कोडं
नमस्कार मिपाकरहो,
लहान असताना जयंत नारळीकरांच्या "गणितातल्या गमती-जमती" पुस्तकात वाचलेलं एक गणिती कोडं आठवलं.
एका राज्यात प्रधानाच वय झाल्यामुळे तो निवृत्त होणार असतो. राजा मग राज्यात दवंडी पिटून सांगतो की प्रधानाच्या जागेवरती योग्य व्यक्तीची निवड करायची आहे तरी हुशार लोकानी दरबारत हजर व्हावं. राजा प्रधान बनण्यासाठी आलेल्या लोकांची मुलाखत घेतो. खुप लोकं पहिल्या फेरीतच बाद होतात. अस करत करत शेवटच्या फेरीत तीन माणसं उरतात. राजा खुप प्रयत्न करुनही त्यापैकी सर्वात हुशार उमेद्वार निवडू शकत नाही.
मिसळपाव