Skip to main content

सर्वोच्च चढाईचा, कुलंग ( Kulang)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 09/02/2018 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
सरासरी सातशे मीटर उंची असलेल्या सह्याद्रीतील किल्ल्यावर चढाई म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच तासाची निश्चिती. पण सह्याद्रीतील सर्व गडात सर्वाधिक वेळ लावणारी, म्हणजे तब्बल पाच तासाची चढाई असणारा किल्ला म्हणजे, "कुलंग". हेच ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

आपला मानुसच्या निमित्ताने

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 09/02/2018 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
'आपला मानुस'च्या निमित्ताने आजच आपला मानुस प्रेक्षागृहात झळकला. सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अभिनित हा चित्रपट पहिल्याच दिवशी बघितलाच पाहिजे हे मी कधीच ठरवलं होत. अर्थात त्याच कारण अगदीच स्पष्ट आहे. सतीश राजवाडे सारखा सशक्त दिग्दर्शक साक्षात नाना पाटेकर सारख्या 'नटसम्राट' व्यक्तीला पडद्यावर कसं दाखवतो ही उत्सुकता तर होतीच. पण सोबत तेवढाच सशक्त अभिनय करणारा सुमित राघवन आणि स्वतःच वेगळेपण कायम सिद्ध करत आलेली इरावती हर्षे असे सशक्त कलाकार होते. खरच चित्रपट अप्रतिम जमून आला आहे यात वादच नाही. नानांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार?

सर्वसामान्य आणि राजकारणी!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 09/02/2018 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य जनता भावूक असते राजकारण्यांना ती मुभा नसते.. समोर होणारा अपघात बघूनही चाकरमानी पळतात.. लेटमार्कच्या भिती पुढे हृदय गहाण ठेवतात! त्यांच्या असहाय्यतेचे कौतुक होते... राजकारण्यांच्या उशीराचे वाभाडे निघते... हृदयशून्य... भावनाहीन... राजकारणी असतात... जणूकाही त्यांच्याकडे मनं नसतात! निवडून दिलंय तुम्हाला... तुमच्या प्रत्येक क्षणावर हक्क... कराच तुम्ही चूक... अपमानाचा चाबूक तुमच्यावर! म्हणतात ना हृदयशून्य... मग तसंच जगावं... तुमची मुलं... तुमचं कुटुंब... प्रायोरिटी कधीच नसावं.... म्हणून वाटतं माणसाने राजकारणी नसावं... किमानपक्षी राजकारणात भाऊक नसावं!!
काव्यरस

माझा जॉली होतो तेंव्हा

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 09/02/2018 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
"यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा." रविवारी सकाळी मी अंथरुणात लोळत पडलो असताना आमच्या हीने बॉम्ब टाकला. उंच धिप्पाड जोएल गॉर्नरने पहीलाच चेंडू शिवसुंदर दासला बाउंसर टाकल्यावर त्याची जी अवस्था होइल तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. शाळा कॉलेजातले सारे खडूस मास्तर बायकोचे रुप घेउन माझी सरप्राइज टेस्ट घ्यायला उभे आहे असे वाटत होते. हा सारा त्या जॉली एलएलबी सिनेमाचा परिणाम होता. कुठुन दुर्बुद्धी झाली आणि तो सिनेमा बघायला गेलो असे झाले होते.

काहूर !!!

लेखक Sanjay Uwach यांनी गुरुवार, 08/02/2018 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
काहूर !!! प्रत्येक माणसाचा एक मूळस्वभाव हा ठरलेला असतो .या स्वभावाला अनुसरून तो आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय घेत असतो .कधी कधी मात्र छोट्याशा स्वार्था साठी तो कांहीतरी विसंगत असे निर्णय घेतो .या विसंगत निर्णयाची प्रेरणा देखील, त्याला त्याच्याच अंतर मनातून मिळाली असते . दिनूची गोष्ट हे याचे एक छोटेसे उदाहरण असू शकेल . दिनू तसा प्रामाणिक माणूस .त्याच्या आयुष्या बद्दल अधिक काय सांगणारा .लहानपणीच त्याच्या आईवडिलांचे छत्र हरपले . एकट्या म्हाताऱ्या आजीने, लोकांच्या घरी मोल मजुरी करून दिनूचा कसाबसा सांभाळ केला.

आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 08/02/2018 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
मनो याम्च्या बाजीराव अ‍ॅट बिठूर लेखातील; राही, मनो, अरविंद कोल्हटकरां सोबतची एक अनुषांगिक उपचर्चा राजेलोकांची बसण्याची पद्धती आसने सिंहासन इत्यादी मार्गाने गेली . त्या चर्चेत सिंहासनास संस्कृतातील मंचक आणि भद्रासन हे शब्द पर्यायांचा विचार झाला . उर्दूतील तख्त , गद्दी शब्दाची चर्चा झाली तर मराठीतील गादी शब्दाचीही आठवण निघाली . पत > पट > पाट >आटपाटनगर, पाटनगर , पाटण, पाटील पटेल इत्यादी शब्द साधर्म्याचा शोध या निमित्ताने वेगळ्या धागा लेख चर्चेच्या माध्यमातून घ्यावा असा विचार केला.

तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 08/02/2018 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली गंध मनाचा उडाला नभी थेम्ब बनुनी खाली कोसळली तुझी आठवण साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली झिजूनी काय मिळवले, माउली ? चूल मोकळीच राहिली हात जरी असले मदतीस हजार तुझी चव मात्र आतच राहिली उत्तरे न मिळती कोड्याची सर्व दडले या अंतरी मनी साठले भंगार सारे अंगार बनुनी जाळी जीवा ज्वाला जिथे तिथे पोहोचली तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली चूक घडली , क्षमा नाही , अक्षम्य अपराध हा आम्ही काशी नाही दाविली उभी हयात चिंतेत गेली चितेवरी ती लोपली गेली मित्रा, सोडूनि आम्हा कायमची माझी माउली सिद्धेश्वर विलास पाटणकर

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा….

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 07/02/2018 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा चंद्र ना स्वयंभू,रवितेज वाहतो हा |ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा || जे न पाहे रवी ते पाहे कवी असे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. इथे कवी ने नुसती कविकल्पनाच केली नाहीये तर, या कविकल्पनेतुन एक खगोलीय सिध्दांत देखील व्यवस्थित मांडला आहे.

नुकते ३१ जानेवारीला संध्याकाळी , झालेल्या चंद्रग्रहणाने आबालवृध्दांना उत्साहीत केले होते. जगभरातुन अब्जावधी लोकांनी हा स्वर्गीय नजारा पाहीला, अनुभवला. सोशल मीडीया च्या वापरामुळे सध्या या व अशा अनेक घटनांविषयी जागरुकता आजकाल वाढताना दिसते आहे. यातुन आपल्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुनः प्रवेश होताना दिसतो आहे.

वी आर नॉट मेड फॉर ईच आदर

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 07/02/2018 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता आला आहेस? कुठे होतास इतके दिवस, इतके महिने , इतके पावसाळे? आला आहेस इथपर्यन्त ठीक आहे पण सांग का आला आहेस? मला न्यायला की असाच? मी प्रश्न विचारतेय खरी पण आहेत त्याची उत्तरे तुझ्याकडे? नसतीलच. कारण हे प्रश्न तू स्वतःला कधी विचारलेच नसतील. हे प्रश्न तुला पडलेही नसतील. तुझ्याकडे वेळ कुठे आहे त्यासाठी? मला आठवतोय तो दिवस जेंव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तो. विश्वामित्र ऋषींच्या सोबत त राजवाड्यात आला होतास. तुला पाहिले आणि पटकन मोहीत झाले असं काही नाही झालं पण इतर सर्व राजे राजकुमारांमधे तू वेगळा वाटत होतास. त्यांच्या भरजरी थाटामाटासमोर तू अगदी साधा वाटत होतास.

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 07/02/2018 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा! कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा! कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!