Skip to main content

केव्हा तरी ...

लेखक मनीषा यांनी सोमवार, 24/05/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
केव्हा तरी असा, साज तुझा थांबलेला तुटलेल्या तारा तरी, सूर तुझा रेंगाळलेला । शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला । सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला । मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला । काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात उंबर्‍यात या माझा, पाय कसा थांबलेला ।

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/05/2010 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा जवळी मज करा होवू निसंग आता बाजूस करा हो कमरबंद ||धृ|| कितीक दिसानं येता आज घरा डोळं लावूनी वाटं उभी अशृ नाही थारा कसर काढा आता जल्माभरची मी संगती असता करा लढाई बेधूंद आता बाजूस करा हो कमरबंद ||१|| तुम्ही जरी शत्रू मारीले, धुळ चारीले तुरे खोवीले, बिल्ले लाविले छातीवरी काय कामाची अशी मुलूखगिरी होईल सवत करील दोघात अंतर रूंद आता बाजूस करा हो कमरबंद ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २४/०५/२०१०
काव्यरस

इंद्रायणीकाठी

लेखक फटू यांनी रविवार, 23/05/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडव्याचा दिवस होता. गुरुवार. नेमका आठवडयाच्या मध्ये आलेला. एक दिवसाच्या सुटटीचं काय करावं हा प्रश्नच होता. आता तुम्ही म्हणाल पुण्यातले थियेटर काय ओस पडलेत? घ्यायचं कुठल्या तरी पोरीला घ्यायचं आणि मस्त ई स्क्वेअरला जायचं. निदान सिटीप्राईडला तरी जायला काहीच हरकत नाही. हाय काय ना नाय काय. पण प्रॉब्लेम असा हाये की ना आपण पोरीबाळींच्या वाटेला जातो ना आपल्याला पिच्चर बगन्यात यिंटरेष्ट हाये. असो. गावी घरी जावं तर जायचे दिडशे आणि यायचे दिडशे असा तीनशे किलोमीटरचा प्रवास एका दिवसात करायला जीवावर येतं. दुसर्‍या दिवशी यायचं ठरवावं तर सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो.

नवनिर्माण समिती

लेखक सरपंच यांनी रविवार, 23/05/2010 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आधी जाहिर केल्याप्रमाणे मिसळपाववर सुधारणा करण्यासाठी खालिल समितीची स्थापना करीत आहे. १. नवनिर्माण समिती या समितीने मिसळपाववर असलेल्या तांत्रिक सुविधांचा अभ्यास करावा आणी त्यांतील त्रुटी शोधून काढाव्यात. तसेच मिसळपाववर कोणत्या तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत याचाही आढावा घ्यावा. मिसळपावचे रुपरंग बदलण्यास वाव असेल तर तसेही सुचवावे. काही नविन सुविधा देता येणे शक्य असल्यास त्यांच्या अहवालात तसा उल्लेख करावा. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो लोकाभिमुख होईल, आणी नंतर अहवालातील सुचवण्यांनुसार बदल केले जातील.

नवीन संपादक

लेखक सरपंच यांनी रविवार, 23/05/2010 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावचा वाढता व्याप लक्षात घेता या लेखाद्वारे मिसळपाववर तीन नवीन संपादकांच्या नावाची घोषणा करतो आहे. १) रामदास २) छोटा डॉन ३)निखील देशपांडे या आधीच्या संपादकांप्रमाणेच हे सुध्दा मिसळपाव.कॉम वरील संपादनाच्या कामात असतील. त्यांनी सक्रिय काम करावे ही अपेक्षा आहे. लवकरच मिसळपाव मध्ये काही बदल घडणे अपेक्षीत आहे. त्या योगे सध्याचे संपादक मंडळ सक्रिय सहभाग देत आहेतच. आता या नवीन सहकार्‍यांमुळे कामाला गती येईल.

शरदिनी

लेखक दशानन यांनी रविवार, 23/05/2010 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
अगम्य असे शब्द घेऊन शब्द फाडतेस नवे नवे र ला ट, ट ला र जोडून विश्व उभारु पाहतेस नवे 'शर' शब्दांचे चालवून 'दीन' करु पाहतेस ब्रम्हचार्‍यास म्हणे शब्दाचे छल तुझे करती वेडे अनेकांस म्हणे चित्रविचित्र भाव नवे त्यांना वाटते काव्यविश्व नवे स्वप्नात देखील काव्य ते करती म्हणती डिनर करु संगे सखे पुण्यनगरी भेटू एकदा निवांत सये शब्दांच्या छलातून आयडीमागे लपलास तू वेड्यासारखा नको नको म्हणत असता केला वार तु ब्रम्हचार्‍यावर वेड्या रे शरदीनी सारखा गजब ढाहला...लपवे तोंड असे ही तो वेडे होऊन आयडी निरखे नवे नवे.. शर शब्दांचे चालवून तू 'दीन' करु पाहतेस ब्रम्हचार्‍यास म्हणे
काव्यरस

पुदिना पुलाव

लेखक अरुंधती यांनी रविवार, 23/05/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बासमती तांदूळ - १ कप (मी नेहमीचा साधा तांदूळ वापरून केला) बटाटे - २ पुदिना पाने - २५ खोवलेला नारळ - ३ टेबलस्पून हिरव्या मिरच्या - ६ ते ७ (मी त्या ऐवजी १० मिरीचे दाणे वापरले) आले - अर्धा इंच हळद - पाव चमचा

आदरणीय राहुल गांधी यांचे चरित्र

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 23/05/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील जनता प्रगल्भ आहे. भारतातील लोकशाही तर भलतीच प्रगल्भ आहे. या प्रगल्भ लोकशाहीच्या परंपरेनुसार आज जवळजवळ प्रत्येक ज्येष्ट पुढार्‍याची कन्या, पुत्र, भाचे, पुतणे भारताच्या सेवेत मग्न आहेत. पण त्यात क्रमवारी लावायची ठरवली तर राहुल गांधी यांचा क्रमांक वरचा आहे. आणि दोन क्रमांक बिटिया प्रियांकाचा आहे हे कुणीच अमान्य करणार नाही. अशा वेळी राहुलजी : भारताचे महानायक हे चरित्र लायब्ररीत दिसले तर कोण बरे वाचणार नाही? श्री माणिक लाल आणि नील घोटे ह्या समर्थ लेखकांनी ह्या भारताच्या तारणहाराचे चरित्र लिहिले आहे. ते लवकरच विक्रीस येत आहे.

दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत होणारी पौर्णिमा

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 23/05/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
आगामी काळात होणार्‍या काही खगोलशास्त्रीय घटना पुढील प्रमाणे असून त्यांचा फलज्योतिषाच्या अंगाने विचार भविष्यकाळात डोकावून पहाणार्‍यांसाठी केला आहे. या घटना अशा - - दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत ६अंश३२मि. वर होणारी पौर्णिमा - दिनांक ११ जुलै २०१० रोजी सायन कर्क राशीत १९ अंश २३ मि.

व्यभिचार- पाप आणि पुण्य???

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 23/05/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला. अन् दुसऱ्याच कोणाशीतरी तिचे लग्न लावून देण्यात आले! त्यानंतरही पूर्वीचा आशिक तिला भेटतो, तीही त्याची वाट पाहते.. हे कुणाच्याही लक्षात न येत चालूच आहे... चीन्तोपंतांच्या चिंता सोसून वैतागलेली राधाबाई तिच्याच ऑफिसातील हर्शल बरोबर फिरत असते. तो तिला हसवतो, खेळवतो. ती खुश आहे... तोही! ही नमुनेदाखलची उदाहरणे सत्यकथा आहेत.(नावे बदलली आहेत.) नवरा बाहेरख्याली झाला त्याचे कारण घरातच कुठेतरी सापडते.