थरार लिंगाण्याचा !!
पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येला असलेला वेल्हे तालुका दुर्गम म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत छोटी छोटी गावे अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेली आहेत. उंच सखल डोंगर दऱ्या, मुसळधार पाउस, सोसाट्याचा वारा, अभावानेच असणारे गाडी रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी मुलाभूत सोयींचा अभाव अशा परिस्थितीत येथील गावकरी राहत असतात. भात, वरई , नाचणी हि येथील प्रमुख पिके पण त्यासाठी देखील भरपूर मेहनत आणि निसर्गाची लहर हे घटक आहेतच. परिस्थिती आता बदलत आहे पण अजूनही येथील जीवन खडतर आहेच.
तोरणा ते रायगड ह्या भ्रमंतीत हा भाग अगदी जवळून बघता येतो.
मिसळपाव