या काही दिवसात शहरात एकामागे एक घडलेल्या पाच हत्येने बरीच खळबळ माजून गेली. दोन-तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात, एकामागून एक असे पाच खून म्हणजे, खूप मोठी गोष्ट होती. शहरात काही मोजकीच रहदारीचे ठिकाणे होती. हेरून त्याच ठिकाणी खून होणे, म्हणजे खुनी शहरातीलच असावा. आणि त्याला शहराची इत्यंभूत माहिती असावी. हत्या करताना प्रत्येक हत्येमागे एक काहीतरी विचारमालिका लपलेले असावी. कारण हत्यारा मानेच्या पाठीमागून सुरा फिरवून तो गळ्यापर्यंत आणायचा. म्हणजे गळा पूर्णपणे गोल भागात चिरलेला असायचा. त्यामुळे खून झालेल्या इसमाचे डोके केवळ कंठाच्या हाडावरच टेकलेले असायचे.