टी-20 मध्ये आम्हीच राजे: भारताचा विश्वविजय
हुश्श.. जिंकलो एकदाचे.! सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले म्हणायचं. जे आजवर विश्व क्रिकेट मध्ये कोणत्याच संघाला जमलेलं नव्हतं.
तश्या अनेक गोष्टी आहेत ज्या भारतीय क्रिकेट आणि वर्ल्ड क्रिकेट मधे पहिल्यांदाच घडत आहेत. पहिली म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे टी-20 वर्ल्डकप defend करणारा भारत पहिला संघ बनला. दुसरं, टी–20 WC होस्ट करणारी टीम पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकली. तीन, २०२३ ची ओडीआय WC फायनल तसेच साऊथ आफ्रिकेसोबत हरल्यामुळे पानौती ठरवल्या गेलेल्या अहमदाबादच्या मोटेरा म्हणजेच नरेंद्र मोदी मैदानावर आपण पहिल्यांदा महत्वाचा सामना जिंकलो.
मिसळपाव