अनवट किल्ले १३ :म्यानातून उसळे तलवारीची पात, सामानगड ( Samangad)
ई.स. १६७४. राजधानी रायगडावर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची तयारी चाललेली, सगळीकडे निमंत्रणे गेलेली. अगदी कट्टर शत्रु ईंग्रजानही निमंत्रण पोहचले होते, पण खुद्द स्वराज्याच्या एका मानकर्याला मात्र या सोहळ्याला यावयाची परवानगी नव्हती, कोण हा शिलेदार ? हे होते स्वराज्याचे सरनौबत कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर. स्वराज्याच्या एका डुख धरलेल्या नागाला, बहलोलखानाला त्यांनी हाती गवसलेला, असताना, जतजवळील उमराणीजवळ धर्मवाट दिली. हाती आलेला शत्रु, गवसलेला नाग आणि न विझलेली आग या तीनही गोष्टी अर्धवट दुर्लक्षित करायच्या नाहीत, हे शिवाजी महारांजांचे धोरण विसरण्याची चुक या मानकर्याकडून झाली होती.
मिसळपाव