Skip to main content

नैसर्गिक काष्टशिल्पं (माझ्या नजरेतुन)

लेखक jaypal यांनी रविवार, 20/06/2010 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"ये कौन चित्रकार है ? " हे माझं आवडत्या गाण्या पैकी एक गाण. निसर्गाची थोरवी, कलाकारी सगळ, सगळ ओतप्रत भरला आहे त्या काव्यात. भटकी जमात असल्याने ब-याच ठिकाणच्या भटकंती दरम्यान मला आढळलेली काही नैसर्गीक काष्टशिल्पं आपल्या समोर मांडतो आहे.

गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2010 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका सिच्यूएशन: हिरो एक सीआयडी ऑफीसर. टास्क (मोहीम): एका गुंडाचा पत्ता काढायचा. हिरोने मग भंगारवाल्याचे रूप घेतले आहे. गाणे सुरू....
काव्यरस

असहमत! असहमत!! असहमत!!!

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 20/06/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
राग म्हणजे काय, लय म्हणजे काय, गायकी म्हणजे काय, तान म्हणजे काय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वर म्हणजे काय, ते अण्णांकडूनच शिकावं
आज मिसळपावच्या एका स्तंभात वरील विधाने वाचायला मिळाली. ही बहूधा तात्यांची असावित कारण ते भीमसेनजींचे निस्सीम भक्त आहेत. एखाद्या कलाकाराचे भक्त असणे यात वावगं काही नाही.

मै सोला बरसका

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 20/06/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
लॅच काढुन मी हॉल मधे प्रवेश केला. स्वयंपाक घरातुन आवाज येत होता. कुटुंबाचे मैत्रीणीबरोबर फोन वर बोलणे चालु होते. वाक्य कानावर आलो. तिथेच थबकलो. .>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> "अग ह्यांच्याबरोबर कुठे जायचे म्हणजे संकटच असते" ....... "अग, काल एका लग्नाला गेले होते. हे ऑफिसमधुन थेट आले. जरा उशिराच आले. आल्या आल्या ह्यांच्या फॅन क्लब ने घेराव घातला. साधारण १५ जणांचा ग्रुप होता. त्यातल्या एकाने प्रश्न विचारला. ह्यांनी उत्तर दिले. त्यातले ६ जण डोळ्यात पाणी येइपर्यंत हसले.

सध्याचे वाचन - सात सक्कं त्रेचाळीस

लेखक बट्ट्याबोळ यांनी रविवार, 20/06/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच किरण नगरकर यांचे "सात सक्कं त्रेचाळीस" हे पुस्तक वाचले ... मुख्प्रुष्ठाच्या तळाशी लिहिलय - "क्या फर्क पडता है ??" आणि त्या खाली "पडता है .. ". कादंबरी ची हीच थीम आहे. जरी कोणी म्हणलं, की "सात सक्कं त्रेचाळीस", काय फरक पडतो ? फरक पडतो ... !! "कुशांक" ला तरी पडतो ... कुशांक चा फारसा थरारक नसणारा, इन फॅक्ट "झंड" असणारा हा जीवनपट आहे. आणि त्यात जगण एवढेच प्राप्त असते. आशय बिशय घंटा शोधणार त्यात. माणसाचं "प्राणी" पण यात उघडं पडत. काय लिहिल आहे यात ते तुम्हीच वाचा. ही कादंबरी वाचावी ही त्यातल्या भाषा प्रयोगात रस घेऊन. डोक गरगरून टाकणारे हे लिखाण आहे.

आजची स्त्री-२

लेखक पुष्करिणी यांनी रविवार, 20/06/2010 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रम्हदेशात गेल्या दोन दशकांपासून अहिंसेच्या मार्गानं चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा तेजस्वी चेहरा. गेल्या वीस वर्षातला अधिकांश काळ तुरूंगात / नजरकैदेत काढूनही जनतेच्या मनातल त्यांच अढ्ळ स्थान. त्या नजरेनं पाहिल तर कधीच पराभूत झालेल ब्रह्मदेशच हुकूमशाही सरकार. 1 दुसरं महायुद्ध संपायच्या पार्श्वभूमीवर झालेला जन्म. वडिल एक उच्च सेनाधिकारी; आई ब्रम्हदेशाच्या परराष्ट्र मंत्रालयात नोकरी. २ वर्षाची असतानाच वडिलांची झालेली हत्त्या.

ब्लॉगवाले सावधान!

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 20/06/2010 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
'फुगल'ने फतवा काढला आहे की,ज्या ब्लॉगवरच्या पोस्टना दहा दीवसापेक्षा जास्त वेळापासुन एकही प्रतिसाद मिळाला नाहीये व कधीच ज्या वाचल्या जात नाहीत/गेल्या नाहीत,त्या सर्व पोस्ट delete केल्या जातील.तेव्हा.............. ज्या मिपाकरांनी व त्यांच्या संबंधीत लोकांनी उगाच मोफत खरडायला मिळत म्हणुन जे पोस्ट,लेख(अर्थात फालतु हा शब्द कमी पडतो आहे) लिहले आहेत्,ते त्वरीत दुसरा एखादा बळी बघुन तिथे टाकावेत.उशीरा जाग आलेल्या,स्व:ताला अनुभवी लेखक/कवी समजणा-यांनी(त्यांचे गैरसमज वाढवणारे ही लेखकच/कवीच असतात,त्यांचा उद्देश हाच की आपला लेख कोणी माणुसकी म्हणुन वाचेल).......आपले ते पोस्ट स्वःताच कुठेतरी हलवावेत. काहींनी

भारत पाकीस्तान सामन्यादरम्यान!!

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 19/06/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आताच भारत जिंकला पाकीस्तानबरोबर!छान मॅच झाली. शेवटीसुद्धा हरभजन जाताना शोएब अख्तरला चिडवुन गेला,त्यानेही उत्तर दीले,काहीसे हतबल झाल्यासारखे! सामन्यादरम्यान गंभीर व पाकीस्तानी विकेटकीपर अकमलमधे बाचाबाची झाली. भारत-पाकीस्तान संबंध बघता खेळाडुंनी असे मैदानावर वाद करुन जनसामान्य लोकांत एकमेंकाबद्दल तेढ वाढवणे योग्य नाही अस वाटत. राजकीय वैर जरी कायम राहणार असेल,तरी सामान्य माणूस खेळाडुंमधील बाचाबाची पाहुन संबंध सुधारण्याबद्दल विचार तर करणार नाहीच(विचार करुही काही फायदा नाही,कारण कुत्राची शेपूट ती वाकडीच राहते)......................पण येथील,भारतातील लोकांमधे दोन धर्मात तेढ वाढेल हे निश्चित! तेव्हा

लावणी: सोन्याची अंगठी मजला आणुन द्या

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 19/06/2010 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या
तुमची माझी प्रित जडली आठवण राहू द्या प्रितीची निशाणी म्हणून सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||धृ|| न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे) साडी चोळी आहे मजला नको दुसरे काही श्रॄगांराची टिकली बांगडी उगाच मागत नाही सोनाराकडे आजच जावू या, नको की उद्या सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||१|| न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे) राव पाटिल बाजीराव आहात तुम्ही कशाला कधी केलं नाही कमी घाटदार
काव्यरस