क्षण तो.....
नाही विसरलो तुझं
मला ओलांडूनी जाणं,
जाता जाता मनाचं
इतकं कठोर होणं !!
कालपर्यंत दोघांचं
एकच होतं जीणं,
एका वळणावर मात्र
त्या हाताचं झिडकारणं !!
गैरसमज क्षुद्र तरीही
जीवाचं करतो मागणं,
आयुष्यच शून्य होईल गं
तुला करता उणं !!
तेही आठवतात क्षण
तुझं उचंबळून येणं,
आसू हासुच्या आठवांत
गंध वर्षावूनी जाणं !!
ते तुझं चालता चालता बोलणं
बोलता बोलता हसणं,
गालामधल्या खळीमध्ये
माझ्या मनाचं बसणं !!
आता ती खळी नाही
टाकलंस ते बोलणं,
तुझ्या वाचून नाही जगणं
आयुष्याचं तूच तर देणं !!
आठव आणाभाका त्या
ज्यात आपलं होतं जीणं,
प्रवाहाविरुद्ध पोहेन मी
तुझ्यासंगती निर्मीन नवं गाणं !!
:श्री.
काव्यरस
मिसळपाव
परवाच 'एलिझाबेथ एकादशी' पाहिला, थोडयाफार त्रुटी असल्या तरी एकूण चांगला आहे. कर्जामुळे वडिलांनी बनवलेली सायकल 'एलिझाबेथ' विकावी लागणार आणि तिला वाचवण्यासाठी त्या दोन्ही मुलांचे प्रयत्न, त्यातला अस्सल प्रामाणिकपणा हा चित्रपटाचा प्राण - आणि त्यात येणारे पंढरपूरच्या छोट्या गल्ल्या-बोळांचे, लहान घरांचे आणि त्यांच्या भावविश्वाचे दर्शन हा भाग मस्त जमून आला आहे. ते घर एखादे पात्रच असल्यासारखे कथेत फिट्ट बसले आहे!