Skip to main content

मधुशाला - अर्थ आणि संदर्भ

लेखक धनंजय यांनी सोमवार, 21/01/2008 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच मधुर जाफरी यांच्या पुस्तकात एक वाक्य वाचून आश्चर्य वाटले. (एका हिंदी शिक्षकाबद्दल) "मला वाचनाचे प्रेम आहे हे जाणून, त्याने मला आमच्या अभ्यासक्रमाच्या अगदी बाहेरील हिंदी कादंबर्‍या आणि कविता वाचायचे सुचवले, ... जशी आमच्या स्वातंत्र्यलढ्याविषयीची हरिवंश राय बच्चनांची कविता, मधुशाला." (पुस्तक नाव : क्लाइंबिंग द मँगो ट्रीज़, २००५) "मधुशाला" ही हरिवंश राय बच्चनांची कविता मी पूर्ण कधीच वाचलेली नाही. पण काही थोडी कडवी मन्ना दे यांनी चाल लावून म्हटली आहेत ती ऐकलेली आहेत - तीही शब्दांच्या अर्थाकडे लक्ष न देता त्या मस्त ओघात गुंग होऊन डुबल्यासारखे, आणखी काही नाही.

"मैफिल"

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी सोमवार, 21/01/2008 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
हे तिचेच काव्य सारे ही तीचीच कविता मांडतो मैफिलीत आठवणींच्या मीच वक्ता मीच श्रोता होते माझेच स्वप्न खोटे कुणाचा राग कशास धरावा गाळुनी असहाय आसवे चार मैफिलीचा बेरंग कशास करावा येणार नाही ती हे ज्ञात असुनी वाट तिची पाहण्यास्तव जगतो रात्री चिंब भिजलेल्या पापण्या जगासमोर दिवसा कोरड्याच ठेवतो ओंजळीत साठऊनी थेंब थेंब तिला तिच्याच आठवणीत चिंब भिजतो अर्घ्य देऊनी प्रत्येक श्वासाचे मैफिल आयुष्याची रंगवतो

धन्यवाद..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 21/01/2008 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती, ऋषिकेश, तात्या, डॉन, धोंडोपंत, विनायक, चतुरंग.. आपण दिलेल्या धिराबद्दल मी आपली आभारी आहे. मी जेव्हा विणीचा पहिला धागा सुरू केला तेव्हा मिपावर नुकतीच आणिबाणी जाहिर झाली होती. बरेच वाद्-विवाद गाजत होते. मिपावर नियमित येत असल्यामुळे मला आंतरजालावरिल हे घर वाटू लागले होते आणि अजूनही वाटते. मी स्वतः कोणत्याही प्रकारच्या वादविवादात कधी पडले नाही पण इथले वातावरण हलके व्हावे या दृष्टीने मी तो धागा चालू केला होता. अपेक्षेपेक्षा खूपच जास्ती मिपाकरांनी त्याला प्रतिसाद दिले. खूप चारोळ्या लिहिल्या गेल्या. भाग दुसरा करावा लागला.नंतर तिसराही करावा लागला.

इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/01/2008 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू लाचार ती असावी, तो, उंबरा असावा माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही' दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा - इलाही जमादार
Taxonomy upgrade extras

इ-पत्रातून पुढे ढकललेल्या साहित्याबाबत...

लेखक सरपंच यांनी रविवार, 20/01/2008 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, काही मंडळी येथे पुढे ढकललेल्या विरोपांतून वगैरे आलेले साहित्य (विशेष करून काव्य,) इथे प्रकाशित करतात. मिसळपावला या प्रकारच्या साहित्याचे वावडे नाही. परंतु जर इथे प्रकाशित होणारे साहित्य हे सभासदाव्यतिरिक्त इतर कुणाचे असेल तर सदर साहित्य प्रकाशित करणार्‍या सभासदाने मूळ साहित्यिकाचे/लेखकाचे/कवीचे/गझलकाराचे नांव जाहीर करणे अत्यावश्यक आहे. जर हे नांव अज्ञात असेल तर संबंधित लेखनाच्या शेवटी 'मूळ लेखक/कवी अज्ञात!' असा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे.

पिंक स्लिप

लेखक सुनील यांनी रविवार, 20/01/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
"हा, सरे...सरे...हां हां सरे.....", असे म्हणून बालाने फोन खाली ठेवला आणि मागे वळून पाहिले. मागे त्याचा सहकारी देशपांडे उभा होता. सकाळचे अकरा वाजले होते. ही त्यांची नेहेमीची चहा पिण्याची वेळ. बाला उठला आणि दोघेही कँटीनच्या दिशेने जाऊ लागले. "घरचा फोन काय?", देशपांडेने चहा पिता पिता विचारले. "हो. काल फोटो दाखवला होता ना तुला? तिच्याबद्दलच!

गद्य्-काव्य

लेखक वेडा यांनी रविवार, 20/01/2008 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
अंत आणि आठवणी ह्यांत जास्त चांगले कोण ? काल रात्री मी अन "ती"याच गोष्टीवर बोलत होतो आता विचारु नका "ती" कोण म्हणुन तुम्ही सगळे तिला "ती" म्हणुनच ओळखता आणि तिच्यामध्येच स्वतःचे प्रतिबिंब पहाता पण माझी "ती" आगळी आहे .. तुम्हा सगळ्यांच्या तिच्यापेक्षा वेगळी आहे असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणा..

शाकंभरी पौर्णिमा = मंगळवार २२ जानेवारी २००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 20/01/2008 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या वर्षी शाकंभरी पौर्णिमा मंगळवार दिनांक २२ जानेवारी २००८ रोजी येत आहे. या दिवशी विविध पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. असे म्हणतात की प्राचीन काळी एकदा महाभयंकर दुष्काळ पडला असतांना सर्व ऋषिमुनिंनी देवीला साकडे घातले आणि तो दुष्काळ निवारण्याची विनंती केली. त्यावेळी देवीने पर्जन्यवृष्टी करून धरती पुन्हा हिरवीगार केली. त्यावेळी धरतीवरती विविध पालेभाज्या उगवल्या.

श्वासालाही उघाणं आलं.

लेखक raje1981 यांनी रविवार, 20/01/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज श्वासालाही उघाणं आलं तिला मिटीत घेताना चुकत होते ठोके काळ्जाचे तिला मिठीत घेताना तिचा श्वासही थाबंला आज त्या भेटीच्या वाद्ळांत जराही नाही लवल्या पापण्या तिला डोळ्यात भरताना. आज मनालाही उधाणं आलं तिचा हात मुठीत धरताना थरथरत होते काळीज तिचे कुशीत माझ्या शिरताना हलकी लहर जरी आली तरी तो वादळांचा भास होता आज काळजातही चमक्ल्या विजा तिला जवळ घेताना. मग डोळ्यांनाही उधाण आलं ओठ तिचे पाहताना मग मान वळवली तिने एका श्वासाचं अतंर असताना कापत होते ओठ तिचे पून्हां मागे वळून पाहताना मग ओठांनीच ओठांना शातं केल डोळे बंद असताना.
Taxonomy upgrade extras