Skip to main content

विठूबंदी

लेखक बाजीगर यांनी रविवार, 22/07/2018 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री) विठूबंदी धाडा रे कुणीतरी, विठूला सांगावा, आरक्षणाचा कांगावा, फार झाला। मागे होते एकदा मराठा मंत्री सोळा, आरक्षणाचा गोळा, तेव्हाका नाही। मुख्यमंत्र्यांना यंदा, नाही महापूजा, कारण बलभूजा, जातीभेद। संत सांगो गेले, वारकरी एकता धर्म भेदाभेद अमंगळ जर्म जळो जळो। नावडतीचे तुम्हा, जरी अळणी मीठ, निषेधाचे व्यासपीठ, इथे नव्हे। समतेचे वाळवंट, एकमेका लोटांगणे, तिथे धटिंगणे, कशासाठी? जिथे सर्वकाळ नामाचा जागर सत्तेचे गाजर, तिथे कायी? किती काळ देवा राहशील मूक तिच तिच चूक जन्मोजन्मी। सांगे "बाजीगर
काव्यरस

पाऊस !

लेखक मनमेघ यांनी शनिवार, 21/07/2018 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजून भिजून, गात्री- झेलून झेलून पाणी झाडाशी बसून, गोड- सुरात गातोय कोणी. कातर कातरवेळी लकेर लकेर ओठी पालवी पालवी जशी पानाच्या फुलते देठी. सळसळ सळसळ पानी चाहूल, जिवाला भूल मोकळ्या मोकळ्या वाटा वाटांत ओलेते सल... गारवा, गारवा रात्री हवेत वेगळा नाद... दुरून, दुरून आली कुणाची? कुणाची साद? ... झाडाशी झाडाशी खोल, थरथर थरथर देही डोळ्यांत, डोळ्यांत दोन पाऊस झाला प्रवाही ! ~ मनमेघ

थक्क करणारी कामगिरी

लेखक सोमनाथ खांदवे यांनी शनिवार, 21/07/2018 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी भाज्यांचे पिक घेऊन शेतकऱ्याने मिळवले वार्षिक 6 कोटींचे उत्पन्न . एका अवलीयने आयटी मधील चकचकीत इमारतीत आपली भाजी विकायची असे स्वप्न पाहिले होते, तेच स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. आयटी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांसह देश-विदेशात ते या वेगवेगळ्या भाज्या पोहचवतात. मूळ परदेशात पिकवल्या जाणाऱ्या या भाज्यांचे पिक घेऊन एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले आहे. या भाज्यांच्या पिकातून त्यांना थोडेथोडके नाही तर वार्षिक ६ कोटी रुपये उत्पन्न मिळते. सगळा खर्च जाऊन त्यांना १ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

वेगळ्या प्रतिमांचे मुस्लीम

लेखक माहितगार यांनी शनिवार, 21/07/2018 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना टिका करायच्या आहेत त्यांनी माझ्या आधीच्या धाग्यांवर जावे, ज्यांना (खरोखर उपरोधाने नव्हे) मुस्लीमातील (परधर्मीय/नास्तिक द्वेष, तकफीर, हिंसा नसलेला) नेमस्तपणा (मॉडरेशन), सुधारणावाद, प्रबोधनवाद, आधूनिकता, अनुकूलनीयता, सहिष्णुता, लवचिकता, अभिव्यक्ती स्वात्रंत्र्य, कला आणि संस्कृती स्वातंत्र्याची बुज राखणार्‍या, रचनात्मक आणि सकारात्मक योगदानाचे कौतुकाचे दाखले देणे शक्य आहे त्यांनी धागा लेख न वाचताही प्रतिसादातून मनमोकळे कौतुक करण्यास हरकत नसावी.

सुपरहिरोंचा शोले!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 21/07/2018 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
"इन्फिनिटी वॉर" च्या सकाळी साडेआठच्या शोला सुद्धा फुल्ल गर्दी, शिट्ट्या, टाळ्या, हास्याचे कारंजे! पूर्ण चित्रपटभर मिस्कील विनोदी डायलॉगची सुखद पेरणी! एकेका सुपरहिरोच्या एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या! यात भारंभार सुपरहिरो आहेत. एकामागून एक येतच राहतात. इतके की काहींचे नाव पण आपल्याला माहिती नाहीत. मी शेवटी मोजणे सोडून दिले. मार्व्हल अवेंजर्स 3 (इन्फिनिटी वॉर) मध्ये थेनॉस पूर्ण चित्रपटभर भाव खाऊन जातो आणि संगळ्या डझनभर सुपर हिरोंना शब्दशः पुरून उरतो. हा सुपर व्हिलन थेनॉस बराच हल्क सारखा दिसतो, कलर मात्र जांभळा!

तो आणि ती....... सत्यभामा! (भाग ८)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 21/07/2018 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980 तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995 तो आणि ती......

मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 20/07/2018 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक! मी: "एक कणीस भाजून दे!" मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!" पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती.

फर्जंद: थरारक युद्धपट!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 20/07/2018 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख २० जून २०१८ या दिवशी लिहिला असून त्या दरम्यान आणि नंतर वारेच दिवस मिसळपाव वर काहीतरी कारणास्तव मला लेख अपलोड करता येत नव्हते. म्हणून आता टाकत आहे) काल रात्री "फर्जंद" बघितला. तिसरा आठवडा सुरु असूनसुद्धा हाऊसफुल होता. स्टोरी (कथा), स्क्रीनप्ले (पटकथा), लिरिक्स (गीत लेखन)आणि डायलॉग (संवाद)अशा चार गोष्टी आणि त्यासुद्धा पहिल्याच चित्रपटात दिग्पाल लांजेकर याने समर्थपणे हाताळल्या आहेत. अमितराजचे संगीत आणि केदार दिवेकरचे पार्श्वसंगीत (बॅगराउंड म्युझिक) दोन्ही छान आणि समर्पक आहेत. त्यात नाविन्य आहे त्यामुळे ऐकायला छान रीफ्रेशिंग (ताजेतवाने) वाटतं.