Foolपाखरा
Foolपाखरा
Foolपाखरा
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली
पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत !
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
जेव्हा माणूस विचार करावयास शिकला
तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत
तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित
ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं
पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.
आज अंगारकी चतुर्थी निमित्त मी केलेली कविता....
टिप :- ही कविता कोणाची टिंगल टवाळी किंवा भावना दुखावण्यासाठी लिहिलेली नसून "अंगारकीच्या या पवित्र दिनी" माझ्या मनःपटलावर उमटलेले तरंग आहेत. तोच शुध्द सात्विक भाव कवितेतून वाचकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणीक प्रयत्न केला आहे. या मधून कोणताही इतर अर्थ जर कोणत्या वाचकास दिसला तर तो केवळ माझ्या प्रतिभेचा दोष समजून वाचकांनी उदार मनाने मला क्षमा करावी. गजाननाची आसिम कृपा सर्वांवर सदैव राहो...
श्री गणेशायनमः
आज अंगारकीच्या सणा
चापून खाउ साबुदाणा
घंटा बडवू घणाघणा
स्पिकर लावूया ठणाणा
पेरणा
कद्रू एके तुझा बाप कद्रू दुणे बहिणी दोन
कद्रू त्रिक भाउ तुझा , हरामखोर चिंधी चोर
कद्रू चोक वेणीत सुतळी, कद्रू पाचा अनवाणी चाल,
कद्रू सक साडीवर ठिगळ, साता कद्रू हसू ओशाळ
मंडई मधे फेकलेली भाजी कद्रू आठा पिशवित टाकू
वडापावचा कागद सुध्दा नव्वे कद्रू रद्दीत विकू
जटाळलेले केस आणि कळकटलेले कृष्णवदन
अधन मधन दातांनाही कद्रू दाहे कर मंजन
सर्वाना होळीच्या अगाउ शुभेच्छा!
पालथागडू
(महाग्रु)
पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २
सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी
राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी
आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी
मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी
भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी
माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी
समूळ पिळून्-बोरकर
अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्
हायवे वरच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक
"लोक काय म्हणतील कृत्रीम बंधन सत्वर तोडुनी टाक !"
बायको नामक भूत बाटलीस कायम भिववीत होते
त्या भीतीने तरल काहिसे ग्लासातून निसटत होते
गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको गाय छाप मळलेली
वाट खोकुनी माझी लावीते, वीडी कोंदटलेली,
जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली
ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली
त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"कितीही प्या, पण ध्यानी ठेवा..चखण्याविण "गंमत" नाही !"
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
ही पहा पाडली गजल,
ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी
दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,
उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू,
शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी,
कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली,
रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी,
हो! जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी,
मीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी,
(डोलकरांचे मनोगत)
शतदा भरला एक प्याला शेवटचा
मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा
रिचवले हजारो पेग मी उदरात
सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा
चखण्याची देउन आहुती पोटाला
मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला
नसता जेवण व्यर्थ मानले असते
मज आहे कारण आज घरी जाण्याला
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले
कुठे जायचे ते अडखळत सांगितले
जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी
निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !!
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन
माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो.
(मुलिंनी धरु नये अबोला)
मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्यांना अडचणीत आणू नये
त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा
फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर
मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..! मनावर
फेरफटका मारण्याचे, आजकाल टाळतो मी
एक एक पाउल उचलणे, जाहले खूप खडतर
तू नको आणूस सुगंध, ऐक वाऱ्या
एक वडा खायचा, होईल मोह अनावर
नुकतेच जरीही, जेवण असले जाहले ना
काकडी-खिचडी, सहज खायचो मी त्या नंतर