जरी आंधळी मी तुला पाहते
एव्हाना मन की बात सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. पण हे गाणं ऐकलं ..जरी आंधळी मी तुला पाहते ...आणि वाटलं अरेच्चा ! हे तर मन की आँख! दिव्यदृष्टीच म्हणा ना!
महाभारतात महर्षी व्यास संजयास दिव्यदृष्टी बहाल करुन जातात; कुरुक्षेत्रावरील वृत्तांत धृतराष्ट्रास कथन करण्यासाठी. गांधारीची दिव्यदृष्टी मात्र तशी बक्षीसपात्र नाही. अंध धृतराष्ट्राशी लग्न होणार समजताच आजन्म डोळ्यावर पट्टी बांधुन घेण्याच्या कठोर प्रतिज्ञेत स्वतःला बद्ध केलं तिने. त्या साधनेतुन, तपश्चर्येतून ती कमावलेली.
मिसळपाव