Skip to main content

अनवट किल्ले १३ :म्यानातून उसळे तलवारीची पात, सामानगड ( Samangad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 30/06/2017 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
ई.स. १६७४. राजधानी रायगडावर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची तयारी चाललेली, सगळीकडे निमंत्रणे गेलेली. अगदी कट्टर शत्रु ईंग्रजानही निमंत्रण पोहचले होते, पण खुद्द स्वराज्याच्या एका मानकर्‍याला मात्र या सोहळ्याला यावयाची परवानगी नव्हती, कोण हा शिलेदार ? हे होते स्वराज्याचे सरनौबत कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर. स्वराज्याच्या एका डुख धरलेल्या नागाला, बहलोलखानाला त्यांनी हाती गवसलेला, असताना, जतजवळील उमराणीजवळ धर्मवाट दिली. हाती आलेला शत्रु, गवसलेला नाग आणि न विझलेली आग या तीनही गोष्टी अर्धवट दुर्लक्षित करायच्या नाहीत, हे शिवाजी महारांजांचे धोरण विसरण्याची चुक या मानकर्‍याकडून झाली होती.

सोलमेट २

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/06/2017 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डेस्कवर बसून आकांक्षा विचार करत होती, आयुष्यातील घटना एखाद्या टाइमलॅप्स व्हिडीओप्रमाणे तिच्या डोळ्यांसमोरून सरकत जात होत्या. घरातल्यांपासून आलेला दुरावा, नात्यांतील अपेक्षाभंग, असफलता, करिअर मधील स्टॅग्नेशन, कधीमधी छळणारे एकटेपण, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन आधी ती जवळ्पास डिप्रेशन मध्ये गेली होती. "मॅडम चला, सुटलं ऑफिस..

एक red wine नातं!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 30/06/2017 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
ती त्याच्याहून साधारण आठ वर्षांनी मोठी. तिच लग्न झाल होत. एक मुलगा आणि प्रेमळ नवरा असा सुखी संसार. पण तरीही त्याची आणि तिची झक्कास मैत्री होती. दोस्ती झाली तेव्हा नुकतेच इंटरनेट सुरु झाले होते. भेटण कमी व्हायचं दोघांच. पण याहू मेसेंजरवर खूप गप्पा व्ह्यायच्या. ती त्याला सतत चिडवायची कोणत्या ना कोणत्या मुलीवरून. तो ते एकदम खेळीमेळीने घ्यायचा. अशीच दोघांची दोस्ती वाढत होती. त्याच्या घरी गणपतीला नवऱ्याला आणि लेकाला घेऊन ती गेली होती. तिच्या मनात होतं कदाचित् त्याचे पालक आणि तिचा नवरा असे सगळे मिळून एक कौटुंबिक मैत्री होईल. पण तस काही झाल नाही.

शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 30/06/2017 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो.

II ना होतो नवा मी , ना होती ती जुनी II ( मिपा मित्रानो "जेनी" नाही बरं का ... जुनी )

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी शुक्रवार, 30/06/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
ना होतो नवा मी ना होती ती जुनी गोष्ट चालूच होती होती फक्त राजा न राणी II सांगे आषाढ पाऊस नको सोडून जाऊस संगे थांब तू जरासा वाटे हृदयास दिलासा II किती दिल्या आणा भाका चुके काळजाचा ठोका वर्षे क्षणात लोटली आता क्षण वाटे मोठा II असा काय घात झाला झाली दुसरीच राणी राजा दूर दूर गेला सोडून साऱ्या आठवणी आता कुणासंगे बोलू मन उदास उदास आषाढ पावसाचा जोर देई राजाचा रं भास फुटकं नशिब त्ये माझं संगे आठवणींचं ओझं म्या चालली चालली जिथं नेतील तिथं ढग II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

कविता II आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी गुरुवार, 29/06/2017 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला विषाद नव्हता मनी तो कसला ना होती मनीषा अन विजिगीषा पाषाण शोधण्यातच हया गेली अनभिज्ञ ,घन अन नाजूक बंधन अक्षय संचयात किल्मिषे दाटली पृथ्थककरणात अन निरूपणात कैक अमावास्यां पौर्णिमा लोटली भ्रमिष्ट अस्थिपंजर शोध कूर्म गतीने पाषाणाचा अनिर्वचनीय बंधनात अविरत सोबतीने शोध अस्तित्वाचा अनावृत वैचित्र्य अनाहूत गाठे यथास्थित स्थितिस्थापक क्षणभंगुर वाटे शिरकाण बलिदान ती ज्येष्ठ नाती पाषाण शोधण्यात दिली मूठमाती सिद्धेश्वर विलास पाटणकर C

आवर्तन

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 29/06/2017 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची आवर्तनं चालू असताना प्रत्येक थेंबाला जमिनीवर एक कोंब फुटतो, आणि पाणी वेलीसारखं पसरत जातं. अचानक थबकायला होतं, आणि भीती वाटते की आपल्याला येणारी जगाची अनुभूतीच तर चुकीची नाही ना? मी आणि माझ्या नजरेने ठरवून घेतलेल्या रूपांमध्ये ज्याचं जगणं अल्पायुषी वाटतं, त्या त्या रुपांच्या मर्यादेतून बाहेर काढलं, तर त्या पाण्याला एकच गुणधर्म राहतो-वाहतेपण. या अचानक झालेल्या जाणीवेने क्षणिक काय, नित्य काय, याच्या सगळ्या संकल्पना वाहत्या होऊन जातात. सरपटत जाणारं पाणी सापडेल तिथल्या भेगेत जुनाट वाड्याच्या भिंतींवरील वेलीप्रमाणेच चोरपावलांनी शिरतं, आणि त्या भेगेइतकंच शहारायला होतं.

ती उत्तर मागत नाही...

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 29/06/2017 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा! मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!
काव्यरस