Skip to main content

अशीहि एक धर्म निरपेक्शता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 03/10/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं, "जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो, "ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं, "ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही, खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
लेखनविषय:

वाचने 30318
प्रतिक्रिया 208

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

दुसर्‍या राजांविरुद्ध आणि सरदारांविरुद्ध लढाया शिवरायांनीही केल्या पण त्यांनी वाटेत इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करण्याचे भडकाऊ प्रकार नाही केले. असो.

In reply to by मृत्युन्जय

तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय घडलं या वादाला काय अर्थ आहे का मृत्यूंजय साहेब? ते जाऊ द्या. आता ह्या तमाम सेक्युलर-विरोधी लोकांना नेमकं काय हवंय तेही स्पष्ट शब्दात कळवतील तर बरं होईल. म्हणजे त्यांच्या स्वप्नातला सेक्युलर-मुक्त भारत कसा असेल?

In reply to by तर्राट जोकर

मी केवळ तुमच्या प्रतिक्रियेला माझा अल्पसा प्रतिवाद दिला. बाकी तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय घडलं आणि त्याचा काही अर्थ आहे की नाही हा वेगळ्या धाग्याचा विषय होउ शकेल त्यामुळे इथे देत नाही.

In reply to by मृत्युन्जय

मराठ्यांनी शृंगेरी शंकराचार्यांचा मठ लुटला होता . ( बरोबर ना ? ) या मठाला टिपू सुलतान मदत करत होता. अदिलशहाने चाफळ राममंदिराला जागा / अर्थसहाय्य दिले होते हे खरे आहे का ? खुद्द अफजलखान कर्नाटक दौर्‍यात असताना एकही मंदिर पाडले नव्हते. कारण तिथले हिंदू सरदार हे आदिलशाहीचे मित्र होते. माहाराष्ट्रात मात्र याच अफजलखानाने देवळे पाडली कारण महाराजाना उकसवायचे होते म्हणून. जाणकारानी माहितीत चुका असतील तर सुधारणा कराव्यात

In reply to by dadadarekar

एखाद्याला उचकावयचे राजकारण करण्यासाठी त्याच्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडणे उचित आहे???? नक्की??? हे मत फायनल ना?

In reply to by तर्राट जोकर

"सगळं काही क्षम्य असतं " तुमचे पहिले स्टेटमेंट नक्की आहे असे समजतो. हे वक्तव्य देखील फायनल समजु का? बदलणार नाही ना नक्की?

In reply to by मृत्युन्जय

अफजल खान वगैरे प्रभुतींनी मंदीरे उद्ध्वस्त केली हे धादांत खोटे आहे, समकालीन ऐतीहासिक साधानांमध्ये असा कोणताही पुरावा नाही.ते फक्त एक सरदार होते ,त्यांचा शिवाजीराजांवर कोणताही वैयक्तीक राग न्हवता.सत्तास्पर्धेत लढाया या व्हायच्याच , म्हणून अफजल खान दहशतवादी ठरत नाही.अफजल खान हा वाइचा सुभेदार होता,वाईच्या हिंदी घाटाला त्याने सुभेदार असताना मदद केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.तो हिंदूद्वेष्टा अजिबात न्हवता,प्रतापगड मोहिमेच्या वेळी वाईत त्याने जनकल्याणार्थ कोटीचंडी यज्ञ केला होता,आता मला सांगा, हिंदू द्वेष्टा माणुस हिंदूंची कर्मकांडे करेल काय?????

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

तो जान्हवेही घालायचा असाही काही पुरावा समकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये सापडेल तुम्हाला. बघा बरे जरा.

In reply to by मृत्युन्जय

अरारारा! दुर्दैवाने या धाग्याची नोंद मिपाच्या इतिहासात सर्वात विनोदी धाग्यांपैकी एक अशी होणार भौतेक!

In reply to by पैसा

च्च च्च च्च....कस्ल्या संपादिका हो तुमी...जर्रा म्हणून दुस्र्यांन्ना हसायला चानस मिळाला तर आल्या लगेच्च...वाईच थांबा की :)

In reply to by पैसा

नव इतीहासात अश्या किरकोळ चुकांकडे तुम्ही बघीतले तर तुम्ही "खिळे-मोळे आणि छन्नी " पाहिलेच नाहीत इतकेच म्हणून मी माझ्या जाग्यावर बसतो. जय मिपा जय नव इतीह्रास. जय आमची शाळा, जय आमचे फुटॉ मास्तर जय बुरदुक वाडी. इ सातवी "फ" शेवटचा वर्ग बाकडे क्र ६ (भिंतीकडून दुसरे) वल्ली चिमण (निव्वळ शारीरीक)उंची मुळे मागच्या बाकड्यावर आहेत. मी, बॅट्या आणि सगा एका बाकड्यावर आहोत. बुवा जेपीला शोधायला गेलेत आणि टक्या अंगठे धरून (स्वतःचे) उभा आहे.

In reply to by नाखु

बाकावर उभे रहा. मिपावर्चे मास्तर मास्तरणी एवढे इतिहास 'घडवतायत' आणि तुम्ही लोक टिवल्या बावल्या करताय.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

अफजल खान वगैरे प्रभुतींनी मंदीरे उद्ध्वस्त केली हे धादांत खोटे आहे, समकालीन ऐतीहासिक साधानांमध्ये असा कोणताही पुरावा नाही
याच न्यायाने नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये दंगल घडवून आणली त्यालाही काहीही पुरावा नाहीये. पण तुमच्यासारखे धर्मनिरपेक्षतेचे स्वघोषित भाट तर त्यांच्याच नावाने शंख करुन राहिलेत. हा एक न्याय शांतताप्रेमी धर्माच्या लोकांना आणि दुसरा न्याय तथाकथित आक्रमक धर्मांधांना असं वागल्यामुळेच सेक्युलर हा शब्द बदनाम झालाय.

In reply to by बोका-ए-आझम

>>>> याच न्यायाने या शब्दावर तीव्र आक्षेप. मोदींची एसआयटी समोर ज्या पद्धतीनं आणि जितक्या वेळा चौकशी झाली, सलग दहा वर्षं त्यांना याबाबत बोललं गेलं (आजही बोललं जातंच) त्या न्यायानं 'उपरोक्त प्रभृतीं'ची चौकशी झालेली नाहीये. तुलना चुकीची आहे.

In reply to by तर्राट जोकर

मी दत्ताजी नाही पण हे प्रश्न पाहून माझ्या वकुबाप्रमाणे उत्तरे द्यावीशी वाटतात म्हणून हा पोस्टप्रपंच. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? >> त्याच्या कृत्यांनी. केवळ बंड करणार्‍या सरदाराच्या मुलाला पकडायला तो आला असे नव्हे तर सर्वसामान्य रयतेला उपद्रव पोहोचवत तो आला. त्यांना भरडून काढत आला, जसे आता काही विघातक प्रवृत्ती सामान्यांना वेठीला धरुन समाजाला उपद्रव पोहोचवतात, तसेच. केवळ तो मुस्लीम आहे म्हणून त्याला सर्व दहशतवादी म्हणतात हे गृहीतक तुम्ही कशावरुन मांडत आहात. जावळीच्या मोर्‍यांबद्दलही इतिहास अभिमानाने बोलत नाही, हे लक्षात घेतले आहे का? की आपण किती सर्व(किंवाएखादाविशिष्ट)धर्मसमभावी आहोत ह्या प्रतिमेला जपण्यासाठी साध्या साध्या गोष्टीही विसरायला होते आहे? "ब्राह्मण म्हणून मुलाहिजा कोण धरु पाहतो?" हे पत्र मुळातून वाचले आहे का? नसल्यास का नाही?
फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे
ह्याहीपेक्षा अफजल प्रवृत्तीच्या कारनाम्यांना सोयीसकर आणि खपेल असा धर्माचा मुलामा देऊन स्वतःच्या पुरोगामित्वाचे डंके बडवण्याची प्रवृत्ती असणे हे फार धोकादायक आणि समाजासाठी लागलेली कीड आहे!
'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे?
अर्धवट माहिती असली वा काहीच माहिती नसली तरी उचलली बोटे, आणि लावली कळफलकाला की असे तोटे होतात. महाराजांचे समग्र चरित्र वाचावे ही अतिचशय नम्र विनंती. अजून बरीच उदाहरणे देऊन लिहिता येईल पण वेपांपेजाकोआकाबो?
वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची? 'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?
ही निरर्थक भडकाऊ बडबड म्हणून सोडून दिली..

In reply to by यशोधरा

हम का बोले और आप का समझे? तुम्हाला काहीतरी वेगळंच लिहिलेलं दिसतंय का ताई? तुम्ही मला जो महाराजांचा अभ्यास करायला सांगत आहात तो तुम्हीच केलेला बरा. तो करण्याआधी आपण ज्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देतोय त्याचाही पुरेसा अभ्यास केलात तरी पुरे. माझ्या प्रतिसादातील खालील परिच्छेद न वाचताच टंकनश्रम घेतलेले दिसत आहेतः "शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज. त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या." हिंदूवाद्यांकडून जितके हे अफजलखान-शिवाजी भेट प्रकरण रंगवले जाते, तसे जावळीचे मोरे वा 'ब्राह्मणपत्र' वा "अजून बरीच" उदाहरणे याबद्दल आज लोक तितक्याच तडफेने आणि तावातावाने बोलतात का? किती पोवाड्यांमधे ही "अजून बरीच" प्रकरणे आहेत? किती गणेशमंडळांनी ह्या "अजून बरीच" घटनांचे देखावे बनवले आहेत? किती लोक ह्या "अजून बरीच" घटनांवर चर्चा, वाद करतात? माझा प्रश्न, तीनशे वर्षांपूर्वीच्या लढाईचा आधार घेऊन 'आज' महाराजांची ज्या प्रकारे कट्टर मुस्लिम-विरोधी प्रतिमा उभी केली जाते त्याबद्दल, होता. "महाराज काय होते व त्यांनी काय केले, नाही केले" याबद्दल मी प्रश्न विचारलेले नाहीत. "महाराजांचं आपण आज काय करत आहोत?" हा मोठा प्रश्न आहे. मी मुसलमान-भक्त नाही. शिवाजींचा भक्त आहे. खोट्या प्रतिमा आपल्या दैवतावर चढवल्या जाऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप. तो तुम्हाला मुस्लिम-धार्जिणा वाटत असेल तर तुमच्या नजरेचा दोष आहे. काही लोक शब्दांचे भ्रमजाल रचून भुलभुलैया करण्यात पटाईत असतात. तुमचा प्रतिसादही त्याचेच एक उदाहरण आहे.

In reply to by तर्राट जोकर

तुमच्या मला खटकलेल्या प्रतिसादावर माझे मत मी मांडले. तुम्हीच तुमचे दोन्ही प्रतिसाद वाचा आणि परस्पर विरोधी विधाने केली आहेत ते पहा.
शब्दांचे भ्रमजाल रचून भुलभुलैया करण्यात पटाईत असतात. तुमचा प्रतिसादही त्याचेच एक उदाहरण आहे.
हायला! थ्यांक्यू! माझ्याकडे इतके शब्दसामर्थ्य होते/ आहे ह्याची मला कल्पना नव्हती! धन्यवाद :)

नेमके हेच चित्र लावण्यावरून सांगली, मिरज सारख्या संवेदनशील भागात अनेक हिंदू- मुस्लिम दंगली झाल्या आहेत.
काय बदनाम करताय ओ उगा फुकाफुकी आमच्या गावाला. बाबरीच्या वेळीही दंगली नाय झाल्या अन तरी आमचा भाग संवेदनशील? तेसुद्धा एका दंगलीपायी?

खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
केहेना क्या चाहते हो, हे मात्र आम्हाला उमजत नाही.... !!!

तसं म्हटलं तर मग कशालाच अर्थ नाही. अनेक वर्षे प्रार्थना न झालेली एक वास्तू पाडली असंही म्हणू शकतो पण तेव्हा सेक्युलर लोकांच्या नाकाला मिरच्या का झोंबतात? जगात प्रत्येकाला मृत्यू आहे. एखादा मेला दुस-याने मारलं म्हणून. काय फरक पडतो? इथे एखादाच्या ऐवजी दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची नावं घाला. मग बघा काय प्रतिक्रिया येते ती. आणि अजून एक, तुम्हाला (व्यक्तिगत घेऊ नका) ज्या गोष्टींनी फरक पडतो किंवा पडत नाही त्याच गोष्टींनी इतरांनाही फरक पडला पाहिजे असा आग्रह धरणं हेही फॅसिझममध्ये येतं. दुस-याच्या न पटणा-या मतावर प्रतिक्रिया देणं हे कधीपासून फॅसिस्ट व्हायला लागलं? अजून एक. सेक्युलर या शब्दाचा खरा अर्थ धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे सर्व धर्मांना समानता. ज्यांचा सेक्युलॅरिझमला विरोध आहे त्यांचा विरोध राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने त्याला विकृत स्वरूप दिलंय आणि sickular बनवलंय त्याला आहे आणि अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी आणि सत्तेसाठी चाललेल्या अनुनयाला (appeasement ) आहे. तुमच्या सेक्युलर मुक्त भारत या प्रश्नाचं उत्तर तेच आहे. जिथे धर्म हा प्रमुख मुद्दा असणार नाही आणि एखाद्या माणसाच्या मृत्यूची बातमी ही त्याच्या धर्मावर दिली जाणार नाही असा देश.

In reply to by बोका-ए-आझम

ज्यांचा सेक्युलॅरिझमला विरोध आहे त्यांचा विरोध राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने त्याला विकृत स्वरूप दिलंय आणि sickular बनवलंय त्याला आहे आणि अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी आणि सत्तेसाठी चाललेल्या अनुनयाला (appeasement ) आहे. तुमच्या प्रतिसादातून हे एक वाक्य अतिशय आवडलं. पण कदाचित हा विरोध 'राजकिय पक्षांच्या धार्मिक-जातीय अनुनयाला' न होता थेट एका विशिष्ट धर्माला व तो धर्म, ते सगळेच धार्मिक कसे वाइट्ट आहेत इतकं ताणण्यापर्यंत गेलाय हे तुमच्या लक्षात आहे ना? यातून दोन धर्मियांमधली तेढ व भविष्यकालिन अस्वस्थता प्रचंड गैरसमजूतीतून वाढत जात आहे हेही जाणवतंय की नाही? सामान्य लोक या बद्दल कसे विचार ठेवून आहेत हे फेसबुकीय अवतारांतून, चर्चा प्रतिक्रियांमधून सतत दिसून येतंय. सर्व समाजाचं धोरण हे "अनुनयाला विरोध" नसून "अनुनयाचे कारण असलेल्या समाजगटालाच विरोध' झाले आहे. अशा समाजघातकी धोरणास विरोध असणार्‍यांना हिंदूविरोधी हिंदू, गद्दार, सिक्यूलर अशी लेबलं चिकटवून सर्रास अपमानित केले जाते. एका विशिष्ट समाजाला जर राजकिय लोक मतांसाठी पुचकारत असतील तर त्यांचा विरोध हा त्या समाजाला संधी, शिक्षण, प्रेम व आपुलकी देऊन करावा जेणेकरून राजकिय पक्षांना असले ग्राउंडच मिळू नये. पण हा मार्ग कठीण आहे. सोपा मार्ग एका मोठ्या गटाला 'दुसर्‍या छोट्या गटामुळे तुमच्यावर अन्याय होतोय' असा प्रचार करून भडकवणे हा आहे. यात खरंच धर्मनिरपेक्ष भारत अपेक्षित आहे असं दिसत तर नाही. जागोजागी हिंदूत्ववाल्यांच्या जनगणनेच्या टक्केवारीची उलटसुलट मांडणी करून 'मुस्लिमांची संख्या वाढत आहे, ही काळजीची बाब आहे' हा धादांत खोटा प्रचार करणार्‍या सभा होत आहेत. हे सगळे कशाचं द्योतक?

In reply to by तर्राट जोकर

फक्त एकच सिद्ध करा
जागोजागी हिंदूत्ववाल्यांच्या जनगणनेच्या टक्केवारीची उलटसुलट मांडणी करून 'मुस्लिमांची संख्या वाढत आहे, ही काळजीची बाब आहे' हा धादांत खोटा प्रचार

In reply to by तर्राट जोकर

जागोजागी हिंदूत्ववाल्यांच्या जनगणनेच्या टक्केवारीची उलटसुलट मांडणी करून 'मुस्लिमांची संख्या वाढत आहे, ही काळजीची बाब आहे' हा धादांत खोटा प्रचार कसा आहे हे नाही पटलं म्हणुन म्हटलं सिध्द् करा. कारण मलातर 'मुस्लिमांची संख्या वाढत आहे, ही काळजीची बाब आहे' हे खर वाटतं बाकी तुमच्याशी सह्मत आहेच

In reply to by नया है वह

ह्याबद्दल एक सविस्तर धागा काढायला लागेल. कारण सांख्यिकिच्या बर्‍याच गमती-जमती विस्ताराने सांगाव्या लागतील. त्याची कारणे, उपायही सांगावे लागतील. थोडक्यात सांगतो ते असे की जसे कुराणाच्या आयतींचे मनाप्रमाणे लोक अर्थ लावतात तसेच सांख्यिकीचेही आहे. जरा वेळ काढून लिहिन.

In reply to by तर्राट जोकर

पण एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन करणारेच आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन करणारेच लोक सत्तेवर होते इतकी वर्षे. त्यांनी पसरवलेलं विष इतक्या सहजासहजी जाणं शक्य नाही. असा अविश्वास लोकांच्या मनात निर्माण करणं हे त्यांच्या राजकारणाला पोषक होतं म्हणून त्यांनी ते केलं. उदाहरणार्थ राजीव गांधींच्या सरकारला शाह बानो प्रकरणात सय्यद शहाबुद्दीन आणि खुर्शीद आलम खान यांच्यासारख्या कर्मठ पुराणमतवादी मुस्लिमांच्या मागे जायची काहीही गरज नव्हती. पण अरिफ मोहम्मद खान यांच्यासारख्या खरोखर पुरोगामी नेत्याचं न ऐकता राजीव सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धाब्यावर बसवून संसदेतल्या बहुमताच्या जोरावर तो निर्णय रद्दबातल ठरवला आणि मुस्लिमांच्या अनुनयाची भूमिका घेतली. हा एक चुकीचा निर्णय घेऊन काँग्रेसने स्वतःच्या पायांवर कु-हाड मारून घेतली. आता - ३० वर्षांनी जे काही धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण झालंय आणि परस्पर अविश्वास निर्माण झालाय त्याचं मूळ हे या निर्णयात आहे.

In reply to by बोका-ए-आझम

हे जे काय राज्यकर्ते सत्तेवर होते ज्यांनी असले अनुनयाचे निर्णय घेतले त्यास बहुसंख्य असलेल्या हिंदू लोकांनी का विरोध केला नाही हेही आश्चर्य वाटत आले आहे. कारण आपल्याकडे तर लोकशाही आहे ना? मतपेटीतून लोकांनी कळवले असते ना त्यांना राजकीय नेत्यांनी घेतलेला निर्णय आवडला नाही म्हणून. मग तसे का झाले नाही? एकतर मुस्लिमांच्या ह्या लांगूलचालनास विरोध करणारे मूठभर असतील किंवा जनतेला राज्यकर्त्यांचा निर्णय मान्य असेल. मुस्लिम मतपेट्या, गठ्ठा मते असली विधानं नेहमी ऐकत आलो आहोत. १३ टक्के मुस्लिम मतांवर राज्यकर्ते जर ठरत असतील तर ८० टक्के जनता काय झोपलेली राहते? ती ८० टक्के जनता आपआपल्या जाती-पातीमधे विभागून आपला बहुसंख्याकांचा फायदा घालवून बसते. तीला ह्या लांगूलचालनाबद्दल बोलायचा नैतिकच काय कायदेशीर अधिकारही राहत नाही. मग ते मूठभर ह्या बहुसंख्य जनतेला एकत्र करायला आभासी शत्रू निर्माण करतात. तो म्हणजे मुस्लिम. सरळ आहे की नाही? असो. नंतर "एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन न करणारे आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन न करणारे" सत्तेवर आल्यावर काही बदल झाला की नाही कायद्यात? लोकशाही देशात ८० टक्के लोक १३ टक्क्यांचे लाड-कौतुक स्वतःलाच पटत नसतांनाही करवून घेतात, वरून त्याविरूद्ध आकांड-तांडवही करतात हे कोडं काही केल्या सुटत नाही. हे ८० टक्के लोक नक्की कशाच्या दबावाखाली आहेत?

In reply to by तर्राट जोकर

१३ टक्के मुस्लिम मतांवर राज्यकर्ते जर ठरत असतील तर ८० टक्के जनता काय झोपलेली राहते? ती ८० टक्के जनता आपआपल्या जाती-पातीमधे विभागून आपला बहुसंख्याकांचा फायदा घालवून बसते.
याच्याशी सहमत.
तिला या लांगूलचालनाबद्दल बोलायचा नैतिकच काय कायदेशीर अधिकारही राहत नाही. मग ते मूठभर ह्या बहुसंख्य जनतेला एकत्र करायला आभासी शत्रू निर्माण करतात. तो म्हणजे मुस्लिम. सरळ आहे की नाही?
याच्याशी असहमत. उलट तथाकथित सेक्युलरांनी हिंदुत्ववादी म्हणजे मुस्लिमांचे शत्रू असा जाणीवपूर्वक प्रचार चालवला आहे. ज्याच्यामुळे नसलेली दरी निर्माण होते आहे.हिंदुत्ववाद्यांना नव्हे तर सेक्युलरांना कोणीतरी शत्रू हवा आहे. मला आठवतं जेव्हा २००४ मध्ये काँग्रेसप्रणित युपीएची सत्ता आली तेव्हा अनेक समित्या आणि मंडळांवरुन भाजपच्या काळात नियुक्त झालेल्या लोकांना हटवलं गेलं. ते ठीक आहे. ते सगळीच सरकारं करतात पण त्याच्यासाठी Detoxification हा शब्द वापरण्यात आला होता. हे कितपत बरोबर आहे? गजेंद्र चौहान यांना FTII च्या प्रमुख संचालकपदी नियुक्त करण्यावरुन विरोध होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याचा संघाशी आणि भाजपशी असलेला संबंध. तो लायक असेल किंवा नसेल पण त्याला एक दिवसही काम करु न देता निव्वळ संघाचा माणूस म्हणून त्याच्याविरूद्ध राळ उडवायची आणि मग त्याची प्रतिक्रिया उठली की वैचारिक दहशतवाद म्हणून आरडाओरडा करायचा हा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा आहे, बाकी काही नाही. काहीही पुरावा नसताना कलबुर्गींची हत्या ही हिंदुत्ववाद्यांनी केली असं पसरवलं गेलं. दाभोळकरांच्या बाबतीतही तेच झालं. पानस-यांच्या बाबतीतही समीर गायकवाडवर अजून खटला चालून त्याचा गुन्हा सिद्ध होणं बाकी आहे पण सेक्युलर लोक निकाल लावून मोकळे झालेले आहेत. बरं, त्यांच्या बाजूने निकाल लागला की न्यायसंस्था बरोबर पण विरोधात लागला की काहीतरी गडबड?याकूब मेमनच्या फाशीच्या वेळी तर याचा अतिरेक झाला. झकिया जाफरींचंही उदाहरण देता येईल. तसं म्हटलं तर नक्षलवादी आणि डावे पक्ष यांची विचारसरणी एकच आहे पण नक्षलवादी हल्ल्यानंतर जर डाव्या पक्षांकडे बोट दाखवलं तर ते सेक्युलरांना खपत नाही. यावरून हेच सिद्ध होतं की हिंदुत्ववादी सेक्युलरांना शत्रू समजायला लागले त्याच्या कितीतरी आधी सेक्युलरांनी हिंदुत्वाला स्वतःचा शत्रू मानलेलं आहे, आणि त्याच्यामागे मुस्लिमांचा कळवळा वगैरे काहीही नाही तर त्यांच्या मनात भीती निर्माण करुन त्यांना कायमचं हिंदुविरोधी बनवून ठेवणं हाच हेतू आहे.
तर "एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन न करणारे आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन न करणारे" सत्तेवर आल्यावर काही बदल झाला की नाही कायद्यात?
कायद्यात बदल होईल. त्याला काही फार लागत नाही. लोकांच्या मनोवृत्तीत बदल होणं गरजेचं आहे आणि ते कुठलाही कायदा करु शकत नाही. ते लोकच आपणहून करु शकतात.

In reply to by बोका-ए-आझम

तथाकथित सेक्युलरांनी हिंदुत्ववादी म्हणजे मुस्लिमांचे शत्रू असा जाणीवपूर्वक प्रचार चालवला आहे. ज्याच्यामुळे नसलेली दरी निर्माण होते आहे.हिंदुत्ववाद्यांना नव्हे तर सेक्युलरांना कोणीतरी शत्रू हवा आहे.
उदाहरणादाखल ही लिंक बघा: https://www.facebook.com/groups/onecrorehindugroup/ असे हजारो गृप फेसबुक, वॉट्सॅपवर आहेत. त्यातली विखारी भाषा आणि विचार बघा. हे सेक्युलरांचे तर नाही दिसत.
काहीही पुरावा नसताना कलबुर्गींची हत्या ही हिंदुत्ववाद्यांनी केली असं पसरवलं गेलं. दाभोळकरांच्या बाबतीतही तेच झालं. पानस-यांच्या बाबतीतही समीर गायकवाडवर अजून खटला चालून त्याचा गुन्हा सिद्ध होणं बाकी आहे पण सेक्युलर लोक निकाल लावून मोकळे झालेले आहेत. बरं, त्यांच्या बाजूने निकाल लागला की न्यायसंस्था बरोबर पण विरोधात लागला की काहीतरी गडबड?
असंच बरंचसं बर्‍याच मुस्लिम तरूणांबद्दल झालेय. मुस्लिम म्हणजे आतंकवादीच ह्या पूर्वग्रहदूषित भावनेतून अनेक तरूणांना विनाकारण डांबून ठेवल्या गेले, त्यांना वकिल मिळायलाही विरोध केला जातो. अतिरेकी कारवायांपायी एखाद्या मुस्लिम तरुणास अटक झाली एवढी बातमीही हिंदूत्ववाद्यांना ढोल पिटायला पुरेशी असते. अशावेळी "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" अशी पृच्छा दोन्ही बाजूने होते हेही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. आताच ७-११च्या बॉम्बस्फोटासाठी काहींना फाशी झाली तर काहींना निर्दोष सोडले. किती हिंदूत्ववाद्यांना न्यायालयाच्या त्यांना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाबद्दल खात्री व अभिमान आहे. निर्दोष सोडलेल्यांवर खरंच भरवसा ठेवतील हिंदुत्ववादी? तेच साध्वी प्रज्ञाबद्दल. किती हिंदूत्ववादी हळहळत आहेत त्या आत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत ह्या बातम्या ऐकून. अशाच बातम्या कुणा मुस्लिम तरुणाबद्दल असत्या तर कोण हळहळलं असतं का? समाजात विखार पसरला आहे. त्याला आवर घालणे महत्त्वाचे. कोण चूक कोण बरोबर च्या भांडणात आपलेच लोक एकमेकांची डोकी फोडून नुकसान करून घेतात. हाच इतिहास आहे. आणि आजुन आपण काहीही शिकलो नाही असेच म्हणावे लागेल.
सेक्युलरांनी हिंदुत्वाला स्वतःचा शत्रू मानलेलं आहे, आणि त्याच्यामागे मुस्लिमांचा कळवळा वगैरे काहीही नाही तर त्यांच्या मनात भीती निर्माण करुन त्यांना कायमचं हिंदुविरोधी बनवून ठेवणं हाच हेतू आहे.
यामुळे सेक्युलरांना काय फायदा होतो हे कळले नाही. राज्यसत्ता भोगावयास मिळते असे म्हटले तर मी वर म्हटलेले ८० टक्के जनता झोपलेली असते का हेच परत इथे लागू होते. सेक्युलरांना हिंदुत्ववादी शत्रू करून कोणता फायदा मिळेल याची हजार खरी-खोटी कारणं देता येतील. जसे विदेशी मदत, प्रतिष्ठा (?), सत्ता. किंवा विदेशी हातांकडून हुशारीने वापरल्या जाणारी प्यादी असेही म्हटल्या जाऊ शकते.
कायद्यात बदल होईल. त्याला काही फार लागत नाही. लोकांच्या मनोवृत्तीत बदल होणं गरजेचं आहे आणि ते कुठलाही कायदा करु शकत नाही. ते लोकच आपणहून करु शकतात.
हे एक बरे असते बघा. जेव्हा काँग्रेसने कायदा बदलला तेव्हा आकांडतांडव केले, स्वतः ते करायची वेळ आली की कायद्यापेक्षा लोकांच्या मनोवृत्ती बदलणे महत्त्वाचे वाटायला लागते. जेव्हा काँग्रेस कायदा बदलत होती तेव्हा लांगूलचालन न करणार्‍यांना लोकांची मनोवृत्ती बदलण्यापासून कोणता कायदा रोखत होता हेही कळले तर बरे. (काँग्रेसनेच कट करुन डांबले असा कंठशोष करणार्‍यांकडून "साध्वी प्रज्ञा अजूनही कैदेत का आहेत" याचे उत्तर मिळालेले नाही.)

In reply to by तर्राट जोकर

साध्वी प्रज्ञा कैदेत असण्याचं एक साधं कारण म्हणजे त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. जामीन देणं आणि तेही दहशतवादविरोधी खटल्यात - हे पूर्णपणे न्यायाधीशांच्या हातात असतं. असा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करता येत नाही आणि खटला अजून चालूच झालेला नसल्यामुळे साध्वी प्रज्ञा निर्दोष आहेत असं म्हणून सोडूनही देता येत नाही. काँग्रेस सरकारने कट करुन त्यांना डांबले असं मी म्हटलेलं नाही. आताच्या सरकारपुढे हे पर्याय आहेत - १. आरोप मागे घेऊन साध्वी प्रज्ञा यांना निर्दोष सोडणे २. खटला चालवून गुन्हा सिद्ध करणे किंवा सिद्ध होत नाही हे मान्य करणे. जर सिद्ध झाला, तर शिक्षा होईल, नाही झाला तर सुटका होईल. काँग्रेसने कायदा बदलला तेव्हा आकांडतांडव केले आणि स्वतःवर वेळ आली ... - रच्याकने काँग्रेसने कायदा जेव्हा बदलला तेव्हा घटनेच्या चौकटीत राहून बदलला आणि शरियत कायद्याला मुस्लिम पर्सनल लाॅचा भाग बनवून टाकलं. त्यामुळे ते आता धर्मस्वातंत्र्यात समाविष्ट होतं, जो मूलभूत हक्कांमध्ये येतो. त्याला हात लावायचा तर घटना बदलावी लागेल. आता सांगा. तुमचंच आधीचं विधान घेऊन - फक्त १३% लोकांसाठी घटना बदलायची का? आणि तेही असे लोक जे तुमच्या पक्षाला मत देणार नाहीत? त्यापेक्षा त्यांची मनोवृत्ती बदलण्यासाठी प्रयत्न करणं किंवा त्यांचं ते बघून घेतील म्हणून सोडून देणं हे जास्त constructive नाही का? कारण परत धार्मिक स्वातंत्र्य वगैरे मुद्दे येतील. तसंही जेव्हा आता AIMPLB च्या लोकांनी तीन वेळा तलाकचं समर्थन केलं तेव्हा स्त्रियांचे हक्क वगैरेंवर बोलणारे सेक्युलर्स मिठाची गुळणी धरूनच तर बसले होते. वरती तुम्ही आणखी एक मुद्दा मांडलेला आहे - ८०% जनता झोपलेली आहे का? - आपल्या देशात बहुसंख्य लोक माणूस,जात, धर्म वगैरे बघून मत देतात.आख्खं दुसरं महायुद्ध जिंकून देऊनही चर्चिलला नाकारणा-या ब्रिटिश मतदारांएवढी परिपक्वता भारतीय मतदारांमध्ये अजून आलेली नाही. पक्ष, विचारसरणी, कामगिरी वगैरे गोष्टींवर आपल्या लोकांनी लक्ष दिलं असतं तर काँग्रेसचं पानिपत व्हायला २०१४ साल उजाडावं लागलं नसतं. त्यामुळे ८०% जनता झोपली होती का? नाही. त्यांनी झोपेचं सोंग घेतलं होतं. त्यातल्या काही जणांनी अजूनही घेतलेलं आहे.
अशाच बातम्या कुणा मुस्लिम तरुणाबद्दल असत्या तर कोण हळहळलं असतं का? समाजात विखार पसरला आहे. त्याला आवर घालणे महत्त्वाचे. कोण चूक कोण बरोबर च्या भांडणात आपलेच लोक एकमेकांची डोकी फोडून नुकसान करून घेतात. हाच इतिहास आहे. आणि आजुन आपण काहीही शिकलो नाही असेच म्हणावे लागेल.
यातल्या शेवटच्या भागाबद्दल सहमत. पण आधीचा जो मुद्दा आहे - लोक हळहळण्याचा - त्यातही भेदभाव होतोच. आता दादरीमध्ये मारला गेलेला तरुण जर हिंदू असता आणि पोर्क खाण्यावरून किंवा तत्सम कारणावरून मारला गेला असता तर प्रसारमाध्यमं आणि राजकीय पक्ष यांनी आता दिलीय तीच प्रतिक्रिया दिली असती का? अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी एका हिंदू माणसाच्या परिवाराला भेटायला गेले असते का? जर तुम्ही खरंच सेक्युलर असाल तर तुम्ही मृत माणसाचा धर्म कोणताही असो, तिथे जायला पाहिजे पण तसं होत नाही. गुजरात दंगलींबद्दल इतकं बोललं जातं, लिहिलं जातं पण नंदीग्राम आणि सिंगुर इथल्या हत्या आणि अत्याचारांबद्दल काहीही बोललं गेलं नाही. कुठल्याही तहलका किंवा कोब्रापोस्टला तिकडे स्टोरी किंवा स्टिंग आॅपरेशन करावंसं वाटलं नाही. अशा selective वागणुकीमुळे लोकांमध्ये राग निर्माण होत असेल तर त्याला फक्त लोक जबाबदार नाहीत. साठपेक्षा जास्त वर्षे राज्य करणारे अाणि सेक्युलर हा शब्द घटनेत अंतर्भूत करणारेही तेवढेच जबाबदार आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

काँग्रेसला हरवा आम्ही सत्तेवर आलो की समान नागरी कायदा आणू वगैरे आरोळ्या ठोकणारे हिंदुत्वी सिंह आता सत्तेवर आल्यावर मुळूमुळू रडत कारणे सांगू लागले ! ....... मुस्लिमविरोध हा विषय वर्षानुवर्षे ( अगदी सोळाव्या शतकापासून ) हिंदु राजे / हिंदुत्वी सरकारानी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे, त्याचाच हा नमुना !

In reply to by dadadarekar

की आणलाच समान नागरी कायदा! हाकानाका!बाकी सोळाव्या शतकातलं तुम्हाला काय अकबराने व्यनि करुन सांगितलं की राणा प्रताप खरडवहीवर लिहून गेले?

In reply to by बोका-ए-आझम

संयत चर्चा व वाचनीय प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमच्या प्रतिसादांमधे बराचसा दोष प्रसारमाध्यमे व सत्ताधारी यांच्याकडे जातो. माझा रोख सामान्य जनतेच्या बदलल्या जाणार्‍या, वापरल्या मानसिकतेवर आहे. जनता कधीच जागी नसते, ती फक्त नशेत असते. नाचवणारे ज्या नशेत तीला नाचवतात त्या. मग ती नशा धर्माची असो, युद्धाची असो वा अजून कसली. नाचवणारे सेक्युलर असो, धर्मांध असो वा हिंदूत्ववादी. जनतेच्या माथी हे नशेत नाचणेच आहे. याचे परिणाम सूज्ञ असलेल्या, खर्‍या अर्थाने कायम 'अल्पसंख्यांक' असलेल्या उदारमतवादी लोकांना भोगायला लागतात. काही मुद्द्यांवर सहमती व मतभेद राहतीलच. आपली चर्चा इथेच थांबवूयात. धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

>>> हे जे काय राज्यकर्ते सत्तेवर होते ज्यांनी असले अनुनयाचे निर्णय घेतले त्यास बहुसंख्य असलेल्या हिंदू लोकांनी का विरोध केला नाही हेही आश्चर्य वाटत आले आहे. कारण आपल्याकडे तर लोकशाही आहे ना? मतपेटीतून लोकांनी कळवले असते ना त्यांना राजकीय नेत्यांनी घेतलेला निर्णय आवडला नाही म्हणून. मग तसे का झाले नाही? शहाबानो प्रकरणात घटना बदलून न्यायालयाचा निर्णय बदलण्याची प्रक्रिया १९८६ साली झाली. लोकसभेत व राज्यसभेत आपल्या राक्षसी बहुमताच्या जोरावर राजीव गांधींनी जबरदस्तीने घटना बदलून मुस्लिम स्त्रियांवर अन्याय करणारा कायदा केला. आपल्याला हा निर्णय आवडलेला नाही हे जनतेने मतपेटीतून पुढील निवडणुकात दाखवून दिले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या ४१४ वरून १९५ वर घसरली. त्याव्यतिरिक्त त्या काळात झालेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकात कॉंग्रेसने सत्ता गमाविली. १९८७-१९९० या काळात काँग्रेसने हिमाचल प्रदेश, हरयाना, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, ओरिसा अशा अनेक राज्यात सत्ता गमाविली. >>> असो. नंतर "एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन न करणारे आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन न करणारे" सत्तेवर आल्यावर काही बदल झाला की नाही कायद्यात? १९८६-२०१५ या काळात "एका विशिष्ट समाजाचं लांगूलचालन न करणारे आणि फोडा आणि राज्य करा या तत्वाचं पालन न करणारे" फक्त १९९८-२००४ या काळात आणि नंतर २०१४-़आजतगायत सत्तेत आहेत. परंतु त्यांना ही घटनादुरूस्ती रद्द करणे शक्य नाही, कारण राज्यसभेत त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत सोडाच, साधे बहुमत सुद्धा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्याच्यासाठी निव्वळ राज्यसभा नाही तर राज्यांच्या विधानसभांमध्येही बहुमत लागेल कारण हा मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्याला हा निर्णय आवडलेला नाही हे जनतेने मतपेटीतून पुढील निवडणुकात दाखवून दिले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या ४१४ वरून १९५ वर घसरली.
हे अत्यंत फारफेच्ड आहे. यामागे बोफोर्स घोटाळ्याचे आरोप हे मुख्य कारण होतं राजीव गांधींच्या पराभवामागचं.

औरंगझेबाकडे चाकरी करणारे जाट्,रजपूत्,मिर्झाराजे जयसिंग ह्यांचे काय करायचे ? शिवाजी राजेंकडे चाकरी करणार्या मुसलमान सरदारांचे काय करायचे ? सगळाच गोंधळ.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

असे ऐकुन आहे की रंग्याची चाकरी करणारे हिंदु सरदार सुद्धा जिझीया द्यायचे. हो पण नविन जावईशोधांनुसार समकालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये औरंगजेबाने जिझिया लावल्याचा काहिच पुरावा नसावा. किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो. सुरुवातीला "जिजाया" अश्या नावाने असणारा कर नंतर मुस्लिम शासनकर्त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणुन आधी जिझाया आणि मग जिझिया झाला अस्शीही नोंद कुठे मिळु शकते.

In reply to by मृत्युन्जय

असे ऐकुन आहे की रंग्याची चाकरी करणारे हिंदु सरदार सुद्धा जिझीया द्यायचे. हो पण नविन जावईशोधांनुसार समकालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये औरंगजेबाने जिझिया लावल्याचा काहिच पुरावा नसावा. किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो. सुरुवातीला "जिजाया" अश्या नावाने असणारा कर नंतर मुस्लिम शासनकर्त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणुन आधी जिझाया आणि मग जिझिया झाला अस्शीही नोंद कुठे मिळु शकते.
जिझिया कर मुस्लिम लोकोत्तर राजांनी हिंदूंवर का लादला हे आपण सम्जून घेतले पाहिजे,मुस्लिम साम्राज्य आलम दुनियेत पसरले होते, ही वेग्वेगळी साम्राज्यं फक्त ईराणच्या खलिफाला उत्तरदायी होते, खलिफाच्या तत्कालीन आदेशानुसार जे लोक ईस्लाम्ची मानवतावादी तत्वे व नैतिक मुल्ये नाकारतात त्यांना जगण्याचा हक्क न्हवता , त्यामुळे भारतातील हिंदूच्या कत्तली कराव्यात असा आदेश खलिफाने मुघलांना दिला होता,परंतु मुघल शासनकर्ते हिंदूंचे पालक असल्याने त्यांनी याला नकार दिला होता. हिंदू जरी परधर्मिय असले तरी ,ईस्लामची मुळ तत्व पाळत असल्याने ते एक प्रकारे मुस्लिमच ठरतात असा युक्तीवाद मुघलांच्या वकिलांनी खलिफाच्या दरबारात केला. पुढे फार माथेफोड झाली परंतु हिंदूंना आम्ही मारणार नाही असे बाणेदारपणे मुघलांनी खलिफाला ठणकावले. जुजबी कर लावू असे आश्वासन देऊन मुघलांनी वेळ मारुन नेली आणि आपल्या हिंदू प्रजेचे प्राण वाचवले. असे लोकोत्तर मुघल हिंदूद्वेष्टे असतील काय!!!????

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुस्लिम साम्राज्य आलम दुनियेत पसरले होते, ही वेग्वेगळी साम्राज्यं फक्त ईराणच्या खलिफाला उत्तरदायी होते, या महान जावईशोधांसाठी इतिहासाचे नवीन नोबेल पारितोषिक घडवायला पाठवले आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या महान जावईशोधांसाठी इतिहासाचे नवीन नोबेल पारितोषिक घडवायला पाठवले आहे !
या धाग्यावरील नानासाहेबचा प्रत्येक प्रतिसाद सहस्त्र नोबेल पारितोषिकांच्या योग्यतेचा आहे!

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

येस्सार..... अगदी हजार टक्के अनुमोदन. ते गुरू तेग बहादूर सिंगांना 'हिंद की चद्दर' म्हणतात ते आक्शी खोटंय.. तमाम मुघलांना तो किताब शिखांनी दिला होता. बखरींच्या लिखाणात काय तरी गडबड झाली भवतेक.

In reply to by मृत्युन्जय

जरा ही महामहीम अफजखान यांचा करूण अंत वाचा आणि विचार करा आपल्या पूर्वसूरींनी किती म्हणून पातक केले आहे ते. पुढील २५ मिनिटे मी आणि तुम्ही मिपा मौन पाळूयात कसें ! खालसा ते खुलासा. एक वैचारीक चळवळ

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, हिन्दी बोलणार्‍या महिलेनं आपला खेळणी विक्री करण्याचा व्यवसाय अंतरात्मा की आवाज ऐकून बंद केला असून ती आता भंगार खरेदी विक्रि करु लागली आहे. या कामी तिला एका संस्थळाची मदत मिळत असल्याचे समजले आहे. -मिपाटीआय

फुजींची फुल्ल दिवाळी सुरू आहे इकडे. धम्माल विनोदी धागा बनवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. दिडशे प्रतिसादांकडे जोरात घोडदौड. जेपी आणि कार्य्कर्ते... होशियार....

In reply to by तर्राट जोकर

विनोदी!!!!!! आर यु सिरीयस? भूतकालीन मुस्लिम राज्यकर्ते कसे अत्याचारी होते याची खोटी वर्णने करुन सांप्रत काळातील मुस्लिमांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे काम चालू आहे, ईतिहासात क्वचीत एखाद्या मुस्लिम राज्यकर्त्याकडून चूक झालीही असेल ,पण् त्याचे दाखले देऊन जर सांप्रत काळातील मुस्लिमांना नागरीकत्वाच्या व्याख्येतून वगळण्याची भाषा होत असेल तर त्याला विरोध होणारच, आणि माझ्यासारखे सामान्य मुस्लिम याविरोधात जन्प्रबोधन करतच राहणार.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

>>>>>>>> ईतिहासात क्वचीत एखाद्या मुस्लिम राज्यकर्त्याकडून चूक झालीही असेल आज एकही प्रतिसाद सीरियस न लिहायला एक एप्रिल आहे काय????

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

तुमचा हा प्रतिसाद सर्वथा मान्य पण.... त्यासाठी तुम्ही टकाटक खोटी धूळफेक तरी करू नका. जिझीया कराचे जे काही एक्ल्प्लेनेशन दिले आहे ते तद्दन डिनायल मोड आहे. तुमच्या ह्या विधानांना ऐतिहासिक पुरावा नाही. कश्मिर पासून खालपर्यंत मुस्लिम राज्यकर्त्यांनी धर्मांतरासाठी काय काय अनन्वित अत्याचार केलेत ते सर्व तुम्ही अमान्य कराल तर कसं चालेल? शिखांनी तर एक स्मारक बनवले आहे मुस्लिमांनी धर्मांतरासाठी कसे टॉर्चर केले गेले ते. एवढं धडधडीत सत्य तुम्ही आज मुसलमानांना वाचवण्यासाठी बोलताय ते तुमच्यावरच उलटेल. तेव्हा सांभाळून. आजच्या मुस्लिमांना स्वतःची बाजू मांडायला इतिहासाचा खोटा आधार घ्यायची काय जरूर? आजचा मुस्लिम कसा राष्ट्रभक्त आहे, धर्मापेक्षा देशाशी निष्ठा ठेवून आहे हे फक्त वागण्या-बोलण्यातून दाखवणे पुरेसे आहे. मुस्लिम-आतंकवादाचा विरोध करणे पुरेसं आहे. एमआयएम सारख्या देशतोडू पक्षांना नाकारणं पुरेसं आहे. पुर्वीचं सगळं विसरून तुम्हाला राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायचं असेल तर खुल्या दिलानं लोक इथे स्वागत करायला तयार आहेत. तुमची किती तयारी आहे ते कधी दाखवाल?

बेक्कार विनोदी धागा... :) फुटल्या गेलो आहे.. भाई आप महान है.. जिझिया करा एक्स्पेनेशन राक्स :)

खानाचे हस्सुन हसुन गडबडा लोळाल्याने आणि बेंबीच्या देठापासून हसल्याने लहान आतड्याबरोबरच मोठ्या आतड्यावरही अतिअति ताण आल्याने पोटाचा अल्सर होऊन अल्पषा आजाराचे निमित्त होऊन निधन झाले.
आयला . आमालाबी हसून हसून गडबडा लोळवलत कि वो . आणि हो खानाचे म्हणू नका खानांचे किवा खान साहेबांचे म्हणा . फुलथ्रॉटल जिनियस ला वाईट वाटायला नको . माईसाहेब कुरसूंदीकर - 'अख्खा जन्म महाराष्ट्रात घालवलेला तरीही' हवे प्रतिसादातले शब्द वाचले नैत का वो काकू ?
अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे.
अफजलखान फक्त सरदार नव्हता तर तो क्रूर आणि हिंसक होता . वाई पर्यंत येईपर्यंत त्याने वाटेत हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले . मुद्दामच तुळजापूर , पंढरपूर हि गावं नष्ट केली . आधी देवूळ आणि मग देवळातल्या मुर्त्या फोडायच्या ,मग गाय कापून टाकायची . कारण हिंदूंना गाय पवित्र . मग तिच्या रक्ताने मूर्तीला आणि देवळाला शिंपण करायचं . हिंदू स्त्रियांची अब्रू लुटायची .पुरुषांच्या कत्तली करायच्या . अशी खूप पुण्याची कामं आफ्जुल्ल्याने वाई पर्यंत येईपर्यंत केली . का ? तर तो मुस्लिम होता आणि त्याच्या दृष्टीने हिंदू काफर (अल्लाला न मानणारे म्हणजे नास्तिक ). अफजल खानची हि सगळी कृत्य धर्मांधपणाची नसून फार चांगली होती नै का . त्या मूर्ख हिंदूंना काय कळतंय हो ? विनाकारण बोंबा मारत असतात .
औरंगझेबाकडे चाकरी करणारे जाट्,रजपूत्,मिर्झाराजे जयसिंग ह्यांचे काय करायचे .
त्यांचं औरंगजेबानेच करून टाकलय . मिर्झाराजा जयसिंगाला स्वतःचा स्वार्थ साधून घेतल्यावर औरंग्याने विष देवून मारला ना .
किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो
आयला किती हसवायचं ते ? जिझिया कर हा फक्त हिंदुस्थानमध्ये नाही तर इराणमध्ये पारशानवर सुधा लावला गेला असल्याचा पुरावा आहे . टिपू सुलतानाने केरळ मधल्या हिंदुंवर अत्याचार करण्यासाठी खास फौज उभी केली होती म्हणे . त्यातले १ लाख फक्त हिंदू स्त्रियांना बाटवण्यासाठी नियुक्त केले होते . औरंग्याने दक्षिण दिग्विजयाच्या मनसुब्याने दक्षिणेत प्रवेश करताना वाटेत ७५ देवळं फोडली होती . इराणमध्ये १७ व्या शतकात शहा अब्बासचं राज्य असताना रंग्याने त्याच्या वकिलामार्फत शहा अब्बासला पत्र पाठवलं होतं . खाली त्याने 'आलमगीर' अशी सही केली . आलमगीर म्हणजे दुनियेचा राजा . तेव्हा शहाने त्याला उलट टोला दिला , 'तुझ्याच दक्षिणेला असलेल्या शिवाजी नामक राजाला तू आजपर्यंत हरवू शकला नाहीस. तू कसला दुनियेचा राजा ? ' फुलथ्रॉटल जिनियस साहेबांना मी पा चा कॉमेडी किंग खिताब देण्यात यावा . सगळी हस्तलिखितं , सगळ्या बखरी , सगळा इतिहास खोटा . भारताचा आणि इतर बाटवलेल्या देशांचा सुधा . तुमचं तेवढं खरं . आपल्या अगाध ज्ञानाने आमचं अज्ञान दाखवून दिल्याबद्दल मानाचा मुजरा .

In reply to by तुडतुडी

अफजलखान फक्त सरदार नव्हता तर तो क्रूर आणि हिंसक होता . वाई पर्यंत येईपर्यंत त्याने वाटेत हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले . मुद्दामच तुळजापूर , पंढरपूर हि गावं नष्ट केली . आधी देवूळ आणि मग देवळातल्या मुर्त्या फोडायच्या ,मग गाय कापून टाकायची . कारण हिंदूंना गाय पवित्र . मग तिच्या रक्ताने मूर्तीला आणि देवळाला शिंपण करायचं . हिंदू स्त्रियांची अब्रू लुटायची .पुरुषांच्या कत्तली करायच्या . अशी खूप पुण्याची कामं आफ्जुल्ल्याने वाई पर्यंत येईपर्यंत केली . का ? तर तो मुस्लिम होता आणि त्याच्या दृष्टीने हिंदू काफर (अल्लाला न मानणारे म्हणजे नास्तिक ). अफजल खानची हि सगळी कृत्य धर्मांधपणाची नसून फार चांगली होती नै का . त्या मूर्ख हिंदूंना काय कळतंय हो ? विनाकारण बोंबा मारत असतात .
हाय दैय्या. काय तो इतिहासाकडे पाहण्याचा महान दृष्टीकोन. कुराणाचा आपल्या मताने अर्थ लावनारे अन् इतिहासाचा आपल्या मताने अर्थ लावणारे यांच्यात काहीच फरक नाही हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद! माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर देणं अजून कोणाला शक्य झालं नाहीये. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' असले "बायकांत बहू बडबडला" टाइप स्लोगनं लिहिण्यापेक्षा दहशतवाद संपवला का नाही?

केवळ तिच्या हिंदी(मराठीमिश्रित) प्रश्नावरून तुम्ही ती मुस्लिम असल्याचा आडाखा कसा बांधलात हे दुर्लक्षित केलं आणि ती मुस्लिम आहे हे गृहीत धरलं, तर अनुभव छान. फारच थोडक्यात सांगितलात पण. आणि प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच.

In reply to by अन्या दातार

दिवाळी कधीच गेली. आता बाइने गणपतीही विकून पुढच्या दिवाळीची तयारी सुरु केली असणार.

एका गावात एक पहिलवान असतो. येता जाताना तो सतत याची त्याची मस्करी, मारपीट करत असतो गावात दोन छाडमाड टपोरी रहात असतात. त्यांच ह्या पैलवानापुढे काही चालत नाही. मग ते विरुद्ध बदला घेण्यासाठी बाकीच्या गाववाल्यांसमोर पैल्वानाची तारीफ करायला सुरुवात करतात. त्यामुळे होतं काय तर आक्ख गाव पैलवानाला शिव्याशाप द्यायला लागत. ह्यांच पाहुण्याच्या काठीने साप मारायचं उद्दिष्ट साध्य, मग ह्या दोन छाड्माड लोकांच रोजचं काम पैलवानाची तारीफ करायची. लोकं देताय शिव्या, हे करताय तारीफ. असं करणारे मिपावर २/३ जणं आहेत म्हणे. बघा लिंक लावुन.

कॅप्टन जॅक स्पॅरो - ह्यांनी म्हटले आहे, वन मॅन्स मार्टियर इझ टेररिस्ट फॉर ऑपोसिशन!!! म्हणजेच आपला तो शहीद आणि परक्याचा तो आतंकवादी ! हेच तत्व आपला कोण आणि परका कोण हे तपासण्यासाठी लागू पडते. तुम्ही त्याला काय समजता ह्यावरून तुम्ही आमचे की परके, हे देखील स्पष्ट होतेच की!

In reply to by तर्राट जोकर

एवढंच काय पण तुळोजी आंग्र्यांचं आरमार पेशवा बाळाजी बाजीराव यांनि इंग्रजांच्या मदतीने बुडवलं तोही देशद्रोहच होता. पण असा देशद्रोह करणारे अनेक होते. त्यामुळे फक्त पेशव्यांकडे बोट दाखवणं हे चुकीचं आहे. तसंच संपूर्ण पेशवाईकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघणं हेही चुकीचं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

असं कसं, असं कसं? इथे लोक काही मुस्लिमांनी केलेल्या अतिरेकी कारवायांवरून सबंध मुस्लिम समाजास पुर्वग्रहदूषित नजरेने बघतात त्याचं काय मग? (मी काही पेशव्यांचंच एकमेव उदाहरण म्हणून दिलेलं नव्हतं. असे अनेक सगळीकडेच होते. असतातच.)