Skip to main content

शब्दविता

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 19/01/2018 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेला अर्थ नसावा संदर्भ नसावा विचारांचा मागमूसही नसावा शब्दांच्या शिड्या नसाव्या नसावेत अर्थाचे मनोरे कवितेतून काहीतरी सापडलंच पाहिजे अस काही नाही कवितेला नसावी अस्मिता नसावा द्वेष , नसावा क्रांतीचा ललकार कवितेत नसावा गूढ वगैरे अर्थ सापडूच नये संदर्भाला स्पष्टीकरण कवितेत नसावा निसर्ग कवितेत नसावे दुःखाचे डोंगर नकोत आनंदाचे चित्कार नकोत मनाचे हुंकार नकोत जातीधर्माचे अन्याय नसावी जगण्याची भौतिकता नसावे मोहाचे आगार नसावी प्रणयाची धुंदी नसावा विरह एवढ सगळ नसल्यावर मग उरेल काय ?? उरेल असंबंध शब्दांची मांडणी वेडीवाकडी मुक्त धुंद अव्यक्त भ्रमांचा मोठा नद वाहेल एका कवितेच्य

अनवट किल्ले २६: खानदेशाचे वैभव, भामेर, रायकोट ( Bhamer, Raikot )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 19/01/2018 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
धुळे जिल्ह्यात असणाऱ्या पाच डोंगरी किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर डोंगरी किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेरगड. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धुळे - सुरत महामार्गावर धुळ्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फुट आहे. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला भामेर गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला असुन या किल्ल्याने व शेजारच्या डोंगराने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला दुहेरी तटबंदी व प्रवेशद्वार बांधून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला व किल्ल्याला संरक्षित केले होते.

वलय (कादंबरी) - प्रकरण ४

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 19/01/2018 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41807 --- प्रकरण 4 एकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम “राजमा चावल” खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता. पलीकडून आवाज आला, “जानू, पहचाना मुझे?” तो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते. “क क कौन? रा राहुल गुप्ता?” घाबरत रागिणी बोलली. “अरे वा! ठिक पहचान लिया तूने!

प्रवास

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/01/2018 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’ त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली . गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले.....

आठवणीतला घरचा मेवा -२

लेखक जेडी यांनी शुक्रवार, 19/01/2018 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतला घरचा मेवा -१ पावसाळ्यातल्या पदार्थ तसे फारसे नसत पण आषाढ लागला कि आषाढ तळणे हे एक काम असे . त्यात मग मुख्यतः तिखट आणि तळणाचे पदार्थ असत . चकली, खाऱ्या शंकरपाळ्या, तिखटाच्या पुऱ्या असे ते पदार्थ असत . आमच्या कोल्हापुरी भागात कर्नाटकी बेंदूर असतो तर तोही असाच जून जुलै महिन्यात येतो तर त्यासाठी खडूगळी (कडबोळी ) केली जात . बोली भाषेत खडूगळीच म्हणतात . हे म्हणजे तेच बेंदराला मातीच्या बैलांच्या शिंगात गोल जे वळे घातलेले असत तेच . त्यात हरबरा डाळीचे पीठ, कणिक आणि गूळ असे भिजवून त्याची गोल गोल वळी बनवायची आणि नंतर तळायची .

कुणी घरटं देतं का घरटं !

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 18/01/2018 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे.) आपले लहानपण 'एक घास चिऊचा , एक घास काऊचा' असे ऐकण्यात गेले. 'चिऊताई चिऊताई दार उघड असे विनवणारा कावळा आणि त्याला न जुमानणारी चिमणीही असायची. माणसाला हा नखरेलपणा बहुधा आवडला नसावा. अक्षरक्षः रस्त्यावर आणले हो त्याने दोघांना. कावळ्यालाही पिंडापुरते ठेवून त्याचाच पराचा कावळ केला. आज ते दोघे 'कुणी घरटं देतं का घरट' असा चिवचिवाट करत असतील असं उगीचच वाटत राहत. पण मला खात्री आहे की पक्ष्यांची ही भाषा माणसाला कधी कळणारच नाही.

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 18/01/2018 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!) सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला! पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला! आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी? मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला! वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला! भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला! —सत्यजित

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला.. वेगळे सुचलेले--

लेखक राघव यांनी बुधवार, 17/01/2018 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
विशालची ही रचना बघून वेगळ्याप्रकारे काही मांडणे झाले [विडंबन नाही].. गझल आहे की नाही हे मात्र माहित नाही. सूर येथे होत बेसूर.. ऐकायचे नव्हते मला.. या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला.. श्वापदांनी फाडलेले पदर ज्यांना झाकती.. देहभूमीच्या चिरांना मोजायचे नव्हते मला.. ओथंबले आभाळ माझे.. मग सर्वकाही चांगले! तीरापल्याडच्या भुकेला उमजायचे नव्हते मला.. पुन्हा वळती त्या दिशेला..पावले माझी..
काव्यरस

शेजाऱ्याचा डामाडुमा- बेबे-कोक्को, ऑपरेशन कॅक्टस आणि भारत-मालदीव - भाग ६

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 17/01/2018 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील या आधीचे ५ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. पाचवा भाग इथे आहे :- http://www.misalpav.com/node/41759  आजचे माले शहर * * * वर्ष १९८८ आणि स्थळ श्रीलंकेचा उत्तर किनारा. उमामहेश्वरन उर्फ मुकुंदनला आता स्वतंत्र तामिळ इलमसाठी 'संघर्ष' सुरु करून दहा वर्षे होत आली होती.