Skip to main content

अशीहि एक धर्म निरपेक्शता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 03/10/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं, "जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो, "ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं, "ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही, खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
लेखनविषय:

वाचने 30367
प्रतिक्रिया 208

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

पण एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन करणारेच आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन करणारेच लोक सत्तेवर होते इतकी वर्षे. त्यांनी पसरवलेलं विष इतक्या सहजासहजी जाणं शक्य नाही. असा अविश्वास लोकांच्या मनात निर्माण करणं हे त्यांच्या राजकारणाला पोषक होतं म्हणून त्यांनी ते केलं. उदाहरणार्थ राजीव गांधींच्या सरकारला शाह बानो प्रकरणात सय्यद शहाबुद्दीन आणि खुर्शीद आलम खान यांच्यासारख्या कर्मठ पुराणमतवादी मुस्लिमांच्या मागे जायची काहीही गरज नव्हती. पण अरिफ मोहम्मद खान यांच्यासारख्या खरोखर पुरोगामी नेत्याचं न ऐकता राजीव सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धाब्यावर बसवून संसदेतल्या बहुमताच्या जोरावर तो निर्णय रद्दबातल ठरवला आणि मुस्लिमांच्या अनुनयाची भूमिका घेतली. हा एक चुकीचा निर्णय घेऊन काँग्रेसने स्वतःच्या पायांवर कु-हाड मारून घेतली. आता - ३० वर्षांनी जे काही धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण झालंय आणि परस्पर अविश्वास निर्माण झालाय त्याचं मूळ हे या निर्णयात आहे.

In reply to by बोका-ए-आझम

हे जे काय राज्यकर्ते सत्तेवर होते ज्यांनी असले अनुनयाचे निर्णय घेतले त्यास बहुसंख्य असलेल्या हिंदू लोकांनी का विरोध केला नाही हेही आश्चर्य वाटत आले आहे. कारण आपल्याकडे तर लोकशाही आहे ना? मतपेटीतून लोकांनी कळवले असते ना त्यांना राजकीय नेत्यांनी घेतलेला निर्णय आवडला नाही म्हणून. मग तसे का झाले नाही? एकतर मुस्लिमांच्या ह्या लांगूलचालनास विरोध करणारे मूठभर असतील किंवा जनतेला राज्यकर्त्यांचा निर्णय मान्य असेल. मुस्लिम मतपेट्या, गठ्ठा मते असली विधानं नेहमी ऐकत आलो आहोत. १३ टक्के मुस्लिम मतांवर राज्यकर्ते जर ठरत असतील तर ८० टक्के जनता काय झोपलेली राहते? ती ८० टक्के जनता आपआपल्या जाती-पातीमधे विभागून आपला बहुसंख्याकांचा फायदा घालवून बसते. तीला ह्या लांगूलचालनाबद्दल बोलायचा नैतिकच काय कायदेशीर अधिकारही राहत नाही. मग ते मूठभर ह्या बहुसंख्य जनतेला एकत्र करायला आभासी शत्रू निर्माण करतात. तो म्हणजे मुस्लिम. सरळ आहे की नाही? असो. नंतर "एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन न करणारे आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन न करणारे" सत्तेवर आल्यावर काही बदल झाला की नाही कायद्यात? लोकशाही देशात ८० टक्के लोक १३ टक्क्यांचे लाड-कौतुक स्वतःलाच पटत नसतांनाही करवून घेतात, वरून त्याविरूद्ध आकांड-तांडवही करतात हे कोडं काही केल्या सुटत नाही. हे ८० टक्के लोक नक्की कशाच्या दबावाखाली आहेत?

In reply to by तर्राट जोकर

१३ टक्के मुस्लिम मतांवर राज्यकर्ते जर ठरत असतील तर ८० टक्के जनता काय झोपलेली राहते? ती ८० टक्के जनता आपआपल्या जाती-पातीमधे विभागून आपला बहुसंख्याकांचा फायदा घालवून बसते.
याच्याशी सहमत.
तिला या लांगूलचालनाबद्दल बोलायचा नैतिकच काय कायदेशीर अधिकारही राहत नाही. मग ते मूठभर ह्या बहुसंख्य जनतेला एकत्र करायला आभासी शत्रू निर्माण करतात. तो म्हणजे मुस्लिम. सरळ आहे की नाही?
याच्याशी असहमत. उलट तथाकथित सेक्युलरांनी हिंदुत्ववादी म्हणजे मुस्लिमांचे शत्रू असा जाणीवपूर्वक प्रचार चालवला आहे. ज्याच्यामुळे नसलेली दरी निर्माण होते आहे.हिंदुत्ववाद्यांना नव्हे तर सेक्युलरांना कोणीतरी शत्रू हवा आहे. मला आठवतं जेव्हा २००४ मध्ये काँग्रेसप्रणित युपीएची सत्ता आली तेव्हा अनेक समित्या आणि मंडळांवरुन भाजपच्या काळात नियुक्त झालेल्या लोकांना हटवलं गेलं. ते ठीक आहे. ते सगळीच सरकारं करतात पण त्याच्यासाठी Detoxification हा शब्द वापरण्यात आला होता. हे कितपत बरोबर आहे? गजेंद्र चौहान यांना FTII च्या प्रमुख संचालकपदी नियुक्त करण्यावरुन विरोध होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याचा संघाशी आणि भाजपशी असलेला संबंध. तो लायक असेल किंवा नसेल पण त्याला एक दिवसही काम करु न देता निव्वळ संघाचा माणूस म्हणून त्याच्याविरूद्ध राळ उडवायची आणि मग त्याची प्रतिक्रिया उठली की वैचारिक दहशतवाद म्हणून आरडाओरडा करायचा हा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा आहे, बाकी काही नाही. काहीही पुरावा नसताना कलबुर्गींची हत्या ही हिंदुत्ववाद्यांनी केली असं पसरवलं गेलं. दाभोळकरांच्या बाबतीतही तेच झालं. पानस-यांच्या बाबतीतही समीर गायकवाडवर अजून खटला चालून त्याचा गुन्हा सिद्ध होणं बाकी आहे पण सेक्युलर लोक निकाल लावून मोकळे झालेले आहेत. बरं, त्यांच्या बाजूने निकाल लागला की न्यायसंस्था बरोबर पण विरोधात लागला की काहीतरी गडबड?याकूब मेमनच्या फाशीच्या वेळी तर याचा अतिरेक झाला. झकिया जाफरींचंही उदाहरण देता येईल. तसं म्हटलं तर नक्षलवादी आणि डावे पक्ष यांची विचारसरणी एकच आहे पण नक्षलवादी हल्ल्यानंतर जर डाव्या पक्षांकडे बोट दाखवलं तर ते सेक्युलरांना खपत नाही. यावरून हेच सिद्ध होतं की हिंदुत्ववादी सेक्युलरांना शत्रू समजायला लागले त्याच्या कितीतरी आधी सेक्युलरांनी हिंदुत्वाला स्वतःचा शत्रू मानलेलं आहे, आणि त्याच्यामागे मुस्लिमांचा कळवळा वगैरे काहीही नाही तर त्यांच्या मनात भीती निर्माण करुन त्यांना कायमचं हिंदुविरोधी बनवून ठेवणं हाच हेतू आहे.
तर "एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन न करणारे आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन न करणारे" सत्तेवर आल्यावर काही बदल झाला की नाही कायद्यात?
कायद्यात बदल होईल. त्याला काही फार लागत नाही. लोकांच्या मनोवृत्तीत बदल होणं गरजेचं आहे आणि ते कुठलाही कायदा करु शकत नाही. ते लोकच आपणहून करु शकतात.

In reply to by बोका-ए-आझम

तथाकथित सेक्युलरांनी हिंदुत्ववादी म्हणजे मुस्लिमांचे शत्रू असा जाणीवपूर्वक प्रचार चालवला आहे. ज्याच्यामुळे नसलेली दरी निर्माण होते आहे.हिंदुत्ववाद्यांना नव्हे तर सेक्युलरांना कोणीतरी शत्रू हवा आहे.
उदाहरणादाखल ही लिंक बघा: https://www.facebook.com/groups/onecrorehindugroup/ असे हजारो गृप फेसबुक, वॉट्सॅपवर आहेत. त्यातली विखारी भाषा आणि विचार बघा. हे सेक्युलरांचे तर नाही दिसत.
काहीही पुरावा नसताना कलबुर्गींची हत्या ही हिंदुत्ववाद्यांनी केली असं पसरवलं गेलं. दाभोळकरांच्या बाबतीतही तेच झालं. पानस-यांच्या बाबतीतही समीर गायकवाडवर अजून खटला चालून त्याचा गुन्हा सिद्ध होणं बाकी आहे पण सेक्युलर लोक निकाल लावून मोकळे झालेले आहेत. बरं, त्यांच्या बाजूने निकाल लागला की न्यायसंस्था बरोबर पण विरोधात लागला की काहीतरी गडबड?
असंच बरंचसं बर्‍याच मुस्लिम तरूणांबद्दल झालेय. मुस्लिम म्हणजे आतंकवादीच ह्या पूर्वग्रहदूषित भावनेतून अनेक तरूणांना विनाकारण डांबून ठेवल्या गेले, त्यांना वकिल मिळायलाही विरोध केला जातो. अतिरेकी कारवायांपायी एखाद्या मुस्लिम तरुणास अटक झाली एवढी बातमीही हिंदूत्ववाद्यांना ढोल पिटायला पुरेशी असते. अशावेळी "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" अशी पृच्छा दोन्ही बाजूने होते हेही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. आताच ७-११च्या बॉम्बस्फोटासाठी काहींना फाशी झाली तर काहींना निर्दोष सोडले. किती हिंदूत्ववाद्यांना न्यायालयाच्या त्यांना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाबद्दल खात्री व अभिमान आहे. निर्दोष सोडलेल्यांवर खरंच भरवसा ठेवतील हिंदुत्ववादी? तेच साध्वी प्रज्ञाबद्दल. किती हिंदूत्ववादी हळहळत आहेत त्या आत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत ह्या बातम्या ऐकून. अशाच बातम्या कुणा मुस्लिम तरुणाबद्दल असत्या तर कोण हळहळलं असतं का? समाजात विखार पसरला आहे. त्याला आवर घालणे महत्त्वाचे. कोण चूक कोण बरोबर च्या भांडणात आपलेच लोक एकमेकांची डोकी फोडून नुकसान करून घेतात. हाच इतिहास आहे. आणि आजुन आपण काहीही शिकलो नाही असेच म्हणावे लागेल.
सेक्युलरांनी हिंदुत्वाला स्वतःचा शत्रू मानलेलं आहे, आणि त्याच्यामागे मुस्लिमांचा कळवळा वगैरे काहीही नाही तर त्यांच्या मनात भीती निर्माण करुन त्यांना कायमचं हिंदुविरोधी बनवून ठेवणं हाच हेतू आहे.
यामुळे सेक्युलरांना काय फायदा होतो हे कळले नाही. राज्यसत्ता भोगावयास मिळते असे म्हटले तर मी वर म्हटलेले ८० टक्के जनता झोपलेली असते का हेच परत इथे लागू होते. सेक्युलरांना हिंदुत्ववादी शत्रू करून कोणता फायदा मिळेल याची हजार खरी-खोटी कारणं देता येतील. जसे विदेशी मदत, प्रतिष्ठा (?), सत्ता. किंवा विदेशी हातांकडून हुशारीने वापरल्या जाणारी प्यादी असेही म्हटल्या जाऊ शकते.
कायद्यात बदल होईल. त्याला काही फार लागत नाही. लोकांच्या मनोवृत्तीत बदल होणं गरजेचं आहे आणि ते कुठलाही कायदा करु शकत नाही. ते लोकच आपणहून करु शकतात.
हे एक बरे असते बघा. जेव्हा काँग्रेसने कायदा बदलला तेव्हा आकांडतांडव केले, स्वतः ते करायची वेळ आली की कायद्यापेक्षा लोकांच्या मनोवृत्ती बदलणे महत्त्वाचे वाटायला लागते. जेव्हा काँग्रेस कायदा बदलत होती तेव्हा लांगूलचालन न करणार्‍यांना लोकांची मनोवृत्ती बदलण्यापासून कोणता कायदा रोखत होता हेही कळले तर बरे. (काँग्रेसनेच कट करुन डांबले असा कंठशोष करणार्‍यांकडून "साध्वी प्रज्ञा अजूनही कैदेत का आहेत" याचे उत्तर मिळालेले नाही.)

In reply to by तर्राट जोकर

साध्वी प्रज्ञा कैदेत असण्याचं एक साधं कारण म्हणजे त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. जामीन देणं आणि तेही दहशतवादविरोधी खटल्यात - हे पूर्णपणे न्यायाधीशांच्या हातात असतं. असा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करता येत नाही आणि खटला अजून चालूच झालेला नसल्यामुळे साध्वी प्रज्ञा निर्दोष आहेत असं म्हणून सोडूनही देता येत नाही. काँग्रेस सरकारने कट करुन त्यांना डांबले असं मी म्हटलेलं नाही. आताच्या सरकारपुढे हे पर्याय आहेत - १. आरोप मागे घेऊन साध्वी प्रज्ञा यांना निर्दोष सोडणे २. खटला चालवून गुन्हा सिद्ध करणे किंवा सिद्ध होत नाही हे मान्य करणे. जर सिद्ध झाला, तर शिक्षा होईल, नाही झाला तर सुटका होईल. काँग्रेसने कायदा बदलला तेव्हा आकांडतांडव केले आणि स्वतःवर वेळ आली ... - रच्याकने काँग्रेसने कायदा जेव्हा बदलला तेव्हा घटनेच्या चौकटीत राहून बदलला आणि शरियत कायद्याला मुस्लिम पर्सनल लाॅचा भाग बनवून टाकलं. त्यामुळे ते आता धर्मस्वातंत्र्यात समाविष्ट होतं, जो मूलभूत हक्कांमध्ये येतो. त्याला हात लावायचा तर घटना बदलावी लागेल. आता सांगा. तुमचंच आधीचं विधान घेऊन - फक्त १३% लोकांसाठी घटना बदलायची का? आणि तेही असे लोक जे तुमच्या पक्षाला मत देणार नाहीत? त्यापेक्षा त्यांची मनोवृत्ती बदलण्यासाठी प्रयत्न करणं किंवा त्यांचं ते बघून घेतील म्हणून सोडून देणं हे जास्त constructive नाही का? कारण परत धार्मिक स्वातंत्र्य वगैरे मुद्दे येतील. तसंही जेव्हा आता AIMPLB च्या लोकांनी तीन वेळा तलाकचं समर्थन केलं तेव्हा स्त्रियांचे हक्क वगैरेंवर बोलणारे सेक्युलर्स मिठाची गुळणी धरूनच तर बसले होते. वरती तुम्ही आणखी एक मुद्दा मांडलेला आहे - ८०% जनता झोपलेली आहे का? - आपल्या देशात बहुसंख्य लोक माणूस,जात, धर्म वगैरे बघून मत देतात.आख्खं दुसरं महायुद्ध जिंकून देऊनही चर्चिलला नाकारणा-या ब्रिटिश मतदारांएवढी परिपक्वता भारतीय मतदारांमध्ये अजून आलेली नाही. पक्ष, विचारसरणी, कामगिरी वगैरे गोष्टींवर आपल्या लोकांनी लक्ष दिलं असतं तर काँग्रेसचं पानिपत व्हायला २०१४ साल उजाडावं लागलं नसतं. त्यामुळे ८०% जनता झोपली होती का? नाही. त्यांनी झोपेचं सोंग घेतलं होतं. त्यातल्या काही जणांनी अजूनही घेतलेलं आहे.
अशाच बातम्या कुणा मुस्लिम तरुणाबद्दल असत्या तर कोण हळहळलं असतं का? समाजात विखार पसरला आहे. त्याला आवर घालणे महत्त्वाचे. कोण चूक कोण बरोबर च्या भांडणात आपलेच लोक एकमेकांची डोकी फोडून नुकसान करून घेतात. हाच इतिहास आहे. आणि आजुन आपण काहीही शिकलो नाही असेच म्हणावे लागेल.
यातल्या शेवटच्या भागाबद्दल सहमत. पण आधीचा जो मुद्दा आहे - लोक हळहळण्याचा - त्यातही भेदभाव होतोच. आता दादरीमध्ये मारला गेलेला तरुण जर हिंदू असता आणि पोर्क खाण्यावरून किंवा तत्सम कारणावरून मारला गेला असता तर प्रसारमाध्यमं आणि राजकीय पक्ष यांनी आता दिलीय तीच प्रतिक्रिया दिली असती का? अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी एका हिंदू माणसाच्या परिवाराला भेटायला गेले असते का? जर तुम्ही खरंच सेक्युलर असाल तर तुम्ही मृत माणसाचा धर्म कोणताही असो, तिथे जायला पाहिजे पण तसं होत नाही. गुजरात दंगलींबद्दल इतकं बोललं जातं, लिहिलं जातं पण नंदीग्राम आणि सिंगुर इथल्या हत्या आणि अत्याचारांबद्दल काहीही बोललं गेलं नाही. कुठल्याही तहलका किंवा कोब्रापोस्टला तिकडे स्टोरी किंवा स्टिंग आॅपरेशन करावंसं वाटलं नाही. अशा selective वागणुकीमुळे लोकांमध्ये राग निर्माण होत असेल तर त्याला फक्त लोक जबाबदार नाहीत. साठपेक्षा जास्त वर्षे राज्य करणारे अाणि सेक्युलर हा शब्द घटनेत अंतर्भूत करणारेही तेवढेच जबाबदार आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

काँग्रेसला हरवा आम्ही सत्तेवर आलो की समान नागरी कायदा आणू वगैरे आरोळ्या ठोकणारे हिंदुत्वी सिंह आता सत्तेवर आल्यावर मुळूमुळू रडत कारणे सांगू लागले ! ....... मुस्लिमविरोध हा विषय वर्षानुवर्षे ( अगदी सोळाव्या शतकापासून ) हिंदु राजे / हिंदुत्वी सरकारानी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे, त्याचाच हा नमुना !

In reply to by dadadarekar

की आणलाच समान नागरी कायदा! हाकानाका!बाकी सोळाव्या शतकातलं तुम्हाला काय अकबराने व्यनि करुन सांगितलं की राणा प्रताप खरडवहीवर लिहून गेले?

In reply to by बोका-ए-आझम

संयत चर्चा व वाचनीय प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमच्या प्रतिसादांमधे बराचसा दोष प्रसारमाध्यमे व सत्ताधारी यांच्याकडे जातो. माझा रोख सामान्य जनतेच्या बदलल्या जाणार्‍या, वापरल्या मानसिकतेवर आहे. जनता कधीच जागी नसते, ती फक्त नशेत असते. नाचवणारे ज्या नशेत तीला नाचवतात त्या. मग ती नशा धर्माची असो, युद्धाची असो वा अजून कसली. नाचवणारे सेक्युलर असो, धर्मांध असो वा हिंदूत्ववादी. जनतेच्या माथी हे नशेत नाचणेच आहे. याचे परिणाम सूज्ञ असलेल्या, खर्‍या अर्थाने कायम 'अल्पसंख्यांक' असलेल्या उदारमतवादी लोकांना भोगायला लागतात. काही मुद्द्यांवर सहमती व मतभेद राहतीलच. आपली चर्चा इथेच थांबवूयात. धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

>>> हे जे काय राज्यकर्ते सत्तेवर होते ज्यांनी असले अनुनयाचे निर्णय घेतले त्यास बहुसंख्य असलेल्या हिंदू लोकांनी का विरोध केला नाही हेही आश्चर्य वाटत आले आहे. कारण आपल्याकडे तर लोकशाही आहे ना? मतपेटीतून लोकांनी कळवले असते ना त्यांना राजकीय नेत्यांनी घेतलेला निर्णय आवडला नाही म्हणून. मग तसे का झाले नाही? शहाबानो प्रकरणात घटना बदलून न्यायालयाचा निर्णय बदलण्याची प्रक्रिया १९८६ साली झाली. लोकसभेत व राज्यसभेत आपल्या राक्षसी बहुमताच्या जोरावर राजीव गांधींनी जबरदस्तीने घटना बदलून मुस्लिम स्त्रियांवर अन्याय करणारा कायदा केला. आपल्याला हा निर्णय आवडलेला नाही हे जनतेने मतपेटीतून पुढील निवडणुकात दाखवून दिले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या ४१४ वरून १९५ वर घसरली. त्याव्यतिरिक्त त्या काळात झालेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकात कॉंग्रेसने सत्ता गमाविली. १९८७-१९९० या काळात काँग्रेसने हिमाचल प्रदेश, हरयाना, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, ओरिसा अशा अनेक राज्यात सत्ता गमाविली. >>> असो. नंतर "एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन न करणारे आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन न करणारे" सत्तेवर आल्यावर काही बदल झाला की नाही कायद्यात? १९८६-२०१५ या काळात "एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन न करणारे आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन न करणारे" फक्त १९९८-२००४ या काळात आणि नंतर २०१४-़आजतगायत सत्तेत आहेत. परंतु त्यांना ही घटनादुरूस्ती रद्द करणे शक्य नाही, कारण राज्यसभेत त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत सोडाच, साधे बहुमत सुद्धा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्याच्यासाठी निव्वळ राज्यसभा नाही तर राज्यांच्या विधानसभांमध्येही बहुमत लागेल कारण हा मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्याला हा निर्णय आवडलेला नाही हे जनतेने मतपेटीतून पुढील निवडणुकात दाखवून दिले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या ४१४ वरून १९५ वर घसरली.
हे अत्यंत फारफेच्ड आहे. यामागे बोफोर्स घोटाळ्याचे आरोप हे मुख्य कारण होतं राजीव गांधींच्या पराभवामागचं.

औरंगझेबाकडे चाकरी करणारे जाट्,रजपूत्,मिर्झाराजे जयसिंग ह्यांचे काय करायचे ? शिवाजी राजेंकडे चाकरी करणार्या मुसलमान सरदारांचे काय करायचे ? सगळाच गोंधळ.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

असे ऐकुन आहे की रंग्याची चाकरी करणारे हिंदु सरदार सुद्धा जिझीया द्यायचे. हो पण नविन जावईशोधांनुसार समकालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये औरंगजेबाने जिझिया लावल्याचा काहिच पुरावा नसावा. किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो. सुरुवातीला "जिजाया" अश्या नावाने असणारा कर नंतर मुस्लिम शासनकर्त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणुन आधी जिझाया आणि मग जिझिया झाला अस्शीही नोंद कुठे मिळु शकते.

In reply to by मृत्युन्जय

असे ऐकुन आहे की रंग्याची चाकरी करणारे हिंदु सरदार सुद्धा जिझीया द्यायचे. हो पण नविन जावईशोधांनुसार समकालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये औरंगजेबाने जिझिया लावल्याचा काहिच पुरावा नसावा. किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो. सुरुवातीला "जिजाया" अश्या नावाने असणारा कर नंतर मुस्लिम शासनकर्त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणुन आधी जिझाया आणि मग जिझिया झाला अस्शीही नोंद कुठे मिळु शकते.
जिझिया कर मुस्लिम लोकोत्तर राजांनी हिंदूंवर का लादला हे आपण सम्जून घेतले पाहिजे,मुस्लिम साम्राज्य आलम दुनियेत पसरले होते, ही वेग्वेगळी साम्राज्यं फक्त ईराणच्या खलिफाला उत्तरदायी होते, खलिफाच्या तत्कालीन आदेशानुसार जे लोक ईस्लाम्ची मानवतावादी तत्वे व नैतिक मुल्ये नाकारतात त्यांना जगण्याचा हक्क न्हवता , त्यामुळे भारतातील हिंदूच्या कत्तली कराव्यात असा आदेश खलिफाने मुघलांना दिला होता,परंतु मुघल शासनकर्ते हिंदूंचे पालक असल्याने त्यांनी याला नकार दिला होता. हिंदू जरी परधर्मिय असले तरी ,ईस्लामची मुळ तत्व पाळत असल्याने ते एक प्रकारे मुस्लिमच ठरतात असा युक्तीवाद मुघलांच्या वकिलांनी खलिफाच्या दरबारात केला. पुढे फार माथेफोड झाली परंतु हिंदूंना आम्ही मारणार नाही असे बाणेदारपणे मुघलांनी खलिफाला ठणकावले. जुजबी कर लावू असे आश्वासन देऊन मुघलांनी वेळ मारुन नेली आणि आपल्या हिंदू प्रजेचे प्राण वाचवले. असे लोकोत्तर मुघल हिंदूद्वेष्टे असतील काय!!!????

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुस्लिम साम्राज्य आलम दुनियेत पसरले होते, ही वेग्वेगळी साम्राज्यं फक्त ईराणच्या खलिफाला उत्तरदायी होते, या महान जावईशोधांसाठी इतिहासाचे नवीन नोबेल पारितोषिक घडवायला पाठवले आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या महान जावईशोधांसाठी इतिहासाचे नवीन नोबेल पारितोषिक घडवायला पाठवले आहे !
या धाग्यावरील नानासाहेबचा प्रत्येक प्रतिसाद सहस्त्र नोबेल पारितोषिकांच्या योग्यतेचा आहे!

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

येस्सार..... अगदी हजार टक्के अनुमोदन. ते गुरू तेग बहादूर सिंगांना 'हिंद की चद्दर' म्हणतात ते आक्शी खोटंय.. तमाम मुघलांना तो किताब शिखांनी दिला होता. बखरींच्या लिखाणात काय तरी गडबड झाली भवतेक.

In reply to by मृत्युन्जय

जरा ही महामहीम अफजखान यांचा करूण अंत वाचा आणि विचार करा आपल्या पूर्वसूरींनी किती म्हणून पातक केले आहे ते. पुढील २५ मिनिटे मी आणि तुम्ही मिपा मौन पाळूयात कसें ! खालसा ते खुलासा. एक वैचारीक चळवळ

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, हिन्दी बोलणार्‍या महिलेनं आपला खेळणी विक्री करण्याचा व्यवसाय अंतरात्मा की आवाज ऐकून बंद केला असून ती आता भंगार खरेदी विक्रि करु लागली आहे. या कामी तिला एका संस्थळाची मदत मिळत असल्याचे समजले आहे. -मिपाटीआय

फुजींची फुल्ल दिवाळी सुरू आहे इकडे. धम्माल विनोदी धागा बनवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. दिडशे प्रतिसादांकडे जोरात घोडदौड. जेपी आणि कार्य्कर्ते... होशियार....

In reply to by तर्राट जोकर

विनोदी!!!!!! आर यु सिरीयस? भूतकालीन मुस्लिम राज्यकर्ते कसे अत्याचारी होते याची खोटी वर्णने करुन सांप्रत काळातील मुस्लिमांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे काम चालू आहे, ईतिहासात क्वचीत एखाद्या मुस्लिम राज्यकर्त्याकडून चूक झालीही असेल ,पण् त्याचे दाखले देऊन जर सांप्रत काळातील मुस्लिमांना नागरीकत्वाच्या व्याख्येतून वगळण्याची भाषा होत असेल तर त्याला विरोध होणारच, आणि माझ्यासारखे सामान्य मुस्लिम याविरोधात जन्प्रबोधन करतच राहणार.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

>>>>>>>> ईतिहासात क्वचीत एखाद्या मुस्लिम राज्यकर्त्याकडून चूक झालीही असेल आज एकही प्रतिसाद सीरियस न लिहायला एक एप्रिल आहे काय????

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

तुमचा हा प्रतिसाद सर्वथा मान्य पण.... त्यासाठी तुम्ही टकाटक खोटी धूळफेक तरी करू नका. जिझीया कराचे जे काही एक्ल्प्लेनेशन दिले आहे ते तद्दन डिनायल मोड आहे. तुमच्या ह्या विधानांना ऐतिहासिक पुरावा नाही. कश्मिर पासून खालपर्यंत मुस्लिम राज्यकर्त्यांनी धर्मांतरासाठी काय काय अनन्वित अत्याचार केलेत ते सर्व तुम्ही अमान्य कराल तर कसं चालेल? शिखांनी तर एक स्मारक बनवले आहे मुस्लिमांनी धर्मांतरासाठी कसे टॉर्चर केले गेले ते. एवढं धडधडीत सत्य तुम्ही आज मुसलमानांना वाचवण्यासाठी बोलताय ते तुमच्यावरच उलटेल. तेव्हा सांभाळून. आजच्या मुस्लिमांना स्वतःची बाजू मांडायला इतिहासाचा खोटा आधार घ्यायची काय जरूर? आजचा मुस्लिम कसा राष्ट्रभक्त आहे, धर्मापेक्षा देशाशी निष्ठा ठेवून आहे हे फक्त वागण्या-बोलण्यातून दाखवणे पुरेसे आहे. मुस्लिम-आतंकवादाचा विरोध करणे पुरेसं आहे. एमआयएम सारख्या देशतोडू पक्षांना नाकारणं पुरेसं आहे. पुर्वीचं सगळं विसरून तुम्हाला राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायचं असेल तर खुल्या दिलानं लोक इथे स्वागत करायला तयार आहेत. तुमची किती तयारी आहे ते कधी दाखवाल?

बेक्कार विनोदी धागा... :) फुटल्या गेलो आहे.. भाई आप महान है.. जिझिया करा एक्स्पेनेशन राक्स :)

खानाचे हस्सुन हसुन गडबडा लोळाल्याने आणि बेंबीच्या देठापासून हसल्याने लहान आतड्याबरोबरच मोठ्या आतड्यावरही अतिअति ताण आल्याने पोटाचा अल्सर होऊन अल्पषा आजाराचे निमित्त होऊन निधन झाले.
आयला . आमालाबी हसून हसून गडबडा लोळवलत कि वो . आणि हो खानाचे म्हणू नका खानांचे किवा खान साहेबांचे म्हणा . फुलथ्रॉटल जिनियस ला वाईट वाटायला नको . माईसाहेब कुरसूंदीकर - 'अख्खा जन्म महाराष्ट्रात घालवलेला तरीही' हवे प्रतिसादातले शब्द वाचले नैत का वो काकू ?
अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे.
अफजलखान फक्त सरदार नव्हता तर तो क्रूर आणि हिंसक होता . वाई पर्यंत येईपर्यंत त्याने वाटेत हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले . मुद्दामच तुळजापूर , पंढरपूर हि गावं नष्ट केली . आधी देवूळ आणि मग देवळातल्या मुर्त्या फोडायच्या ,मग गाय कापून टाकायची . कारण हिंदूंना गाय पवित्र . मग तिच्या रक्ताने मूर्तीला आणि देवळाला शिंपण करायचं . हिंदू स्त्रियांची अब्रू लुटायची .पुरुषांच्या कत्तली करायच्या . अशी खूप पुण्याची कामं आफ्जुल्ल्याने वाई पर्यंत येईपर्यंत केली . का ? तर तो मुस्लिम होता आणि त्याच्या दृष्टीने हिंदू काफर (अल्लाला न मानणारे म्हणजे नास्तिक ). अफजल खानची हि सगळी कृत्य धर्मांधपणाची नसून फार चांगली होती नै का . त्या मूर्ख हिंदूंना काय कळतंय हो ? विनाकारण बोंबा मारत असतात .
औरंगझेबाकडे चाकरी करणारे जाट्,रजपूत्,मिर्झाराजे जयसिंग ह्यांचे काय करायचे .
त्यांचं औरंगजेबानेच करून टाकलय . मिर्झाराजा जयसिंगाला स्वतःचा स्वार्थ साधून घेतल्यावर औरंग्याने विष देवून मारला ना .
किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो
आयला किती हसवायचं ते ? जिझिया कर हा फक्त हिंदुस्थानमध्ये नाही तर इराणमध्ये पारशानवर सुधा लावला गेला असल्याचा पुरावा आहे . टिपू सुलतानाने केरळ मधल्या हिंदुंवर अत्याचार करण्यासाठी खास फौज उभी केली होती म्हणे . त्यातले १ लाख फक्त हिंदू स्त्रियांना बाटवण्यासाठी नियुक्त केले होते . औरंग्याने दक्षिण दिग्विजयाच्या मनसुब्याने दक्षिणेत प्रवेश करताना वाटेत ७५ देवळं फोडली होती . इराणमध्ये १७ व्या शतकात शहा अब्बासचं राज्य असताना रंग्याने त्याच्या वकिलामार्फत शहा अब्बासला पत्र पाठवलं होतं . खाली त्याने 'आलमगीर' अशी सही केली . आलमगीर म्हणजे दुनियेचा राजा . तेव्हा शहाने त्याला उलट टोला दिला , 'तुझ्याच दक्षिणेला असलेल्या शिवाजी नामक राजाला तू आजपर्यंत हरवू शकला नाहीस. तू कसला दुनियेचा राजा ? ' फुलथ्रॉटल जिनियस साहेबांना मी पा चा कॉमेडी किंग खिताब देण्यात यावा . सगळी हस्तलिखितं , सगळ्या बखरी , सगळा इतिहास खोटा . भारताचा आणि इतर बाटवलेल्या देशांचा सुधा . तुमचं तेवढं खरं . आपल्या अगाध ज्ञानाने आमचं अज्ञान दाखवून दिल्याबद्दल मानाचा मुजरा .

In reply to by तुडतुडी

अफजलखान फक्त सरदार नव्हता तर तो क्रूर आणि हिंसक होता . वाई पर्यंत येईपर्यंत त्याने वाटेत हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले . मुद्दामच तुळजापूर , पंढरपूर हि गावं नष्ट केली . आधी देवूळ आणि मग देवळातल्या मुर्त्या फोडायच्या ,मग गाय कापून टाकायची . कारण हिंदूंना गाय पवित्र . मग तिच्या रक्ताने मूर्तीला आणि देवळाला शिंपण करायचं . हिंदू स्त्रियांची अब्रू लुटायची .पुरुषांच्या कत्तली करायच्या . अशी खूप पुण्याची कामं आफ्जुल्ल्याने वाई पर्यंत येईपर्यंत केली . का ? तर तो मुस्लिम होता आणि त्याच्या दृष्टीने हिंदू काफर (अल्लाला न मानणारे म्हणजे नास्तिक ). अफजल खानची हि सगळी कृत्य धर्मांधपणाची नसून फार चांगली होती नै का . त्या मूर्ख हिंदूंना काय कळतंय हो ? विनाकारण बोंबा मारत असतात .
हाय दैय्या. काय तो इतिहासाकडे पाहण्याचा महान दृष्टीकोन. कुराणाचा आपल्या मताने अर्थ लावनारे अन् इतिहासाचा आपल्या मताने अर्थ लावणारे यांच्यात काहीच फरक नाही हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद! माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर देणं अजून कोणाला शक्य झालं नाहीये. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' असले "बायकांत बहू बडबडला" टाइप स्लोगनं लिहिण्यापेक्षा दहशतवाद संपवला का नाही?

केवळ तिच्या हिंदी(मराठीमिश्रित) प्रश्नावरून तुम्ही ती मुस्लिम असल्याचा आडाखा कसा बांधलात हे दुर्लक्षित केलं आणि ती मुस्लिम आहे हे गृहीत धरलं, तर अनुभव छान. फारच थोडक्यात सांगितलात पण. आणि प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच.

In reply to by अन्या दातार

दिवाळी कधीच गेली. आता बाइने गणपतीही विकून पुढच्या दिवाळीची तयारी सुरु केली असणार.

एका गावात एक पहिलवान असतो. येता जाताना तो सतत याची त्याची मस्करी, मारपीट करत असतो गावात दोन छाडमाड टपोरी रहात असतात. त्यांच ह्या पैलवानापुढे काही चालत नाही. मग ते विरुद्ध बदला घेण्यासाठी बाकीच्या गाववाल्यांसमोर पैल्वानाची तारीफ करायला सुरुवात करतात. त्यामुळे होतं काय तर आक्ख गाव पैलवानाला शिव्याशाप द्यायला लागत. ह्यांच पाहुण्याच्या काठीने साप मारायचं उद्दिष्ट साध्य, मग ह्या दोन छाड्माड लोकांच रोजचं काम पैलवानाची तारीफ करायची. लोकं देताय शिव्या, हे करताय तारीफ. असं करणारे मिपावर २/३ जणं आहेत म्हणे. बघा लिंक लावुन.

कॅप्टन जॅक स्पॅरो - ह्यांनी म्हटले आहे, वन मॅन्स मार्टियर इझ टेररिस्ट फॉर ऑपोसिशन!!! म्हणजेच आपला तो शहीद आणि परक्याचा तो आतंकवादी ! हेच तत्व आपला कोण आणि परका कोण हे तपासण्यासाठी लागू पडते. तुम्ही त्याला काय समजता ह्यावरून तुम्ही आमचे की परके, हे देखील स्पष्ट होतेच की!

In reply to by तर्राट जोकर

एवढंच काय पण तुळोजी आंग्र्यांचं आरमार पेशवा बाळाजी बाजीराव यांनि इंग्रजांच्या मदतीने बुडवलं तोही देशद्रोहच होता. पण असा देशद्रोह करणारे अनेक होते. त्यामुळे फक्त पेशव्यांकडे बोट दाखवणं हे चुकीचं आहे. तसंच संपूर्ण पेशवाईकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघणं हेही चुकीचं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

असं कसं, असं कसं? इथे लोक काही मुस्लिमांनी केलेल्या अतिरेकी कारवायांवरून सबंध मुस्लिम समाजास पुर्वग्रहदूषित नजरेने बघतात त्याचं काय मग? (मी काही पेशव्यांचंच एकमेव उदाहरण म्हणून दिलेलं नव्हतं. असे अनेक सगळीकडेच होते. असतातच.)

In reply to by अरुण मनोहर

असहमत. खरा क्रांतिकारक कधीही जाणूनबुजून निरपराध माणसांचा जीव घेत नाही. त्यामुळे एकाचा दहशतवादी तो दुस-याचा क्रांतिकारक हे म्हणणंच चुकीचं आहे.

शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज
. हे योग्यच. उत्तम.
त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या.
हित्ते चुकले बघा! (असे आपले मला वाटले हां) अशी प्रतिमा कधी उभी झाली? कशी होऊ शकेल? शिवाजीमहाराजांचा इतिहास माहित असलेल्या कोणालाही ह्यापेक्षा अधिक ठाऊक असते. महाराष्ट्रामध्ये अशी प्रतिमा सर्वसामान्याच्या मनात तयार करणे फारच कठीण काम आहे असे मला तरी वाटते. अर्थात, एका सामान्य नागरिकाच्या दृष्टीतून मी माझे मत मांडतेय. सर्वसामान्य मतदार इतकाही मूर्ख नाही हो! कदाचित तुमचा रोख एका राजकीय पक्षाकडे आणि घराण्याकडे असावा पण त्यांनीही महाराजांविषयी असे काही पसरवले होते, हे मान्य करणे कठीण आहे.
अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला?
- Really? खरोखर?
तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे.
पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे म्हणून तो दहशतवादी आहे हे कोण म्हणालेय? मला खरंच असे दिसले नाहीये, तुम्ही सांगता का?
'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे?
कधीतरी पोवाडे ऐका साहेब. लोक काव्य ऐका. महाराजांविषयीची/ बद्दलची अभ्यासू लोकांची भाषणे/ लेख ऐका, वाचा. माहिती मिळेल. अफजलबद्दलच्या गोष्टी, जयसिंगासोबतची वागणू़क, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, स्वतःच्या पोटच्या पोराला दिलेली सजा, मोरे, कित्येक घटना आहेत हो. दुसरे म्हणजे सामान्य जनमानस तुम्हांला वाटते तेवढे मूर्ख नसते. असो. शेवटी, बरं बाबा, तुमचंच खरं आणि योग्य. धन्यवाद. :)

In reply to by यशोधरा

लोक काव्य ऐका. महाराजांविषयीची/ बद्दलची अभ्यासू लोकांची भाषणे/ लेख ऐका, वाचा. माहिती मिळेल. अफजलबद्दलच्या गोष्टी, जयसिंगासोबतची वागणू़क, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, स्वतःच्या पोटच्या पोराला दिलेली सजा, मोरे, कित्येक घटना आहेत हो.
परत तुम्ही तीच तीच कॅसेट घासत आहात. महाराजांविषयी मलाच अभ्यास करायला सांगत आहात. तुम्हाला अजूनही प्रश्न कळला नाहीच असे दिसते आहे. हा प्रश्न "महाराजांनी काय केले?" हा नाही आहे हे पुन्हा एकदा सांगतो.
दुसरे म्हणजे सामान्य जनमानस तुम्हांला वाटते तेवढे मूर्ख नसते. असो
हे जे सामान्य जनमानस आहे ना ते तुमच्या अभ्यासू लोकांची भाषणे/लेख वाचत नाही. शहानिशा करायला स्वतः माहिती मिळवून वाचत नाही. हे सामान्य जनमानस फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, त्यापूर्वी निवडणुकांमधे होणार्‍या प्रचारसभा यांतून दील्या जाणार्‍या हेतुपुरस्सर (गरजेपुरत्या, अर्धवट) माहितींमधून सतत भडकवलं जातं. सोसायटीची मतं चार बाकड्यांच्या बदल्यात विकणारे, रेशनकार्ड-झोपडी-दारू-पैसा-कपडे याबदल्यात मते विकणारे, एवढ्या तेवढ्यावरून रस्त्यांवर तोडफोड, दंगल करणारे, तुमच्या आमच्या सारखे अभ्यासू लोकांची पळी धरणारे, चार भिंतीच्या सुरक्षित चौकोनात बसून निवांत चर्चा-परिसंवाद घालणारे नसतात. हेही फार जवळून पाहिलंय. त्यामुळे सामान्य जनमानस किती हुशार आहे याबद्दल खरंच चर्चा नको. कारण तो एका वेगळ्या आणि प्रदिर्घ धाग्याचा विषय आहे. अधिक माहितीसाठी "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" हे अप्रतिम नाटक बघून घ्या. "महाराजांचे आम्ही काय केले?" हा प्रश्न व त्याचे उत्तरही मिळून जाईल कदाचित. 'जाणता राजा' ला होणारी गर्दी व उपरोल्लिखित नाटकाला झालेला/होणारा विरोध/गर्दी पुरेसा बोलका आहे.

पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे म्हणून तो दहशतवादी आहे हे कोण म्हणालेय? मला खरंच असे दिसले नाहीये, तुम्ही सांगता का?
आता कसा संघिष्ट पवित्रा घेतलात! हीच तर तुम्हा लोकांची खासियत आहे. म्हणे टीपू सुलतान यांनी एक लाखाची फौज निर्माण केली होती , हिंदू स्त्रीयांवर अत्याचार करायला. अरे कीती खोटे फेकावे याला तारत्म्य तरी हवे.... टिपू सुलतान हे अत्यंत नैतिक राजे होते, आपल्या साम्राज्यातील कोणत्याही स्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये असा आदेशच त्यांनी दिला होता.बहामणी साम्राज्याला जे जमले नाही ते टिपूने केले होते.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

>>> टिपू सुलतान हे अत्यंत नैतिक राजे होते, आपल्या साम्राज्यातील कोणत्याही स्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये असा आदेशच त्यांनी दिला होता.बहामणी साम्राज्याला जे जमले नाही ते टिपूने केले होते. नानासाहेब, आता पुरे नाही का झालं? आतापर्यंत अनेक बेताल प्रतिसाद दिलेत आणि प्रत्येक प्रतिसादाची सर्वांनी यथेच्छ टिंगलटवाळी केली. तरी अजून हौस फिटलेली दिसत नाही. ती ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके वाचणे थांबवा. नाहीतर असेच बेताल प्रतिसाद देत बसाल आणि अजून टवाळी सहन करावी लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब, आता पुरे नाही का झालं? आतापर्यंत अनेक बेताल प्रतिसाद दिलेत आणि प्रत्येक प्रतिसादाची सर्वांनी यथेच्छ टिंगलटवाळी केली. तरी अजून हौस फिटलेली दिसत नाही. ती ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके वाचणे थांबवा. नाहीतर असेच बेताल प्रतिसाद देत बसाल आणि अजून टवाळी सहन करावी लागेल..>>>>>>>>>>>>>>> मी बेताल प्रतीसाद दिलेले नाहित, मी फक्त सत्यांश सांगितला. (बायदवे, राजा शिवछत्रपती, जाणता राजा ही तद्दन व्यावसायिक कलाकृती आहेत, या असल्या गल्लाभरु गोष्टींना समकालीन पुरावे समजणार्यांनी मी कोणती पुअस्तके वाचावित हे ठरवू नये.)

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

मी बेताल प्रतीसाद दिलेले नाहित, मी फक्त सत्यांश सांगितला.
नाना, आता पुरे. हसून हसून इतकं पोट दुखतंय की अफझुल्यासारखा माझा कोथळा बाहेर येईल. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका नवीन आणि अत्यंत विश्वसनीय ऐतिहासिक संशोधनानुसार, शिवाजी महाराजांनी अफझुल्याला पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून मारले नाही. अफझुयाने शिवाजी महाराजांची गळाभेट घेतल्यावर त्यांच्या कानात महाराजांनी नानासाहेबांचे प्रतिसाद सांगितले. ते ऐकल्यावर अफझुल्या इतक्या जोराने हसायला लागला की शेवटी हसताहसता तो गडाबडा लोळू लागला आणि अति हसल्यामुळे पोट दुखुन त्याची आतडी बाहेर आली व तो मेला. त्यामुळे महाराजांनी अफझुल्याला पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून मारले ही शुद्ध लोणकढी थाप आहे हे सिद्ध झाले आहे.
(बायदवे, राजा शिवछत्रपती, जाणता राजा ही तद्दन व्यावसायिक कलाकृती आहेत, या असल्या गल्लाभरु गोष्टींना समकालीन पुरावे समजणार्यांनी मी कोणती पुअस्तके वाचावित हे ठरवू नये.)
हो बरोबर. तुमचे संदर्भ ग्रंथ म्हणजे ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके हे मी विसरलेलो नाही.

मला पहिल्यांदा डिरेक्टलि विचारलाय तर डिरेक्टलि उत्तर देतो. १. वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची? हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती लागू आहेत. माझ्या आधीचा स्वतःची पोस्ट वाचण्याची तसदी घ्यावी. २. "'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?" आडून आडून नाही. जन्म आणि शिक्षणाने सांगलीकर आहे. वयाची सुरवातीची २५ वर्षे सांगलीत काढलीत. माझ्या बायोडाटाची काळजी नसावी. चांगल्यापैकी मजबूत आहे. स्वतःचे खरे नाव तरी टाका उगीच नपुंसक बड बड वगैरे लिहून स्वतःला शूर वीर नका समजू. मिरजेत दंगल झाली नाही म्हणणारे काल संध्याकाळी जन्माला आले असावेत. तेव्हा त्यांनी वेळेवर दुध पिण्याची काळजी करावी. सांगली मिरजेत गेली ६ वर्षे प्रत्येक गणेश उत्सवाआधी flagmarch होतो का होतो ते दुधाचे दात आले कि बघावेत. ३. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? अरे व्वा. शिवरायांच्या स्वराज्याची व्याख्याच तुम्ही बदलून टाका आणि स्वराज्यावारच प्रश्नचिन्ह उभे करा. आणि म्हणे मी शिवाजी भक्त. ४. फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे? नाही ना हो दाखवता येत. कारण ते बाहेरून इथे हिरवा धर्म पसरवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी आले नव्हते. त्यांनी इथे येवून आमची देवळे फोडली नाही. स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत. आपला धर्म जबरदस्तीने पसरविला नाही. आमची विद्यापीठे उध्वस्त केली नाहीत हिंदू आणि बौध धर्मग्रंथ जाळले नाहीत. मुस्लिमांनी जिथे जिथे आक्रमण ती सर्व राष्ट्रे आज मुस्लिम राष्ट्रे आहेत. ( आजच्या युगातहि हेच सुरु आहे.) पण तुमच्या पुस्तकात हे सर्व पांढर्या पानावर सफेद शाईने लिहिले असल्याने (किंबहुना त्या सगळ्या वस्तुस्थितीवर व्हाइट वॉश दिला असल्याने) काय बोलावे? इथल्या लोकसभेवर हल्ले होतात, मुंबईत बॉम्ब स्फोट होतात, निरपराध निः शास्त्र लोकांवर मशीन गन चालवली जाते आणि ते करणारे काश्मीर मुक्तीसाठी लढणारे स्वतंत्र सैनिक आहेत म्हणणाऱ्या लोकांशी काय वाद घालायचा? अहो त्या मराठी सरदारांना व्हिजन नव्हती. स्वराज्य म्हणजे काय, त्यांचा उद्देश काय , ते कशाशी खातात हे माहिती नव्हते.त्यांचा विरोध स्वतःची वतनदारी टिकवून ठेवण्यासाठी होता. त्यांना स्वतःची स्पेस हवी होती. इतकेच. पण तुमच्या दृष्टीने ते अविचारी स्थानिक वतनदार- सरदार आतंकवादीच असणार!

In reply to by दत्ता जोशी

मिरजेत दंगल झाली नाही म्हणणारे काल संध्याकाळी जन्माला आले असावेत. तेव्हा त्यांनी वेळेवर दुध पिण्याची काळजी करावी. सांगली मिरजेत गेली ६ वर्षे प्रत्येक गणेश उत्सवाआधी flagmarch होतो का होतो ते दुधाचे दात आले कि बघावेत.
२००९ च्या अगोदर कधी मोठी दंगल झालीय ओ मिरजेत?

In reply to by दत्ता जोशी

आडून आडून नाही. जन्म आणि शिक्षणाने सांगलीकर आहे. वयाची सुरवातीची २५ वर्षे सांगलीत काढलीत. माझ्या बायोडाटाची काळजी नसावी. चांगल्यापैकी मजबूत आहे. स्वतःचे खरे नाव तरी टाका उगीच नपुंसक बड बड वगैरे लिहून स्वतःला शूर वीर नका समजू.
माझे प्रश्न तुम्हाला असले तरी 'दत्ता जोशी' या व्यक्तिस वा सदस्य आयडीस व्यक्तिशः नसून आपल्या प्रतिसादांतून जे विचार पाझरले त्यास उद्देशून आहेत. ते 'डॉन बॉस्को' असते तरी तसेच असते. लगेच अंगावर घेऊन हमरी तुमरीवर यायला हा काही आठवडी बाजारातला चौक नाही. तस्मात आपला बलदंड बायोडाटा आपणापाशीच ठेवणे. योग्य ठिकाणी उपयोगी पडेल.
शिवरायांच्या स्वराज्याची व्याख्याच तुम्ही बदलून टाका आणि स्वराज्यावारच प्रश्नचिन्ह उभे करा. आणि म्हणे मी शिवाजी भक्त.
तुम्ही तुमची व्याख्या लावून जातीय तेढ वाढवा. चालु द्या.
कारण ते बाहेरून इथे हिरवा धर्म पसरवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी आले नव्हते. त्यांनी इथे येवून आमची देवळे फोडली नाही. स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत. आपला धर्म जबरदस्तीने पसरविला नाही. आमची विद्यापीठे उध्वस्त केली नाहीत हिंदू आणि बौध धर्मग्रंथ जाळले नाहीत.
अशा हिरव्या लोकांना महाराजांनी आपल्या पदरी ठेवले, विश्वासाची पदं दिलीत. असे का बरे केले असावे महाराजांनी इतक्या जहरी हिरव्या पिलावळीसोबत? तसेच इंग्रजांनीही यातले बरंच काही उपद्व्याप केलेत. तितकेच अत्याचार त्यांनीही केलेत. खरे तर भारताचा खरा इतिहासच लपवून, नष्ट करून टाकण्याचे पातक इंग्रजांना जाते. त्यांच्याबद्दल एवढ्या तीव्र भावना कधी व्यक्त होत नाहीत जेवढ्या मुस्लिम शासकांबद्दल होतात.
इथल्या लोकसभेवर हल्ले होतात, मुंबईत बॉम्ब स्फोट होतात, निरपराध निः शास्त्र लोकांवर मशीन गन चालवली जाते आणि ते करणारे काश्मीर मुक्तीसाठी लढणारे स्वतंत्र सैनिक आहेत म्हणणाऱ्या लोकांशी काय वाद घालायचा?
मी तरी नाही म्हटले की लोकसभेवर हल्ला करनारे, मुंबईत बॉम्बस्फोट करणारे, निशस्त्र लोकांवर गोळ्या चालवणारे यांना दया दाखवा. आपल्या बादशहाच्या 'सत्ते'मधे होणारी बंडाळी तत्कालिन सर्व उपलब्ध पर्यायांचा वापर करून मोडण्याचा प्रयत्न करणारा अफझल खान, दुसर्‍यांच्या भूमीवर अशांतता पसरवून देशाच्या प्रगतीस खिळ घालण्याचा प्रयत्न करणार्‍या ह्या परदेशी दहशतवाद्यांचं प्रतिक आहे ते कसं हे काही समजलं नाही. केवळ तो मुस्लिम होता, त्याने अत्याचार केले इतकंच सूत जुळवून 'तोही तसाच' आणि 'हेही तसेच' असे करत "सगळेच मुस्लिम अथपासून इथपर्यंत असेच" असा शॉर्टकट मारून तुम्हाला इतिहास व आंतरराष्ट्रीय राजकारणाची कितपत जाण आहे हे कळून आले.
त्या मराठी सरदारांना व्हिजन नव्हती. स्वराज्य म्हणजे काय, त्यांचा उद्देश काय , ते कशाशी खातात हे माहिती नव्हते.त्यांचा विरोध स्वतःची वतनदारी टिकवून ठेवण्यासाठी होता. त्यांना स्वतःची स्पेस हवी होती. इतकेच. पण तुमच्या दृष्टीने ते अविचारी स्थानिक वतनदार- सरदार आतंकवादीच असणार!
करेक्ट. कारण तेव्हा त्या लोकांना स्वतःच्या वैयक्तिक फायद्यापुढे आपल्याच लोकांवर होणारे अत्याचार दिसत नव्हते. तुम्ही वर जे वर्णिले ते काहीही त्यांच्या डोळ्यादेखत घडत नव्हते. त्यांना तसे काही वाटतच नव्हते. म्हणून आमच्यासाठी अशा नराधम शासकांचे कुकर्म डोळेझाक करणारे पराक्रमी सरदार-योद्धे हेही तेवढेच अन्यायी जेवढे तुम्हाला तथाकथित सिक्युलर हे आतंकवाद्यांइतकेच देशद्रोही वाटतात. तुम्ही त्यांना आपले म्हणून सोडून देताय ते एवढ्याच साठी की ते फक्त हिरवे नाहीत भले त्यांनी कितीही अपराध केलेले असू दे. तोच न्याय आपण अशा दहशतवादी कृत्यांमधे सामील असणार्‍या 'भटकवलेल्या' स्थानिक मुस्लिमांना लावत नाही कारण ते हिरवे आहेत. असो. आंतरजालावर वैयक्तिक काही घेत जावू नका.

अशा आतंक वाद्यांना फाशी देवू नका म्हणून याचना अर्ज करणारे. अश्या आतंकवाद्यांना फाशी दिले तर देश पेटेल म्हणणारे आणि फाशी दिल्यावर त्यांच्या मयतीला गोल टोपी घालून जमा होणारे, मतांसाठी इतिहासाला व्हाइट वॉश देवून स्वतःची अस्मिता विकणारे ..भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान जिंकले कि फटाके वाजवणारे, इराक मध्ये सद्दामला फाशी झाली म्हणून इथे रस्त्यावर मोर्चे काढणारे, बेंगळूरूत पोलिस स्टेशन जाळणारे, आणि त्यांचे लांगुल चालन करणारे कसले सेक्युलर ते तर सिक्युलरच...

In reply to by दत्ता जोशी

अशा आतंक वाद्यांना फाशी देवू नका म्हणून याचना अर्ज करणारे. अश्या आतंकवाद्यांना फाशी दिले तर देश पेटेल म्हणणारे आणि फाशी दिल्यावर त्यांच्या मयतीला गोल टोपी घालून जमा होणारे, मतांसाठी इतिहासाला व्हाइट वॉश देवून स्वतःची अस्मिता विकणारे ..भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान जिंकले कि फटाके वाजवणारे, इराक मध्ये सद्दामला फाशी झाली म्हणून इथे रस्त्यावर मोर्चे काढणारे, बेंगळूरूत पोलिस स्टेशन जाळणारे, आणि त्यांचे लांगुल चालन करणारे कसले सेक्युलर ते तर सिक्युलरच...
मुस्लिम असे काही करत नाहीत,हा तद्दन खोटा प्रचार आहे.या देशातला प्रत्येक मुस्लिम हा देशभक्तच असतो.पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारे कुठेबघितले हो जोशि? आणि याकुबच्या मयतीला आलेले लोक अत्यंत कमी होते, कुठला तरी फोटो मॉर्फ करुन चिकटवण्याची भक्तांची सवय आपल्याला ठाऊक नाही काय.?

In reply to by धनावडे

पाकिस्तान भारतात येऊन अखंड हिंदुस्तान व्हावा हे हुतात्मा नथुरामपंत गोडसेगुरुजी यांचे स्वप्न होते ना ? मोदीनीदेखील भारतमातेकडून पाकमावशीला साडी भेट दिली आहे ना ?

In reply to by दत्ता जोशी

मोदींच्या वाराणशीत गंगेत गणपती विसर्जन प्रकरणावरून संतप्त हिंदुनी पोलिस चौकी जाळली ! http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=49231442&section=top-st… बघा बघा . किती धूर झालाय !

हिंदुनी सगळा इतिहास हा फॅब्रिकेटेड लिहिला आहे. अफजलखान , समान नागरी कायदा, मुस्लिमांची धर्मांधता यावर तावातावाने लिहायला आले. पण गेल्या काही महिन्यात झालेल्या घटना ... समाजसुधारकांच्या खुनाच्या केसेस एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्याला झालेली अटक , बीफ खाल्ले असा आरोप करुन भाजपाशी संबंधित गटाने एका मुस्लिमाची केलेली हत्या , गणेश विसर्जावरून मोदींच्या वाराणशीत सुरु असलेली जाळपोळ व दंगल ... यावर मात्र कुणी धागे / प्रतिसाद लिहिलेले नाहीत. इतिहासात कोणत्या धर्माने / कोण्त्या व्यक्तीनी काही का केलेले असेना आज मला जो धर्म आवडतो मी तोच स्वीकारणार व त्यात आनंदाने रहाणार. हे स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे. ....

इतिहासात कोणत्या धर्माने / कोण्त्या व्यक्तीनी काही का केलेले असेना.... हो मान्य आहे कि पण एकाच बाजूने हे होती नसते हो. अजूनही दुसर्याबाजुच्या बहुसंख्य पब्लिकची मानसिकता तीच असेल तर हे शक्य होत नाही न! बोलणे सोपे आहे. आज मला जो धर्म आवडतो मी तोच स्वीकारणार व त्यात आनंदाने रहाणार. हे स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे. तेच तर आम्ही पण म्हणतो. एकांगी आमचा धर्म आणि तत्वज्ञान कोणावरही लादावा असा कोणताही अतिरेकी विचार आम्ही करत नाही फक्त. भारतात तरी आम्हाला सुखाने आणि शांततेने जगू द्या इतकीच मागणी आहे. अश्या कोणत्याही अतिरेकी विचारला विरोध करण्याचा विवेक संस्कार आणि बाळकडू आम्हाला मिळाली आहे त्यासाठी सिक्युलारांची गरज नाही. अजूनही सर्व जगावर आमचाच धर्म स्थापन करू त्यासाठी सर्व मार्गांचा वापर करू या विचारला खतपाणी देणारे इथे आहेत तो पर्यंत हे कसे व्हावे? सरसकट सगळे मुस्लिम वाइट आहेत असा कोणीच कधीच म्हटला नाही. शिवाजी महाराजांनी पात्रतेचा आदर करून मुस्लिमांना आणि सर्व जातीच्या लोकांना योग्य पदे दिली होती. पण म्हणून धर्मांध मुस्लिमांना जवळ केले होते असे कसे म्हणता येईल? बरं हेच पेशव्यांनी हि केले होते पण सिक्युलाराच्या दृष्टीने ते कधी सेक्युलर का होत नाहीत? ते धर्मांधआणि जातीयवादीच कसे काय? तिथे या विचारवंत आणि इतिहासकारांची वाचा का खुंटते. याचे उत्तर मिळत नाही. आफ्जुल्याच्या वधाचे चित्राला हिंदू मुस्लिम रंग द्यायला नको हा मुद्दा स्वागतार्ह. पण हा मुद्दा दंगल करणार्यांना पटवायची तुमची तयारी नाही उलट लगेच आम्हाला चित्र बदला, चित्र लावू नका हे सल्ले येतात. हा इतिहास खोटा सांगणारे विचारवंत पुढे येतात. इथे समतोल सांभाळावा असे का वाटत नाही ? यांना सेक्युलर म्हणावे कि सिक्युलर? साईबाबा, ताजुद्दीन बाबा, जंगली महाराज, शेख महम्मद, हे आम्हाला पूज्यच आहेत. साईबाबांना मुसलमान म्हणून संत पद देण्यास विरोध करणाऱ्यांविरुद्ध आवाज आम्ही पण उठवला. देशप्रेमी मुस्लिमांना आमचा कधीच विरोध नव्हता आणि नाही. राष्ट्रद्रोही जन्माने " हिंदू" असला तरी त्याला कोणताही आदर, सहानुभूती किंवा थारा आमच्यापाशी नाही. मलाही अनेक मुसलमान मित्र आहेत. आणि माझी मते त्यांनाही माहिती आहेत. आमच्या इतिहासात मुस्लिमांच्या अत्याचाराचे खोटे आअनि अतिरंजित वर्णन केले कारण असे सांगणाऱ्या समकालीन वृत्तपत्रांची कात्रणे, चलचित्र फिती पुरावे म्हणून नाहीत असे म्हणणार्यांना जगात थैमान घालणं रक्तपात दिसत नाही? ज्या गोष्टी इतिहासात लिहिल्या अगदी त्याच गोष्टी ( मुस्लिमेतर स्त्रिया पळवून नेवून अत्याचार करणे, हाल हाल करून ठार मारणे, त्यांच्या धार्मिक इमारती, मंदिरे उध्वस्त करणे, लुटमार करणे, ) आजच्या युगात घडत आहेत आणि या गोष्टींचे यांच्यातल्या कोणालाही सोयर सुटक नाही उलट त्यांना समर्थन देवून या "धर्म" कार्यासाठी भारतातून पळून जावून सामील होणार्यांचे समुपदेशन करण्यापेक्षा हिंदू कसे वाईट हे आणि एव्हडेच सांगण्यावर जो पर्यंत सिक्युलर लोकांचं कार्य मर्यादित राहील तो पर्यंत ते कधीच सेक्युलर होऊ शकणार नाहीत.पान मावा खावून नको तिथे पचापच थुंकणाऱ्या आणि या गोष्टीची शरम हि नसणाऱ्या लोकांत आणि जिथे तिथे, जाता येता असल्या निरर्थक सिक्युलर पिंका टाकणाऱ्या लोकांत माझ्यादृष्टीने काडीमात्र फरक नाही.

In reply to by दत्ता जोशी

बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी दिलीत. ..... मंदिराचे निमित्त होऊन देशभर ज्या दंगली झाल्या त्याला कोण कोण जबाबदार होते , त्याची नावेही जाहीर करून त्याना शिक्षा कधी देताय ? ( आणि हो , त्यानाही जर फाशी दिलीत आणि त्यांच्या विधीला तुमचे पन्नास हजार लोक उपस्थीत राहिले तर मी तरी ऑब्जेक्शन घेणार नाही. )

In reply to by dadadarekar

मंदिर-ईतिहास-धर्म..सगळ्याची सरमिसळ करणारे ते लोहपुरूष दिल्लीत बसले आहेत.त्यांचे शिष्य फेसबूक व गूगलवाल्यांना रेल्वे स्थानकांवर 'वाय-फाय'बसवावे म्हणून मागे लागले आहेत. 'कापून काढा',' देशाबाहेर हाकलून लावा'चे मथळे देणारे सामना वर्तमानपत्र अजूनही सुरळीत चालू आहे.

चला झाले २०० ! अभिनंदन दिकुसाहेब !! खास कल्पक ऐतिहासिक योगदानांनी केलेल्या वाचकांच्या मनोरंजनासाठी विनोदी कलाकारांचे विषेश आभार ! (अरे, नेहमीचेच यशस्वी सत्कारधुरीण हल्ली कुठे गायब झालेत ? :) ) एखाद्या लघुलेखातील एखाद्या लघुवाक्याने व्दिशतकी दीर्घचर्चा* कशी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण ;) :) * : चर्चा आमच्यावर घसरू नये यासाठी मुद्दाम 'चर्चा' या अतीसौम्य शब्दाची योजना केली आहे हे सुज्ञांस वेसांनल ;)

सध्या गरिब मुस्लिमांच्या विरोधात प्रचार चालू आहे हे इथल्या चर्चेवरुन दिसतच आहे,पण सामान्यांनी घाबरुन जायचे कारण नाही, सोशल डायनॅमिक्स आपले काम करतच असते, सध्या याच मुस्लिमद्वेषाच्या विरोधात मुस्लिम हे जनाब असौद्दीन ओवैसी साहब यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत आहेत, मुस्लिमांचा वापर आता व्होटबॅंक म्हणून करता येणार नाही हे अनेकांच्या पचनी पडत नाही आहे.

एवढंच काय पण तुळोजी आंग्र्यांचं आरमार पेशवा बाळाजी बाजीराव यांनि इंग्रजांच्या मदतीने बुडवलं तोही देशद्रोहच होता
त्यावेळचे राजे-महाराजे-सुलतान फक्त स्वतःसाठी लढत.'मी व माझे राज्य'ईतपतच.ह्या साम्राज्य विस्तारात मग कधी लढाईने व कारस्थाने करून दुसर्याला नमवायचे. शिवाजी महाराज ह्यांचा एखादा अपवाद.

चर्चा संपूर्णपणे भरकटलेला धागा वाचनमात्र करत आहोत.