१४ जुलै २०१३. रात्रीची १० ची वेळ. अश्वनी मिश्रा ह्यांनी राहुल गांधीना शेवटची तार पाटवली आणी तब्बल १६३ वर्ष सेवा बजावणारी तार सेवा भारतातून कायमची बंद केली गेली. मोबाइल, whats up, sms, email, इंटरनेट असे ताज्या दमाचे खेळाडू असताना तार सेवा चालू ठेवणे तसे पण फ़ायद्याचा व्यवहार न्हवताच. कधी ना कधी तिला जावे लागणार हे स्पष्टच होते. २०११ पासून चर्चा केली गेली आणी अखेरीस १४ जुलै २०१३ ला तिचे देहावसान झाले.
अशी ही तार सेवा सुरु झाली १७९२ साली. ह्या वर्षी दूरच्या अंतरावरची टेलिग्राम सेवा सेमाफोर लाइन्स मार्फत सुरु झाली. पण इलेक्ट्रिक टेलिग्राम सुरु करण्याचे श्रेय जाते samuel morse ला.