Skip to main content

३१ डिसेंबर : मदत : हॉली-डे रिसॉर्ट ( माहिती )

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 21/12/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे. विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे अंदाजे ८-९ लोकांसाठी बजेट : नो बार ! अपेक्षा ( कमीत कमी ) : १. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे २. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल. ३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे. ४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे ५.

सौ चुंहे खाकर बिल्ली हज ..........

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 21/12/2010 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आधी खुप भ्रष्टाचाराला खत पाणी घाला. मग अंगाशी यायला लागले तेव्हा पाच कलमी कार्यक्रम राबवा (हे पहिल्यांदीच करायला पाहिजे होते). पण पुढच्या निवडणुकांची तयारी कशी झाली असती मग. पंतप्रधान बिचारे काय करणार. जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचारी तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. मग कोण देशप्रेमी. आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. पुर्वी लाखात घपला असायचा. मग करोडोत आता म्हणे हजार करोड वगैरे. अबबब

भारत व रशिया इजारेल नेपाल ( महत्वाचे भागीदार )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी मंगळवार, 21/12/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी आधी सुधीर काळे ह्यांच्या पुतीन संबंधित लेखात प्रतिक्रियेत म्हटले होते कि रशियाला सध्यस्थितीत भारताशी व्यापारिक संबंध वाढवले पाहिजे .अर्थात आज पासून रशियन राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव भारताचा २ दिवसाचा दौरा करणार आहेत .त्याच्यासोबत व्यापारी मंडळ असून किमान १५ सौदे होणार आहे जे अंतराळ /बिन लष्करी परमाणु सहयोग / व अनेक महत्वाचे प्रामुख्याने व्यापारी सौदे होणार आहेत .पुढील ५ वर्षात २० अब्ज डॉलर च्या व्यापाराचे उदिष्ट दोन्ही देशांनी ठेवले आहे .ह्यात सर्वात महत्वाचा सौदा जेट विमानाच्या ५ व्या पिढीतील विमानाचा असून ते भारत व रशिया सहकार्याने बनवत आहे .(जगात ह्या पिढीचे अत्याधुनिक विमान फक्त अम

दुर्ग - ढाकोबा आणि दार्‍या घाट

लेखक अप्पा जोगळेकर यांनी मंगळवार, 21/12/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्ग - ढाकोबा आणि दार्‍या घाट हा एक छान रूट आहे. दुर्ग वरुन ढाकोबा ची वाट सापडता सापडत नाही. दैव चांगलं म्हणून आम्हाला जागोजाग स्थानिक माणसं भेटत गेली. नुकतीच क्लिक्सची खरेदी केल्यैय. त्यामुळे खाण्यापिण्याचा तर नुसता माज केला. उकडलेली अंडी, कॉफी, श्रीखंड, भाकर्‍या, चटणी आणि मॅगी यांनी बहार आणली.मागच्या महिन्यात पावसामुळे ढवळ्या घाटाचा प्लॅन फसला त्यामुळे लई शॉट बसला होता. पण आता जरा छान वाटतंय. डोंगरात भटकणे हा आमचा खास स्किलसेट असला तरी छायाचित्रण हा आमचा प्रांत नाही. किंबहुना फोटो काढायचा कंटाळाच येतो. दोस्तांनी काढलेले फोटो पाहत बसणं मात्र फारच आनंददायक.

(पृथ्वी समर्थ आणि पक्षनिष्ठा)

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 21/12/2010 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडच्याच एका प्रसंगी दिल्लीच्या परिसरात काही नेते म्याडमदर्शनाच्या इच्छेने यत्न करत होते. युवराजांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे सहाय्य मागितले. युवराजांनी त्यांना निष्ठा दृढ करा असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर म्याडम आदिमायेच्या रूपात स्वीय सचिव, आपल्या खास मर्जीतली चौकडी, ट्रकभरून फायलींचा गठ्ठा, हातात बंद लिफाफा आणि एक स्वीस देशीची वर्गणी पुस्तिका अशा लवाजम्यासह तिथे दाखल झाल्या. त्या वेळी बरोबरच्या सचिवाला "वेळ निभवावी" असे म्हणून सिलेक्शन करायला सांगितले. सचिवाने एक टेबलखुर्ची मांडून त्यावर एक मेणबत्ती लावली व एकेक फाईल काढून वाचू लागला.

लावणी- लावण्यखणी?

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 20/12/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी हा एक महाराष्ट्रातील नृत्य प्रकार.खास करून उत्तर पेशवाईत अधीक लोकप्रीयता मिळालेला. दक्षीनेत नृत्याची जशी मंदीरांसोबत /धार्मीक उत्सवांसोबत सांगड घातली जाते. अरंगेत्रम सारखा समारंभ कुटुंबासमवेत मोठ्या थाटात साजरा केला जातो. गुजरातेत नवरात्र निमित्त स्त्री पुरुष हे एकत्र नाचतात. त्या उत्सवास धार्मीक रंग आहे. महाराष्ट्रात कोळी लोक सोडले तर स्त्री पुरुष मिलून एकत्र एखादे नृत्य करतात असे कुठेच दिसत नाही. मागे कोणीतरी म्हणाले की लावणी हा महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असा ठेवा आहे. लावणीचे सौम्दर्य गायन कलेत आहे. शब्द कलेत आहे.

बहादुर शाह जफर के कुछ आखरी अशार...

लेखक अश्फाक यांनी सोमवार, 20/12/2010 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे) लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में !
काव्यरस

[ज्योतिष] दिनांक ४ जाने २०११ रोजीचे सूर्यग्रहण

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 20/12/2010 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ४ जाने २०११ रोजी सकाळी ९ वाजून ०२ मि सायन मकर राशीत १३ अंशावर ३८ मि अमावस्या होत असून ही अमावस्या सूर्यग्रहणयुक्त असून वर्षारंभीच होत आहे.