 02/04/2009 - 07:47
काय पण ते डासांचे महाभाग्य म्हणावे.. बेलाच्या विडंबनात प्रभुचे स्थान मिळावे.. डासांच्या दुनियेत हे महाकाव्य ठरावे.. विडंबनाचे डास तुम्हास असेच चावत रहावे.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

मदनबाण 03/04/2009 - 04:41
हे हे हे... झक्कास्स्स्स्स्... :) मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...
या तनुचा माझ्या करशी दररोजचा घास तुझा डोंबिवली वा धारावी, घरभर हा वास तुझा तू जळी अन् तू नाली, इवलासा श्वास तुझा ए.सी.च्या खालीसुद्धा रंगतो तो रास तुझा मॉर्टीन असो वा कछवा, धसका जीवास तुझा गुणगुणता कानी करती सगळे दुस्वास तुझा नाना रुपे बळावे अवतार तो, भास तुझा डेंग्यू अन् मलेरियाचा आजारी खास तुझा तारशील भवसागरी? मागे घे डास तुझा झोपु दे जरासे रात्री, प्रभु मी रे दास तुझा प्रेरणा: क्रान्ति ताईंचा दास

मनाच्या कुपितले-पाऊस

विनायक पाचलग ·

योगी९०० 25/03/2009 - 17:13
चांगले आहे मन तुझे..मनात कुपी आहे का टाकी आहे ते जरा सांग..लेख आवडला .. थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय. ४ थ्या वाक्यापर्यंत १०-१५ वेळा शिंकतोस म्हणतो म्हणजे पुर्ण लिखाण होईपर्यंत संगणक पुर्णपणे भिजला असला पाहिजे. त्यामुळे शुद्धलेखन चुका का याचे कारण ही समजले. या वेळी त्या चुका सुधार असे सांगणार नाही. मला आता माझ्याच संगणकाकडे बघवत नाही आहे. थांबा थांबा फट्यावर मरू नका जातो बाय.......................... आम्ही फट्यावर मरत नाही...तर फाट्यावर मारतो... (विनंती-लेख जरा गडबडीत टाइप केला आहे ,त्यामुळे काही चुका रहिल्या असण्याची शक्यता आहे वेळ मिळाल्यावर दुरुस्त करेन तोपर्यंत समजुन घ्या) हे बहूतेक तू तुझ्या स्वाक्षरीमध्येच टाकून ठेव. आम्हाला आता याची सवय झाली आहे. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

प्रतिसादाबद्दल आभार सध्या का कोणास ठावुक मला हे वारा पाऊस असच सुचतय बाकी शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्या आहेत When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग

मिहिर 25/03/2009 - 22:19
लेख चांगला आहे तसा. फार मोठे परिच्छेद वाचायचा कंटाळा येतो तुझे लेख वाचताना.

भाग्यश्री 25/03/2009 - 22:34
ह्म्म.. ते गाणं चांगलं आहे.. पण या लेखामधून तुला त्या गाण्यापेक्षाही दुसर्‍याच गोष्टीवर लिहायचे होते किंवा कोणावर तरी शरसंधान करायचे आहे असे फार वाटले.. बरेच उल्लेख उगीच आलेत असं मलातरी वाटले... वैयक्तिक हेवेदावे लेखात आणू नयेत या मताची मी आहे.. पावसावर अजुन छान नक्की लिहीता येईल..

In reply to by भाग्यश्री

वैयक्तीक हेवेदावे नाहीत पण शिरिष्कणेकर जसे एखादा साधा विषय घेवुन सगळ्याना मारतात त्याप्रमाणे लिहाय्चे होते पण जमले नाही असे वाटते When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग

दशानन 26/03/2009 - 11:09
विनायक ने खरडी मधून येथे त्याच्या बद्दलचे मत व्यक्त करायला सांगितले आहे त्यासाठी हा लेखन प्रपंच. मित्रा, मला सहा वर्ष झाली मराठी महाजालावर वावर करताना व अनेक लेख / कथा लिहल्या तरी ही माझ्यात जरा ही ही हिंमत झाली नाही की कुणाकडे जाऊन माझ्या बद्दल त्यांचे मत काय आहे विचारायला... तुला येथे येऊन चार महिने झाले तुझ्या बद्दल आम्ही (सगळ्यांनी ) कसे मत व्यक्त करायचे ? शिकणे ही हे कला आहे, कुणाकडे जाऊन जबरदस्तीने शिकता येत नाही त्यासाठी समोरच्या माणसाच्या मनात ही शिकवण्याची / लिहण्याची इच्छा होणे आवश्यक आहे. येथे तू अजून काही काळ व्यतीत कर. वाचत जा, जे दिसतय ते सर्व काही वाच. वाचनामुळे तुझ्यात बदल होईल, एक दृष्टीकोन मिळेल. असे सारखे सारखे मागे लागून प्रतिसाद / मत मिळत नसतात विनायका. त्यासाठी भरिव कामगीरी करावी लागते, वाचन्यासारखं असले की अपोआप सदस्य वाचतात ही व प्रतिसाद देतात, फक्त तुझं मन राखावं व प्रतिसाद द्यावा हे मला पटत नाही त्यामुळे हे सर्व लिहतो आहे, माझा हा अधिकार ही नाही कि तुला काय कर व काय करु नको हे सागण्याचा पण ती विचारले आहेस म्हणून लिहतो आहे, प्रत्येक गोष्टी साठी काळ जावा लागतो. काही शिकण्यासाठी साधना करावी लागते, तुला अजून खुप आयुष्य बघायचं आहे, जो पर्यंत तु जिवन म्हणजे काय असे समजत नाहीस तो पर्यंत तुझे लेखन समृध्द कसे होणार ? तु अजून घरातून देखील बाहेर पडला नाही आहेस, सध्या तु कॉलेज मध्ये शिकतो आहेस त्यामुळे तुला वारा, पाऊस व गाणी आठवतात पण जेव्हा तु जिवनाच्या कॉलेज मध्ये येशील तेव्हा तुला नवनवीन विषय भेटतील, नव नवीन शब्द भेटतील, अनुभव भेट्तील व कधी तरी मग तेच अनुभव तुझ्या शब्दातून बाहेर पडतील. सध्या तु लेखन इत्यादी मार्ग सोड असे म्हणत नाही पण सध्या फक्त वाच, कमी त कमी दोन-तीन महीने, सर्वसाक्षी, रामदास काका, तात्या, सामंत काका, बिपिन, अदिती, बिरुटे सर, डांबिस काका, प्राजु, शितल, अवलिया, प्रकाश घाटपांडे, प्रमोद देव, विकास व अन्य मिपाकर ह्यांचे लेखन वाच, तु लिहलेले व त्यांनी लिहलेले ह्यात काय फरक आहे तांत्रिक दृष्ट्या व शाब्दिक दृष्ट्या हे शोध, आपले लेखन परिपक्क करण्यासाठी वेळ द्यावा लागेल तुला, असेल लगेच दोन-तीन महिन्यात समृध्द होता येत नाही .

हं, आत्ताच पाहिला हा लेख! चुकूनच माझं (अशुद्ध तस्मात् चुकीचं) नाव नजरेस पडलं म्हणून प्रतिक्रीया प्रपंच! माझ्यावर विनोद करूच नयेत असं काही नाही, पण किमान ते विनोदी असावेत याची काळजी घेतली तर बरं! अर्थात, माझा व्यक्तीगत उल्लेख मला खटकलेला आहे, कृपया लेखकाने याची नोंद घ्यावी. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

कवटी 26/03/2009 - 10:59
नाहीतर मुंबैकर, जरा पाऊस पडला की यांच्या काळजात धस्स... हा आम्हा तमाम मुंबैकरांचा आणि त्यानी २६/७ च्या (आणि इतर वेळीही गोची करणार्‍या पावसाच्या) भोगलेल्या वेदनेचा अपमान आहे. मी याचा इथे जाहिर निषेध करतो. कवटी

योगी९०० 25/03/2009 - 17:13
चांगले आहे मन तुझे..मनात कुपी आहे का टाकी आहे ते जरा सांग..लेख आवडला .. थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय. ४ थ्या वाक्यापर्यंत १०-१५ वेळा शिंकतोस म्हणतो म्हणजे पुर्ण लिखाण होईपर्यंत संगणक पुर्णपणे भिजला असला पाहिजे. त्यामुळे शुद्धलेखन चुका का याचे कारण ही समजले. या वेळी त्या चुका सुधार असे सांगणार नाही. मला आता माझ्याच संगणकाकडे बघवत नाही आहे. थांबा थांबा फट्यावर मरू नका जातो बाय.......................... आम्ही फट्यावर मरत नाही...तर फाट्यावर मारतो... (विनंती-लेख जरा गडबडीत टाइप केला आहे ,त्यामुळे काही चुका रहिल्या असण्याची शक्यता आहे वेळ मिळाल्यावर दुरुस्त करेन तोपर्यंत समजुन घ्या) हे बहूतेक तू तुझ्या स्वाक्षरीमध्येच टाकून ठेव. आम्हाला आता याची सवय झाली आहे. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

प्रतिसादाबद्दल आभार सध्या का कोणास ठावुक मला हे वारा पाऊस असच सुचतय बाकी शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्या आहेत When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग

मिहिर 25/03/2009 - 22:19
लेख चांगला आहे तसा. फार मोठे परिच्छेद वाचायचा कंटाळा येतो तुझे लेख वाचताना.

भाग्यश्री 25/03/2009 - 22:34
ह्म्म.. ते गाणं चांगलं आहे.. पण या लेखामधून तुला त्या गाण्यापेक्षाही दुसर्‍याच गोष्टीवर लिहायचे होते किंवा कोणावर तरी शरसंधान करायचे आहे असे फार वाटले.. बरेच उल्लेख उगीच आलेत असं मलातरी वाटले... वैयक्तिक हेवेदावे लेखात आणू नयेत या मताची मी आहे.. पावसावर अजुन छान नक्की लिहीता येईल..

In reply to by भाग्यश्री

वैयक्तीक हेवेदावे नाहीत पण शिरिष्कणेकर जसे एखादा साधा विषय घेवुन सगळ्याना मारतात त्याप्रमाणे लिहाय्चे होते पण जमले नाही असे वाटते When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES विनायक पाचलग

दशानन 26/03/2009 - 11:09
विनायक ने खरडी मधून येथे त्याच्या बद्दलचे मत व्यक्त करायला सांगितले आहे त्यासाठी हा लेखन प्रपंच. मित्रा, मला सहा वर्ष झाली मराठी महाजालावर वावर करताना व अनेक लेख / कथा लिहल्या तरी ही माझ्यात जरा ही ही हिंमत झाली नाही की कुणाकडे जाऊन माझ्या बद्दल त्यांचे मत काय आहे विचारायला... तुला येथे येऊन चार महिने झाले तुझ्या बद्दल आम्ही (सगळ्यांनी ) कसे मत व्यक्त करायचे ? शिकणे ही हे कला आहे, कुणाकडे जाऊन जबरदस्तीने शिकता येत नाही त्यासाठी समोरच्या माणसाच्या मनात ही शिकवण्याची / लिहण्याची इच्छा होणे आवश्यक आहे. येथे तू अजून काही काळ व्यतीत कर. वाचत जा, जे दिसतय ते सर्व काही वाच. वाचनामुळे तुझ्यात बदल होईल, एक दृष्टीकोन मिळेल. असे सारखे सारखे मागे लागून प्रतिसाद / मत मिळत नसतात विनायका. त्यासाठी भरिव कामगीरी करावी लागते, वाचन्यासारखं असले की अपोआप सदस्य वाचतात ही व प्रतिसाद देतात, फक्त तुझं मन राखावं व प्रतिसाद द्यावा हे मला पटत नाही त्यामुळे हे सर्व लिहतो आहे, माझा हा अधिकार ही नाही कि तुला काय कर व काय करु नको हे सागण्याचा पण ती विचारले आहेस म्हणून लिहतो आहे, प्रत्येक गोष्टी साठी काळ जावा लागतो. काही शिकण्यासाठी साधना करावी लागते, तुला अजून खुप आयुष्य बघायचं आहे, जो पर्यंत तु जिवन म्हणजे काय असे समजत नाहीस तो पर्यंत तुझे लेखन समृध्द कसे होणार ? तु अजून घरातून देखील बाहेर पडला नाही आहेस, सध्या तु कॉलेज मध्ये शिकतो आहेस त्यामुळे तुला वारा, पाऊस व गाणी आठवतात पण जेव्हा तु जिवनाच्या कॉलेज मध्ये येशील तेव्हा तुला नवनवीन विषय भेटतील, नव नवीन शब्द भेटतील, अनुभव भेट्तील व कधी तरी मग तेच अनुभव तुझ्या शब्दातून बाहेर पडतील. सध्या तु लेखन इत्यादी मार्ग सोड असे म्हणत नाही पण सध्या फक्त वाच, कमी त कमी दोन-तीन महीने, सर्वसाक्षी, रामदास काका, तात्या, सामंत काका, बिपिन, अदिती, बिरुटे सर, डांबिस काका, प्राजु, शितल, अवलिया, प्रकाश घाटपांडे, प्रमोद देव, विकास व अन्य मिपाकर ह्यांचे लेखन वाच, तु लिहलेले व त्यांनी लिहलेले ह्यात काय फरक आहे तांत्रिक दृष्ट्या व शाब्दिक दृष्ट्या हे शोध, आपले लेखन परिपक्क करण्यासाठी वेळ द्यावा लागेल तुला, असेल लगेच दोन-तीन महिन्यात समृध्द होता येत नाही .

हं, आत्ताच पाहिला हा लेख! चुकूनच माझं (अशुद्ध तस्मात् चुकीचं) नाव नजरेस पडलं म्हणून प्रतिक्रीया प्रपंच! माझ्यावर विनोद करूच नयेत असं काही नाही, पण किमान ते विनोदी असावेत याची काळजी घेतली तर बरं! अर्थात, माझा व्यक्तीगत उल्लेख मला खटकलेला आहे, कृपया लेखकाने याची नोंद घ्यावी. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

कवटी 26/03/2009 - 10:59
नाहीतर मुंबैकर, जरा पाऊस पडला की यांच्या काळजात धस्स... हा आम्हा तमाम मुंबैकरांचा आणि त्यानी २६/७ च्या (आणि इतर वेळीही गोची करणार्‍या पावसाच्या) भोगलेल्या वेदनेचा अपमान आहे. मी याचा इथे जाहिर निषेध करतो. कवटी
मनाच्या कुपितले या सदरातला हा सलग तेरावा लेख पाऊस दाटलेला माझ्या घरावरीही हा काल हे गाणे पुन्हा ऐकले. ऐकून बरे वाटले बाकी मी मराठी गाण्यांचा डाय हार्ड फॅन आहे हे तुम्ही जाणताच, त्यामुळे असे अर्थवाही, माझ्यासारखी पाल्हाळ न लावता थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय. हा आता तुम्हाला हा प्रश्न पडला असणार म्हणा की तू पावसात भिजलास त्याचा आम्हाला काय फायदा. तुझ्या अंगात मस्ती होती म्हणून भिजलास आता भोग फळ कर्माची.

माझे महान प्रयोग - २

दशानन ·

तवा बरोबर गरम झाला नाही राव. तेल ही सर्व बाजुला चोथीने लावावे. हे आधीच सांगीतले होते मी राजे.

In reply to by विनायक प्रभू

गुर्जी तवा गरम करायला पण शिकवला होता का नाही ? तुमचा विद्यार्थी गॅस चालु करायला विसरतो म्हणजे काय ? बाकी आपल्या लेखात संजय कपुर दिसले आणी 'तुमचा चुकलेला पदार्थ कोणचा?' सुद्धा आठवुन गेले ;) राजे आजकाल तुम्ही नुसते चौकार षटकार मारत आहात बॉ ! मज्जा येतेय .. येउद्यात अजुन पराक्रम. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

काय राजे तव्यावर प्लास्टीकची पिशवी ठेवलीत ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सुप्रिया 24/03/2009 - 13:46
=)) =)) =)) =)) मजा आली वाचायला. -------------------- देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.

योगी९०० 24/03/2009 - 13:50
हहपुवा.. बरे झाले फक्त पराठा केलात्....प्राठा आणि लस्सी नाही केलीत. खादाडमाऊ

शिप्रा 24/03/2009 - 14:10
>>रात्रीचे ११.३५ मिनिटे नंतर पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... ! =)) भारीच लिहिले आहेस..

टिव्ही चालू करुन परत आलो पण भांड्यात काहीच प्रतिक्रिया चालू असलेली दिसली नाही, मी जरा गडबडलो व खाली वाकून गॅस कडे पाहीले तर मी गॅस पेटवला नव्हता हे मला कळाले मस्तच रे..... पण चहाचई चव कशी झाली होति ते नाही लिहिले.... पराठा पण टेस्टी होता बॉस ! काय राजे तुमच्या पा कृ चा फोटो नाही..... बा़की तुम्हि तुमच्या प्रयोगा प्रमाणे महानच आहात. "हे भगवान, किचन में क्या करने गये थे... यह आटा कुं गोंद के रखा है... यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. .. क्या करते हो राज भाई ! ओ मेरी मां ! ग्लास फोडा क्या.... " बिचारा सतबीर......:-)

सँडी 24/03/2009 - 14:43
=)) =)) प्रत्येक शब्दाला हसायला आलं, खुप हसलो आज! बिचारा सतबीर, सगळी बियर उतरली असेल बिचार्‍याची! =))

In reply to by सँडी

अबोल 24/03/2009 - 21:08
आयला , साडि एवडा काळा पराठा झाला हे वाचुन सुध्दा (यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. ..) अर्धे बियरचे कॅन राजे च्या...त गेले हे न समजायला उरलेले अर्धे बियरचे कॅन तुझ्या ...त (....= पोट )गेले हि माझि रात्रिचि बियर पचल्यामुळे खात्रि झालि.(आमच्यात बियर पचते, उतरण्या साठि चढतच नाहि)

मृगनयनी 24/03/2009 - 14:57
अगंआईईईई$$$$गं!!! राजे.... आपण धन्य आहात! __________/\__________ =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) राजे... शेवटी, "पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... !" या वाक्यानन्तर "क्रमश: " टाकायला विसर्लात का? :-? ;) ;) ;) ;) मागच्या पेक्षा हा लेख अधिक उत्कंठावर्धक वाटला... आणि पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले, की "तुम्हाला एका" बायको"ची गरज आहे..." :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

खर म्हणजे राजे लग्नाच बघा राव कंटाळा आला आम्हाला तुमच्या प्रेमभंगाच्या कथा वाचुन साला ह्या लेखन प्रकारात तुमची मोनोपॉली झालि आहे नविन आणी तरुण रक्ताला तुमच्या मुळे वाव मिळत नाहि तुम्ही ह्या लेखन प्रकाराला एक उच्च प्रकारावर नेउन ठेवलेत म्हनुन मिपावर कोणी असे लेखन करयचे धाडस करत नाहि ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अवलिया 24/03/2009 - 15:08
फटु नसलेल्या पाकृ आम्ही वाचत नाही. मागचा थोबाडाचा फटु टाकणे नाही तर ३०-३१ ची दिल्ली ट्रीप रद्द करेल. --अवलिया

In reply to by अवलिया

दशानन 24/03/2009 - 15:11
बाबा, पाठवतो फोटो मेल मध्ये.... तेवढी ट्रिप रद्द करुन नकोस बॉ... मी बुकिंग केले आहे यार !

रेवती 24/03/2009 - 19:43
आईग्ग! काय काय नि कसले कसले प्रयोग केलेत! आपण केलेल्या पराठ्यांमध्ये कणिक (आटा) घातलीच नव्हती. :( रेवती

चतुरंग 24/03/2009 - 21:04
आपण स्वयंपाकघरातसुद्धा लढाईला जाता हे माहीत नव्हते! ;) चतुरंग

समिधा 24/03/2009 - 23:42
मला माहीत न्हवते पाकृ.देताना की प्लॅस्टीक पिशवी तव्यावर टाकु नये अस लिहायच.. आणि कणीकच (आटा) घातला न्हवता म्हणजे ........ :O नशिब मी पाकृ.चा फोटो टाकला आहे,नाहितर...... :S बाकी तुमचा प्रयोग पण मस्तच.. पण पुढच्या वेळी सतबीर तुम्ही सुट्टी देउन पण कुठे जाणार नाही हे नक्की. लेखन ही आवडले ते तरी लिहायला मस्त जमले आहे :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

In reply to by समिधा

दशानन 25/03/2009 - 09:12
>> कणीकच (आटा) ओ तेरी ! कणीक म्हणजे आटा काय .. अर्रे रे ! मला माहीत नव्हतं ! थंक्यु ! परत जाइन कधी तर किचन मध्ये १० वीस वर्षा नंतर तेव्हा ह्या माहीतीचा फायदा होईल.

स्पृहा 25/03/2009 - 11:51
तु धन्य आहेस................:D _____________/\_______________ साष्टांग नमस्कार..... हे असले सगळे प्रयोग करण्यापेक्षा सरळ लग्न कर.........;)

सोनम 29/03/2009 - 16:41
राजे लेख खूप छान लिहिला आहे. :) :) :) मी पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावले व मिश्रण त्यावर पसरवले राजे प्लास्टिकची पिशवी ला तेल लावतात हे पहिल्यादाच ऐकले आहे मी. :? :? :?

तवा बरोबर गरम झाला नाही राव. तेल ही सर्व बाजुला चोथीने लावावे. हे आधीच सांगीतले होते मी राजे.

In reply to by विनायक प्रभू

गुर्जी तवा गरम करायला पण शिकवला होता का नाही ? तुमचा विद्यार्थी गॅस चालु करायला विसरतो म्हणजे काय ? बाकी आपल्या लेखात संजय कपुर दिसले आणी 'तुमचा चुकलेला पदार्थ कोणचा?' सुद्धा आठवुन गेले ;) राजे आजकाल तुम्ही नुसते चौकार षटकार मारत आहात बॉ ! मज्जा येतेय .. येउद्यात अजुन पराक्रम. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

काय राजे तव्यावर प्लास्टीकची पिशवी ठेवलीत ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सुप्रिया 24/03/2009 - 13:46
=)) =)) =)) =)) मजा आली वाचायला. -------------------- देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.

योगी९०० 24/03/2009 - 13:50
हहपुवा.. बरे झाले फक्त पराठा केलात्....प्राठा आणि लस्सी नाही केलीत. खादाडमाऊ

शिप्रा 24/03/2009 - 14:10
>>रात्रीचे ११.३५ मिनिटे नंतर पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... ! =)) भारीच लिहिले आहेस..

टिव्ही चालू करुन परत आलो पण भांड्यात काहीच प्रतिक्रिया चालू असलेली दिसली नाही, मी जरा गडबडलो व खाली वाकून गॅस कडे पाहीले तर मी गॅस पेटवला नव्हता हे मला कळाले मस्तच रे..... पण चहाचई चव कशी झाली होति ते नाही लिहिले.... पराठा पण टेस्टी होता बॉस ! काय राजे तुमच्या पा कृ चा फोटो नाही..... बा़की तुम्हि तुमच्या प्रयोगा प्रमाणे महानच आहात. "हे भगवान, किचन में क्या करने गये थे... यह आटा कुं गोंद के रखा है... यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. .. क्या करते हो राज भाई ! ओ मेरी मां ! ग्लास फोडा क्या.... " बिचारा सतबीर......:-)

सँडी 24/03/2009 - 14:43
=)) =)) प्रत्येक शब्दाला हसायला आलं, खुप हसलो आज! बिचारा सतबीर, सगळी बियर उतरली असेल बिचार्‍याची! =))

In reply to by सँडी

अबोल 24/03/2009 - 21:08
आयला , साडि एवडा काळा पराठा झाला हे वाचुन सुध्दा (यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. ..) अर्धे बियरचे कॅन राजे च्या...त गेले हे न समजायला उरलेले अर्धे बियरचे कॅन तुझ्या ...त (....= पोट )गेले हि माझि रात्रिचि बियर पचल्यामुळे खात्रि झालि.(आमच्यात बियर पचते, उतरण्या साठि चढतच नाहि)

मृगनयनी 24/03/2009 - 14:57
अगंआईईईई$$$$गं!!! राजे.... आपण धन्य आहात! __________/\__________ =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) राजे... शेवटी, "पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... !" या वाक्यानन्तर "क्रमश: " टाकायला विसर्लात का? :-? ;) ;) ;) ;) मागच्या पेक्षा हा लेख अधिक उत्कंठावर्धक वाटला... आणि पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले, की "तुम्हाला एका" बायको"ची गरज आहे..." :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

खर म्हणजे राजे लग्नाच बघा राव कंटाळा आला आम्हाला तुमच्या प्रेमभंगाच्या कथा वाचुन साला ह्या लेखन प्रकारात तुमची मोनोपॉली झालि आहे नविन आणी तरुण रक्ताला तुमच्या मुळे वाव मिळत नाहि तुम्ही ह्या लेखन प्रकाराला एक उच्च प्रकारावर नेउन ठेवलेत म्हनुन मिपावर कोणी असे लेखन करयचे धाडस करत नाहि ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अवलिया 24/03/2009 - 15:08
फटु नसलेल्या पाकृ आम्ही वाचत नाही. मागचा थोबाडाचा फटु टाकणे नाही तर ३०-३१ ची दिल्ली ट्रीप रद्द करेल. --अवलिया

In reply to by अवलिया

दशानन 24/03/2009 - 15:11
बाबा, पाठवतो फोटो मेल मध्ये.... तेवढी ट्रिप रद्द करुन नकोस बॉ... मी बुकिंग केले आहे यार !

रेवती 24/03/2009 - 19:43
आईग्ग! काय काय नि कसले कसले प्रयोग केलेत! आपण केलेल्या पराठ्यांमध्ये कणिक (आटा) घातलीच नव्हती. :( रेवती

चतुरंग 24/03/2009 - 21:04
आपण स्वयंपाकघरातसुद्धा लढाईला जाता हे माहीत नव्हते! ;) चतुरंग

समिधा 24/03/2009 - 23:42
मला माहीत न्हवते पाकृ.देताना की प्लॅस्टीक पिशवी तव्यावर टाकु नये अस लिहायच.. आणि कणीकच (आटा) घातला न्हवता म्हणजे ........ :O नशिब मी पाकृ.चा फोटो टाकला आहे,नाहितर...... :S बाकी तुमचा प्रयोग पण मस्तच.. पण पुढच्या वेळी सतबीर तुम्ही सुट्टी देउन पण कुठे जाणार नाही हे नक्की. लेखन ही आवडले ते तरी लिहायला मस्त जमले आहे :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

In reply to by समिधा

दशानन 25/03/2009 - 09:12
>> कणीकच (आटा) ओ तेरी ! कणीक म्हणजे आटा काय .. अर्रे रे ! मला माहीत नव्हतं ! थंक्यु ! परत जाइन कधी तर किचन मध्ये १० वीस वर्षा नंतर तेव्हा ह्या माहीतीचा फायदा होईल.

स्पृहा 25/03/2009 - 11:51
तु धन्य आहेस................:D _____________/\_______________ साष्टांग नमस्कार..... हे असले सगळे प्रयोग करण्यापेक्षा सरळ लग्न कर.........;)

सोनम 29/03/2009 - 16:41
राजे लेख खूप छान लिहिला आहे. :) :) :) मी पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावले व मिश्रण त्यावर पसरवले राजे प्लास्टिकची पिशवी ला तेल लावतात हे पहिल्यादाच ऐकले आहे मी. :? :? :?
माझे महान प्रयोग - १ मागील भाग. सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा. सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण. चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला ! माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध !

गिरिश

निखिल देशपांडे ·

दशानन 23/03/2009 - 12:32
सुंदर व्यक्ती चित्रण ! पण गिरिशचे असे अकाली जाणं मनाला कुठे तरी... टोचणी देऊन गेले !

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 23/03/2009 - 13:04
असेच म्हणतो ... अंगावर काटा आला हे सर्व वाचुन ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

शितल 24/03/2009 - 00:34
सहमत. छान लिहिले आहे पण वाईट वाटले शेवट वाचुन. :(

क्रान्ति 23/03/2009 - 19:32
मन सुन्न झाल वाचून. माझ्या जवळच्या मैत्रिणीचा भाऊ सुद्धा असाच अचानक पाण्यात बुडून गेला होता, त्याची आठवण झाली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

भाग्यश्री 23/03/2009 - 22:57
हे वाचून माझ्याही दादाचा एक मित्र, सिद्धार्थ, पट्टीचा पोहणारा.. पण स्विमिंग करतानाच बुडून गेला ते आठवलं. :(

दशानन 23/03/2009 - 12:32
सुंदर व्यक्ती चित्रण ! पण गिरिशचे असे अकाली जाणं मनाला कुठे तरी... टोचणी देऊन गेले !

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 23/03/2009 - 13:04
असेच म्हणतो ... अंगावर काटा आला हे सर्व वाचुन ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

शितल 24/03/2009 - 00:34
सहमत. छान लिहिले आहे पण वाईट वाटले शेवट वाचुन. :(

क्रान्ति 23/03/2009 - 19:32
मन सुन्न झाल वाचून. माझ्या जवळच्या मैत्रिणीचा भाऊ सुद्धा असाच अचानक पाण्यात बुडून गेला होता, त्याची आठवण झाली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

भाग्यश्री 23/03/2009 - 22:57
हे वाचून माझ्याही दादाचा एक मित्र, सिद्धार्थ, पट्टीचा पोहणारा.. पण स्विमिंग करतानाच बुडून गेला ते आठवलं. :(
आज सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिसला निघालो. सोसायटिच्या समोरच्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत होते, एक दहा-बारा वर्षांचा मुलगा बॉलिंग करत होता, त्याचा कडे पाहुन माझे पाउल अचानक थांबले, तो पळत आला आणि त्याने डाव्या हाताने जोरात बॉल टाकला आणि त्याने बॅट्समन ला बोल्ड केले. त्याला पाहुन माझ्या डोळया समोर गिरिश उभा राहिला. गिर्‍या माझा बालमित्र माझा शेजारी. असाच गिरिश ला आठवत मी पुढे जाऊ लागलो आणि डोळ्यात समोर उभा राहिलं तो दिवस. मी असाच घरात लोळत पडलो होतो. पहिल्या पावसाची पहिली सर बाहेर पडत होती. शांत पणे गॅलरी जवळच्या सोफ्यावरबसुन बाहेर मस्त पाउस बघत बसलो होतो.

स्मृतीगंध-१२ "व्हेळ ते फ्रांकफुर्ट : एक प्रवास"

वामनसुत ·

संध्याकाळी गप्पा मारताना नाना (वामनसुत)त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगत होते. त्यांना आम्ही त्या लिहून काढण्याचा आग्रह धरला. २,३ दिवसांनी त्यांनी लिहायला सुरुवात केली. ४,५ पाने लिहून झाल्यावर मला वाचायला दिली. मी त्यांना मिसळपाववर लेखांच्या स्वरुपात प्रकाशित करु असे सांगितले तोपर्यंत त्यांना मिपा किंबहुना मराठी संस्थळे आणि त्यावर लिहिले जाणारे लेखन यांची माहिती नव्हती. ते आपलं मला नाउमेद करायचं नाही म्हणून म्हणाले कर तुला हवे तर प्रकाशित. त्यांच्या नावचा वेगळा आयडी काढून मुद्दामहूनच त्यांची आयडेंटीटी उघड न करता मी 'व्हेळातले दिवस'टंकले.पहिल्याच लेखाला आलेले प्रतिसाद पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि हळूहळू त्यांची ह्या माध्यमाशी आणि मिपाशीही ओळख होत गेली आणि आलेल्या प्रतिसादांनी हुरुप येऊन ते पुढचे भाग लिहित गेले,आपल्या लेखाचे प्रतिसाद किती झाले आहेत? ह्याची चौकशी माझ्याकडे करु लागले आणि मग आम्ही रोज १ भाग प्रकाशित करुन स्मृतिगंध ते जर्मनीत असेपर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले. जशी आपणा सर्वांना स्मृतीगंध वाचण्याची चटक लागली होती तशी त्यांना प्रतिसाद पाहण्याची , १५ दिवस त्यांच्याबरोबर मीही टाइममशिनमध्ये बसून ७०,७५ वर्षे मागे गेले. स्मृतीगंध पूर्ण होताना पाहणे हा माझ्यासाठीही एक आनंददायी अनुभव होता, आपणा सर्वांच्या प्रेमाने, कौतुकाने आम्ही भारावून गेलो आहोत,असाच लोभ असू द्या. स्वाती व दिनेश

In reply to by स्वाती दिनेश

१५ दिवस त्यांच्याबरोबर मीही टाइममशिनमध्ये बसून ७०,७५ वर्षे मागे गेले. स्मृतीगंध पूर्ण होताना पाहणे हा माझ्यासाठीही एक आनंददायी अनुभव होता, आपणा सर्वांच्या प्रेमाने, कौतुकाने आम्ही भारावून गेलो
स्वातीताई आपण नानांना लिहित केलत कारण हा अनुभव आपल्या मिपाकरांनीही शेअर करावा अशीच आपली इच्छा असणार! आम्हालाही खुप आनंददायी वाटल. स्मृतीगंध असाच दरवळत राहो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by स्वाती दिनेश

श्रावण मोडक 23/03/2009 - 12:21
एक मोठे काम केले आहेत तुम्ही. ते अर्धवट ठेवू नका. अकरा भागांमध्ये (तेही इंटरनेटच्या हिशेबातले) एकूण एका पिढीचा कालखंड बसवण्याची कसरत काय असते ती ठाऊक आहे. हे सारे लेखन वाचनीय जरूर झाले आहे. तसे मी वेळोवेळी लिहिलेही आहे. पण त्याहीपलीकडे हे लेखन अपूर्णतेची हुरहूर लावून जाते. ते त्याचे यश जरूर आहे. पण अपूर्णतादेखील इतकीही नको. आणखी काही स्मृतिचित्रे असतील. नेमके प्रसंग असतील, घटना असतील. किंवा कदाचित आत्ताच्या लेखनातही अशा घटना, प्रसंग दृष्टीतक्षेप टाकल्याच्या स्वरूपात आली असतील. त्यांचा विस्तार होऊ शकतो. जरूर विचार करा. चांगले लेखन वाचायला दिल्याबद्दल कृतज्ञ.

In reply to by स्वाती दिनेश

अन्वय 23/03/2009 - 18:50
नाना, सर्व लेख वाचले. माझ्या वडिलांच्या आयुष्याचा पट डोळ्यासमोर आला. आयुष्यभर वणवण करून "संध्याकाळी' कृतार्थ जीवन जगत आहात, हे वाचून अत्यानंद झाला. आपण खरेच खडतर आयुष्य जगला आहात. मात्र, हार न मानता झुंजत राहिलात म्हणूनच जिंकलात. हे लेख म्हणजे केवळ तुमच्या आयुष्याची माहिती नाही, तर माझ्यासारख्या असंख्य तरुणांना कष्टाला पर्याय नाही, हे ठासून सांगणारे पाठ आहेत, असे वाटते. आमची पिढी बरीच सुखावह आहे. तुमच्यासारखे कष्ट, दोन-दोन, तीन-तीन नोकऱ्या कराव्या लागत नाहीत. किंबहुना केल्यास चांगलेच; पण कुणाला त्याची गरज वाटतेच असे नाही. असो. लिखाण खूप ओघवते आहे. तुमच्या आयुष्यात आणखी काही नाट्यपूर्ण प्रसंग घडले असतील. ते एकत्रित बांधून त्याचे आत्मचरित्रपर पुस्तक करावे, असे वाटते. यापुढेही असेच कृतार्थ जीवन जगा. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना!

विकास 23/03/2009 - 02:49
फारच छान! असेच आम्हीपण आमच्या वडिलांना लिहीण्यासाठी उद्युक्त केले आहे. आधीच्या पिढ्यांनी वास्तवीक असे नक्की लिहून ठेवावे. तो केवळ कुटूंबासाठीच नाहीतर काही अंशी समाजासाठी साठा आहे. कारण त्यातून अनेक गोष्टी, संस्कार, संस्कृती, त्यातील बदल आपल्याला कळू शकतात. विशेष करून स्वातंत्र्याच्या आधी आणि जवळपास जन्माला आलेल्या पिढीने बरेच बदल पाहीले आहेत: बैलगाडीपासून ते विमानापर्यंत, जगाशी नाते नसलेल्या खेड्यापाड्यापासून ते शहर-परदेशापर्यंत, चौकात जाऊन गांधीहत्येनंतरचे भाषण एकाच रेडीओवर सगळ्या गावाने ऐकण्यापासून ते स्वतःच्या बेडरूममधे मुलांकडून आंतर्राष्ट्रीय फोनवरून लॅपटॉप आणि इंटरनेट वापरण्याच्या सुचना घेई पर्यंत, एकत्र कुटूंबापासून एकाकीपणा अनुभवेपर्यंत आणि अर्थातच स्वातंत्र्याच्या पहाटे आदर्शांच्या स्वप्नांपासून ते अनेक अर्थाने त्या स्वप्नभंगापर्यंत...

In reply to by विकास

प्राजु 23/03/2009 - 03:00
प्रतिसाद खूप आवडला तुमचा. खरंच आधीच्या पिढ्यांनी हे लिहून ठेवायलाच हवं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु 23/03/2009 - 02:50
काय बोलू आणखी?? स्वातीताई, वामनसूत तुझे सासरे असणार याची साधरण कल्पना आली होती. पण काही बोललो नाही कोणालाच. असो... लेखन समाप्त नको.. चालू राहुदे. काकांना... धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नंदन 23/03/2009 - 03:13
तुमचे लेखन, विशेषतः हा शेवटचा भाग वाचताना सारखं 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' आठवत होतं. तीच नम्र कृतार्थतेची भावना. लेखमाला संपली म्हणून एखादी सुरेल मैफल संपल्यासारखं थोडं वाईट वाटतं आहे, पण हे लेख वाचायला मिळाले याचा आनंदही मोठा आहे. आमच्यापर्यंत ही लेखमाला पोचवल्याबद्दल स्वातीताईचे विशेष आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

भाग्यश्री 23/03/2009 - 06:42
सहमत.. मी प्रत्येक भागाला प्रतिसाद दिला नाही परंतू उत्सुकता लागून राहीली कायम.. आता काय होणार.. ? लेखमाला संपू नये असेच वाटले..

जणू प्रभातचा एखादा सुंदर चित्रपट पहात आहोत असे वाटले.... लेखकाचे हार्दिक अभिनंदन!! आता लिहायला सुरवात केली आहे तर ते या मालिकेनंतर खंडित होऊ नये ही प्रार्थना!!! पुढील लेखनासाठीही शुभेच्छा!!

केशवसुमार 23/03/2009 - 03:43
ति.नाना, अप्रतिम लेखमाला.. =D> जवळ जवळ ५० वर्षाच्या काळखंड अगदी चित्रमय उभा केलात...नतमस्तक.. फ्रांकफुर्ट मध्ये तुम्हाला २-३ वेळा भेटलो पण पत्ता लागू दिला नाहीत.. आणि स्वाती आणि दिनेश त्यांच्याकडे मी नंतर बघतो X( .... 'व्हेळ' हे नाव दिनेश कडून ऐकल होते पण लक्षात नाही आले ~X( .... आजच्या लेखात "फ्रांकफुर्ट''आले तेव्हा जरा शंका आली.. :W 'जे.के सोडून क्रॉम्टनग्रीव्हजमध्ये' वाचल्यावर खात्रीच झाली.. #o L) अतिशय अप्रतिम लेखमाला हे परत परत सांगावेसे वाटते.. =D> =D> =D> आणि आपल्याला भेटता आले आणि आपल्याशी गप्पा मारता आल्या या बद्दल मी स्वत।ला नशिबवान समजतो.. (नशिबवान)केशवसुमार :P बाकी स्वाती आणी दिनेश.. आपण पाळलेली गोपनियता धन्य आहे!! अवांतरः ति.नाना, आता मला खायला मिळालेल्या तुमच्या हातच्या लोणच, भरल्या मिरच्या आणि मसाल्याची आमटी या पाककॄती सर्व मिपाकरांना निदान वाचायला द्या.... सर्व मिपाकरांना टूकटूक.. :P (पुन्हा नशिबवान)केशवसुमार :P

सुक्या 23/03/2009 - 04:11
अगदी भारावुन गेलो. काय लिहु तेच सुचत नाही. अगदी पहिल्या भागापासुन या लेखमालिकेने वेड लावलं होतं. अगदी साध्या सोप्या ओघवत्या शैलीत आपल्या जिवनाचा पट उलगडुन दाखवला. लिखाणातही तोच साधेपणा. अगदी सुरेख. लोकांना वेड लावायला काहीतरी भव्यदिव्यच लागते असे मुळीच नाही. तुमचे अनुभवाचे बोल अजुन येउद्यात. (नतमस्तक) सुक्या (बोंबील)

मदनबाण 23/03/2009 - 04:15
--- मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

समिधा 23/03/2009 - 04:52
सगळे भाग खरच अप्रतिम्,तुमचे लेखन थांबु नये असे वाटते. आजुन लिहीत रहा. =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

घाटावरचे भट 23/03/2009 - 05:17
मला काही इथे आलेल्या भारी प्रतिसादांसारखं लिहिता येत नाही, तस्मात् सध्या '+१' एवढेच म्हणतो.

शितल 23/03/2009 - 06:01
एवढेच केवळ शब्द आहेत आपल्या लेखमालेला. तुम्हाला आमचा नमस्कार. :) स्वाती ताई तु ही ग्रेट आहेस. :) मिपावर स्वातीताईंच्या रेसिपी आणि प्रवासवर्णनांनी मिपाकरांना आपले केले आणी तुम्ही तुमचा जीवन वृत्तांत साध्या सोप्या भाषेत आम्हाला सांगितलात आणि आम्हा मिपाकरांशी असलेली आपुलकीची नाळ अजुन घट्ट केलीत. तुमच्या ह्या सुंदर लेखमालेसाठी तुम्हाला धन्यवाद . :)

सहज 23/03/2009 - 07:01
केवळ अप्रतिम! उत्कृष्ट लिखाण. लिखाणातुन जवळचे वाटत असलेले नाते प्रत्यक्षातही तितकेच जवळचे निघाले आम्ही मिपाकर खरोखर भाग्यवान आहोत.

In reply to by सहज

छोटा डॉन 23/03/2009 - 07:09
सहजरावांशी शब्दशः सहमत आहे ... >>उत्कृष्ट लिखाण. लिखाणातुन जवळचे वाटत असलेले नाते प्रत्यक्षातही तितकेच जवळचे निघाले आम्ही मिपाकर खरोखर >>भाग्यवान आहोत. +++++++++++++++१, हेच म्हणतो ... आंतरजालावरची एक अत्यंत नितांतसुंदर लेखमाला म्हनुन मी ह्याचा अवश्य उल्लेख करेन ... खुपच रोचक आणि गतीशील लिखाण होते, जणुकाही आम्ही एखाद्या निवांत संध्याकाळी जेवण झाल्यावर "आजोबांच्या गोष्टी" ऐकत आहोत असेच वाटत होते. महत्वाचे म्हणजे काळ इतका जुना असुनसुद्ध त्यातले डिटेल्स आहे तसे अगदी तारखेनिशी लिहल्याने फारच "क्लास" झाले आहे लिखाण ...! बाकी आख्ख्या लेखमालेतुन कधीच स्वातीताई आणि दिनेशदादा ह्यांचा चुकुनसुद्धा "उल्लेख" आला नाही हे लिखाणाचे यश म्हणावे लागेल, अगदी शेवटच्या भागात हा सुखद धक्का दिलात .... आजोबा, आता इथे थंबु नकात .... ही लेखमाला संपली तर संपुद्यात, अजुन दुसरे असेच काहीतरी हाती घ्या ... आम्हाला तुमचे लिखाण आवडते, अजुन असेच येऊद्यात ... ------ ( वामनसुतांचा फॅन ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

आजोबा, आजपर्यंत रोज व्यसन लागल्यासारखंच तुमचं लिखाण, नव्हे कथन, वाचत होते. आता रूखरूख लागली आहे की रोज तुमचं लिखाण वाचता येणार नाही. पण तुम्ही आम्हा नातवंड, पोरा-सोरांना नाऊमेद करणार नाहीत अशी आशा आहे. तुमचं आणखी जास्त लिखाण वाचायला आवडेल. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by छोटा डॉन

सहमत. सगळे भाग वाचुन मगच प्रतिक्रीया देणार होतो, पण येव्हडे सुंदर सुंदर प्रतिसाद पाहुन काहि लिहायचा धिर होइना. "आंतरजालावरची एक अत्यंत नितांतसुंदर लेखमाला म्हनुन मी ह्याचा अवश्य उल्लेख करेन ..." ह्या वाक्याशी पुर्णपणे सहमत आणी ह्या लेखमालेचा वाचक व्हायला मिळाले हे माझे भाग्य :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by छोटा डॉन

बाकी आख्ख्या लेखमालेतुन कधीच स्वातीताई आणि दिनेशदादा ह्यांचा चुकुनसुद्धा "उल्लेख" आला नाही हे लिखाणाचे यश म्हणावे लागेल, अगदी शेवटच्या भागात हा सुखद धक्का दिलात .... आजोबा, आता इथे थंबु नकात .... ही लेखमाला संपली तर संपुद्यात, अजुन दुसरे असेच काहीतरी हाती घ्या ... आम्हाला तुमचे लिखाण आवडते, अजुन असेच येऊद्यात ... डान्याशी १०००१% सहमत (वामनसुत आजोबांच्या लिखाणाचा पंखा )घाशीराम कोतवाल ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

रेवती 23/03/2009 - 07:40
फारच सुंदर वर्णन.... आयुष्याच्या प्रवासाचे. आपण भरपूर कष्ट केलेत तरी इतकं साधं, सुंदर वर्णन..... कुठेही कटुता नाही. खरंतर प्रतिक्रियेसाठी शब्द जुळवावे लागताहेत. रेवती

In reply to by रेवती

चित्रा 23/03/2009 - 16:24
कुठेही कटुता नाही. कौतुक वाटते. ही लेखमाला संपली तरी लिहायचे सोडू नका. हे लेख आमच्यापर्यंत आणण्याबद्दल स्वातीचेही अनेक आभार.

प्राची 23/03/2009 - 07:58
काय प्रतिसाद देऊ असं झालंय.शब्दच उरले नाहीत. स्वाती ताई यांचे आभार. वामनसुत यांना साष्टांग दंडवत ___/\___ आपण आपल्या अशाच लेखांनी मिपाला आणि मिपाकरांना समृद्ध करावे. =D> =D> =D>

प्रमोद देव 23/03/2009 - 08:13
नारायणराव, आपली मैफल मस्त रंगली. तिची समाप्तिही आपण तितक्याच समर्थ भैरवीने केलीत. पण आता इथेच थांबू नका. अशाच वेगवेगळ्या मैफिली सादर करत चला. पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

यशोधरा 23/03/2009 - 08:46
अतिशय सुरेख अशी लेखमाला होती ही. सगळे भाग संपल्यावरच प्रतिसाद देऊ म्हणून थांबले होते, पण ही लेखमाला सुरुच रहावी असे वाटत होते, हे मात्र खरे. अतिशय साधे सुधे पण मनापासून केलेले प्रांजळ लिखाण खूप भावले. अजूनही काही जरुर लिहा. वाचायला खूप आवडेल. स्वातीताई , तू सगळे भाग टंकून आमच्यापर्यंत पोहोचवलेस याबद्दल तुझेही खूप खूप आभार.

In reply to by यशोधरा

सखी 23/03/2009 - 18:54
अगदी असेच म्हणणार होते. अजूनही काही जरुर लिहा. वाचायला खूप आवडेल. शेवटच्या भागातील रहस्यभेद खासच!

सुंदर लेखमाला. आपल्या या संपूर्ण लेखमालेला हा माझा एकमेव प्रतिसाद. आपले एकामागोमाग एक नोकर्‍या, व्यवसाय बदलणे आणि प्रत्येक नवीन व्यवसायात यश संपादन करणे हे माझ्यासारख्या तरुणाला एक आदर्श आहे. आपल्यासारखे सरळमार्गी, उद्यमी व्यक्तीमत्व माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी आहे. आपल्याला लिहीते केल्याबद्दल स्वातीताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. (प्रभावित) पुण्याचे पेशवे

एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास, त्याच व्यक्तीच्या शब्दात वाचून धन्य झालो. स्वतःच्या जीवना बद्दल इतक्या तटस्थपणे इतके उत्तम लेखन केलेत. फार आवडले! श्रीकृष्ण सामंत व आपण अशी बुजुर्ग माणसे मिपावर वावरत रहावीत. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

दिपक 23/03/2009 - 10:03
एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास, त्याच व्यक्तीच्या शब्दात वाचून धन्य झालो. हे लिखाण आम्हा सर्व युवा वाचकांना मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद :) अतिशय सुंदर लेखन. स्वातीताई तुमचे आभार मानाचे तेवढे थोडेच. अप्रतिम कथन. लेखमाला कधीच संपु नये असे वाटत होते. वामनसुत आम्ही आपले पंखे. (वामनसुतांचा पुढील लिखाणांच्या प्रतिक्षेत)दिपक.

मैत्र 23/03/2009 - 10:49
नंदनने म्हटल्या प्रमाणे : लेखमाला संपली म्हणून एखादी सुरेल मैफल संपल्यासारखं थोडं वाईट वाटतं आहे, पण हे लेख वाचायला मिळाले याचा आनंदही मोठा आहे. आमच्यापर्यंत ही लेखमाला पोचवल्याबद्दल स्वातीताईचे विशेष आभार. स्वाती ताइने लिहिल्या प्रमाणे टाइम मशीन मधून ७०-७५ वर्ष मागे नेलं सगळ्या मिपाकरांना. ही पूर्ण लेखमाला, आजोबांचा जीवन प्रवास आणि सगळ्या गोष्टी विलक्षण सहजतेने लिहिणं. काय प्रतिसाद देणार यावर. खरं तर रोज लहान सहान गोष्टींनी मनाला - स्वतःला आणि इतरांना खूप त्रास करुन घेतो आम्ही आत्ताच्या पिढीतले सर्व. तुमच्या दशांशाने सुद्धा कष्ट, त्रास किंवा अडचणी आल्या नसतील. तुमच्या कृतार्थ आयुष्याकडे पाहून आमचे त्रास आणि आकांक्षा फार लहान वाटायला लागल्या. काही निराळाच झटका देऊन गेला हा अनुभव. तुमचं लिहिणं तर अप्रतिम आहेच. पण त्यातली सहजता आणि दिसून येणारी एक शांत विचारधारणा ही अत्यंत परिणामकारक आहे. सगळी लेख माला इतकी भावली मिपाकरांना याचं महत्त्वाचं कारण त्यातून दिसणारं तुमचं व्यक्तिमत्व काही विशेष आहे, वेगळं आहे. सर्व विचारांचे, लिखाणाचे इतके 'क्लिशे' तयार झालेले असताना हा एक सुखद धक्काच होता. आजोबा - एकच विनंती. आता काही तुम्हाला योग्य वाटेल, आवडेल अशा गोष्टींवर जास्त तपशील वार अजून लिहा. इतकी हुरहुर चांगली नव्हे. तुम्हाला आम्ही धन्यवाद काय देणार ... इथल्या किती तरी नातवंडांना खूप आनंद दिलात तुम्ही...

सगळे भाग संपले की शेवटच्या भागातच प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते... अप्रतिम लेखमाला... इतक्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन तुम्ही आयुष्याच्या या टप्प्यावर पोचला आहात..हा सगळा प्रवास आम्हा सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.... तुमची लेखणी अशीच चालु राहुदेत... इंटरनेटच्या माध्यमातून हे सर्व लिहिताना धाकट्या सुनेचे ( मिपाकर स्वाती दिनेश )टंकलेखन व लेखांच्या जुळणीकरता सहाय्य घेतले आणि हा स्मृतीगंध आपणासमोर आणला. हा रहस्यभेद खासच... :-) हॅटस ऑफ टु यु ... आणि स्वातीताई :-) -स्मिता श्रीपाद.

विसोबा खेचर 23/03/2009 - 11:00
नानासाहेब, मिपा हे संस्थळ काढून किती कृतकृत्य वाटलं हे शब्दात सांगू शकत नाही. आपल्यासारख्या वडिलधार्‍यांचा मिपावर असाच नेहमी कृपाशीर्वाद रहावा एवढीच नम्र विनंती... मिपावरील आपल्या लेखनाची ही एक टर्म संपली असं म्हणायला हरकत नाही. परंतु यापुढेही आपले असेच स्वान्तसुखाय लेखन मिपावर सुरू रहावे एवढीच विनंती.. इथूनच नमस्कार करतो.. स्वातीचेही आभार... आपला, (कृतकृत्य) तात्या.

विसोबा खेचर 23/03/2009 - 11:03
खरडवही व पोस्टहापीसची सुविधा सुरु झाल्यावर आलेल्या खरडींना जरूर उत्तरे देईन. नानासाहेब, ही सुविधा आपल्याकरता सुरू करायची राहिली त्याबद्दल क्षमस्व. आता ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तरीही काही अडचण आल्यास कृपया मला अवश्य कळवा. तात्या.

बामनाचं पोर 23/03/2009 - 11:57
फारच सुरेख.. आयुष्य म्हणजे आजवरच्या श्वासांची बेरीज न्हवे तर ; श्वास विसरयला लावणारया , रोखून धरलेल्या क्षणांची बेरीज.. आपल्या आयुष्यातील अशा क्षणांच्या स्मृती व त्यांचा स्मृतीगंध फारच भावला... पुढील लेखनासाठी शुभेच्छा जाता जाता इतकेच म्हणेन.. भले बुरे जे घडून गेले, विसरुन जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर.. कसे कोठूनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो, उगाच रुसतो क्षणात आतूर, क्षणात कातर जरा विसावू या वळणावर.. .....

सुप्रिया 23/03/2009 - 13:28
सुरेख लेखमाला ! ! संपली म्हणून खूप वाईट वाटले. तुम्हाला आणि स्वातीताईंना अनेकानेक धन्यवाद. (देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.)

विसुनाना 23/03/2009 - 15:02
लेखमाला संक्षिप्त झाल्याने चुटपुट लागली आहे.तरीही आपले अनुभव नव्या पिढीसमोर मांडल्याबद्दल आभार. इतर सर्व प्रतिसादकांप्रमाणेच मलाही लेखकाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना वेगळ्या काढून अधिक विस्तारपूर्ण लिहिल्यास वाचायला खूप आवडेल. (लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक आणि आभार)

In reply to by विसुनाना

श्रावण मोडक 23/03/2009 - 15:35
लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक आणि आभार सहमत.

मन्जिरि 23/03/2009 - 16:05
अप्रतिम लिहिल आहे रोज वाचायचि सवय झालिय .किति विविधता आहे,एकाच आयुश्यात.म्हटल तर सरळ ,पण खाचखळग्यानि भरलेल.स्वातिचे॑ हि अभिनन्दन .रोज पाटपूर्‍रावा केल्याबद्द्ल्.पुन्हा एकदा अभिनन्दन

साध्या ओघवत्या शैलीमुळे गेले दहा बारा दिवस रोज हपिसात आल्यावर पहिले ताजा भाग आला का हे बघत असे. तुम्ही आणखी लिहावे असे वाटते. लेखनिकेचे खास आभार !

लिखाळ 23/03/2009 - 16:24
फार सुंदर लेखमाला झाली. या आधीचे तीन भाग अजून वाचायचे राहिले आहेत, ते लवकरच वाचतो. शेवटचा भाग उत्सुकतेने आधीच वाचला. वरील प्रतिसादांतील सर्वांशी सहमत आहे. विशेषकरुन नंदन, विकास आणि सहज यांच्या प्रतिसादाला अजूनच सहमत :) सहज म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही जवळच्या ओळखीचे निघाल्याचे पाहून सुखद धक्का बसला. आनंद झाला.
हे आईवडिल आणि वहिनीच्या आशीर्वादांचेच संचित.
ज्यांच्याप्रति आयुष्यभर कृतज्ञ राहावे अशी माणसे आयुष्यात लाभणे ही सुद्धा श्रीमंतीच आहे असे मला वाटते. प्रत्येक भाग वाचनीय होता आणि यापुढे सुद्धा आपले लेखन वाचायला आवडेल. आम्ही सर्व वाट पाहू. स्वातीताईने मिपावर हे सर्व लेखन आणले यासाठी तिचे सुद्धा आभार. -- लिखाळ.

काका, अतिशय मजा आली वाचताना. तुमच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याच्या वृत्तीचे खूपच कौतुक वाटले. इतक्या सगळ्यातून जाताना तुमचा दृष्टीकोण बव्हंशी सकारात्मक असला पाहिजे असे वाटते. आणि म्हणूनच तुम्ही हे लिखाण केले पण त्यात कुठेही थोडीही कटुता दिसली नाही. (कटुता येण्या सारखे प्रसंग घडले असतील तरीही). तुम्ही म्हणता तसे ' हे अगदी सर्वसामान्य जीवन' आहे, पण त्यातही मजा आली ती शैली मुळे. आता तुम्ही तुमच्या अजूनही काही गंमतीदार किंवा इतर अनुभवांबद्दल वगैरे लिहा. आम्ही वाट बघतो आहोतच. आणि स्वातीताई म्हणते तसे, तुम्हालाही प्रतिसादांची चटक लागली आहेच. ;) तर मग होऊन जाऊ दे... आता थांबू नका. अवांतर : खरं तर पहिल्याच भागानंतर अगदी अपघातानेच तुमची खरी ओळख कळली होती. :) बिपिन कार्यकर्ते

उत्तम लेखमाला... रहस्यभेदही छान... .. आता इतरांसारखेच म्हणतो की अजूनही काही आठवणी येउद्यात... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग 23/03/2009 - 17:32
आयुष्यातल्या सर्व ठळक घटनांचे तटस्थ राहून केलेले वर्णन वाचताना इतका गुंगून गेलो होतो की अचानक शेवटचा भाग आल्याचे पाहून जरासा धक्का बसला! अजून वाचायचे आहे असे राहून राहून वाटते आहे. तुमच्या आयुष्यातल्या सर्व घटनाक्रमाकडे बघता "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान!" ही उक्ती तुम्ही सार्थपणे जगला आहात असे वाटते. कडू-गोड अनुभवातून प्रगतीच्या वाटा धुंडाळण्यासाठी लागणारी मनाची ताकद टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य तुमच्या तटस्थतेत आणि विचारसरणीत आहे असे वाटते. तुमची वहिनी ही तर तुम्हा भावंडांची दुसरी आईच जणू. एका स्त्रीने स्वतःचे दु:ख असे काळाच्या उदरात चिणून टाकून पुढच्या पिढीसाठी जीवन झिजवणे परिकथेतले वाटते! तसेच तुमची आई. पुरुष माणूस घरात नसताना एकहाती एवढा मोठा संसार रेटणे येरागबाळ्याचे काम नाही. जिद्द, कणखरपणा, भविष्यात मुलांनी खितपत पडायचे नसेल तर पुढे जायलाच हवे ही महत्वाकांक्षा, धन्य आहे! तुमची वहिनी आणी आई ह्या दोघींसमोर मी नतमस्तक आहे! तुमच्या कष्टांचे तुमच्या मुलामुलींनी चीज केले. तुमच्या आयुष्यातल्या चढउतारांचे ओझे तुम्ही त्यांच्या खांद्यावर टाकले नाहीतच उलट तुम्ही त्यांना स्फूर्तीदाते बनलात हे पाहून आपलेही कौतुक वाटते. तुम्ही लिहिते रहा. आणखी आठवणींचा खजिना घेऊन या. मला खात्री आहे जगभरात मिपाकर वाट पहाताहेत! तुम्हाला लिहायला लावून आणि त्या आठवणी आमच्यापर्यंत पोचवून देणार्‍या स्वाती-दिनेश ह्या दोघांचेही खास आभार. एक अप्रतिम लेखमाला वाचायला मिळाली ह्याबद्दल मी धन्य आहे! "व्हेळ ते फ्रँकफुर्ट" असे शीर्षक बघताक्षणीच तुम्ही स्वाती आणि दिनेशचे बाबा आहात हे लक्षात आले (तशीही स्वातीताईची एकही प्रतिक्रिया ह्या लेखमालेत नव्हती तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती! ;) ) चतुरंग

मनापासून लिहिले की लेखन किती ओघवतं होतं ह्याचं ही लेखमाला उत्तम उदाहरण आहे. स्वातीताईंनाही स्पेशल धन्स -- ही लेखमाला मिपावर आणण्यासाठी.

क्रान्ति 23/03/2009 - 19:28
अत्यंत अप्रतिम लेखमाला! स्वातिताईचे आभार मानावे तेवढे थोडेच! इतकी सुंदर कलाकृती वाचायला मिळाली की शब्द नाहीत अभिप्राय द्यायला! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

वामनसुत 24/03/2009 - 22:07
आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादांनी भारावून गेलो आहे. पुनश्च सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. आता खरडवही आणि पोस्टहापिसाची सुविधा तात्यांनी चालू केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद, आपल्या प्रश्नांची उत्तरे लवकरच देईन.

मुशाफिर 26/03/2009 - 02:29
मी संपूर्ण लेखमाला वाचून प्रतिसाद द्यावा, असे ठरवले होते. त्यामुळे बरेचदा तुमचं सुंदर कथन वाचुन प्रतिसाद द्यायचा असुनही मोह आवरला. खरंतरं मी तुमच्या लेखनाबद्दल तुमचं अभिनंदन करणं किंवा तुमचं कौतुक करणं, हे वावगं ठरेल. कारण तेव्हढं माझं वय नाही आणि पात्रताही! पण, जुन्या काळातील लोकांनी पुढच्या पिढीच्या भल्यासाठी (वैयक्तिक पातळीवर का होइना) किती खस्ता खाल्ल्या? हे तुम्ही तुमच्या अनुभव कथनातुन आजच्या पिढीला दाखवून दिल आहे. त्याबद्दल आपले शतश: धन्यवाद! हे लेखन वाचून आमंच जीवन कितीतरी सहजं आणि सोपं आहे ह्याची जाणीव झाली. आपण मि.पा. वर असेच लिहितं राहाल अशी अपेक्षा. मुशाफिर.

योगी९०० 26/03/2009 - 02:36
प्रतिकुल परिस्थितीत कष्ट करून आपली परिस्थिती सुधारणार्‍या आपल्यासारख्या लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटत राहिला आहे. एक सुंदर कथन.. आपले शतश: धन्यवाद !! आपल्यापासून सध्या जवळच्याच देशात आहे. जर जर्मनीत आलो तर आपली भेट घ्यायला नक्कीच आवडेल मला. खादाडमाऊ

त्या काळीं कर्ज काढून घर बांधणें, एकाचीं तीन घरें करणें, नोकरी सोडून फंडातून कर्जफेड करणें ही उद्योगशीलता असामान्यच म्हणायची. फक्त लागलें एवढेंच कीं प्रकृतीची योग्य ती काळजी घेतलेली दिसत नाहीं. असो. पण त्या काळीं तेवढा हेल्थ कॉन्शसनेस नव्हता. कर्तृत्त्व असामान्यच. स्वातीताईंनीं नात्याचें गुपित जपलें तेंहि योग्यच. झकास. मजा आली. सुधीर कांदळकर.

बबलु 06/04/2009 - 14:36
वामनसुत काका.... आजच स्मृतीगंधचे १ ते १२ भाग सलग वाचून संपवले. [मिपा वरची "वाचनखुणा साठवून" ठेवायची सोय उत्तम आहे (तात्या, धन्यवाद) ]. काका... काय सुंदर रीतिनं लिहिलंय !! हिमपर्वतातून उसळणारा पांढराशुभ्र ओढा खळाळत जातो तसं ओघवत्या शैलीतलं लेखन आपल्याला फार आवडलं. तुमचा हा ओढा व्हेळया मध्ये उगम पावून राजापूर/गिरगाव/गोरेगाव/डोंबिवली/फ्रांकफुर्ट असा खळाळत जातोय. दरम्यान अनंत अडचणी आल्या. त्या तुम्ही समर्थपणे पार केल्यात. धन्य होय !! ही लेखमाला संपूच नये असं वाटतं. (लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक). ....बबलु

स्मृतीगंध काय आहे म्हणून उचकले आणि सर्वच भाग आजच वाचून काढले. हा भाग वाचल्यावर प्रतिक्रिया काय लिहावी असा प्रश्न पडला. आपला जीवनपट उलगडून दाखवतांनांचा सहजपणा आणि आपले अनुभव वाचून आम्ही वाचक संपन्न झालो इतकेच म्हणावेसे वाटते. अजून खूप लेखन येऊ द्या ! मिपावर भेटत राहू !!! -दिलीप बिरुटे

नंदन 20/10/2013 - 14:38
आज पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत बाराही भाग सलग वाचून काढले. एखादी साधी, अनलंकृत पण ठाव घेणारी दीर्घ कथा वाचावी तसा पुनर्वाचनाचा अनुभव पुन्हा एकदा मिळाला. काही नवीन सदस्यांच्या वाचनातून सुटले असेल म्हणून हे किंचित उत्खनन.

रेवती 21/10/2013 - 08:57
मीही पुन्हा एकदा ही मालिका वाचून काढली. आणखी एकदोनदा तर वाचली जाईलच. एकच भाग वाचायचा असे ठरवून सगळी मालिका वाचत बसले. अश्या लेखनासाठी ती. वामनसुतांचे आभार. नंदनने धागा वर आणून छान काम केलय.

मृत्युन्जय 21/10/2013 - 12:55
खुपच सुंदर लिहिले आहे. गरम गरम वरण भात, मीठ, लिंबु आणि वर साजुक तुपाची धार आणि तोंडी लावायला लिंबाच्या लोणच्याची फोड या साध्याश्या जेवणात जो कमालीचा आनंद मिळतो तसाच आनंद मिळाला. स्वातीतै आणी नंदनचे आभार. @स्वातीतै: लेखमाला आवडली हे नानांना आवर्जुन सांगा

स्पंदना 22/10/2013 - 04:42
काल बसून ही सगळी लेखमाला वाचुन संपवली. वामनकाका तुम्ही माझ्या वडिलांच्या पिढीचे म्हणुन काका म्हणायचा अधिकार घेतेय. एक अतिशय महत्वाचा पैलु जाणवला या लेखनात अन तो म्हणजे एका स्त्रीचा दुसर्‍या स्त्रीच्या प्रति असणारा आदर,अन श्रद्दा! तुमच्या आई, चार मुलांच्या आई होत्या. त्यांनी आयुष्यात पतिसुख अनुभवल, पण वयाने २ वर्षे मोठ्या असलेल्या सावत्र सुनेवर त्यांनी जो विश्वास दाखवला, किंवा त्यांना जो तुमची आई होण्याचा अधिकार दिला, तो शब्दातीत आहे. शेतीवाडी तुमच्या वैनींना करायला देउन त्या आपली मुले घेउन त्यांच्या शिक्षणासाठी बाहेर राहु शकत होत्या. पण त्यांनी ते काम तुमच्या वैनींना दिलं. आपली मुले इतक्या विश्वासाने दुसर्‍या व्यक्तीच्या हातात सोपवली अन तो विश्वास तुमच्या वहीनींनी सार्थ ठरवला. हा नात्यांचा सुरेख गोफ उलगडणे हे तुमच्या लिखाणाचे सार्थक आहे. लिहायला बसले तर या नात्याचे अनेक पैलु सामोरे येतील. पण येथेच थांबवते. फार भिडल तुमच साध सोप लिखाण. अगदी हळव करुन गेलं.

बहुगुणी 24/10/2013 - 04:27
श्री. वामनसुत यांच्या परवानगीने मी या अतीव सुंदर आत्मकथनाचे सात भाग ध्वनिमुद्रित करून मिपावर दुवे दिले होते, आणि प्रतिसादांवरून तो उपक्रम वाचक-श्रोत्यांना आवडलाही होता असं वाटतं: मनकर्णिका १ मनकर्णिका २ मनकर्णिका ३ दुर्दैवाने ज्या खाजगी मालकीच्या सर्व्हरवर ते टाकले होते ती सुविधा गायब झालेली दिसते आहे :-( . असो, हे लिखाण इतकं उच्च प्रतीचं आहे की पुन्हा एकदा ध्वनिमुद्रण करण्यासाठी वेळ काढण्याची माझी तयारी आहे, इतर कुणी सहभागी होऊन मदत केली तर स्वागतच आहे!

बहुगुणी 24/10/2013 - 17:53
सॉरी, मंडळी, मी वर लिहिल्याप्रमाणे, दुर्दैवाने ज्या खाजगी मालकीच्या सर्व्हरवर ते ध्वनिमुद्रण टाकले होते ती मोफत सुविधा गायब झालेली दिसते आहे. (आणि डोमेन नेम ही वेगळे आहे, बहुतेक ती मूळची साईट विकली गेली असावी.) माझ्याकडे लॉगिन सुविधा नाही. तेंव्हा नव्याने पुन्हा ध्वनिमुद्रण करून मी "मनकर्णिका" सुरू करू शकेन. इथेच मिपावर दीर्घ ध्वनिमुद्रण टा़कायची सोय झाली तर अत्युत्तम!

मेघनाद 25/10/2013 - 01:07
नाना आजोबा, अहो काय मस्तच लिहील आहात हो तुम्ही. १ ते १२ हे सर्व भाग एका दिवसात वाचून काढले मी, अगदी ट्रेन मध्ये बसलो असताना मोबाईल वरती वाचल. माझ पण आजोळ राजापूर जवळ मिठगवाणे येथे आहे, त्यामुळे आपल्या लेख मालिकेतील सर्वच ठिकाणे डोळ्यासमोर येत होती. तुमच्या अश्याच लेख मालिका वाचायला आवडतील. वाट बघतोय आम्ही सर्व मिपाकर……

प्यारे१ 25/10/2013 - 03:39
अतिशय सुंदर मालिका. १ ते १२ भाग सलग वाचले. नंदन शेठचे उत्खननाबद्दल आभार. जुन्या काळातल्या एका अत्यंत धडपड्या स्वभावाच्या व्यक्तीची जीवनगाथा. त्या त्या कालाचा तटस्थपणे अ‍ॅज इट इज घेतलेला आढावा. विशेष भावलं ते म्हणजे प्रत्येक वेळी ज्येष्ठ व्यक्तीचा केलेला आदरार्थी उल्लेख. तीर्थस्वरुप नाना यांचे सेवेसी चरणी नतपर दासानुदासाचे दोन्ही कर जोडून त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार ही विज्ञापना. (भाग २ मधलाच मायना वापरलाय) ती. स्वाती दिनेश ह्यांना सविनय नमस्कार

संध्याकाळी गप्पा मारताना नाना (वामनसुत)त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगत होते. त्यांना आम्ही त्या लिहून काढण्याचा आग्रह धरला. २,३ दिवसांनी त्यांनी लिहायला सुरुवात केली. ४,५ पाने लिहून झाल्यावर मला वाचायला दिली. मी त्यांना मिसळपाववर लेखांच्या स्वरुपात प्रकाशित करु असे सांगितले तोपर्यंत त्यांना मिपा किंबहुना मराठी संस्थळे आणि त्यावर लिहिले जाणारे लेखन यांची माहिती नव्हती. ते आपलं मला नाउमेद करायचं नाही म्हणून म्हणाले कर तुला हवे तर प्रकाशित. त्यांच्या नावचा वेगळा आयडी काढून मुद्दामहूनच त्यांची आयडेंटीटी उघड न करता मी 'व्हेळातले दिवस'टंकले.पहिल्याच लेखाला आलेले प्रतिसाद पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि हळूहळू त्यांची ह्या माध्यमाशी आणि मिपाशीही ओळख होत गेली आणि आलेल्या प्रतिसादांनी हुरुप येऊन ते पुढचे भाग लिहित गेले,आपल्या लेखाचे प्रतिसाद किती झाले आहेत? ह्याची चौकशी माझ्याकडे करु लागले आणि मग आम्ही रोज १ भाग प्रकाशित करुन स्मृतिगंध ते जर्मनीत असेपर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले. जशी आपणा सर्वांना स्मृतीगंध वाचण्याची चटक लागली होती तशी त्यांना प्रतिसाद पाहण्याची , १५ दिवस त्यांच्याबरोबर मीही टाइममशिनमध्ये बसून ७०,७५ वर्षे मागे गेले. स्मृतीगंध पूर्ण होताना पाहणे हा माझ्यासाठीही एक आनंददायी अनुभव होता, आपणा सर्वांच्या प्रेमाने, कौतुकाने आम्ही भारावून गेलो आहोत,असाच लोभ असू द्या. स्वाती व दिनेश

In reply to by स्वाती दिनेश

१५ दिवस त्यांच्याबरोबर मीही टाइममशिनमध्ये बसून ७०,७५ वर्षे मागे गेले. स्मृतीगंध पूर्ण होताना पाहणे हा माझ्यासाठीही एक आनंददायी अनुभव होता, आपणा सर्वांच्या प्रेमाने, कौतुकाने आम्ही भारावून गेलो
स्वातीताई आपण नानांना लिहित केलत कारण हा अनुभव आपल्या मिपाकरांनीही शेअर करावा अशीच आपली इच्छा असणार! आम्हालाही खुप आनंददायी वाटल. स्मृतीगंध असाच दरवळत राहो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by स्वाती दिनेश

श्रावण मोडक 23/03/2009 - 12:21
एक मोठे काम केले आहेत तुम्ही. ते अर्धवट ठेवू नका. अकरा भागांमध्ये (तेही इंटरनेटच्या हिशेबातले) एकूण एका पिढीचा कालखंड बसवण्याची कसरत काय असते ती ठाऊक आहे. हे सारे लेखन वाचनीय जरूर झाले आहे. तसे मी वेळोवेळी लिहिलेही आहे. पण त्याहीपलीकडे हे लेखन अपूर्णतेची हुरहूर लावून जाते. ते त्याचे यश जरूर आहे. पण अपूर्णतादेखील इतकीही नको. आणखी काही स्मृतिचित्रे असतील. नेमके प्रसंग असतील, घटना असतील. किंवा कदाचित आत्ताच्या लेखनातही अशा घटना, प्रसंग दृष्टीतक्षेप टाकल्याच्या स्वरूपात आली असतील. त्यांचा विस्तार होऊ शकतो. जरूर विचार करा. चांगले लेखन वाचायला दिल्याबद्दल कृतज्ञ.

In reply to by स्वाती दिनेश

अन्वय 23/03/2009 - 18:50
नाना, सर्व लेख वाचले. माझ्या वडिलांच्या आयुष्याचा पट डोळ्यासमोर आला. आयुष्यभर वणवण करून "संध्याकाळी' कृतार्थ जीवन जगत आहात, हे वाचून अत्यानंद झाला. आपण खरेच खडतर आयुष्य जगला आहात. मात्र, हार न मानता झुंजत राहिलात म्हणूनच जिंकलात. हे लेख म्हणजे केवळ तुमच्या आयुष्याची माहिती नाही, तर माझ्यासारख्या असंख्य तरुणांना कष्टाला पर्याय नाही, हे ठासून सांगणारे पाठ आहेत, असे वाटते. आमची पिढी बरीच सुखावह आहे. तुमच्यासारखे कष्ट, दोन-दोन, तीन-तीन नोकऱ्या कराव्या लागत नाहीत. किंबहुना केल्यास चांगलेच; पण कुणाला त्याची गरज वाटतेच असे नाही. असो. लिखाण खूप ओघवते आहे. तुमच्या आयुष्यात आणखी काही नाट्यपूर्ण प्रसंग घडले असतील. ते एकत्रित बांधून त्याचे आत्मचरित्रपर पुस्तक करावे, असे वाटते. यापुढेही असेच कृतार्थ जीवन जगा. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना!

विकास 23/03/2009 - 02:49
फारच छान! असेच आम्हीपण आमच्या वडिलांना लिहीण्यासाठी उद्युक्त केले आहे. आधीच्या पिढ्यांनी वास्तवीक असे नक्की लिहून ठेवावे. तो केवळ कुटूंबासाठीच नाहीतर काही अंशी समाजासाठी साठा आहे. कारण त्यातून अनेक गोष्टी, संस्कार, संस्कृती, त्यातील बदल आपल्याला कळू शकतात. विशेष करून स्वातंत्र्याच्या आधी आणि जवळपास जन्माला आलेल्या पिढीने बरेच बदल पाहीले आहेत: बैलगाडीपासून ते विमानापर्यंत, जगाशी नाते नसलेल्या खेड्यापाड्यापासून ते शहर-परदेशापर्यंत, चौकात जाऊन गांधीहत्येनंतरचे भाषण एकाच रेडीओवर सगळ्या गावाने ऐकण्यापासून ते स्वतःच्या बेडरूममधे मुलांकडून आंतर्राष्ट्रीय फोनवरून लॅपटॉप आणि इंटरनेट वापरण्याच्या सुचना घेई पर्यंत, एकत्र कुटूंबापासून एकाकीपणा अनुभवेपर्यंत आणि अर्थातच स्वातंत्र्याच्या पहाटे आदर्शांच्या स्वप्नांपासून ते अनेक अर्थाने त्या स्वप्नभंगापर्यंत...

In reply to by विकास

प्राजु 23/03/2009 - 03:00
प्रतिसाद खूप आवडला तुमचा. खरंच आधीच्या पिढ्यांनी हे लिहून ठेवायलाच हवं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु 23/03/2009 - 02:50
काय बोलू आणखी?? स्वातीताई, वामनसूत तुझे सासरे असणार याची साधरण कल्पना आली होती. पण काही बोललो नाही कोणालाच. असो... लेखन समाप्त नको.. चालू राहुदे. काकांना... धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नंदन 23/03/2009 - 03:13
तुमचे लेखन, विशेषतः हा शेवटचा भाग वाचताना सारखं 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' आठवत होतं. तीच नम्र कृतार्थतेची भावना. लेखमाला संपली म्हणून एखादी सुरेल मैफल संपल्यासारखं थोडं वाईट वाटतं आहे, पण हे लेख वाचायला मिळाले याचा आनंदही मोठा आहे. आमच्यापर्यंत ही लेखमाला पोचवल्याबद्दल स्वातीताईचे विशेष आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

भाग्यश्री 23/03/2009 - 06:42
सहमत.. मी प्रत्येक भागाला प्रतिसाद दिला नाही परंतू उत्सुकता लागून राहीली कायम.. आता काय होणार.. ? लेखमाला संपू नये असेच वाटले..

जणू प्रभातचा एखादा सुंदर चित्रपट पहात आहोत असे वाटले.... लेखकाचे हार्दिक अभिनंदन!! आता लिहायला सुरवात केली आहे तर ते या मालिकेनंतर खंडित होऊ नये ही प्रार्थना!!! पुढील लेखनासाठीही शुभेच्छा!!

केशवसुमार 23/03/2009 - 03:43
ति.नाना, अप्रतिम लेखमाला.. =D> जवळ जवळ ५० वर्षाच्या काळखंड अगदी चित्रमय उभा केलात...नतमस्तक.. फ्रांकफुर्ट मध्ये तुम्हाला २-३ वेळा भेटलो पण पत्ता लागू दिला नाहीत.. आणि स्वाती आणि दिनेश त्यांच्याकडे मी नंतर बघतो X( .... 'व्हेळ' हे नाव दिनेश कडून ऐकल होते पण लक्षात नाही आले ~X( .... आजच्या लेखात "फ्रांकफुर्ट''आले तेव्हा जरा शंका आली.. :W 'जे.के सोडून क्रॉम्टनग्रीव्हजमध्ये' वाचल्यावर खात्रीच झाली.. #o L) अतिशय अप्रतिम लेखमाला हे परत परत सांगावेसे वाटते.. =D> =D> =D> आणि आपल्याला भेटता आले आणि आपल्याशी गप्पा मारता आल्या या बद्दल मी स्वत।ला नशिबवान समजतो.. (नशिबवान)केशवसुमार :P बाकी स्वाती आणी दिनेश.. आपण पाळलेली गोपनियता धन्य आहे!! अवांतरः ति.नाना, आता मला खायला मिळालेल्या तुमच्या हातच्या लोणच, भरल्या मिरच्या आणि मसाल्याची आमटी या पाककॄती सर्व मिपाकरांना निदान वाचायला द्या.... सर्व मिपाकरांना टूकटूक.. :P (पुन्हा नशिबवान)केशवसुमार :P

सुक्या 23/03/2009 - 04:11
अगदी भारावुन गेलो. काय लिहु तेच सुचत नाही. अगदी पहिल्या भागापासुन या लेखमालिकेने वेड लावलं होतं. अगदी साध्या सोप्या ओघवत्या शैलीत आपल्या जिवनाचा पट उलगडुन दाखवला. लिखाणातही तोच साधेपणा. अगदी सुरेख. लोकांना वेड लावायला काहीतरी भव्यदिव्यच लागते असे मुळीच नाही. तुमचे अनुभवाचे बोल अजुन येउद्यात. (नतमस्तक) सुक्या (बोंबील)

मदनबाण 23/03/2009 - 04:15
--- मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

समिधा 23/03/2009 - 04:52
सगळे भाग खरच अप्रतिम्,तुमचे लेखन थांबु नये असे वाटते. आजुन लिहीत रहा. =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

घाटावरचे भट 23/03/2009 - 05:17
मला काही इथे आलेल्या भारी प्रतिसादांसारखं लिहिता येत नाही, तस्मात् सध्या '+१' एवढेच म्हणतो.

शितल 23/03/2009 - 06:01
एवढेच केवळ शब्द आहेत आपल्या लेखमालेला. तुम्हाला आमचा नमस्कार. :) स्वाती ताई तु ही ग्रेट आहेस. :) मिपावर स्वातीताईंच्या रेसिपी आणि प्रवासवर्णनांनी मिपाकरांना आपले केले आणी तुम्ही तुमचा जीवन वृत्तांत साध्या सोप्या भाषेत आम्हाला सांगितलात आणि आम्हा मिपाकरांशी असलेली आपुलकीची नाळ अजुन घट्ट केलीत. तुमच्या ह्या सुंदर लेखमालेसाठी तुम्हाला धन्यवाद . :)

सहज 23/03/2009 - 07:01
केवळ अप्रतिम! उत्कृष्ट लिखाण. लिखाणातुन जवळचे वाटत असलेले नाते प्रत्यक्षातही तितकेच जवळचे निघाले आम्ही मिपाकर खरोखर भाग्यवान आहोत.

In reply to by सहज

छोटा डॉन 23/03/2009 - 07:09
सहजरावांशी शब्दशः सहमत आहे ... >>उत्कृष्ट लिखाण. लिखाणातुन जवळचे वाटत असलेले नाते प्रत्यक्षातही तितकेच जवळचे निघाले आम्ही मिपाकर खरोखर >>भाग्यवान आहोत. +++++++++++++++१, हेच म्हणतो ... आंतरजालावरची एक अत्यंत नितांतसुंदर लेखमाला म्हनुन मी ह्याचा अवश्य उल्लेख करेन ... खुपच रोचक आणि गतीशील लिखाण होते, जणुकाही आम्ही एखाद्या निवांत संध्याकाळी जेवण झाल्यावर "आजोबांच्या गोष्टी" ऐकत आहोत असेच वाटत होते. महत्वाचे म्हणजे काळ इतका जुना असुनसुद्ध त्यातले डिटेल्स आहे तसे अगदी तारखेनिशी लिहल्याने फारच "क्लास" झाले आहे लिखाण ...! बाकी आख्ख्या लेखमालेतुन कधीच स्वातीताई आणि दिनेशदादा ह्यांचा चुकुनसुद्धा "उल्लेख" आला नाही हे लिखाणाचे यश म्हणावे लागेल, अगदी शेवटच्या भागात हा सुखद धक्का दिलात .... आजोबा, आता इथे थंबु नकात .... ही लेखमाला संपली तर संपुद्यात, अजुन दुसरे असेच काहीतरी हाती घ्या ... आम्हाला तुमचे लिखाण आवडते, अजुन असेच येऊद्यात ... ------ ( वामनसुतांचा फॅन ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

आजोबा, आजपर्यंत रोज व्यसन लागल्यासारखंच तुमचं लिखाण, नव्हे कथन, वाचत होते. आता रूखरूख लागली आहे की रोज तुमचं लिखाण वाचता येणार नाही. पण तुम्ही आम्हा नातवंड, पोरा-सोरांना नाऊमेद करणार नाहीत अशी आशा आहे. तुमचं आणखी जास्त लिखाण वाचायला आवडेल. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by छोटा डॉन

सहमत. सगळे भाग वाचुन मगच प्रतिक्रीया देणार होतो, पण येव्हडे सुंदर सुंदर प्रतिसाद पाहुन काहि लिहायचा धिर होइना. "आंतरजालावरची एक अत्यंत नितांतसुंदर लेखमाला म्हनुन मी ह्याचा अवश्य उल्लेख करेन ..." ह्या वाक्याशी पुर्णपणे सहमत आणी ह्या लेखमालेचा वाचक व्हायला मिळाले हे माझे भाग्य :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by छोटा डॉन

बाकी आख्ख्या लेखमालेतुन कधीच स्वातीताई आणि दिनेशदादा ह्यांचा चुकुनसुद्धा "उल्लेख" आला नाही हे लिखाणाचे यश म्हणावे लागेल, अगदी शेवटच्या भागात हा सुखद धक्का दिलात .... आजोबा, आता इथे थंबु नकात .... ही लेखमाला संपली तर संपुद्यात, अजुन दुसरे असेच काहीतरी हाती घ्या ... आम्हाला तुमचे लिखाण आवडते, अजुन असेच येऊद्यात ... डान्याशी १०००१% सहमत (वामनसुत आजोबांच्या लिखाणाचा पंखा )घाशीराम कोतवाल ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

रेवती 23/03/2009 - 07:40
फारच सुंदर वर्णन.... आयुष्याच्या प्रवासाचे. आपण भरपूर कष्ट केलेत तरी इतकं साधं, सुंदर वर्णन..... कुठेही कटुता नाही. खरंतर प्रतिक्रियेसाठी शब्द जुळवावे लागताहेत. रेवती

In reply to by रेवती

चित्रा 23/03/2009 - 16:24
कुठेही कटुता नाही. कौतुक वाटते. ही लेखमाला संपली तरी लिहायचे सोडू नका. हे लेख आमच्यापर्यंत आणण्याबद्दल स्वातीचेही अनेक आभार.

प्राची 23/03/2009 - 07:58
काय प्रतिसाद देऊ असं झालंय.शब्दच उरले नाहीत. स्वाती ताई यांचे आभार. वामनसुत यांना साष्टांग दंडवत ___/\___ आपण आपल्या अशाच लेखांनी मिपाला आणि मिपाकरांना समृद्ध करावे. =D> =D> =D>

प्रमोद देव 23/03/2009 - 08:13
नारायणराव, आपली मैफल मस्त रंगली. तिची समाप्तिही आपण तितक्याच समर्थ भैरवीने केलीत. पण आता इथेच थांबू नका. अशाच वेगवेगळ्या मैफिली सादर करत चला. पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

यशोधरा 23/03/2009 - 08:46
अतिशय सुरेख अशी लेखमाला होती ही. सगळे भाग संपल्यावरच प्रतिसाद देऊ म्हणून थांबले होते, पण ही लेखमाला सुरुच रहावी असे वाटत होते, हे मात्र खरे. अतिशय साधे सुधे पण मनापासून केलेले प्रांजळ लिखाण खूप भावले. अजूनही काही जरुर लिहा. वाचायला खूप आवडेल. स्वातीताई , तू सगळे भाग टंकून आमच्यापर्यंत पोहोचवलेस याबद्दल तुझेही खूप खूप आभार.

In reply to by यशोधरा

सखी 23/03/2009 - 18:54
अगदी असेच म्हणणार होते. अजूनही काही जरुर लिहा. वाचायला खूप आवडेल. शेवटच्या भागातील रहस्यभेद खासच!

सुंदर लेखमाला. आपल्या या संपूर्ण लेखमालेला हा माझा एकमेव प्रतिसाद. आपले एकामागोमाग एक नोकर्‍या, व्यवसाय बदलणे आणि प्रत्येक नवीन व्यवसायात यश संपादन करणे हे माझ्यासारख्या तरुणाला एक आदर्श आहे. आपल्यासारखे सरळमार्गी, उद्यमी व्यक्तीमत्व माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी आहे. आपल्याला लिहीते केल्याबद्दल स्वातीताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. (प्रभावित) पुण्याचे पेशवे

एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास, त्याच व्यक्तीच्या शब्दात वाचून धन्य झालो. स्वतःच्या जीवना बद्दल इतक्या तटस्थपणे इतके उत्तम लेखन केलेत. फार आवडले! श्रीकृष्ण सामंत व आपण अशी बुजुर्ग माणसे मिपावर वावरत रहावीत. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

दिपक 23/03/2009 - 10:03
एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास, त्याच व्यक्तीच्या शब्दात वाचून धन्य झालो. हे लिखाण आम्हा सर्व युवा वाचकांना मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद :) अतिशय सुंदर लेखन. स्वातीताई तुमचे आभार मानाचे तेवढे थोडेच. अप्रतिम कथन. लेखमाला कधीच संपु नये असे वाटत होते. वामनसुत आम्ही आपले पंखे. (वामनसुतांचा पुढील लिखाणांच्या प्रतिक्षेत)दिपक.

मैत्र 23/03/2009 - 10:49
नंदनने म्हटल्या प्रमाणे : लेखमाला संपली म्हणून एखादी सुरेल मैफल संपल्यासारखं थोडं वाईट वाटतं आहे, पण हे लेख वाचायला मिळाले याचा आनंदही मोठा आहे. आमच्यापर्यंत ही लेखमाला पोचवल्याबद्दल स्वातीताईचे विशेष आभार. स्वाती ताइने लिहिल्या प्रमाणे टाइम मशीन मधून ७०-७५ वर्ष मागे नेलं सगळ्या मिपाकरांना. ही पूर्ण लेखमाला, आजोबांचा जीवन प्रवास आणि सगळ्या गोष्टी विलक्षण सहजतेने लिहिणं. काय प्रतिसाद देणार यावर. खरं तर रोज लहान सहान गोष्टींनी मनाला - स्वतःला आणि इतरांना खूप त्रास करुन घेतो आम्ही आत्ताच्या पिढीतले सर्व. तुमच्या दशांशाने सुद्धा कष्ट, त्रास किंवा अडचणी आल्या नसतील. तुमच्या कृतार्थ आयुष्याकडे पाहून आमचे त्रास आणि आकांक्षा फार लहान वाटायला लागल्या. काही निराळाच झटका देऊन गेला हा अनुभव. तुमचं लिहिणं तर अप्रतिम आहेच. पण त्यातली सहजता आणि दिसून येणारी एक शांत विचारधारणा ही अत्यंत परिणामकारक आहे. सगळी लेख माला इतकी भावली मिपाकरांना याचं महत्त्वाचं कारण त्यातून दिसणारं तुमचं व्यक्तिमत्व काही विशेष आहे, वेगळं आहे. सर्व विचारांचे, लिखाणाचे इतके 'क्लिशे' तयार झालेले असताना हा एक सुखद धक्काच होता. आजोबा - एकच विनंती. आता काही तुम्हाला योग्य वाटेल, आवडेल अशा गोष्टींवर जास्त तपशील वार अजून लिहा. इतकी हुरहुर चांगली नव्हे. तुम्हाला आम्ही धन्यवाद काय देणार ... इथल्या किती तरी नातवंडांना खूप आनंद दिलात तुम्ही...

सगळे भाग संपले की शेवटच्या भागातच प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते... अप्रतिम लेखमाला... इतक्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन तुम्ही आयुष्याच्या या टप्प्यावर पोचला आहात..हा सगळा प्रवास आम्हा सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.... तुमची लेखणी अशीच चालु राहुदेत... इंटरनेटच्या माध्यमातून हे सर्व लिहिताना धाकट्या सुनेचे ( मिपाकर स्वाती दिनेश )टंकलेखन व लेखांच्या जुळणीकरता सहाय्य घेतले आणि हा स्मृतीगंध आपणासमोर आणला. हा रहस्यभेद खासच... :-) हॅटस ऑफ टु यु ... आणि स्वातीताई :-) -स्मिता श्रीपाद.

विसोबा खेचर 23/03/2009 - 11:00
नानासाहेब, मिपा हे संस्थळ काढून किती कृतकृत्य वाटलं हे शब्दात सांगू शकत नाही. आपल्यासारख्या वडिलधार्‍यांचा मिपावर असाच नेहमी कृपाशीर्वाद रहावा एवढीच नम्र विनंती... मिपावरील आपल्या लेखनाची ही एक टर्म संपली असं म्हणायला हरकत नाही. परंतु यापुढेही आपले असेच स्वान्तसुखाय लेखन मिपावर सुरू रहावे एवढीच विनंती.. इथूनच नमस्कार करतो.. स्वातीचेही आभार... आपला, (कृतकृत्य) तात्या.

विसोबा खेचर 23/03/2009 - 11:03
खरडवही व पोस्टहापीसची सुविधा सुरु झाल्यावर आलेल्या खरडींना जरूर उत्तरे देईन. नानासाहेब, ही सुविधा आपल्याकरता सुरू करायची राहिली त्याबद्दल क्षमस्व. आता ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तरीही काही अडचण आल्यास कृपया मला अवश्य कळवा. तात्या.

बामनाचं पोर 23/03/2009 - 11:57
फारच सुरेख.. आयुष्य म्हणजे आजवरच्या श्वासांची बेरीज न्हवे तर ; श्वास विसरयला लावणारया , रोखून धरलेल्या क्षणांची बेरीज.. आपल्या आयुष्यातील अशा क्षणांच्या स्मृती व त्यांचा स्मृतीगंध फारच भावला... पुढील लेखनासाठी शुभेच्छा जाता जाता इतकेच म्हणेन.. भले बुरे जे घडून गेले, विसरुन जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर.. कसे कोठूनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो, उगाच रुसतो क्षणात आतूर, क्षणात कातर जरा विसावू या वळणावर.. .....

सुप्रिया 23/03/2009 - 13:28
सुरेख लेखमाला ! ! संपली म्हणून खूप वाईट वाटले. तुम्हाला आणि स्वातीताईंना अनेकानेक धन्यवाद. (देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.)

विसुनाना 23/03/2009 - 15:02
लेखमाला संक्षिप्त झाल्याने चुटपुट लागली आहे.तरीही आपले अनुभव नव्या पिढीसमोर मांडल्याबद्दल आभार. इतर सर्व प्रतिसादकांप्रमाणेच मलाही लेखकाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना वेगळ्या काढून अधिक विस्तारपूर्ण लिहिल्यास वाचायला खूप आवडेल. (लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक आणि आभार)

In reply to by विसुनाना

श्रावण मोडक 23/03/2009 - 15:35
लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक आणि आभार सहमत.

मन्जिरि 23/03/2009 - 16:05
अप्रतिम लिहिल आहे रोज वाचायचि सवय झालिय .किति विविधता आहे,एकाच आयुश्यात.म्हटल तर सरळ ,पण खाचखळग्यानि भरलेल.स्वातिचे॑ हि अभिनन्दन .रोज पाटपूर्‍रावा केल्याबद्द्ल्.पुन्हा एकदा अभिनन्दन

साध्या ओघवत्या शैलीमुळे गेले दहा बारा दिवस रोज हपिसात आल्यावर पहिले ताजा भाग आला का हे बघत असे. तुम्ही आणखी लिहावे असे वाटते. लेखनिकेचे खास आभार !

लिखाळ 23/03/2009 - 16:24
फार सुंदर लेखमाला झाली. या आधीचे तीन भाग अजून वाचायचे राहिले आहेत, ते लवकरच वाचतो. शेवटचा भाग उत्सुकतेने आधीच वाचला. वरील प्रतिसादांतील सर्वांशी सहमत आहे. विशेषकरुन नंदन, विकास आणि सहज यांच्या प्रतिसादाला अजूनच सहमत :) सहज म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही जवळच्या ओळखीचे निघाल्याचे पाहून सुखद धक्का बसला. आनंद झाला.
हे आईवडिल आणि वहिनीच्या आशीर्वादांचेच संचित.
ज्यांच्याप्रति आयुष्यभर कृतज्ञ राहावे अशी माणसे आयुष्यात लाभणे ही सुद्धा श्रीमंतीच आहे असे मला वाटते. प्रत्येक भाग वाचनीय होता आणि यापुढे सुद्धा आपले लेखन वाचायला आवडेल. आम्ही सर्व वाट पाहू. स्वातीताईने मिपावर हे सर्व लेखन आणले यासाठी तिचे सुद्धा आभार. -- लिखाळ.

काका, अतिशय मजा आली वाचताना. तुमच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याच्या वृत्तीचे खूपच कौतुक वाटले. इतक्या सगळ्यातून जाताना तुमचा दृष्टीकोण बव्हंशी सकारात्मक असला पाहिजे असे वाटते. आणि म्हणूनच तुम्ही हे लिखाण केले पण त्यात कुठेही थोडीही कटुता दिसली नाही. (कटुता येण्या सारखे प्रसंग घडले असतील तरीही). तुम्ही म्हणता तसे ' हे अगदी सर्वसामान्य जीवन' आहे, पण त्यातही मजा आली ती शैली मुळे. आता तुम्ही तुमच्या अजूनही काही गंमतीदार किंवा इतर अनुभवांबद्दल वगैरे लिहा. आम्ही वाट बघतो आहोतच. आणि स्वातीताई म्हणते तसे, तुम्हालाही प्रतिसादांची चटक लागली आहेच. ;) तर मग होऊन जाऊ दे... आता थांबू नका. अवांतर : खरं तर पहिल्याच भागानंतर अगदी अपघातानेच तुमची खरी ओळख कळली होती. :) बिपिन कार्यकर्ते

उत्तम लेखमाला... रहस्यभेदही छान... .. आता इतरांसारखेच म्हणतो की अजूनही काही आठवणी येउद्यात... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग 23/03/2009 - 17:32
आयुष्यातल्या सर्व ठळक घटनांचे तटस्थ राहून केलेले वर्णन वाचताना इतका गुंगून गेलो होतो की अचानक शेवटचा भाग आल्याचे पाहून जरासा धक्का बसला! अजून वाचायचे आहे असे राहून राहून वाटते आहे. तुमच्या आयुष्यातल्या सर्व घटनाक्रमाकडे बघता "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान!" ही उक्ती तुम्ही सार्थपणे जगला आहात असे वाटते. कडू-गोड अनुभवातून प्रगतीच्या वाटा धुंडाळण्यासाठी लागणारी मनाची ताकद टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य तुमच्या तटस्थतेत आणि विचारसरणीत आहे असे वाटते. तुमची वहिनी ही तर तुम्हा भावंडांची दुसरी आईच जणू. एका स्त्रीने स्वतःचे दु:ख असे काळाच्या उदरात चिणून टाकून पुढच्या पिढीसाठी जीवन झिजवणे परिकथेतले वाटते! तसेच तुमची आई. पुरुष माणूस घरात नसताना एकहाती एवढा मोठा संसार रेटणे येरागबाळ्याचे काम नाही. जिद्द, कणखरपणा, भविष्यात मुलांनी खितपत पडायचे नसेल तर पुढे जायलाच हवे ही महत्वाकांक्षा, धन्य आहे! तुमची वहिनी आणी आई ह्या दोघींसमोर मी नतमस्तक आहे! तुमच्या कष्टांचे तुमच्या मुलामुलींनी चीज केले. तुमच्या आयुष्यातल्या चढउतारांचे ओझे तुम्ही त्यांच्या खांद्यावर टाकले नाहीतच उलट तुम्ही त्यांना स्फूर्तीदाते बनलात हे पाहून आपलेही कौतुक वाटते. तुम्ही लिहिते रहा. आणखी आठवणींचा खजिना घेऊन या. मला खात्री आहे जगभरात मिपाकर वाट पहाताहेत! तुम्हाला लिहायला लावून आणि त्या आठवणी आमच्यापर्यंत पोचवून देणार्‍या स्वाती-दिनेश ह्या दोघांचेही खास आभार. एक अप्रतिम लेखमाला वाचायला मिळाली ह्याबद्दल मी धन्य आहे! "व्हेळ ते फ्रँकफुर्ट" असे शीर्षक बघताक्षणीच तुम्ही स्वाती आणि दिनेशचे बाबा आहात हे लक्षात आले (तशीही स्वातीताईची एकही प्रतिक्रिया ह्या लेखमालेत नव्हती तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती! ;) ) चतुरंग

मनापासून लिहिले की लेखन किती ओघवतं होतं ह्याचं ही लेखमाला उत्तम उदाहरण आहे. स्वातीताईंनाही स्पेशल धन्स -- ही लेखमाला मिपावर आणण्यासाठी.

क्रान्ति 23/03/2009 - 19:28
अत्यंत अप्रतिम लेखमाला! स्वातिताईचे आभार मानावे तेवढे थोडेच! इतकी सुंदर कलाकृती वाचायला मिळाली की शब्द नाहीत अभिप्राय द्यायला! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

वामनसुत 24/03/2009 - 22:07
आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादांनी भारावून गेलो आहे. पुनश्च सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. आता खरडवही आणि पोस्टहापिसाची सुविधा तात्यांनी चालू केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद, आपल्या प्रश्नांची उत्तरे लवकरच देईन.

मुशाफिर 26/03/2009 - 02:29
मी संपूर्ण लेखमाला वाचून प्रतिसाद द्यावा, असे ठरवले होते. त्यामुळे बरेचदा तुमचं सुंदर कथन वाचुन प्रतिसाद द्यायचा असुनही मोह आवरला. खरंतरं मी तुमच्या लेखनाबद्दल तुमचं अभिनंदन करणं किंवा तुमचं कौतुक करणं, हे वावगं ठरेल. कारण तेव्हढं माझं वय नाही आणि पात्रताही! पण, जुन्या काळातील लोकांनी पुढच्या पिढीच्या भल्यासाठी (वैयक्तिक पातळीवर का होइना) किती खस्ता खाल्ल्या? हे तुम्ही तुमच्या अनुभव कथनातुन आजच्या पिढीला दाखवून दिल आहे. त्याबद्दल आपले शतश: धन्यवाद! हे लेखन वाचून आमंच जीवन कितीतरी सहजं आणि सोपं आहे ह्याची जाणीव झाली. आपण मि.पा. वर असेच लिहितं राहाल अशी अपेक्षा. मुशाफिर.

योगी९०० 26/03/2009 - 02:36
प्रतिकुल परिस्थितीत कष्ट करून आपली परिस्थिती सुधारणार्‍या आपल्यासारख्या लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटत राहिला आहे. एक सुंदर कथन.. आपले शतश: धन्यवाद !! आपल्यापासून सध्या जवळच्याच देशात आहे. जर जर्मनीत आलो तर आपली भेट घ्यायला नक्कीच आवडेल मला. खादाडमाऊ

त्या काळीं कर्ज काढून घर बांधणें, एकाचीं तीन घरें करणें, नोकरी सोडून फंडातून कर्जफेड करणें ही उद्योगशीलता असामान्यच म्हणायची. फक्त लागलें एवढेंच कीं प्रकृतीची योग्य ती काळजी घेतलेली दिसत नाहीं. असो. पण त्या काळीं तेवढा हेल्थ कॉन्शसनेस नव्हता. कर्तृत्त्व असामान्यच. स्वातीताईंनीं नात्याचें गुपित जपलें तेंहि योग्यच. झकास. मजा आली. सुधीर कांदळकर.

बबलु 06/04/2009 - 14:36
वामनसुत काका.... आजच स्मृतीगंधचे १ ते १२ भाग सलग वाचून संपवले. [मिपा वरची "वाचनखुणा साठवून" ठेवायची सोय उत्तम आहे (तात्या, धन्यवाद) ]. काका... काय सुंदर रीतिनं लिहिलंय !! हिमपर्वतातून उसळणारा पांढराशुभ्र ओढा खळाळत जातो तसं ओघवत्या शैलीतलं लेखन आपल्याला फार आवडलं. तुमचा हा ओढा व्हेळया मध्ये उगम पावून राजापूर/गिरगाव/गोरेगाव/डोंबिवली/फ्रांकफुर्ट असा खळाळत जातोय. दरम्यान अनंत अडचणी आल्या. त्या तुम्ही समर्थपणे पार केल्यात. धन्य होय !! ही लेखमाला संपूच नये असं वाटतं. (लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक). ....बबलु

स्मृतीगंध काय आहे म्हणून उचकले आणि सर्वच भाग आजच वाचून काढले. हा भाग वाचल्यावर प्रतिक्रिया काय लिहावी असा प्रश्न पडला. आपला जीवनपट उलगडून दाखवतांनांचा सहजपणा आणि आपले अनुभव वाचून आम्ही वाचक संपन्न झालो इतकेच म्हणावेसे वाटते. अजून खूप लेखन येऊ द्या ! मिपावर भेटत राहू !!! -दिलीप बिरुटे

नंदन 20/10/2013 - 14:38
आज पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत बाराही भाग सलग वाचून काढले. एखादी साधी, अनलंकृत पण ठाव घेणारी दीर्घ कथा वाचावी तसा पुनर्वाचनाचा अनुभव पुन्हा एकदा मिळाला. काही नवीन सदस्यांच्या वाचनातून सुटले असेल म्हणून हे किंचित उत्खनन.

रेवती 21/10/2013 - 08:57
मीही पुन्हा एकदा ही मालिका वाचून काढली. आणखी एकदोनदा तर वाचली जाईलच. एकच भाग वाचायचा असे ठरवून सगळी मालिका वाचत बसले. अश्या लेखनासाठी ती. वामनसुतांचे आभार. नंदनने धागा वर आणून छान काम केलय.

मृत्युन्जय 21/10/2013 - 12:55
खुपच सुंदर लिहिले आहे. गरम गरम वरण भात, मीठ, लिंबु आणि वर साजुक तुपाची धार आणि तोंडी लावायला लिंबाच्या लोणच्याची फोड या साध्याश्या जेवणात जो कमालीचा आनंद मिळतो तसाच आनंद मिळाला. स्वातीतै आणी नंदनचे आभार. @स्वातीतै: लेखमाला आवडली हे नानांना आवर्जुन सांगा

स्पंदना 22/10/2013 - 04:42
काल बसून ही सगळी लेखमाला वाचुन संपवली. वामनकाका तुम्ही माझ्या वडिलांच्या पिढीचे म्हणुन काका म्हणायचा अधिकार घेतेय. एक अतिशय महत्वाचा पैलु जाणवला या लेखनात अन तो म्हणजे एका स्त्रीचा दुसर्‍या स्त्रीच्या प्रति असणारा आदर,अन श्रद्दा! तुमच्या आई, चार मुलांच्या आई होत्या. त्यांनी आयुष्यात पतिसुख अनुभवल, पण वयाने २ वर्षे मोठ्या असलेल्या सावत्र सुनेवर त्यांनी जो विश्वास दाखवला, किंवा त्यांना जो तुमची आई होण्याचा अधिकार दिला, तो शब्दातीत आहे. शेतीवाडी तुमच्या वैनींना करायला देउन त्या आपली मुले घेउन त्यांच्या शिक्षणासाठी बाहेर राहु शकत होत्या. पण त्यांनी ते काम तुमच्या वैनींना दिलं. आपली मुले इतक्या विश्वासाने दुसर्‍या व्यक्तीच्या हातात सोपवली अन तो विश्वास तुमच्या वहीनींनी सार्थ ठरवला. हा नात्यांचा सुरेख गोफ उलगडणे हे तुमच्या लिखाणाचे सार्थक आहे. लिहायला बसले तर या नात्याचे अनेक पैलु सामोरे येतील. पण येथेच थांबवते. फार भिडल तुमच साध सोप लिखाण. अगदी हळव करुन गेलं.

बहुगुणी 24/10/2013 - 04:27
श्री. वामनसुत यांच्या परवानगीने मी या अतीव सुंदर आत्मकथनाचे सात भाग ध्वनिमुद्रित करून मिपावर दुवे दिले होते, आणि प्रतिसादांवरून तो उपक्रम वाचक-श्रोत्यांना आवडलाही होता असं वाटतं: मनकर्णिका १ मनकर्णिका २ मनकर्णिका ३ दुर्दैवाने ज्या खाजगी मालकीच्या सर्व्हरवर ते टाकले होते ती सुविधा गायब झालेली दिसते आहे :-( . असो, हे लिखाण इतकं उच्च प्रतीचं आहे की पुन्हा एकदा ध्वनिमुद्रण करण्यासाठी वेळ काढण्याची माझी तयारी आहे, इतर कुणी सहभागी होऊन मदत केली तर स्वागतच आहे!

बहुगुणी 24/10/2013 - 17:53
सॉरी, मंडळी, मी वर लिहिल्याप्रमाणे, दुर्दैवाने ज्या खाजगी मालकीच्या सर्व्हरवर ते ध्वनिमुद्रण टाकले होते ती मोफत सुविधा गायब झालेली दिसते आहे. (आणि डोमेन नेम ही वेगळे आहे, बहुतेक ती मूळची साईट विकली गेली असावी.) माझ्याकडे लॉगिन सुविधा नाही. तेंव्हा नव्याने पुन्हा ध्वनिमुद्रण करून मी "मनकर्णिका" सुरू करू शकेन. इथेच मिपावर दीर्घ ध्वनिमुद्रण टा़कायची सोय झाली तर अत्युत्तम!

मेघनाद 25/10/2013 - 01:07
नाना आजोबा, अहो काय मस्तच लिहील आहात हो तुम्ही. १ ते १२ हे सर्व भाग एका दिवसात वाचून काढले मी, अगदी ट्रेन मध्ये बसलो असताना मोबाईल वरती वाचल. माझ पण आजोळ राजापूर जवळ मिठगवाणे येथे आहे, त्यामुळे आपल्या लेख मालिकेतील सर्वच ठिकाणे डोळ्यासमोर येत होती. तुमच्या अश्याच लेख मालिका वाचायला आवडतील. वाट बघतोय आम्ही सर्व मिपाकर……

प्यारे१ 25/10/2013 - 03:39
अतिशय सुंदर मालिका. १ ते १२ भाग सलग वाचले. नंदन शेठचे उत्खननाबद्दल आभार. जुन्या काळातल्या एका अत्यंत धडपड्या स्वभावाच्या व्यक्तीची जीवनगाथा. त्या त्या कालाचा तटस्थपणे अ‍ॅज इट इज घेतलेला आढावा. विशेष भावलं ते म्हणजे प्रत्येक वेळी ज्येष्ठ व्यक्तीचा केलेला आदरार्थी उल्लेख. तीर्थस्वरुप नाना यांचे सेवेसी चरणी नतपर दासानुदासाचे दोन्ही कर जोडून त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार ही विज्ञापना. (भाग २ मधलाच मायना वापरलाय) ती. स्वाती दिनेश ह्यांना सविनय नमस्कार
3

स्मृतीगंध-११ "गोकुळ"

वामनसुत ·

सुक्या 22/03/2009 - 12:25
धन्य तुमची वामनसुत . . . काय वेग आहे लिखानाचा. वाचकांची लिंक तुटु न देता तुमचे लिखाण चालु आहे. तुम्ही आता व्यवस्थीत स्थिरस्थावर झाल्याचे पाहुन बरे वाटले. येउदेत अजुन. वाचतोय. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by विसोबा खेचर

सहज 22/03/2009 - 13:42
३० - ४०च्या दशकातील गाडी आता ८६ सालापर्यंत आली आहे. अचानक ही मालीका संपेल ही कल्पना सहन होत नाही आहे. तुमच्या लेखनाचा रतीब चालू राहीला पाहीजे हा! :-)

अतिशय सुरेख लिखाण आहे. शिवाय जुना काळ समोर येण्यासाठी, सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा दस्त ऐवज आहे. वाचत आहोत. भरपूर लिहा! आळश्यांचा राजा

आनंद 22/03/2009 - 15:12
मस्त लेखमाला. मला वाटते की तुम्ही सगळे भाग आधीच टंकुन ठेवले असावेत, पुस्तक रुपाने प्रकाशन करण्याचा विचार असावा. पण मिपा व जाल बघुन आताच्या पिढी पर्यंत पोचण्याच हा चांगला मार्ग दिसतोय म्हणुन लेख इथे पाठ्वले असावेत.मला वाटत इथला प्रतिसाद बघुन तुमचा हेतु नक्कीच साध्य झाला असावा. धन्यवाद. -- आनंद

रामदास 22/03/2009 - 15:24
तुमची लिखाणाची शैली आवडली.आत्मचरीत्रात्मक लिखाण फारच सुंदर आहे.पण राहून राहून असं वाटतं की हे चरीत्र ओळखीचं आहे.आपण केलेल्या लिखाणाला गालबोट लावतो आहे असं वाटून घेऊ नका .या अगोदर हे लिखाण प्रसिध्द केलं होतं का ?

प्राजु 22/03/2009 - 19:41
समोर बसून कथन करावं असं लिहिलं आहे तुम्ही. हा या मालिकेचा शेवट नक्कीच नाही. आता तर ८६ साला पर्यंत आलो आहोत. गोकुळ आता तर भरलं आहे. अजून गोकुळात बाळकृष्णाने जन्म घ्यायचा आहे. चालू ठेवावे लेखन ही विनंती. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल 22/03/2009 - 20:48
हा भाग ही खुप सुंदर झाला आहे. :) हल्ली सकाळी उठल्यावर पहिला तुमच्या लेखमालेचा पुढचा भाग आला आहे का ते पहाते आणि वाचते :)

मदनबाण 22/03/2009 - 21:15
वामनराव लेखन अगदी जोरदार चाललय्...येउदे अजुन. :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

शब्द बापुडे 22/03/2009 - 21:51
मी आज प्रथमच सगळे भाग एकामागे एक असे वाचले. खूप आवडले. इतका जुना काळ आम्हा नव्या लोकांना माहिती करुन दिला त्याबद्दल आभार. *चिरविजयी*

समिधा 23/03/2009 - 00:48
अजुन खुप येउदेत्, खुपच सुंदर. =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

हा भाग पण मस्त जमला आहे वामनसुत साहेब ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सुक्या 22/03/2009 - 12:25
धन्य तुमची वामनसुत . . . काय वेग आहे लिखानाचा. वाचकांची लिंक तुटु न देता तुमचे लिखाण चालु आहे. तुम्ही आता व्यवस्थीत स्थिरस्थावर झाल्याचे पाहुन बरे वाटले. येउदेत अजुन. वाचतोय. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by विसोबा खेचर

सहज 22/03/2009 - 13:42
३० - ४०च्या दशकातील गाडी आता ८६ सालापर्यंत आली आहे. अचानक ही मालीका संपेल ही कल्पना सहन होत नाही आहे. तुमच्या लेखनाचा रतीब चालू राहीला पाहीजे हा! :-)

अतिशय सुरेख लिखाण आहे. शिवाय जुना काळ समोर येण्यासाठी, सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा दस्त ऐवज आहे. वाचत आहोत. भरपूर लिहा! आळश्यांचा राजा

आनंद 22/03/2009 - 15:12
मस्त लेखमाला. मला वाटते की तुम्ही सगळे भाग आधीच टंकुन ठेवले असावेत, पुस्तक रुपाने प्रकाशन करण्याचा विचार असावा. पण मिपा व जाल बघुन आताच्या पिढी पर्यंत पोचण्याच हा चांगला मार्ग दिसतोय म्हणुन लेख इथे पाठ्वले असावेत.मला वाटत इथला प्रतिसाद बघुन तुमचा हेतु नक्कीच साध्य झाला असावा. धन्यवाद. -- आनंद

रामदास 22/03/2009 - 15:24
तुमची लिखाणाची शैली आवडली.आत्मचरीत्रात्मक लिखाण फारच सुंदर आहे.पण राहून राहून असं वाटतं की हे चरीत्र ओळखीचं आहे.आपण केलेल्या लिखाणाला गालबोट लावतो आहे असं वाटून घेऊ नका .या अगोदर हे लिखाण प्रसिध्द केलं होतं का ?

प्राजु 22/03/2009 - 19:41
समोर बसून कथन करावं असं लिहिलं आहे तुम्ही. हा या मालिकेचा शेवट नक्कीच नाही. आता तर ८६ साला पर्यंत आलो आहोत. गोकुळ आता तर भरलं आहे. अजून गोकुळात बाळकृष्णाने जन्म घ्यायचा आहे. चालू ठेवावे लेखन ही विनंती. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल 22/03/2009 - 20:48
हा भाग ही खुप सुंदर झाला आहे. :) हल्ली सकाळी उठल्यावर पहिला तुमच्या लेखमालेचा पुढचा भाग आला आहे का ते पहाते आणि वाचते :)

मदनबाण 22/03/2009 - 21:15
वामनराव लेखन अगदी जोरदार चाललय्...येउदे अजुन. :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

शब्द बापुडे 22/03/2009 - 21:51
मी आज प्रथमच सगळे भाग एकामागे एक असे वाचले. खूप आवडले. इतका जुना काळ आम्हा नव्या लोकांना माहिती करुन दिला त्याबद्दल आभार. *चिरविजयी*

समिधा 23/03/2009 - 00:48
अजुन खुप येउदेत्, खुपच सुंदर. =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

हा भाग पण मस्त जमला आहे वामनसुत साहेब ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
3

स्मृतीगंध-१० "घर पहावं बांधून.."

वामनसुत ·

वामनसुत साहेब खुप मोठी झेप घेतलित आपण एव्हाना नऊ वाजायला आले होते. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती. हसनने टांगा आणला आणि ती दोघे मला सोडायला स्टेशनवर आली. मला गाडीत बसवले आणि गाडी चालू झाल्यानंतर ती दोघे परत गेली. लोकांन मधे अजुन्ही माणसुकिचा अंश शिल्लक आहे याचेच हे उदाहरण ... ************************************************************* कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

समिधा 21/03/2009 - 12:49
ह्याही लेखनातले प्रसंग अगदी तुम्ही समोर बसुन सांगताय अस वाटल, =D> खुप सुंदर लिहीताय, पुढील भागांची वाट बघतीय आणि उद्या पुढचा भाग वाचायला मिळेल याची खात्री आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

रेवती 21/03/2009 - 17:18
अनेक अडचणींवर मात करून सर्वांची प्रगती होत होती म्हणून आनंद झाला. आनंदाचे प्रसंग अथवा अडचणी लिहिताना भाषा तशीच साधी आहे. तुम्ही ग्रेट आहात! रेवती

सगळे भाग नीट वाचतो आहे. आधीही बर्‍याच जणांनी म्हणल्याप्रमाणे शैली जबरदस्तच आहे. रात्रीची जेवणं झाली आहेत. मस्तपैकी अंगणात नाही तर गच्चीवर गाद्या टाकून सगळे जण बसले आहेत. एखादे अतिशय प्रेमळ मायाळू आजोबा आपल्या सुना नातवंडांना जुन्या दिवसांबद्दल सांगत आहेत. आजोबा समाधानी आहेत त्या मुळे या आठवणी "आमच्या वेळी असं नव्हतं हो" या पेक्षा "अरे आमच्या वेळी काय गंमत होती माहिती आहे" अशा अंगाने जात आहे. मला अगदी असंच वाटत आहे वाचताना. वाचता वाचता थोडा हात पुढे केला तर आजोबांच्या हाताला हात लागेल असं वाटत राहतं. हेच शैलीचं यश. बिपिन कार्यकर्ते

मदनबाण 21/03/2009 - 21:59
छानच्..आपली झालेली प्रगती वाचुन फार आनंद वाटला... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

प्राजु 22/03/2009 - 07:47
हा तुमचा स्मृतीगंध इतका दरवळतो आहे की, प्रत्येक मिपाकर या गंधाने वेडा झाला आहे. तुमचे शब्द, अनुभव ... आणि एकेक झेप.. सगळंच विलक्षण आहे. कदाचित फार सोपं आयुष्य नशिबी आलं म्हणूनही हे सगळं विलक्षण वाटत असेल. पण आजोबांच्या तोंडून ज्या काळाचं वर्णन ऐकलं.. तोच काळ आपल्या लेखातून अनुभवायला मिळतो आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरू नये. मस्तच. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 22/03/2009 - 08:50
हा तुमचा स्मृतीगंध इतका दरवळतो आहे की, प्रत्येक मिपाकर या गंधाने वेडा झाला आहे. तुमचे शब्द, अनुभव ... आणि एकेक झेप.. सगळंच विलक्षण आहे. हेच बोल्तो.. तात्या.

वामनसुत साहेब खुप मोठी झेप घेतलित आपण एव्हाना नऊ वाजायला आले होते. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती. हसनने टांगा आणला आणि ती दोघे मला सोडायला स्टेशनवर आली. मला गाडीत बसवले आणि गाडी चालू झाल्यानंतर ती दोघे परत गेली. लोकांन मधे अजुन्ही माणसुकिचा अंश शिल्लक आहे याचेच हे उदाहरण ... ************************************************************* कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

समिधा 21/03/2009 - 12:49
ह्याही लेखनातले प्रसंग अगदी तुम्ही समोर बसुन सांगताय अस वाटल, =D> खुप सुंदर लिहीताय, पुढील भागांची वाट बघतीय आणि उद्या पुढचा भाग वाचायला मिळेल याची खात्री आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

रेवती 21/03/2009 - 17:18
अनेक अडचणींवर मात करून सर्वांची प्रगती होत होती म्हणून आनंद झाला. आनंदाचे प्रसंग अथवा अडचणी लिहिताना भाषा तशीच साधी आहे. तुम्ही ग्रेट आहात! रेवती

सगळे भाग नीट वाचतो आहे. आधीही बर्‍याच जणांनी म्हणल्याप्रमाणे शैली जबरदस्तच आहे. रात्रीची जेवणं झाली आहेत. मस्तपैकी अंगणात नाही तर गच्चीवर गाद्या टाकून सगळे जण बसले आहेत. एखादे अतिशय प्रेमळ मायाळू आजोबा आपल्या सुना नातवंडांना जुन्या दिवसांबद्दल सांगत आहेत. आजोबा समाधानी आहेत त्या मुळे या आठवणी "आमच्या वेळी असं नव्हतं हो" या पेक्षा "अरे आमच्या वेळी काय गंमत होती माहिती आहे" अशा अंगाने जात आहे. मला अगदी असंच वाटत आहे वाचताना. वाचता वाचता थोडा हात पुढे केला तर आजोबांच्या हाताला हात लागेल असं वाटत राहतं. हेच शैलीचं यश. बिपिन कार्यकर्ते

मदनबाण 21/03/2009 - 21:59
छानच्..आपली झालेली प्रगती वाचुन फार आनंद वाटला... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

प्राजु 22/03/2009 - 07:47
हा तुमचा स्मृतीगंध इतका दरवळतो आहे की, प्रत्येक मिपाकर या गंधाने वेडा झाला आहे. तुमचे शब्द, अनुभव ... आणि एकेक झेप.. सगळंच विलक्षण आहे. कदाचित फार सोपं आयुष्य नशिबी आलं म्हणूनही हे सगळं विलक्षण वाटत असेल. पण आजोबांच्या तोंडून ज्या काळाचं वर्णन ऐकलं.. तोच काळ आपल्या लेखातून अनुभवायला मिळतो आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरू नये. मस्तच. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 22/03/2009 - 08:50
हा तुमचा स्मृतीगंध इतका दरवळतो आहे की, प्रत्येक मिपाकर या गंधाने वेडा झाला आहे. तुमचे शब्द, अनुभव ... आणि एकेक झेप.. सगळंच विलक्षण आहे. हेच बोल्तो.. तात्या.
3