Skip to main content

सोपी खेकडा करी.

लेखक निशांत_खाडे यांनी रविवार, 13/03/2016 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आजची पाककृती आहे सहज आणि सोप्या पद्धतीची खेकडा करी.

अमलेश्वर आणि खोलेश्वर - अंबाजोगाई

लेखक स्पा यांनी रविवार, 13/03/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी अंबेजोगाई ला जायचा योग आला.योगेश्वरी देवी कुलदेवता असल्याने तसे अधे मध्ये जाऊन येतो.लातूर एक्सप्रेस झाल्याने आता जाणे सोपे झाले आहे. पूर्वी सारखे औरंगाबाद हून बस ने वेग्रे जावे लागत नाही. लातूर ला उतरून एक गाडी केलेली होती.आमच्याच गाडीला अमित देशमुख असल्याने , सिंघम स्तैल मध्ये आधी त्याच्या २०-२५ गाड्यांचा ताफा धुरळा उडवत निघून गेला.

तार

लेखक अभिजीत अवलिया यांनी रविवार, 13/03/2016 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
१४ जुलै २०१३. रात्रीची १० ची वेळ. अश्वनी मिश्रा ह्यांनी राहुल गांधीना शेवटची तार पाटवली आणी तब्बल १६३ वर्ष सेवा बजावणारी तार सेवा भारतातून कायमची बंद केली गेली. मोबाइल, whats up, sms, email, इंटरनेट असे ताज्या दमाचे खेळाडू असताना तार सेवा चालू ठेवणे तसे पण फ़ायद्याचा व्यवहार न्हवताच. कधी ना कधी तिला जावे लागणार हे स्पष्टच होते. २०११ पासून चर्चा केली गेली आणी अखेरीस १४ जुलै २०१३ ला तिचे देहावसान झाले. अशी ही तार सेवा सुरु झाली १७९२ साली. ह्या वर्षी दूरच्या अंतरावरची टेलिग्राम सेवा सेमाफोर लाइन्स मार्फत सुरु झाली. पण इलेक्ट्रिक टेलिग्राम सुरु करण्याचे श्रेय जाते samuel morse ला.

वेताळकथा: तर त्यांचे नाते काय असावे?

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 13/03/2016 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव.कॉम वरील वाचकाने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीसारखाच नविन काय वाचायला आले आहे ते पाहण्यासाठी तो पुन्हा ऑनलाईन आला. ते पाहून वेताळ त्याला म्हटला, "हे वाचका, असाही तू वेळ घालवण्यासाठी येथे आला आहेस. या जगात मानवप्राणी अगदी वेगळा आहे. थोडा विचित्र आहे असे म्हटले तरी चालेल. तर मग मी अशाच प्रकारातील एक सत्यकहाणी सांगतो ती तू ऐक म्हणजे तुझा वेळ मजेत जाईल." असे म्हणून वेताळ सत्यकहाणी सांगू लागला----- पाषाणभेदने क्लायंटला आपले बोलणे पटवून दिले. क्लायंटसमोरील काम संपल्यानंतर आपल्या कामाच्या धोपटीत आपली नेहमीची कागदपत्रे ठेवली अन ती आपल्या खांद्यावर अडकवली.

पाण्यासाठी दाही दिशा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 13/03/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
राज्यात दुष्काळाचे सलग चौथे वर्ष सध्या आपण भोगतो आहोत. अनेक शहरांमध्ये आत्ताच पाण्याची बोंब उडालेली आहे. पुण्यासारख्या आणि नाशिकसारख्या, ठाण्यासारख्या एरवी पाण्याच्या बाबतीत सुखी राहिलेल्या शहरांमध्येही आठवड्यांतून दोन दिवस कधी तीन दिवस पाणी येणार नाही अशी स्थिती उद्भवलेली आहे. आणि आत्ता आपण फक्त मार्चच्य मध्यावर आलो आहोत! पुढचा पाऊस सुरु होऊन तलाव धरणांतील पाणी साठा उचावण्यासाठी अद्याप तीन महिन्यांचा किमान अवधी आहे. काळ तर मोठा कठीण आला अशीच ही स्थिती आहे.... अशा वेळी पाण्याच्या साऱ्या नव्या जुन्या योजना आठवल्या तर नवल नाही.

अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद हवा विसंवाद नको

लेखक अनिकेत एस जोशी यांनी शनिवार, 12/03/2016 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचा पहिला आठवडा तीन दिवसातच समाप्त झाला. 9 मार्चला सुरु झालेल्या या अधिवेशनाचे कामकाज 17 एप्रिलपर्यंत दाखवण्यात आले आहे. तसे पाहिले तर हे अधिवेशन चक्क चाळीस दिवस चालेल असे म्हणावे लागेल. पण प्रत्यक्षात कमाचे दिवस आहेत फक्त तेवीस!! दि. 17 एप्रिल पर्यंतचे अधिवेशन असे दाखवलेले आहे, पण त्यात दि. 13 एप्रिल नंतर साऱ्या सुट्याच आहेत. पहिला आठवडा तीन दिवसातच संपल्या नंतर पुढचा, म्हणजे दुसरा सप्ताह, हा कामाकजाच्या पूर्ण पाच दिवसांचा आठवडा आहे. त्या नंतरचा तिसरा आठवडा पुन्हा तीन दिवसांचा आहे.

अशी कबुतरे येती...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 12/03/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे!