Skip to main content

चार दिवस मिळाले असतां हसू खेळून निभवावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे दुःख ना कुणी ऐके,असो माझे वा परक्याचे अवधि हाच आहे,हसणे अथवा हसवण्याचे

अर्धा कप दुध...

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला, "अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की. आई,लवकर उठलीस, चहा घेणार? नको ,तुला उशीर होतोय. बरं निघतो मी". क्लिनीक मधे खुप गर्दी होती. पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली. " आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय. काय झालं. काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या. तेल लावून गरम पाण्याने आंघोळ घातली. अर्धा कप चहा देतीस का म्हणाल्या.

गाढ झोपेतलं माझं स्वप्नं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतं,शेतात काम करताना सर्वात जास्त मेहनत घेतली जाते ती म्हणजे शेत नांगरणं. माझ्या आजोबांच्या शेतात अनेक कामगार कामं करत असायचे.शेत नांगरण्या सारखी कामं अर्थातच कामगारांना दिली जायची. पण त्या दिवशी मी स्वतः एक कुणगा अट्टाहासाने नांगरायचं असं ठरवलं. आणि व्हायचं तेच झालं. सूर्यास्त होई पर्यंत माझं अंग चोळामोळा झालं. रात्री घरी येऊन कसाबसा दोन घांस गिळून अंथरूणावर पडलो. आणि सूर्योदय केव्हा झाला हे कळलंच नाही. असं म्हणतात जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा मेंदूत येणारे विचार स्वपनाद्वारे हयदोस घालतात. त्या दिवशी माझं अगदी तसंच झालं.

निसर्ग सृष्टीचं सादरीकरण

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे विचार माझ्या मनात आले. लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा - मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे. जांभळ्या आणि पिवळ्या फुलांच्या मधोमध एक केशरी फूल फुललेलं मला दिसतं. हे उघड आहे की आता वसंत ऋतू आला आहे आणि त्याचं सौंदर्य मला मोहित करत नाही असं कदापि होणार नाही. आकाशाचा स्वच्छ निळा पोत पण मला आकर्षित करतो. मला माझ्या शरीराला स्पर्श करणारा वारा जाणवतो.

शिकार...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मी वाचलेले पहिले पुस्तक होते Drums along the Mohwak. ज्या काळात युरोपियन लोकांनी अमेरिकेची जमीन पादाक्रांत केली, ज्या काळात इंग्लंडच्या राजाच्या सैन्याविरुद्ध अमेरिकन जनता लढली, त्या काळात घडलेली ही गोष्ट. मी जेव्हा वाचली तेव्हा माझ्या मनात, संताप, दुःख, इ. भावना उफाळून आल्या कारण त्याच काळात मी रेड इंडियन्सची गोऱ्यांनी कशी ससेहोलपट केली यावर पुस्तके वाचली होती. असे असले तरीही हे पुस्तक वाचताना, मला मोठी मौज वाटली हे मला नाकारता येणार नाही. आता एवढ्या वर्षांनंतर या पुस्तकाचा मी अनुवाद करायला घेतला आहे.. सहज.

संगीत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर फेरफटका मारत असताना एक प्रश्न केला. आणि तो त्यांनाच करण्याचा माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात. त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी पूर्वी गेलो आहे. मी त्यांना म्हणालो, “संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील? हे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हे संगीतात रस नसलेल्या लोकांना कसं लागू होतं? ते मला म्हणाले, “संगीताशिवाय "जीवनातील दिवसाची" ​​ कल्पना करूया. संगीताशिवाय जीवन भावनाहीन, रंगहीन आणि अनावश्यकपणे रेखाटलेलं होईल . संगीताची व्याख्या अशी करता येईल, “वेळेत आवाजाची मांडणी करण्याची कला” म्हणजे संगीत.

लागट बोलणं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली . धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं. तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो. एकदा लोकांनी एका व्यक्तीला चिडवायला,धमकावायला, सुरुवात केली की प्रत्येकजण त्याचं अनुकरण करून त्याचा पाठपुरावा करतो. जेव्हा तुमचा एखादा मित्र तुम्हाला चिडवतो, धमकावतो तेव्हा तुमचे प्रत्येक मित्र त्यात सामील होऊन त

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा. सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते.

अक्षय्य तृतीया

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 10/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
घ्या कविता.... सोनार आठवण करुन देतात, पेपरमधे पानभर जाहीराती देतात... अलीबाबाची गुहा, सापडल्यासारखे, दागिन्यांचे फोटोज । कंगन हार कर्णफूलं कंठे तोडे नाणी कलश, चळत बिस्किटोज ।। कुणालाच आठवत नाहित । घामटलेले खाणकामगार,त्यांचे कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।। भट्टीत तापून सुलाखून । कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी, घडवतोय बारीक नक्षी फूलं।। मालक गुलजार हसतोय । पेठेत अजून एक नवे, दालन उघडतांना दिसतोय ।। #कवी नेहमीचा..... हार के जितनेवाला....बाजीगर
काव्यरस