Skip to main content

लेखन मालिका

लेखक मनस्वी यांनी सोमवार, 31/03/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
खालील मत हे मिसळपाववर प्रस्तुत होणार्‍या लेखन मालिकांच्या प्रेमापोटी आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेपोटी आणि उत्सुकतेपोटी... (गैरसमज नसावा.) अहो वाट वाट म्हणजे बघायची तरी किती!! आज येईल पुढचा भाग... नाही उद्या नक्की येईल... नाही परवा येईल बहुतेक... या आठवड्यात तरी यायला हवा... ह्या महिन्यात येईल असं वाटतंय... पण छ्या... तात्यांचे रौशनी, सालस, धोंडोपंतांचे अच्युत गणपुले... एक ना अनेक! आम्ही मात्र ते वाचण्यासाठी इथे तिष्ठत असतो. मान्य आहे कामाच्या रगाड्यात नाही जमत एखाद्याला किंवा नाही बैठक जमत तशी जी त्या दुनियेत पुन्हा घेउन जाईल आणि शब्द न शब्द आपोआपच स्फुरेल... ह्रदयातून...

मी मराठी

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 31/03/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी कानावर पडतात. त्यातच 'भय्या' लोकांची हिंदी देखील मराठी भाषेत आपले 'हात पाय पसरू' लागली आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे या सार्‍या प्रसारमाध्यमांमधून आपल्याला इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचाच खुराक रोज मिळत आहे. त्यामुळे आपली भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.

तुरुंग

लेखक गिरीराज यांनी सोमवार, 31/03/2008 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुरुंग जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते मजला ठाऊक त्यांची खोडी कशाकशाची भ्रांत न उरते कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! -गिरीराज
Taxonomy upgrade extras

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 31/03/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :) कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती. डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती.

एप्रिल फुले(स्वरचित विडंबन गीत गायन)

लेखक प्रा सुरेश खेडकर यांनी सोमवार, 31/03/2008 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल फुले(स्वरचित विडंबन गीत गायन) सादरकर्ते:प्रा.सुरेश खेडकर व सौ.आरती खेडकर निवेदन: किशोर गलांडे आयोजक:सकाळ, मधुरांगण(नागपूर) बुधवार,२ एप्रिल,सायंकाळी ६:३० वाजता मंगलदीप हॉल,छत्रपति चौक,वर्धारोड, नागपूर.
Taxonomy upgrade extras

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

लेखक यशोदेचा घनश्याम यांनी सोमवार, 31/03/2008 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित. ती एकदा आजीला म्हणाली... मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जूनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून! तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून! तीचं पाणी किती गोड...

आईस्क्रीम वडे

लेखक मनापासुन यांनी सोमवार, 31/03/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नवी पाक क्रुती: बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे.त्यात चवीसाठी मीठ जिरे टाकावे , त्यात हवे असल्यास काजु /बदाम कापुन टाकावेत. गोडे तेल कढईत उकळत ठेवावे. आईस क्रीम ( वॅनीला) स्कूप ( गोळा)घेउन तो बेसन पीठात वड्याप्रमाने बुडवुन घ्यावा.व तो पटकन तळुन घ्यावा. आईस क्रीम तेवढ्याच पटकन खावे...गरम वडा- गार आइस क्रीम झकास कॉम्बीनेशन होते सू:..हा पदार्थ दिल्लीत "नुरूलाज" ची स्पेशालीटी आहे.लोक रांगा लाउन खाण्यासाठी उभे असतात. उ.सु: वडे तळुन काढणे आणि खाणे यात अंतर असु नये.

जन्म चारोळीचा.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 31/03/2008 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला तिष्ठत उभे ठेऊन तू नाही नाही ते बोललीस तू गेलीस आणि भानावर येत मनाची आरोळी आली तू दिलेल्या वेदनामय शब्दांना ओळीत उभे करून माझ्या "वांझोट्या" प्रेमाची चारोळी झाली !

गाण्यांच्या शोधात

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.