Skip to main content

?

लेखक शितल यांनी रविवार, 01/03/2009 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
तू एक स्वप्न आहेस की सत्य? हा तुझा आभास का तुझी जाणीव करून देणारा अलगद स्पर्श? मनाला काहीच उमजत नाही ... आणि शरीरालाही. सगळे विसरून वर्तमानात जगायचे, तरी घुसमट होते. मनाच्या कोपर्‍यात, खोल कुठेतरी एक साद ऐकू येत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण आज तर माझाच आवाज मीच विसरले आहे! तुझ्या सादाला प्रतिसाद द्यायला टाळतेय... का? कारण तू सत्य का तुझा मृत्यू सत्य? ... शरीर म्हणते तू आज जगात नाहीयेस, मन म्हणते तू मला सोडुन कुठे ही दूर नाही... फक्त माझ्यासाठी... मृत्यू नंतरही माझ्याजवळ.
Taxonomy upgrade extras

गदीमा आणि सुरेश भट

लेखक रामोजी यांनी शनिवार, 28/02/2009 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
ग दि माडगूळकर आणि सुरेश भट हे दोघेही महान कवी. त्यांची तुलना करणे हे फारच कठीण आहे. तरी देखील गदिमा अधिक श्रेष्ठ वाटतात. भटांनी अनेक उत्तम गझला, भावगीते आपल्याला दिली तर गदीमांनी अनेक विविध काव्यप्रकार दिले..लावणी, भावगीते, अभंग, गीतरामायण इत्यादि. भटांच्या कवीता त्यांचि महान प्रतीभा दर्शवतात, तर गदिमांचे काव्य वाचून वाटते कि अरे किती सोपे शब्द आहेत. ह्या दोन महान व्यक्तिंच्या काव्यशैली चा अभ्यास हा एखाद्या शोधनिबंधाचा विषय आहे.

खूण

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 28/02/2009 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
जा सखे गं शोधुन ये मोहन मुरलीवाला, कुठे हरवला? ना कळे, ना क्षण उसंत जीवाला - १ काल रातीला भेट जाहली कालिंदिच्या तीरी, श्याम - सावळा समोर आणिक चुकार पावा करी - २ रात्रभर जागी होती चांदणवेडि चंद्रकला, जरा स्पर्शता तरंग उठले कालिंदिच्या गुढ जला - ३ स्पर्श असे कि मोरपिस जणु शरीरभर थरथरते, क्षितीजावरती शुक्र मनोहर रात्र अशीच सरते - ४ श्याम - सावळ्या मिठीत अवचित किनखापी जर खुपते कुणा न कळता ओठांवरची अजुन पण खूण जपते - ५ - सौरभ वैशंपायन.

उडीद डाळीच्या पु-या व बटाट्याची भाजी

लेखक मिना भास्कर यांनी शनिवार, 28/02/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
ही रेसिपी दिल्ली ला ब्रेकफास्ट साठी केली जाते व या नंतर गरम गरम जिलेबीवर ताव मारतात. ( ही माहीती ऐकीव आहे.) १ वाटी उडीद डाळ २ टे.स्पून लाल मिरची पावडर १ टे.स्पून जिरे पावडर १ टे.स्पून बडीशेप १ टे.स्पून धने १ टे.स्पून गरम मसाला १ टे.स्पून ओवा १ टे.स्पून हळद मीठ चवीपुरते कणीक तेल उडीद डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवावी. नंतर पाणी काढून टाकून मिक्सर मधून बारीक करावी. बडीशेप व ओवा जाडसर पावडर करावी. वाटलेल्या डाळीत सर्व मसाले , मीठ घालून एकत्र भिजवावे. या डाळीत बसेल इतकी कणीक घालून नेहमीप्रमाणे कणीक भिजवावी. पु-या लाटून तेलात तळून घ्याव्यात. या पु-या जास्त पातळ लाटू नये. कडक होतात.

निमित्त ८ मार्च ...

लेखक मनीषा यांनी शनिवार, 28/02/2009 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
( मार्च महिन्यातील ८ तारखेला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे . ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मानला जातो. अर्थात ३र्‍या जगातील देशातील महिलांना त्याची माहिती आणि महती किती असेल हा एक प्रश्नच आहे . पण आता वर्षातील ३६५ दिवसां मधील एक दिवस महिलांना देण्यात आला आहे . भारताचाच नाही तर जगातील प्रगत अशा युरोपियन देशांचा किंवा अमेरिकेचा इतिहास पाहिला तर सगळीकडे महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूप मोठा लढा द्यायला लागलेला दिसतो ... अर्थात त्याला काही अपवाद आहेत . पण ते फक्त नियम सिद्ध करण्यापुरतेच..

बोंबलाया दाहि दिश्या

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/02/2009 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
सखारामजी गटणेजी ह्यांनी दिलेल्या जाहिर आव्हानास हे आमचे प्रत्युत्तर ! निसतला ग्लास ओन्जलितुन तो मल कुन्वित आहे वस घेत्तो मोकले की मी अत्ता ओकलो आहे एकु द्या मज शिविगल त्य्य काउन्तरच्या खुर्चितु नी मद्यगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति फुन्क्लि जी धुरादे घामबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या नाकासवे ग्लासतुन बात्ल्यातुन मदिरेची ही स्पन्दने उतुन्ग लाथा देती मज ही आच्मने हलूच ते ग्लास चुम्बनि जाती मित्रचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते गुजरात मी की मद्यबंदीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्य

फेड...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 28/02/2009 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
"राजू...." आक्काची किंचाळी रात्रीच्या घट्ट काळोखाला चिरत गेली. इतका गाढ झोपलो होतो तरी देखिल धडपडून उठलो मी. अशा वेळी सहसा उठलो तरी मला १-२ मिनिट काही सुधरत नाही. पण आक्काच्या आवाजात असा काहीतरी विलक्षण थरार होता की मी झोपलो होतो की नव्हतो असं वाटावं इतका लख्ख जागा झालो. मी अंथरूणातून उठणार एवढ्यात आक्का परत ओरडली... "राजू... ये रे लवकर... तो आला बघ परत. मला हाक मारतोय. राजू, नंदा... अरे कुठे आहात रे सगळे... तो घेऊन जाईल मला... त्याला समजवा... आम्ही काही घेतलं नाही कोणाचं... का असा छळवाद मांडला आहेस रे तू?" आक्काचा नुसता आकांत चालला होता. काय चाललंय काही कळत नव्हतं.

लग्नाच्या "बाजार'गप्पा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 28/02/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न हा "बाजार' म्हटला जातो. मनांचं मीलन बिलन खूपच दूर राहिलं. अनेकदा फक्त महत्त्वाचा असतो व्यवहार! "देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!' आमच्याही "लग्नावळी'च्या अनुभवातले हे काही किस्से...अर्थातच, क्रमशः! (किस्से क्रमशः लिहिले नाहीत, तर तो "मिपा'वर फाऊल धरतात!) --- "हॅलो' ""हां. बोला.'' ""मी XYZ बोलतोय. तुमच्या मुलीची माहिती वाचली होती एका लग्नसंस्थेत.'' ""बरं.'' ""माहिती आवडली होती, म्हणून भेटायचं होतं.'' ""बरं.

मोकलाया दाहि दिश्या

लेखक सतिश यांनी शनिवार, 28/02/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले थेन्ग
Taxonomy upgrade extras