भ्रष्टाचार ...काँग्रेस.... विरोधी पक्ष ....जनलोकपाल
अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत आजवर न झालेली गोष्ट म्हणजे त्यांच्या उपोषणाचा विरोधी पक्षाना नेहमीप्रमाणे मुद्दाच करता आलेला नाही. केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे भाजप आणि मित्र मंडळ.
मात्र अण्णांनी जे जनलोकपाल विधेयक मागितले आहे त्याबद्दल हा पक्ष सुरवातीला उत्सुक दिसला मात्र कुठे माशी शिंकली कोण जाणे अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे भाजपने अण्णांच्या आंदोलनाबाबत एकदम सावध भूमिका घ्यायला सुरवात केली.
एरवी काँग्रेसप्रणीत भ्रष्टाचाराबद्दल घणाघाती भाषणे करणारे नेते देखील अण्णांच्या आंदोलनाबद्दल काहीच भाष्य करीत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे
भाजपला खरेतर या आंदोलनाचा पूरेपूर लाभ उठवता आला असता.
मिसळपाव