Skip to main content

समारोप - गुरूपदेश

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 23/09/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो तुमच्या भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसादातून बरेच काही शिकायला मिळाले. पण एक खुलासा आवश्यक आहे. माझ्या गुरूला मी अंतर्बाह्य ठाऊक असल्याने माझे भले कशात आहे ते त्यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे वैयक्तिक होता. तो माझ्याकरता म्हणजे विशिष्ट व्यक्तीकरता होता. मला माझा विकास साधायचा असेल तर मी ज्या वातावरणात असायला हवे तेथे मी नव्हतो, एव्हढेच त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे आयायटियन्स बुद्धीमान की आयायटी बाहेरचे बुद्धीमान हा मुद्दा गैरलागू आहे. ज्योतिषाशी लावलेला संबंध तर अत्यंत हास्यास्पद आहे.

)माझं सामान हे...(

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 23/09/2011 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
शैलेंद्र यांनी रसग्रहणाची परंपरा पुढे चालवत धनाजीराव वाकडे यांच्या 'माझं हे सारं सामान गं सखू...' या कवितेवर लेख लिहिला. ती कविता व तो लेख या दोन्हीवर एकंदरीतच धमाल, हहपुवा वगैरे प्रतिसाद पाहून थोडी निराशा झाली. शैलेंद्र यांनीदेखील ही कविता काहीशी गमतीदार असल्याप्रमाणे तिचा अर्थ लावलेला आहे. माझं नेहेमीच असं मत पडलेलं आहे की लेखकाच्या रचनेचा अभ्यास हा त्याच्या इतर रचनांच्या संदर्भात घेतला पाहिज.
काव्यरस

राधा गौळण

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/09/2011 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
राधा गौळण
आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ|| दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१|| गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२|| मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०९/२०११

निदान नमस्कार तर कराल?

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 23/09/2011 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी कामावर निघण्याच्या गडबडीत नित्यकर्मे उरकत असतांना पत्नीच्या आई म्हणाल्या, "आज अविधवा नवमी आहे, निघतांना आईच्या फोटोला नमस्कार करून जा, आणि येतांना दुध-केळी आणायला विसरू नकोस." गेली ३० वर्षे पत्नीच्या आईना मीही 'आई'च म्हणतो. त्याही त्यांच्या मुली इतकंच माझ्यावर प्रेम करतात, क्वचित कधी हक्काने रागावतातही. लग्नानंतर माझ्या आईला विचारलं होतं, "मी त्यांना आई म्हणालो तर तुला चालेल का गं?", तर म्हणाली "अरे बाबा, दोन आया मिळणं याला नशीब लागतं, त्या किती प्रेम करतात ते पाहिलंय मी, मला वाईट तर नाहीच, उलट आनंदच वाटेल. फक्त तूच लक्षात ठेव, आई म्हणशील तर तसा मानही ठेव!" मी जमेल तितकं ते पाळतो.

रंगपंचमीच्या सनाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/09/2011 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
रंगपंचमीच्या सनाला
This Lavani is dedicated to parag p divekar as yesterday he demanded "Lavani Mahotasav" here.
नका भिजवू शालू वेल बुट्टेदार नऊवारी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||धृ|| नेम तुमचा कधी का चुकतो! अंगाला बाई असा झोंबतो पाण्याचा तो मारा; नका करू मजवरी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||१|| रंग हवेत* कितीक उडवीले *(हवे ते) फुगे फोडीले हिरवे पिवळे रंगात येवूनी का गुलाल फेकीला अंगावरी? रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||२|| लाज मला हो आली भारी सर्व सख्यांनी मस्करी केली
काव्यरस

जशास तसे

लेखक शुचि यांनी गुरुवार, 22/09/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्याशी कोणी उर्मटासारखे वागले, तरी तुम्ही त्या व्यक्तीशी चांगुलपणाने वागता की तुम्ही त्या व्यक्तीला "ईंट का जवाब पत्थर से" देता? उदा - तुमची बायको एखाद्या किरकोळ कारणावरून तुमच्याशी अतोनात भांडली, खूपच आक्रस्ताळेपणाने वागली तर भांडण झाल्यानंतर तिला खूष करण्यासाठी तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठविता का? का तुमच्या कृतीमधून तिची चूक जाणवून देता? जर तुम्ही तिला गुलाबाचा गुच्छ पाठवत असाल तर मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून ते चूकीचे आहे. कारण तुमच्या कृतीमधून तुमच्या दुबळेपणाचा, चूकीचा संदेश तिच्याकडे जातो आहे.

पत्तेबाज..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 22/09/2011 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर पत्ते खेळला नसेल असा एखादाच माणुस असेल..लहान पणी उन्हाळ्याची सुटी लागल्यावर पत्यांचा डाव कायम पडायचा. पण पत्त्यांचा नाद असणे हि काहि वेळा फार काळजीची बाब हि ठरु शकते. कष्टकरी ..कामगार..मध्यम वा उच्चभ्रु सा~या वर्गात रमी व ३ पत्ति खेळ लोकप्रिय आहे...व ब~याच वेळा हा खेळ नुसता वा पैसे लावुन खेळला जातो. पत्ते खेळणा~यांचे ग्रुप असतात.. मी ज्या वेळी डेक्कन ने पुणे मुंबई करीत असे त्या वेळी असाच एक ग्रुप होता..गाडी सुरु खाली कि ते व्ही.टी येईपर्यंत रमी खेळत असत..

मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं # माझं हे सारं सामान गं सखू...

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 22/09/2011 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
घासू गुरुजींनी सुरु केलेल्या कविता रसग्रहणाच्या उपक्रमाने प्रभावीत होवून आपणही तिथे एखाद फुल सोडाव असं बरेच दिवस वाटत होत, पण योग्य फुल गवसत नव्हत, इतक्यात मिपाचे ताज्या दमाचे, नव्या रक्ताचे तरुण ताठर कवी श्री धनाजीराव वाकडे यांची माझं हे सारं सामान गं सखू... ही कविता वाचनात आली आणी योग्य फुलं गवसल्याचा आनंद झाला. खरतर ही कविता इतकी रसरशीत आहे, की मधमाशीच्या मकरंद गोळा करण्याच्या कौशल्याऐवजी लहान व्रात्य मुलाच्या बर्फगोल्यातून रस ओढायच्या कौशल्याचीच येथे गरज पडावी..
काव्यरस

अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेला आणि बेला,वैशालीने गायलेला नवीन अल्बम प्रकाशित

लेखक योगेश पितळे यांनी गुरुवार, 22/09/2011 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेला पहिले वहिले प्रेम हा अल्बम नुकताच प्रकाशित झाला आहे.बेला शेंडे आणि वैशाली सामंत या आजच्या आघाडीच्या गायिकांसह नील नाडकर्णी या अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण गायकाने या अल्बमद्वारे मराठी संगीतक्षेत्रात आपलं पदार्पण केलय! या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची ८ गीते आहेत असून प्रवीण दवणे, मिलींद जोशी आणि मनोज यादव यांनी ती लिहिली आहेत.

३२ रुपये आहेत मग तुम्ही गरीब नाही

लेखक शाहिर यांनी गुरुवार, 22/09/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या खिशात ३२ रुपये असतील तर तुम्ही गरीब नाहीत, असा आपल्या सरकारचा म्हणाना आहे . आयोगाच्या मते, देशातील शहरात राहणारी व्यक्ती ३२ रुपयांत तर ग्रामीण भागातील व्यक्ती २६ रुपयांत सहज एका दिवसाची गुजराण करू शकतो. पूर्ण हिशोब केला असता शहरात राहणार्‍या एका माणसाला एका महिन्याच्या खर्चासाठी ९६५ रुपये पुरेसे आहेत. ग्रामीण भागात असाल, तर खर्च ७८१ रुपये इतका होऊ शकतो.