Skip to main content

मी अजिबात घाबरत नाही....! - २

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 04/10/2019 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू. तुर्तास महत्वाचे हे, की ती माझी सवय बनली आहे..... (की व्यसन?) तिला पाहिले नाही की रात्री निद्रादेवी सुद्धा माझ्यावर प्रसन्न होत नाहीत.

आमार कोलकाता - भाग ३

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 03/10/2019 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.

धो धो धो की भं भं भं (भाग २)

लेखक राजे १०७ यांनी मंगळवार, 01/10/2019 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
राजपुत्र आणि प्रधानपुत्र तळ्यातील पायऱ्या उतरून खाली गेले. सावधपणे सोनेरी महालात प्रवेश केला. महाल अतिशय सुंदर होता. पुढे पुढे जात एका दालनात ती सौंदर्यवती त्यांना दिसली. त्यांना पाहून ती घाबरून म्हणाली तुम्ही दोघे इथे कशाला आला? तो येईल आणि तुम्हाला मारुन टाकील. लवकर लवकर येथून जा. राजपुत्र म्हणाला तो कोण? ती म्हणाली तो म्हणजे राक्षस. दिवसा राक्षस आणि रात्री नाग बनून बाहेर जातो. राजपुत्रानं तिला सांगितले की काळजीचे कारण नाही, माझ्या या शूर मित्रानं त्याला खलास केले आहे. हे ऐकून ती तरूणी आश्वस्त झाली. मग तीने तिला राक्षसाने पळवून आणले असं सांगितलं. ती सुद्धा एक राजकन्या होती.

अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/10/2019 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सुख साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का? या कार्यक्रम शरण समाजात माणूस संपला तरी कार्यक्रम चुकत नाहीत. दु:ख आवरून कंबर खोचून कार्यक्रम साजरे करायचे असतात. नाहीतर लोक काय म्हणतील! याला मुळी प्रेमच नव्हतं. म्हणून कार्यक्रम करत नाही. माणूस वारला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका - २०१९

लेखक उपेक्षित यांनी मंगळवार, 01/10/2019 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय धाग्याचे काम नेहमी करायचे पण हल्ली ते अज्ञातवासात गेल्यामुळे म्हंटल आपण बघावा काढून असा एखादा धागा. तर परवा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली, त्याप्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका आणि दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. सध्या भाजपची सगळीकडे घौडदौड चालू आहे त्यामुळे भाजपच्या विजयाच्या अपेक्षेपेक्षा तो किती मोठ्ठा विजय मिळवतो हे पाहणे रंजक ठरेल. अगदी कालपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना युती होणार का ? हे विचारले जात होते. स्वतः अमित शहा आणि पप्र.

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 30/09/2019 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात. एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली.

कारभारीण

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी सोमवार, 30/09/2019 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शकतो याचं नेहमीच कोडं पडायचं तिला. सगळेच त्याच्या प्रेमात. अर्थात गाऱ्हाणे सांगणारेही असंख्य. पण गाऱ्हाणेही त्यालाच सांगतात याचा अर्थ तो ते समजून घेऊन सोडवू शकतो म्हणूनच. त्याला भेटायला यायचं म्हणून एका तालात पावलं टाकणारे, त्याच्या नामाचा जयघोष करणारे वारीतले हजारो जीव बघितले कि उर दडपून जायचा एखाद्याचा. पण तो तो आहे. आपल्या अगणित लेकरांना पाठीशी घालणारा, त्यांच्या असंख्य चुका पदरात घेणारा आणि तरीही त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा. द्वारकाधीश श्रीकृष्ण. आणि ती?

सह्याद्रीतले हिरे माणके

लेखक Yogesh Sawant यांनी सोमवार, 30/09/2019 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किनारपट्टीला समांतर पसरलेली जी डोंगररांग आहे तिला आजकाल Western Ghat असं म्हणतात. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागापासून सुरु झालेली हि डोंगररांग महाराष्ट्राच्या पलीकडे गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. पृथ्वीवरच्या सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी हि एक जागा आहे. त्यामुळे हे आहे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. काहींसाठी त्यांच्या घरापासून काही तासांच्या अंतरावर असलेला एक अमूल्य ठेवा. काहींसाठी वीकएंड पिकनिक स्पॉट. काहींसाठी महाराष्ट्राचा आणि त्यामुळे देशाचा जाज्वल्य इतिहास. हे सगळं तर आहेच.