Skip to main content

७ लेयर्स बार (बर्फी)

लेखक सानिका पटवर्धन यांनी मंगळवार, 10/11/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
गेली २ वर्षे मी मिपा ची चाहती आहे. पण लेखन वगैरे आपला प्रांत नसल्यामुळे कधी तसा विचार केला नाही. अहो, शाळेत कधी निबंध धड लिहिता आला नाही. पण आज मी जी पाककृती इथे देत आहे ती जेव्हा मी चाखली आणि स्वतः करून पाहिली, तेव्हाच ठरवले की मिपावर ही पाककृती शेअर करायची. ही पाककृती माझ्या मित्राच्या आत्याची आहे.

सामन्‍यातील बकवास अग्रलेख

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 10/11/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्‍या सामन्‍यातील बकवास अग्रलेख पाहिला का? शिवसेना स्‍वतःच्‍या कर्तृत्‍वाचा इतिहास किती दिवस लोकांच्‍या कानीकपाळी ओरडून सांगणार आहे. आताचे काय ते बोला... कालच्‍या घटनेच्‍या वेळी कुठे गेले तुमचे मराठी प्रेम?

फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/11/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या? साधारणता: १९८० च्या दशकात ज्यावेळी दुरदर्शनवर वाहिन्यांचा सुळसूळाट चालू झालेला नव्हता त्या काळी दिल्ली दुरदर्शनवर वरचेवर भारतीय फिल्म डिव्हीजन ने तयार केलेल्या काही कार्टून फिल्म दाखवल्या जायच्या. सदर फिल्म्स ह्या देशभक्तिपुर्ण, अर्थपुर्ण, संगीतमय व काहीतरी उद्दात हेतू असणार्‍या होत्या.

असंबध्ध

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 10/11/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
असंबध्ध मुंबईच्या लोकल्स लोखंडी असतात.. म्हणुन प्रवासी का एक्मेकाच्या बोकांडी बसतात? नाहि आज सण तरी भोजनात पुरण वरण.. नाहि वाळवंट तरी का बांधता उरण ला धरण समुद्रात मासे खुप छान पोहत होते म्हणुन का रस्तावर कोणी पुस्तके विकत होते? सत्य नारायणाच्या पुजेला घातला घाट जेवायचा? आम्हि पण ठरविला आहे बेत डोहाळ जेवणाचा तुमच्या नातवाच तोंड एकदा आम्हाला पाहु द्या.. अन दुस~या लग्नाचा बार आम्हाला ऊडवु द्या १३ वा झाला तरी अजुन सुतक उतरत नाहि... कितिहि साखर घाला बासुंदी गोड होत नाहि उघडले चपटीचे बुच प्यायला कसा ढस्साढस्सा चमचा भर ईनो पाण्यात कसा फुलला फस्सा फस्सा एक पोरगी नाहि पटत ,म्हणे लग्न करा.. विम

◦हिंदी ही राष्ट्रभाषा? - एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम

लेखक सखाराम_गटणे™ यांनी मंगळवार, 10/11/2009 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
◦हिंदी ही राष्ट्रभाषा? - एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम http://amrutmanthan.wordpress.com/2009/07/21/15/ --------------------------------------- भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना जी वस्तुस्थिती आहे तिची स्पष्ट माहिती असावी, म्हणून मुद्दामच मी हा लेख लिहीत आहे. भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही एका भाषेचा उल्लेख ’राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही.

' राजमाचि येथे जायचे ठरवत आहे.

लेखक मॅन्ड्रेक यांनी मंगळवार, 10/11/2009 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी ' राजमाचि येथे जायचे ठरवत आहे. सोबत १० लहान मुले आहेत ( वय ६-१०) सन्त्रो , कींवा इन्डिका जावु शकेल का? अधिक माहिति हवी आहे. धन्यवाद.

३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्रा‌इव्ह

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/11/2009 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्रा‌इव्ह म्हणजे माझा जिव कि प्राण आहे.. पॉकेट सा‌ईज डायरी च्या आकाराच्या त्या खजिन्या मघे माझ्या अनंत अश्या गमति व गुपिते बंदिस्त आहेत. एखाद्या लहान मुलाच्या खेळण्याच्या पेटित असतात तसे.. खुप गमति साठवल्या आहेत..त्यात.. सी.एच आत्माचि जुनी गाणी.. पुलंच्या काहि कविता... पिकासो नि काढलेली चित्रे.. मॅरिलिन मनरो व मधुबालेचे जुने फोटो.. काहि उन्मादक जे.पी.जी फोटो.. काहि पोर्न क्लिप्स... सहलीचे फोटो.. इरॉटीक वेब सा‌ईटचे गुप्त पासवर्ड काहि सेक्सी प्रोफा‌इल्स च्या लिंक्स काहि गेम्स.. आचार्य् अत्र्यांचि भाषणे काहि पी.डी.एफ् ई पुस्तके अश्या हजारो गोष्टी साठवल्या आहेत..

मनसे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य मराठी आमदारांनो,

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/11/2009 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे व्यतिरिकत महाराष्ट्रातील अन्य मराठी आमदारांनो, मला तुमची लाज वाटते! मला तुमच्या लाचारीचा, मूग गिळून गप्प बसण्याचा संताप येतो! मला तुमच्या अस्मिताहीनतेची दया येते! मला तुमच्या कणाहीनतेची कीव वाटते! मला तुमच्या नपुंसकत्वाचं हसू येतं! मला तुमच्यावर थुंकावं असंदेखील वाटत नाही! धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र! आपला, (एक सामान्य परंतु मराठीचा अभिमान असलेला मराठी माणूस) तात्या अभ्यंकर.

सरहद्दीपलीकडून झालेलं कौतुक!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 09/11/2009 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
'डॉन' या कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या दैनिकात आज खाली दिलेले पत्र प्रसिद्ध झाले आहे. मजकूर वाचल्यावर असे वाटते कीं पाकिस्तानी सरकार कसेही असो पण पाकिस्तानी जनतेला नीर-क्षीर-विवेक सुचू लागलेला दिसतोय! ही खरंच एक निरोगी परिस्थितीकडे नेणारी घटना आहे व आपण तिचे स्वागत केले पाहिजे. पत्र लिहिणार्‍याने जरी दोनदा भारताचा उल्लेख केला असला तरी जास्त करून माहिती चीनचीच दिली आहे. कदाचित पाकिस्तानी वृत्तपत्रांत भारताची माहिती दिली जात नसावी.