Skip to main content

किल्ले शिवनेरी

लेखक saumitrasalunke यांनी बुधवार, 21/11/2012 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक: शनिवार, ०३ नोव्हेंबर २०१२ दुर्गस्थ: सौमित्र आणि सुनिता साळुंके पहाटे ०६ वाजता माळशेज मार्गे जाणारी कुर्ला नेहरूनगर–जुन्नर गाडी पकडून निघालो. मुरबाडच्या पुढे आल्यावर जीवधन–खडा पारशी–नानाचा अंगठा याचं सुरेख दर्शन झालं. या मार्गावर आम्ही दोघेही प्रथमच येत होतो तेव्हा डावीकडे हरिश्चंद्रगड, पिंपळगाव जोगा जलाशय बघून भान हरपलं. साधारण ११ च्या सुमारास जुन्नरला पोहोचलो. शिवनेरी एका दिवसात करण्याजोगा आहे मात्र मुक्काम करावयाचा असल्यास लॉजिंगची व्यवस्था आहे. मात्र त्याचं बुकिंग वगैरे करूनच यावं. थोडी विश्रांती घेऊन आम्ही साडेतीन वाजता गडाकडे प्रयाण केले.

मैत्री

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
"भावना" आणी "नाती" बदलतात का ? जसे ॠतू बदलतात ? जसी माणसे बदलतात .! का ति बदलून हि ह्र्द्यात जस्सीच्या तस्सी राहतात ...? Graduation सम्प्ल्यानन्तर सारेजण आपापल्या रस्त्याने गेले.. एक जण bank manager ,एक जण engineer - अमेरिकेत , एक जण "यशदा " मधे UPSC ची तयारी...! एक जण PSI ! आणी एक जण MPSC ची तयारी ! - अन तयारी करत असताना "गाव कामगार तलाठि" ..! काल सर्वच भेटले..कोलेजात असताना चहा किवा नाश्त्याचे पैसे देताना कधीच दुरावा वाट्ला नाहि..पण काल " Teachers " विकत घेताना जो दुरावा जानवला..तो मनात काहुर माजवनारा ....त्या वेळि सग्ळ्याची लायकि सारखीच होती..आत्ता पगारात लायकि वाटली गेली..!

गार - व्हा

लेखक वनक्या यांनी बुधवार, 21/11/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
काम जरा जास्त आहे ...दर वेळी वाटत... भर मीटिंग मधे appraisal घेउन स्वप्न नव दाटत.. तरी बडबड चालत राहते डोक चालत नाही... कस्टमर शिवाय मीटिंग मधे कोणीच बोलत नाही... तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो... तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो... रिजल्ट मधल्या चूका वेशीवरती टांगतो.... आमी पळवाटा हुड़कत सैरावैरा धावतो... hi how are you ? मनुन विषय वळवून बघतो... दुपार टलून संध्याकाळचा सुरु होतो खेळ.. कितीही नको मनल तरी मीटिंग ची जालेली असते वेळ.. चक्क कस्टमर समोर मेनेजर शिव्या देऊन घेतो .... मीटिंग आंधी आमच्या मधे कुठून इतका " गार - व्हा " येतो..

माझी चार अंग वस्रे

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 21/11/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

मदत करा......

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 21/11/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो ,एका जवळच्या मित्राचे पुढच्याच आठवड्यात लग्न आहे. उखाणे घेण्याच्या बाबतीत त्याने माझ्याकडे मदत मागितली आहे. मी मिपा शिवाय कोणाकडे मदत मागणार? मुलींचे उखाणे र ला र ,ट ला ट लावून कसेतरी करता येतात. ह्या बाबतीत मुलांची विकेटच पडते. तुमची सगळी कल्पनाशक्ती पणाला लावून काहीतरी वेगळे उखाणे सांगा मुलांसाठी.

आता काळ, काम, वेग

लेखक शरद यांनी बुधवार, 21/11/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
हे कोडे घालण्याचा उद्देश आपण शाळेमध्ये शिकलेले सर्वच बरोबरच असते असे नाही एव्हड्यापुरताच मर्यादित होता. सर्वश्री अरुण मनोहर,राजेश व आनंद घारे यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी बाहेर पडण्याचा वेग दाबाच्या ( म्हणजेच पाण्याच्या उंचीच्या) प्रमाणात बदलतो. व सर्व पाणी बाहेर पडावयास फार म्हणजे फारच वेळ लागेल. साध्या गणीताने ह्याचे उत्तर काढता येत नाही व इंट्रिगल कल्क्युलसचा वापर आपण रोज करत नाही. द्या सोडून. व्यवहारतः साधारणपणे २० मिनिटे हे उत्तर. याचाच पुढचा भाग म्हणजे शाळेतील काळ, काम,वेग यांची उदाहरणे. टाकीत एका नळाने पाणी भरा व दुसर्‍या नळाने बाहेर सोडा अशी गणीते आपण सोडवत होतोच.

मा़झ्या चारोळ्या

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!
काव्यरस

हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे. कसाबला फाशी?

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 21/11/2012 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे. वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध.