Skip to main content

गूढ अंधारातील जग -२

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 14/11/2017 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -२ मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ. युद्धाचा मूळ हेतू म्हणजे आपल्या शत्रूचे आर्थिक शारीरिक /सामरिक आणि मानसिक खच्चीकरण करणे. जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही(साम) तिच्यासाठी पैसे मोजून(दाम) काम होत असेल तर ठीक ते जर होत नसेल तर दंड (युद्ध) आणि भेद (शत्रूला एकटा पाडणे) हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत. यात लष्कराचा किंवा कूटनीतीचा भाग दंड आणि भेद यात केला जातो.

शिवांबू कल्प विधी

लेखक mantarang यांनी मंगळवार, 14/11/2017 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
================================================= अस्वीकरण (डिस्क्लेमर) : या लेखातील मजकूरासंबंधात मिसळपाव कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. खुद्द लेखकानेही मजकूरात "अनेक अतिशयोक्त गोष्टी आहेत" असे लिहिले आहे.

अहेवपण ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 14/11/2017 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळी अस्वस्थ मनाला दुरच्या दिव्यांची वाटे आस स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा कितीक स्मरती हळवे भास उगाच ओठी शब्द अडकती दूर कोणी कोकिळ बोलतो तुडुंब मनाचे आगर भरतां उद्रेकाला मग वाट शोधतो नाद खगांचे, स्वर समीराचा कातळडोही अनाम खळबळ विजनवास व्रतस्थ मनाचा गर्द सावल्या सावळ सावळ पैलतीरी उभे दुत प्रकाशी कुणी छेडले सनईचे सूर अहेवपण सजले सरणावर प्रिया मनी हे कसले काहूर? © विशाल कुलकर्णी
काव्यरस

असतेस घरी तू जेव्हा...(विडंबन काव्य)

लेखक OBAMA80 यांनी मंगळवार, 14/11/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे व सलील कुलकर्णी यांची प्रथम माफी मागून सादर करतो आहे त्यांच्या "नसतेस घरी तू जेव्हा" चे विडंबन...... असतेस घरी तू जेव्हा **************** असतेस घरी तू जेव्हां जीव घाबरा घुबरा होतो जगण्याची विरते आशा संसार नकोसा होतो असतेस घरी तू जेव्हां ...../1/ नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ग होतो घराची तावदाने फुटती अन भितींना कंपही सुटतो असतेस घरी तू जेव्हां ...../2/ येतात मुले दाराशी, हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकून भैय्या मग कपड्यांवाचून जातो असतेस घरी तू जेव्हां ...../3/ तुज घाबरून घालविलेल्या मज स्मरती लाखो वेळा तव पैशांने घर हे चालते म्हणूनच तुला ग झेलतो असतेस घरी तू जेव्हां ...../4/ त
काव्यरस

#एकादशी #

लेखक सतिश गावडे यांनी मंगळवार, 14/11/2017 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तारी भवसागरी करी मज मोकळा देई तुझ्या रे चरणी तू ठाव मला झालो चिंब भक्तीत मीपणा नुरला माझा देह हा चंदनाचा रे झाला नामाचा गोडवा माझ्या ओठी आला पामर रे तुझा हा भक्ती रस प्याला पाहूनी राधेसी तुझिया रे अंकावरी होई रुकमाई रे कावरी बावरी झाले सहन न तिला आली दिंडीरवनाला देवा आला तू पाठी समजूत घालण्याला पाहूनी झोपडी रे चंद्रभागेतीरी देवा क्षण दोन क्षण तू थबकला देवा क्षण दोन क्षण तू थबकला आतून वीट फेकली पुंडलीक बोलला तू थांब मातापित्याची सेवा करु दे
काव्यरस

!! बालदीन !!

लेखक नाखु यांनी मंगळवार, 14/11/2017 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
!!बालदीन !! असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची शिलकीच्या तबल्यासम बालतळावर स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू -झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार ) २२ जून २०१७

*बालदिन *

लेखक वैभवदातार यांनी मंगळवार, 14/11/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
*बालदिन * हासूया खेळूया नाचूया गाऊया आनंद घेऊया मुलांसवे कोवळ्या निरागस मुलांपासून मिळते आम्हा सुख नवे पंडित नेहरूंचा जन्मदिवस आज म्हणती त्यास बालदिन मुले असती फुले देवाची होऊ त्यांच्यात तल्लीन मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू सद्विचारांचे शिंपण करूनी उद्याचे आदर्श नागरिक घडवू --शब्दांकित (वैभव दातार ) १४ नोव्हेंबर २०१७

एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र

लेखक पुंबा यांनी मंगळवार, 14/11/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह!

गाज

लेखक अबोली२१५ यांनी सोमवार, 13/11/2017 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीवर्धन तालुक्याच्या कुशीत रममाण छोटे खाणी दिवेआगर.दिवेआगर म्हणजे सृष्टीला पडलेलं स्वप्न... नारळ पोफळीच्या बागांनी नटलेल निसर्गान पुष्कळ दान केलं. जसे श्रीवर्धनला अतिप्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आहे त्याचप्रमाणे दिवेआगर हि अतिप्राचीन गावांपैकी एक ठरत असून देवविद्या पारंगत घैसास, देवल, मावलभट आदी ब्राम्हणाची वस्ती होती. समुद्रमार्गानी येणाऱ्या अरब चाच्यांनी या गावाला वेळोवेळी लुटलं. पण, भट आणि बापट या दोघा भावंडानी सिद्धीच्या परवानगीने याचा कायापालट केला.

‘डर’ – एक भयकथा !

लेखक ए ए वाघमारे यांनी सोमवार, 13/11/2017 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
'डर' – एक भयकथा ! असं म्हणतात की झुरळ हा प्राणी फारच प्राचीन आहे. प्रागैतिहासिक का कुठल्याश्या काळापासून तो पृथ्वीवर वास्तव्य करून आहे. मानव तर तसा 'आनी-जानी'च आहे म्हणा. पण झुरळं मात्र माणसांच्या आधीपासून होती आणि माणसांच्या नंतरही राहणार आहेत असं आम्ही कुठेतरी वाचलंय. पण य:कश्चित झुरळाला इतकी सिनिअ‍ॅरिटी देऊन त्याचं 'प्रतिमासंवर्धन' करणं काही आम्हाला पटत नाही. मग या झुरळांपेक्षाही जुनं काय असावं जे आजही आपल्या आजूबाजूला सर्व चराचर व्यापून आहे ? थोडं डोकं खाजवल्यावर लक्षात आलं की- आहे ! अशी एक गोष्ट आहे जी या पृथ्वीवर फडतूस झुरळांपेक्षाही जुनी आहे ती म्हणजे भय, भीती किंवा डर !