Skip to main content

याला न्याय कसं म्हणायचं

लेखक रामबाण यांनी गुरुवार, 21/03/2013 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
१२ मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बाँब स्फोट खटल्याचा आता सर्वोच्च न्यायालयात निकाल देणं सुरु आहे. तसा हा देशावरचा पहिला आणि सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, २५७ लोकांचा जीव घेऊन गेला. दाऊद, टायगर वगैरे मुख्य आरोपी पाकिस्तानात सुखरुप आहेत. बाकींच्यांना घेऊन २० वर्ष उलटली तरी खटला सुरुच आहे. बहुतांश पब्लिकला संजुबाबाचं काय होणार याचीच उत्सुकता आहे. आता २० वषांनंतर काहीही निकाल लागला तरी, जे गेले त्यांना... ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले त्यांना... जे जखमी झाले त्यांना... ज्यांचं सगळं आयुष्यंच बदलून गेलं त्यांना..

स्टफ्ड खजुर रोल्स

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 21/03/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काहि गोष्टि जशा ठरवुन होत नाहि तसाच ह्या पाकॄ बाबतीत झालं. बच्चु करिता आणलेलं दुध नासलं. नासकोणी (नासलेल्या दुधात गुळ किंवा साखर घालुन करतात तो प्रकार) मला फारसं आवडत नाहि. म्हणुन जरा माझं डोकं (?) चालवुन खालील पाकॄ केली. अनायसे सर्व साहित्यहि घरात उपलब्ध होतं. पाकॄ वाचल्यावर कदाचीत तुम्हि म्हणाल हे देवा.....याने फिरुन परत पनीर आणलच पण एक स्टफिंग विदाउट पनीर पण आहे. आशा आहे गोड मानुन घ्याल :D Khajur साहित्यः १.

भूल-भुलैया

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 21/03/2013 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
भूल-भुलैया चार वर्षापूर्वीची गोष्ट. शुक्रवारची सुट्टी असल्याने लंचनंतर वामकुक्षी काढून जरा आमच्या कॅम्पबाहेर फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. इथे दम्ममला संध्याकाळचे चार वाजले तरी अजून उष्मा जाणवत होताच ! सौदीला आल्यापासुन दोन महीने आराम असा नव्हताच ! अगदी वीकली ऑफ सुद्धा कॅन्सल केले होते ,इतक्या दिवसानी सुट्टी मिळाली म्हणून जरा एंजॉय करायचा मूड होता .म्हणून अल-खोबर वरुन विक्रांतला फोन करून बोलावलं होतं . तो गाडी घेवून पाच वाजेपर्यंत पोहोचणार होता. तोपर्यंत पायी फेरफटका मारावा म्हणून निघालो, आणि चालत चालत कॅम्प पासून दीड-दोन किलोमीटर वर आलो. सगळीकडे रखरखीत निर्मनुष्य वाळवंट पसरला होता.

बटाटा

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 20/03/2013 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
केला जरी सर्व भाज्यांनी टाटा उरतो केवळ मी बटाटा उन्ह-पाऊस-थंडीत राहतो मी सान-थोर सर्वांस भावतो मी गाव-शहर असो पाऊल-वाटा सर्वत्र दिसतो मी बटाटा पार्टी असो वा उपास करती जन माझा तपास गोड अथवा तिखट कुरकुरीत वा चिवट परिस्थिती असो बिकट असतो मी सदैव निकट असा मी बटाटा
काव्यरस

दुनिया गोल आहे...

लेखक धन्या यांनी बुधवार, 20/03/2013 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
"आ रहा हैं क्या इंटरव्ह्यू लेने? टेलिफोनिक हैं." त्याने मीटींग रुमचा दरवाजा उघडताना मला विचारलं. तो मला साडे चार पाच वर्षांनी सिनियर. त्याची माझी ओळख फक्त एक दिवसाची. अगदी कालचीच. मी त्याला हो म्हटलं. साहेबांनी उमेदवाराला कॉल केला. समोरचा पठठया पोचलेला निघाला. "इटस थ्री ट्वेंटी. आय हॅड आस्कड युअर एचार टू शेज्युल माय इंटरव्ह्यू एनीटाईम बीफोर थ्री. नाऊ आय अ‍ॅम इन ओडीसी. आय कान्ट गो अहेड विथ धिस इंटरव्ह्यू.". समोरच्या पठठयाने त्याची वेळ न पाळल्यामुळे आम्हाला निकालात काढले होते.

ती राजकन्या आणि मी..??

लेखक Yash यांनी बुधवार, 20/03/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
तो खूपच थकून गेला होता. मागचे काही दिवस ऑफिसमधील काम इतक वाढलेल होत कि त्याला जेवायलाही वेळ मिळत नव्हता. तो PC समोर बसून files check करत होता. त्याला काहीच सुचत नव्हते. त्याला असं उदास बसलेलं पाहून अमोद त्याच्या इथे येऊन म्हणाला “अविनाश बस झाल आता चल जरा खाली जाऊन काही तरी खाऊन येऊ. तू तर आज धड जेवला पण नाहीयेस.” “नको रे कंटाळा आलाय खाली उतरायची पण इच्चा नाहीये.” “अरे चल ना अव्या (अविनाश) काम तर होतच राहतात म्हणून काय आपलं जेवणखाण सोडून चालत का ? चल निदान ज्यूस तरी घे.” “बर चल कटकट करू नको.” अविनाश आणि अमोद एका चांगल्या सोफ्टवेअर कंपनीत कामाला होते.

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 20/03/2013 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ मागील लेखात इलियडमधील २४ बुक्सपैकी पहिल्या ३ बुकांचा सारांश आला होता. आता बुक्स ४ ते १० यांमधील कथाभाग पाहू. पहावे तिकडे नुस्ती मारामारी-महाभारतात "धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभि:" असे त्या तुंबळ युद्धाचे वर्णन दिलेय अगदी तश्शीच. शृंगार झाल्यानंतर होमरबाबांच्या अंगात वीररस उसळी मारू लागलाय असेच वाटते ती बुक्स वाचून. आधीचे संक्षिप्त ब्याकग्रौंडः मेनेलॉसबरोबरच्या मारामारीत जखमी होऊन पॅरिस पळाला.

कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 20/03/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.” ― Chris Hedges तुमचा भुतांवर विश्वास आहे का? तुमचा भानामतीवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या चालीवर तुमचा ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास आहे का असा प्रश्न लोक एकमेकांना विचारताना पाहिले की विज्ञान ही एक श्रद्धा-अंधश्रद्धा ठेवण्याची गोष्ट आहे की काय असे वाटू लागते.

काक मृत्यू

लेखक मेघनाद यांनी बुधवार, 20/03/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता. काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल.

सीमारेषा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/03/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं ------ श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित.... आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे फार अवघड असते गं ------- सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही...
काव्यरस