उत्क्रांती
एकदा मी एका कार्यक्रमासाठी गावाला गेलो होतो. कार्यक्रम संपायला रात्रीचे 12 वाजले. मी मित्राला, मला स्टेशनवर सोडायची विनंती केली.
तो म्हणाला, एक दिवस कामाला नाही गेलास तर काय होईल? तू उद्या सकाळी पुण्याला जा. मी क्षणभर विचार केला व त्याला एक गोष्ट सांगितली,
कोणे एके काळी पृथ्वीवर फक्त एकपेशीय जीव (अमिबा) होते. त्यांना अन्न मिळवण्या शिवाय दुसरे काही करण्यास वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी एकत्र राहून काम वाटून घेण्याचे ठरवले. असा त्यांचा बहुपेशीय जीव तयार झाला. नंतर त्याची वाढ होत गेली व कामेही वाढत गेली. मग आळशी, कामचुकार पेशींची केस, नखे झाली, ताकदवान पेशींचे स्नायू झाले.
मिसळपाव