Skip to main content

पी एम केअर फंड- लपवा छपवी?

लेखक शुर यांनी सोमवार, 27/09/2021 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पीएम केयर्स फंडाला एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टेंट्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम केअर्स) फंडाला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ)मध्ये विलीन करण्याची आवश्यकता नाही. पी एम केअर फंड ची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. आताच सरकारने जाहीर केलेय की तो निधी सरकारी नाही. किती पैसे जमा झाले? किती खर्च करण्यात आले? ह्याचा कुठलाही हिशेब देण्यास नकार देण्यात आलाय. कोरोना संकटात भरभरून दान देण्यात आलेल्या पैशांचे काय झाले ह्याचा हिशेब देण्याची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. ही जबाबदारी सरकार का पार पाडत नसावे?? नेमकं काय आणी का लपवण्यात येत आहे?? पैसे खर्च केलेत तर तसं देशातील जनतेस दाखवण्यात नेमकी काय समस्या आहे?? पीएम केअर्स या फंडातील ५० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न कोंग्रेसने ऊपस्थित केलेत. ह्यात गोपनीय ठेवण्यासारखे नेमके काय आहे? https://www.loksatta.com/desh-videsh/pm-care-fund-is-not-a-government-f… https://www.bbc.com/marathi/india-53838492

वाचने 22610
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

In reply to by मराठी_माणूस

Ed chya भीती नी प्रसार माध्यम मोदी सरकार विरोधी कॉमेंट प्रसिद्ध च करत नाहीत .त्यांना भीती आहे . महाराष्ट्रात सर्व सत्ताधारी नेत्यांवर ed धाड takat आहे पण एका पण bjp नेत्यांवर टाकत नाही . डोळे उघडा.पुढचे टार्गेट भक्त पण असतील. केरळ,महाराष्ट्र,बंगाल ह्या राज्यांना केंद्र सरकार टार्गेट करत आहे..तमिळ nadu केंद्रीय सत्तेला काडी ची किंमत देत नाही आणि त्या राज्यात राज्य द्रोही लोक नाहीत.. महाराष्ट्रात राज्य द्रोही लखोबा लोखंडे ची संख्या कमी नाही.. म्हणून अजुन पण ह्यांना bjp च गोड वाटत आहे.

In reply to by धनावडे

ते सेनेला विरोध करत नाहीत महाराष्ट्र ल बदनाम करत आहेत जो महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन आहे. कंगना,अर्णव,राणे,राम कदम,फडणवीस,चंपा हे सर्व मिळून महाराष्ट्र ल बदनाम करत आहेत. राज्यातील लोकांच्या समस्या,अडचणी,विकास काम,सिंचन योजना,अशा विषयावर bjp virodhi पक्ष म्हणून कधी काही बोलली आहे जा? ह्यांना त्या सुशांत ची काळजी,

In reply to by Rajesh188

आवरा, खरेच आवरा =)))) तुम्हाला खरेच कळत नाहीये की मुद्दामुन करताय ? महाराष्ट्राची बदनामी १०० कोटीच्या हप्ते वसुलीने होते, भर मुंबईत साकीनाक्यावर होणार्‍या रेप ने होते . मंत्र्याची जाहीरपणे प्रेमप्रकरणे आहेत अन तरीही त्यांना पाठीशी घातले जाते हे पाहुन होते , सरळ सरळ मंत्र्याशी गप्पा मारणार्‍या युवतीच्या आतमहत्येने होते , पोलिसांच्या देखत २ सांधुंची जमावाकडुन हत्या होते अन सरकार गप्प बसते ह्यामुळे होते ! आणि सगळ्यात जास्त बदनामी तर मेडीकल सायन्स चा अभ्यास नसणार्‍या माणसाला डब्ल्यु. एच. ओ. च्या अध्यक्षापेक्षा जास्त कळते असे म्हणण्याने होते ! आवरा , आवरा स्वतःला . हिंदुद्वेष / भाजपा द्वेष करा पण मर्यादित करा , इतकाही करु नका की स्वतःचे नुकसान होईल ! काळजी घ्या .

In reply to by प्रसाद गोडबोले

कशाला त्रागा करून घेताय? तुम्ही जे लिहिलंय ते समजणं या इसमाच्या आवाक्यातलं आहे का? '***पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता' हा वाक्प्रचार माहिती आहे ना?

In reply to by श्रीगुरुजी

त्यांना कळणार नाही , त्यांच्या आवाक्याचा बाहेर आहे हे तर अख्ख्या मिसळपाव ला माहीत आहे =)))) ते एका मागुन एक फुल्ल्टोस्स टाकत आहेत आणि आपल्याला मस्त ब्यॅटींग करता येत आहे म्हणुन मजा येत आहे , बाकी काही नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

मी स्वतःच हिंदू अभिमानी आहे हिंदू द्वेष का करेन.पण bjp ही जर हिंदू हित वादी पार्टी आहे तर ज्यांच्या सात वर्षाच्या काळात हिंदू आर्थिक ,सामाजिक ,शैशनिक बाबतीत मजबुत झाले पाहिजे होते. काँग्रेस काळा पेक्षा कमजोर झाले. चार हिंदू नाव धारण केलेले उद्योग पती श्रीमंत झाले म्हणजे हिंदू आर्थिक बाबतीत मजबुत झाले असे नाही .ते उद्योगपती आहेत देश सोडून कधी ही बाहेरच्या देशात जावून स्थायिक होतील. आकडेवारी ध्या . किती सिंचन योजना bjp काळात निर्माण झाल्या किती वीज जोडण्या शेतकऱ्यांना दिल्या. किती शेतमाल एक्सपोर्ट करण्यासाठी सरकार सक्रिय होते. ग्रामीण अर्थ व्यवस्था bjp काळात किती सुधारली. बकाल शहर आहे तशीच आहेत ,स्थलांतर bjp काळात किती कमी झाले प्रशासन भ्रष्ट आहे तसेच आहे,न्याय मिळण्यास विलंभ अजुन पण आहे तसाच आहे उलट वाढला आहे . काय देशात बदल झाला BJP येवून..फक्त राम मंदिर संपत्ती विवादात आताच एकाने आत्न हत्या केली ..राम भक्त खरा तरी कोणी आहे का.

In reply to by Rajesh188

मी स्वतःच हिंदू अभिमानी आहे हिंदू द्वेष का करेन.
दूरदृष्टी नसलेले हिंदु हिंदुंचा द्वेष करतात हे ऐतिहासिक पुराव्याने शाबित करता येण्यासारखे सर्वज्ञात विधान आहे. शिवाजी महाराजांना हरवले तो राजा जयसिंगच होता, मल्हारबा काशीविश्वनाथाचे मंदिर उभारणार होते त्यांना विरोध करणारे वाराणासीतील हिंदुच होते ! आणि हे फक्त हिंदुंच्या बाबतीच दिसुन येते , औरंगजेब मंदिरे पाडत होता तेव्हा कोण्या सुफी संताने त्याला विरोध केल्याचा पुरावा नाही, पोर्तुगीज गोव्यात इन्क्विसिशन करत होते त्याला कोणत्याही ख्रिश्चन माणासाने विरोध केल्याचे ऐकिवात नाही. इतकं कशाला, तालिबान सत्तेत आल्यापासुन कोणीतरी त्याला जाहीर विरोध केलाय का ? आत्मघातकी वृत्ती ही प्रकर्षाने हिंदुमध्येच दिसुन येते !
पण bjp ही जर हिंदू हित वादी पार्टी आहे तर ज्यांच्या सात वर्षाच्या काळात हिंदू आर्थिक ,सामाजिक ,शैशनिक बाबतीत मजबुत झाले पाहिजे होते. काँग्रेस काळा पेक्षा कमजोर झाले.
ते झालेलेच आहे , तुम्ही मोदी द्वेषाचा चष्मा घातल्याने तुम्हाला दिसत नाहीये. इथे साधा पाणीप्रीवाला सुध्दा "सर छुट्टा नही है, जी.पे कर दो , डायरेक्ट अकाऊंट मे जाता है" असे म्हणायला लागलाय . किती लोकांची बँक अकाऊट उघडलीत , किती लोकांना गॅस कनेक्शन मिळाले आहे , किती नवीन रस्ते तयार झालेत ह्याची आकडेवारी जगजाहीर आहे , फक्त तुम्ही जरा चष्मा काढुन नीट गुगल सर्च करा , तुम्हालाही नक्की सापडेल. हे पाहा आमचा क्शेत्रातील संबंधित व्यक्तीचा एक व्हिडीओ देतो उदाहरण म्हणुन : वेळ 56:30 to 58:00 पहा !
चार हिंदू नाव धारण केलेले उद्योग पती श्रीमंत झाले म्हणजे हिंदू आर्थिक बाबतीत मजबुत झाले असे नाही .ते उद्योगपती आहेत देश सोडून कधी ही बाहेरच्या देशात जावून स्थायिक होतील.
तुमचं शिक्षण काय ? हा प्रश्ण उपरोधिक नाहीय. मी सीरीयसली विचारत आहे कारण पुढील वाक्य कळणे हे त्यावर अवलंबुन आहे : तुम्ही परेटो डिस्ट्रिब्युशन विषयी ऐकले आहे का ? कोणत्याही "अन बायस्ड" आणि "फेयर" सिस्टिम मध्ये मल्टिपल आयटेरशन नंतर ८०:२० चा रुल अ‍ॅप्लाय होतो, २०% लोकांकडे ८०% संसाधने असतील आणि ८०% लोकांकडे २०% संसाधने असतील . तेच अजुन जास्त आयटरेशन्स केले तर हेच गुणोत्तर ९५:५ असे होत जाईल ! बरं हे शोधणारा कोणी आरेसेस चा किंव्वा बजरंग दल चा कार्यकर्ता नाही, हे परेटो नावाच्या एका इटालियन संशोधकाने इटली मध्ये किती लोकांकडे किती जमीन आहे ह्यावरुन शोधुन काढले आहे ! हे फक्त माणासात लागु होते असे नाही हे प्राण्यातही लागु होते , झाडातही लागु होते , एखादे झाड मोठ्ठे झाले की ते जास्त जास्त उन खाते अन अजुन मोठ्ठे होत जाते अन त्याच्या खाली सगळी झाडे छोटी छोटीच होत जातात. हे तितकेच माणासांच्या बाबतीत खरे आहे . संपत्तीचे विभाजन फक्त भारतातच स्क्युड आहे असे नाही , हे सर्व जगात आहे , अगदी कम्युनिस्ट चायना मध्ये देखील. सांगायचा मुद्दा इतकाच की भाजप असो की काँग्रेस , काही मोजक्या लोक श्स्रीमंत असणार अन काही मोजके गरीब . ही परिस्थिती अशीच रहाणार ! तुमची स्वतःची शैक्षणिक कुवत नसेल तर तुम्हाला हे कळणार नाही .
काय देशात बदल झाला BJP येवून..फक्त राम मंदिर
हीच खुप मोठ्ठी अचिव्हमेंट आहे. तब्बल चारशे वर्षांचा अन्याय पुसुन काढला आहे . तुमच्या लक्षात येत नाहीये की सर्वसामान्य भोळ्या भाबड्या हिंदुंसाठी हा किती जिव्हाळ्याचा मुद्दा होता ते . ५ ऑगस्ट्ला अक्षरः दिवाळी साजरी झालेली पाहिली आहे मी ! आजही ५ ऑगस्टला "स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असे संदेश येतात . फक्त ह्या एका मुद्द्यावर निवडणुक लढवली तरीही भाजप परत सत्तेत येतील. सर्वसामान्य हिंदुंच्या श्रध्दांचा अपमान करायची घोडचुक काँग्रेसने केली होती , आजही करत आहेत . ह्यातुन जोवर जागे होणार नाहीत तोवर काही खरं नाही त्यांचे !

In reply to by प्रसाद गोडबोले

काँग्रेसने भ्रष्टयाचार केला म्हणून ओरडणार्याच्या राज्यातच नोटांबंदीत सगळ्यात जास्त काळा पैसा गोळा झाला, तेंव्हा त्या राज्याची बदनामी होत नाही. गुजरातमध्ये 9000 कोटीचे ड्रग आल्याने बदनामी होत नाही. गायिवरून हात फिरवल्याने बीपी कमी होतो म्हणणारी बाई कोर्टाच्या तारखेला स्वतः मात्र बीपी वाढल्याचे कारण देते , तेंव्हा न्यायाची बदनामी होत नाही. मुसलमान से खतरा है असे जन्मभर म्हणणारा साधू त्याच्या शिष्याकडूनच ठार होतो , तेंव्हा त्या राज्याची बदनामी होत नाही. का, ही राज्ये बिजेपीची आहेत म्हणून का ?

In reply to by hrkorde

ह्या सगळ्याचा व शुर (वेलांटी नको तिथे गेलेली) ह्यांच्या सदर धाग्याचा संबंध काय आहे?

In reply to by प्रदीप

काळ्या मांजराचा धाग्याचा "बाजार उठवणे" हा एकमेव हेतू आहे. सोनीया ,राहुल ,रॉबर्ट , प्रियांका, मीराया , रेहनजी यांचे सरकार कुणाचाही पाठिंबा न घेता (५४३/५४३) सत्तेवर येवो आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पं.प्र, उप पं.प्र पासून विरोधी पक्षनेते (?) पर्यंत आणि त्या खाली / वर / मधे असतील ती सर्व पदे मिळोत हि ईश्वर चरणी प्रार्थना! इत्यलम!

https://www.sumanasa.com/go/TGrZn6 अडाणी ह्यांच्या मालकीच्या बंदरात करोडो रुपयांचे ड्रग आयात केले गेले .ह्या मध्ये अडाणी ग्रुप च किती आर्थिक फायदा झाला ह्याची चौकशी करण्याचे आदेश गुजरात न्यायालयाने दिले आहेत. एक तर त्या न्यायाधीश ची बदली होईल किंवा वरचे न्यायालय तो आदेश रद्ध करतील. भारतीय मीडिया दबाव मुळे काही बोलू शकणार नाही विदेशी मीडिया आणि जनतेने ह्या प्रकरणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे

In reply to by Rajesh188

विदेशी मीडिया आणि जनतेने ह्या प्रकरणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे वा ! काय सुपीक डोकं आहे ?

In reply to by Rajesh188

धागा: पी. एम. केयर ह्यावरचा. हे तुंबाडतनू इथे लिहीतायत 'अदानी, गुजरात, न्यायाधिश, मीडिया' वगैरे असंबंध विषयांवर !!

मोदी केअर फंडात किती पैसे आहेत ? गंमत म्हणून जीपे उघडले त्यात डोनेशन सेक्शन उघडला पी एम केअर सर्च केला, तर त्यावर इतकी रक्कम दिसत आहे, ही टोटल रक्कम आहे की फक्त जीपेद्वारे दिलेली रक्कम आहे ? म

In reply to by hrkorde

ही टोटल रक्कम आहे की फक्त जीपेद्वारे दिलेली रक्कम आहे ?
आम्हाला नाय बॉ म्हाईत. ते गुगल ला ईचारा की ? आमास्नी बी सांगा. गुगल जर न्हाय म्हनलं तर या हिकडं, कोर्टात केस लाउ. आमच्या गावचं भोकरे वकील लय भारी हाय . . .

In reply to by hrkorde

मोदीसरकार म्हणजे, पारदर्शक भ्रष्टाचार कसा करावा त्याचा आदर्श रुप आहे. करोनाच्या नावावर पैसे गोळा केले, करीत आहेत. करोनाच्या काळात साडेचारलाख दररोज रुग्ण होत होते, कितीतरी लोक दररोज मरत होते. तेव्हा तेव्हा पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाने काय काय दिवे लावले ते सर्व भारतीय लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. मंत्रीमंडळ आहे की नाही, खासदार आहेत की नाही, एक बोलत नाही. इतकी दहशत. लोकांनी दिलेल्या पैशाला सार्वजनिक फ़ंड म्हणायचा नाही. ती काय खासगी मालमत्ता आहे का ? अनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलीफ फंड तसंच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोश असताना नव्या फंडाची आवश्यकता का आहे ? आलेला पैसा किती आणि त्याचा विनियोग किती केला, हे लोकांना समजू नये. कोणी हिशेब मागू नये म्हणून त्यासाठीचं हा नवा फ़ंडा घोटाळा असावा असे वाट्ते. भारतीय लोकांच्या भावनेच्या आधार घेऊन लूटमार चालू ठेवा..! -दिलीप बिरुटे

In reply to by श्रीगुरुजी

विचाराला, चर्चेला घाबरायचं नाही. चूक असो की बरोबर. व्यक्तिगत तर अजिबात व्हायचं नाही. इतकं भान सार्वजनिक संस्थळावर लिहिता बोलतांना असलं पाहिजे. आपणास ते भान येणार नाही हे माहिती आहे, आपल्या प्रतिसादाकडे कायमच दुर्लक्ष करतो . एकदा सांगून पाहावे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या प्रतिसादातून वस्तुस्थिती कधीच नसते. कायमच दाह दिसतो. म्हणून विचारलं.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर्व सामान्य जनतेचा श्री मोदींवर विश्वास आहे म्हणून एवढी जळजळ होते आहे. काही इलाज नाही. करा तुम्ही पाहिजे ते बिनबुडाचे आरोप. श्री मोदींना ना आगा ना पिछा, मुलबाळ नाही स्वतः शाकाहारी गुजराती जेवण जेवतात. त्यासाठी तीन आमदारकी आणि दोन खासदारकी मधून मिळणार पगार आणि नंतर आयुष्यभर मिळणारे निवृत्तीवेतन हे सडाफिटिंग माणसाला कसेही पुरून उरेल एवढी लुटमार केलेला पैसे कुठे ठेवला आहे याचे उत्तर काही कुणाला देता आलेले नाही. बाकी तुमचे बिनबुडाचे आरोप चालू द्या जनतेला शष्प पडलेली नाही. आणि २०२४ मध्ये परत श्री मोदीच येणार आहेत. तुम्ही कितीही शंख करा

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, नमस्कार. आपल्या प्रतिसादाला फाट्यावर मारणे शक्य नाही. ब-याचदा आपले प्रतिसाद, लेखन माहितीपूर्ण असते ते नेहमीच आवडतात, आणि आपली मैत्री आहेच, म्हणून ही पोच.
सर्व सामान्य जनतेचा श्री मोदींवर विश्वास आहे म्हणून एवढी जळजळ होते आहे. काही इलाज नाही.
अजून काही लोकांचा विश्वास आहे, ही लोकशाही आहे, लोक योग्यवेळी योग्य उपचार करतात. काही लोक बाजू घेतात काही लोक व्यवस्थेतील खोट्या-अपप्रचारी गोष्टींवर आणि ज्या हेतूसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ते जर होत नसेल तर लोक हे बोलणारच. त्यालाही काही विलाज नाही. >>> करा तुम्ही पाहिजे ते बिनबुडाचे आरोप. असं कसं ! पैसे दिले तर हिशेब विचारले पाहिजे की नाही. लोकांकडून तुम्ही रडवेले चेहरे करुन, दु;खाच्या कष्टाच्या काळातला दु:खी कष्टी चेहरा करुन लोकांकडून पैसे जमा करणार आणि पैशाचे काय करीत आहात ? काय करणार आहात ? किती खर्च करणार आहात ? कुठे खर्च करणार आहात ? हे विचारलं पाहिजे की नाही. मला व्यक्तीगत वाटतं, पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे.
स्वतः शाकाहारी गुजराती जेवण जेवतात. त्यासाठी तीन आमदारकी आणि दोन खासदारकी मधून मिळणार पगार आणि नंतर आयुष्यभर मिळणारे निवृत्तीवेतन हे सडाफिटिंग माणसाला कसेही पुरून उरेल
हे असले गळेदाटू विधानी कामाची नाहीत. लोकांनी आपणास जी जवाबदारी दिलेली आहे त्यातून पळवात काढू नये. राहीलं सडाफटींग या सर्व बाता आहेत. पक्षीय निधी वाढवता येतो. पक्षीय निवडणूका जिंकता येतात. कार्यकर्ते, नेते उभे राहतात. पक्षीय पाठीशी बळ मिळतं त्यामुळे या वाक्याला काहीही अर्थ नाही. लोकांच्या गरजा, लोकांचे प्रश्न, महागाई, बेकारी, रोजगार, यावर फोकस केला पाहिजे. गादी सांभाळायला तर लोकांनी मतदान केलेले नाही.
२०२४ मध्ये परत श्री मोदीच येणार आहेत. तुम्ही कितीही शंख करा
नो प्रॉब्लम. आपण भारतीय म्हणून तो पर्यंत भिकेला लागलेले असू पण त्याची आपल्याला अजिबात काळजी नाही . लोकशाहीत लोक बजबजपुरीला कंटाळले की योग्य जागा दाखवतात हा इतिहास आहे. मोदीसेठ, कधीतरी त्या पदावरुन पायउतार होणारच आहेत. तो पर्यंत, आपण जे आपल्याला पटणार नाही त्यावर पुढेही टीका करीत राहू. एवढेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसे दिले तर हिशेब विचारले पाहिजे की नाही. लोकांकडून तुम्ही रडवेले चेहरे करुन, दु;खाच्या कष्टाच्या काळातला दु:खी कष्टी चेहरा करुन लोकांकडून पैसे जमा करणार आणि पैशाचे काय करीत आहात ? काय करणार आहात ? किती खर्च करणार आहात ? कुठे खर्च करणार आहात ? हे विचारलं पाहिजे की नाही. विचारा की. पण न विचारता, हिशेब अजिबात माहिती नसतानाही जमलेल्या पैशातून मोदींनी भ्रष्टाचार केला हा आरोप कोणत्या आधारावर केलात? आपण भारतीय म्हणून तो पर्यंत भिकेला लागलेले असू पण त्याची आपल्याला अजिबात काळजी नाही . अशी व अशासारखी भविष्यवाणी अनेक जण २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासूनच करीत आहेत. Modi as PM will be disastrous for India अशी भविष्यवाणी भ्रष्टाचारशिरोमणी मनमोहन सिंहांनी जानेवारी २०१४ मध्ये केली होती. मागील साडेसात वर्षात ना कोणी भिकेला लागले ना काही डिझास्ट्रस झाले. ज्यांना असह्य दाह होत आहे तेच अशी भविष्यवाणी करीत आहेत. म्हणून म्हणतो की ईनो, जेलुसिल, बर्नॉल वगैरे वापरा.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही मोदी ह्या विषयावर न बोलणेच उत्तम. तुमच्या पोस्ट मुळे bjp ही ब्राह्मण आणि शेठ लोकांची पार्टी आहे बाकी लोकांशी ह्या पक्षाचा काहीच संबंध नाही हा विचार प्रबळ होतो. Bjp हितासाठी तुम्ही bjp चे समर्थन करू नका.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या पोस्ट ला काही अर्थ नाही. मोदी ना मूलबाळ नाहीत म्हणजे त्यांना संपत्ती ची हाव नाही. हे आयटी सेल नी लोकांचा बुध्दी भेद करण्यासाठी सोडलेले पिल्लू आहे. माणसाच्या जीवनाचा काहीच भरवसा नाही मरण कधी ही कोणत्या ही वयात येवू शकतो. तरी माणूस हत्या,हिंसा,भ्रष्टाचार,लुटालूट करत च असतो. मोह माया सोडा असे सर्व धर्म सांगतात पण ते सांगणारे संत च करोडो रुपयांची माया जमवावतात. सर्व धर्मातील . धर्मा साठी मेल्या वर स्वर्ग मिळेल ही मौलाना सांगत असतात पण स्वतः मात्र धर्मासाठी कधीच मरत नाहीत. आसाराम बापू मोह माया सोडा सांगतात आणि करोडो ची संपत्ती जमा करतात. इर्षा,द्वेष,वर्चस्व,स्वार्थ हे गुण माणसात पक्के असतात. मोदी काय देशसेवा करण्यासाठी विविध डावपेच खेळून, साम, दाम,दंड वापरून पंतप्रधान झाले नाहीत वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांनी हे सर्व उद्योग केले आहेत ..आणि त्यासाठी पैसा हवाच तो ते कोणत्या ही मार्गाने मिळवणारच . सरळ आहे.

In reply to by Rajesh188

मी एक तुम्हाला साधा प्रश्न विचारला हे लुटालूट केलेले पैसे कुठे ठेवले आहेत याचा काहीतरी पुरावा द्या. त्यावर तुम्ही तोंड उघडायला तयार नाही. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

यांच्या आधीची 70 वर्षेही लोकनियुक्तच सरकार होते, मग त्याच्याबद्दल भाजपयाना का जळजळ होते ?

In reply to by सुबोध खरे

मध्ये कोणते पैसे खर्च केले जात आहेत.बंगाल मध्ये यूपी मधून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक केलेस घेवून गेले त्या साठी पैसा कोठून खर्च केला गेला. महाराष्ट्रात कंगना,अर्णव,राम कदम,राणे,फडणवीस काय फुकट तमाशा करत आहे का? विविध प्रसार मध्यम bjp विरूद्ध काहीच बोलत नाहीत . एक कारण ed, cbi ह्यांची भीती. आणि दुसरे कारण होणारे नुकसान गैर कायदेशीर पने bjp देत असणार

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)))) मला खरेच पुढच्या निवडणुकांच्या नंतर तुम्हाला भेटायचं आहे सर ! बाकीच्यांचे सोडून दे , बहुतांश तर अशिक्षित आहेत , त्यांच्या विधानांमध्ये काहीही लॉजिकल फ्लो नाही, केवळ मोदी द्वेष आहे अन म्हणुन उगाच NDTV BBC LOKSATTA असले काहीतरी वाचुन प्रतिसाद टाईप करत असतात. स्वतःचे अ‍ॅनालिसिस नाही, स्वतःचे डेटा कलेक्शन नाही , स्वतःची काँक्रीट लाईन ओफ थिन्किन्ग नाही . त्यांचे प्रतिसाद मजा म्हणुन, फाट्यावर मारायला म्हणुन उत्तम असतात. पण एखादे प्राध्यापकही त्यांच्या सुरात सुर मिळत आहेत हे पाहुन खरेच आश्चर्य वाटते. मला खरेच पुढच्या निवडणुकांनंतर , राहुल गांधी , ममतादीदी, मायावती, ओवेसी किंवा खणता राजा वगैरे कोणी पंतप्रधान झाल्यावर तुम्हाला भेटुन तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि तुम्ही मोठे ज्ञानी आहात का. घोकाम पट्टी करून कोणत्या तरी विषयात पदवी मिळाली म्हणजे माणूस ज्ञानी होत नाही. हमाल होतो त्याला स्वतःची काहीच बुध्दी नसते. जीवनाच्या मैदानात जो स्वतःचे साम्राज्य निर्माण करतो तो ज्ञानी असतो कोणत्या तरी कंपनी नी दिलेल्या पगार रुपी पैशावर किंवा सरकार नी दिलेले पगार रुपी पैशावर जीवन जगणारे . ज्ञानी नसतात.

In reply to by Rajesh188

तुम्ही मोठे ज्ञानी आहात का.
होय. मला मुलभुत गोष्टी कळून चुकल्या आहेत . उदाहरणार्थ म्हणुन, १. आर्थिक विषमता : मोदी सरकार असो की काँग्रेस सरकार , काही मोजक्या लोकांच्या हातात साधन संपत्ती एकवटलेली असणे हे कायमच रहाणार आहे , हा दोष भाजप सरकारचा नाही, ही नैसर्गिक स्थिती आहे. २. भारतीय न्याय्य व्यवस्था : बाकी देशात काहीही चालो पण सुप्रीमकोर्ट बहुतांश वेळा ९९.९९% वेळा न्यायाला अनुसरते , पी. एम केयर मध्ये काहीही घोटाळा आल्याचा अजुनही ठोस पुरावा नाही, तुम्ही आणि तत्सम लोकं नुसताच धुरळा उडवण्यात व्यस्त आहात . काही घोटाळा असल्याचा पुरावा आला तर मोदी सरकारला कोणीही वाचवु शकणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. पण काहीच पुरावा नसताना नुसत्याच तोंडाच्या वाफा झाडणे हे फक्त मोदी द्वेषाचे अन हिंदु द्वेषाचे लक्षण आहे बाकी काही नाही. ३. बाकी तुमचा अन्य प्रतिसाद अवांतर आहे मुद्द्याला धरुन नाही म्हणुन फाट्यावर मारता येईल पण इथेही मोदी सर्कार्चे यश दाखवुन देणारी ही बातमी पहा : India adds 28 unicorns in 2021 to take total to 66; over 3.3 lakh people employed: Nasscom मोदी ससरकार्च्या काळात भांडवल्शाहीला अन पर्यायाने उद्योजकतेला पुरक वातावरण निर्माण झाले आहे हे म्हणजे अगदी करतलामलक इतके स्पष्ट आहे. मी परत एकदा पुनरुच्छार करतो : मोदी द्वेष करा , हिंदुद्वेष करा , पण इतकाही करु नका की स्वतःची लॉजिकल थिंकिंग कपॅसिटी पर्मनंट डॅमेज होउन वैयक्तिक नुकसान होईल . तुम्ही जरा नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की भाजपा मध्ये कोणीही राहुल गांधी , प्रियांका गांधी , मंमसिंग, सोनिया गांधीं, मायावती ह्यांचा द्वेष करत नाही, कदाचित ममता , ओवेसी , कन्हैया कुमार , उमर खालिद वगैरे महान नेत्यांबद्दल थोडासा द्वेष असेल, पण तोहि इतक्या मोजक्या लोकात आहे की बाहीच्या बहुतांश लोकांना त्याचा फरक पडत नाही. दुसर्‍या बाजुला मात्र , बहुतांश विरोधक मोदी- शहा-योगी- फडणवीस / आरेसेस / हिंदु ह्यांचा द्वेष ह्या केवळ एका मुद्द्यावर एकवटलेले आहेत. असो , चालायचंच ! काळजी घ्या .

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी ***पुढे वाचली गीता . . . हे वाचून खालील पीजे चिटकवायचा मोह आवरला नाही : गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! : आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं. गीतानी कर्ररररकचू्..न ब्रेक दाबला. : वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !! गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले.. आणि..... : : : : : हुश्श.....!!! : : ::::::::....गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. व अशाप्रकारे, गाढवा पुढे ................,,,,,, वाचली गीता.

In reply to by चौथा कोनाडा

वा वा,... हलका फुलका, तरी टू द पॉइंट प्रतिसाद . ..गाढव कोण, गीता कोण , वाचली कशी सगळ कसं अगदी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ (कोणत स्फटिक ते आता विचारु नका) :)

In reply to by प्रसाद गोडबोले

समजा ही मोजकीच श्रीमंत लोक ज्यांनी साधन संपत्ती स्वतः कडेच हडप करून ठेवलेली आहे ते हिंदू आहेत. तरी राहिलेल्या हिंदू लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर ही मोजकेच बोके धार्मिक उन्माद मध्ये समूळ नष्ट होतील किती ही श्रीमंत असेल तरी. धार्मिक उन्माद तयार करून बोके कोणी खात असतात . 99% संपत्ती वर dalla मारून 99% लोकांना ( १% हे बनील बोके असतात) धर्माची ,राष्ट्र प्रेमाची अफू ची गोळी दिली जाते. हेच सिद्ध होते.

In reply to by hrkorde

१४० कोटी लोकांनी फक्त २५ रुपये दरडोई दिले तरी एवढे होतात PM Cares Fund received Rs 3,076 crore in donations in just 5 days, shows audit report https://www.indiatoday.in/india/story/pm-cares-fund-received-rs-3-076-c… 30,76,62,58,096 यापुढे १२९ कोटी (१,२९,३४, ०८,४१२) रुपये म्हणजे काहीच नाही. कशाला रडारड करताय? सर्व सामान्य जनतेचा श्री मोदींना असलेला पाठिंबा पाहून लोकांची जळजळ होते आहे. पण त्याला इलाज नाही.

कोणत्या कायद्या अंतर्गत बनवला आहे? कोणत्याच कायद्या अंतर्गत बनवला नसेल तर हा फंड च बेकायदेशीर आहे देशाच्या पंतप्रधान ना असा कोणत्याच कायद्या अंतर्गत न येणारा फंड निर्माण करून लोकांकडून पैसे जमा करण्याचा अधिकार नाही.

. कोविड काळात आमची हॉस्पिटल ड्युटी असल्याने पूर्ण लॉकडाऊनमध्ये 300 रु एडिशनल भत्ता मायबाप सरकारने दिला. मी हॉस्पिटलजवळच राहत असल्याने व पूर्वीपासूनच रोज रिक्षानेच जात असल्याने मला लॉकडाऊन करोना कशाचाच फरक पडला नाही, भत्ता मिळाला , शिवाय साथ जेंव्हा अगदी जोरात होती त्या काळात दोन टीम करून एक आड एक दिवस ड्युटी लावली होती ,म्हणजे ते दिवस घरीच आराम केला. हे 111 रु अगदी नगण्य आहेत. पी एम रिलीफ फ़ंड जीपेवर दिसला नाही.

In reply to by hrkorde

मानलं कोरडेसाहेब तुम्हाला. इतका पारदर्शक देणगीदार पाहून उद्या आमटीत कितीही गूळ टाकला तरी गोड लागणार नाही आम्हाला.

In reply to by गॉडजिला

मान गये गॉ जी सर ... जबरदस्त हसलो .. कोरडे साहेबांचा स्क्रीनशॉट "Donation of the Century" म्हणून गिनेज बुकात जावा हीच शुभेच्छा

In reply to by hrkorde

कोरडे साहेब, तुमचं कौतुक करायलाच हवं या देणगीबद्दल ! आमचा पण एक सीएम केअर्स फण्ड आहे (सीएम म्हणजे मुख्यमंत्री नाही) त्याला ही द्या ना १५१ रु (फक्त) देणगी. तपशिल व्यनिने पाठवत आहे !

In reply to by hrkorde

डॉ. गजानन विनायक कागलकर सर, लिहिण्याच्या आणि शेअर करण्याच्या भरात असे काही करता आणि पितळ उघडे पडते. काळजी घेत जा नाहीतर ह्या आयडीला देखील Modiत जावे लागेल !!

In reply to by चामुंडराय

तुम्हीपण चामुंडराय नावाने पैसे भरा व इथे पावती लावा, चामुंडीमागची खरी मुंडी कोण आहे , हे जगाला समजेल

https://pmnrf.gov.in/en/online-donation ह्याच्यावर QR code आहे , त्यावरून पीएम नॅशनल रिलीफ फ़ंडला जीपेने देणगी देता येते. पण जीपेच्या सर्च इंजिनात ते कुठेही मिळत नाही आहे. जीपेला तसे मेल लिहून मी कळवले आहे. आता तो कोड एका मोबाईलवर किंवा पीसीवर ओपन करून मग तो दुसऱ्या मोबाईलने जीपेने द्यावा लागेल. नेहरू फंडाला देणगी देण्यासाठी 2 ऑक्टोबरसारखा सुंदर दिवस नाही.

In reply to by मराठी_माणूस

सर्वच काही भरवावे लागणार आहे का? फंडाचे प्रमुख विश्वस्त भारताचे पंतप्रधान आहेत. त्याचे सचिव पंतप्रधानांच्या हपिसातील जॉईंट सेक्रेटरी आहेत. हे कारण असावे. पी. एम. एन. आर. एफच्या बाबतीतही हेच लागू आहे. अधिक माहितीसाठी माझा हा प्रतिसाद पहावा.

In reply to by मराठी_माणूस

" लॉजिकल " प्रश्न विचारु नयेत - आदेशानुसार ;-)

In reply to by नावातकायआहे

काहीही माहिती न घेता, नुसतेच इथे प्रश्न विचारण्यांत काय हंशील आहे? 'दुनिया पोहोचू शकत नाही, तिथे मी जातोय, बघा' ह्या शहाणपणापलिकडे काही नाही. तरीही ह्या खुसपटी प्रश्नाचे (जो मलातरी 'लॉजिकल' वगैरे अजिबात वाटत नाही- उलट तो अडाणीपणाचा वाटतो) उत्तर, माझ्या परीने देतो:
सत्ता बदलल्यावर फंडाचे प्रमुख विश्वस्त कोण असतील ?
Constitution of the Trust : Prime Minister is the ex-officio Chairman of the PM CARES Fund and Minister of Defence, Minister of Home Affairs and Minister of Finance, Government of India are ex-officio Trustees of the Fund. The Chairperson of the Board of Trustees (Prime Minister) shall have the power to nominate three trustees to the Board of Trustees who shall be eminent persons in the field of research, health, science, social work, law, public administration and philanthropy. [अधोरेखीकरण, माझे] माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला तरी ह्यावरून असे दिसते की पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री हेच फंडाचे नेहमी विश्वस्त रहातील. ह्यांत सध्या कोण व्यक्ति ह्या पदावर आहेत, हे इथे अप्रस्तुत (इर्रेलेवंट) आहे. प्रत्येकवेळी, केंद्र सरकारांतील ते ते पदधारी, फंडाचे विश्वस्त असतील.

In reply to by प्रदीप

काहीही माहिती न घेता, नुसतेच इथे प्रश्न विचारण्यांत काय हंशील आहे?
उत्तर देण्याचे बंधन नाही. मी किती दिडशहाणा हे दाखवण्या व्यतरीक्त काही नाही. एक साधा प्रश्न कीती झोंबला त्यावरुन सगळे लक्षात येते. रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर उत्तरे देउ नका.

In reply to by मराठी_माणूस

हा असला अडाणी प्रश्न मला झोंबल्याचे कारण काय? त्यांतून प्रश्नकर्त्याचा अडाणीपणाच (अजून तिखट शब्द वापरणार होतो, ते आवरत आहे) दिसला, बाकी काही नाही. बाकी मला तर, कुठल्याही प्रश्नांना उत्तरे द्यायचे बंधन नाही, हे मात्र खरे आहे. तुमचे चालूंदेत.

In reply to by प्रदीप

मनोरंजक थयथयाट. स्वतःची *** वापरायची नाही, कुठुन कून्थुन लिंका गोळा करायच्या आणि इथे चिकटावायच्या. उत्तरे देत चला , थयथयाटा मूळे खुप मनोरंजन होते.

In reply to by मराठी_माणूस

स्वतःची *** वापरायची नाही, कुठुन कून्थुन लिंका गोळा करायच्या आणि इथे चिकटावायच्या.
ज्या फंडाविषयी तुम्ही प्रश्न विचारत आहात, त्याच फंडांचे दुवे मी दिलेले आहेत. त्यावर माझी स्वतःची टिपण्णीही केली आहे. नुसते 'इथे पहा', तिथे पहा' असे केलेले नाही. आता, त्या दुव्यांपासूनच सुरूवात करायची नाही, तर कुठून? मी मुख्य प्रवाहातील मीडियामधे काम करत नाही, काहीतरी स्वतःची अक्कल वापरून, नसलेले काहीही शोधून काढायला. का, तसलेच काही चटपटीत पाहून व ऐकून, साधे सरळ काही समजण्याची कुवत गेलेली आहे? माझ्या उत्तरांत कसलाही थयथयाट वगैरे दिसून येत नाही. तुमच्या दुसर्‍या प्रश्नांत मात्र तद्दन मूर्खपणा दिसून येत आहे. पंप्र वगैरे दूर राहिले, हाऊसिंग सोसायटीच्या कमिटीने केलेल्या नियमावलीत, 'कमिटीचे सचिव आपल्या अखत्यारीत अमुकतमुक निर्णय घेतील' असा उल्लेख असल्यावर, 'पण, पण, पण मग पाटील त्या पदावरून पुढल्या वर्षी गेले की मग ते निर्णय कोण घेणार' असे तुम्ही बहुधा विचारत असणार. वास्तविक 'बाकी मला तर, कुठल्याही प्रश्नांना उत्तरे द्यायचे बंधन नाही, हे मात्र खरे आहे.' हे मी लिहील्यावरतीही तुम्ही आता वैयक्तिक शेरेबाजी केली आहेत, तेव्हा हे उत्तर देत आहे.

In reply to by प्रदीप

वैयक्तिक व्हायला कोणी सुरुवात केली ते बघा. जसे उत्तेर तसे प्रत्त्युतर मिळणारच. कोणाही सोम्या गोम्याचे ऐकुन घेतले जाणार नाही.

हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून स्थापन केला आहे. पण त्याची स्थापन भारतीय राज्य घटने नुसार झाली नाही. लोकसभेत किंवा कोणत्याही राज्यात परित झालेल्या कायद्याचे त्याला समर्थन नाही म्हणजे सरळ आहे बेकायदेशीर आहे.

In reply to by Rajesh188

म्हणजे सरळ आहे बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने Pm care fundला कायदेशीर ठरवलेले आहे आपलॆ बुद्धिमत्ता दैदिप्यमान आहे. श्री राहुल गांधींचे आपण गुरु होऊ शकाल

लिंक देता का म्हणजे इथे सर्वांना नाच समजेल कोणत्या कायद्याने कोणत्या कलमा अंतर्गत pm care फंड हा भारत सरकार चा अधिकृत फंड आहे . पंतप्रधान चे नाव वापरले आहे,भारत सरकार चे अधिकृत बोध चिन्ह वापरले आहे म्हणजे भारत सरकार चा ते अधिकृत फंड च असावा .