Skip to main content

अनवट किल्ले २७: राणी लक्ष्मीबाईचा माहेरचा वारसा, पारोळा ( Parola )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 16/02/2018 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मै मेरी झांसी नही दुंगी" हा बाणेदार उदगार काढणारी मर्दानी झाशींची राणी उर्फ मनकर्णिका तांबे ह्या मुळ पारोळा या गावच्या. याच गावात खंदकांनी वेढलेला बळकट भुईकोट आज काहीश्या पडीक अवस्थेत उभा आहे. याच भुईकोटाची या धाग्यात माहिती घेणार आहोत. केळी, सोन्याच्या पेठा आणि चित्रपटांच्या वितरणाचे केंद्र अश्या विवीध कारणासाठी प्रखात्य असणार्‍या जळगाव जिल्ह्यातून धुळे-नागपुर महामार्ग जातो. याच महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मध्यभागी पारोळे गाव वसलेले आहे. पूर्वी या गावातील रस्त्यावर अधूनमधून पिंपळाचे अनेक ' पार ' ओळीने बांधलेले दिसायचे.

काही त्रिवेणी रचना...

लेखक राघव यांनी शुक्रवार, 16/02/2018 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
सहज विचार करतांना उतरलेले हे काही शब्द.. ============ सांगायचं कसं अन् लिहायचं कसं.. मनांतलं शब्दांत मांडायचं कसं? त्या अग्नीपंखाचा तुटक्या पंखांना सवाल, "आता उडायचं कसं?" ============ लहान मुलं आणि त्यांची निरागसता.. वेड लावणारं त्यांचं निष्पाप मन.. पारिजाताच्या फुलांसारखं नितळ विश्व! ============ प्रयत्नांची कास सोडू नये.. कामनांची आस धरू नये.. ईच्छा अर्पण करावी.. निष्काम कर्म करावं.. गुंतागुंत आणि परस्परविरोध ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात! ============ केवढाली कपाटं आणि पुस्तकांची आरास..
काव्यरस

बक्षिस समारंभ (शतशब्दकथा)

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 16/02/2018 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
अरे बापरे..एवढी सगळी प्रशस्तीपत्रके ? कमीतकमी अर्धा तास तरी लागेल हा सगळा गठठा संपायला... आयोजकांनी हे आधी सांगायला नको का ? सगळीकडची हीच बोंब. ..नियोजन म्हणून काही नाहीच. आणि एवढं करून मिळणारे मानधन किती ? सात हजार फक्त. कोण कुत्र तरी विचारत का सात हजारला .. छ्या.. वेळ काही संपतच नाही आजचा. कधी एकदा हॉटेलवर जाऊन झोपतो अस वाटतयं.. ................................................................................ माहितेय आज मला बक्षिस मिळणार! फक्त अर्धा तास राहिला आता.. आला की नंबर माझा..धावत जाऊन बक्षिस घेतो आता.. बापरे..यात चक्क पन्नास रुपये आहेत ..एवढ्या पैशाच काय करावं ?

॥ रमू नको या जगात ॥

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 16/02/2018 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
रमू नको या जगात दुःखांचा राजा तू दुःख कनवटीला असे घे दुःखांची मजा तू विरह असो , प्रेम असो असो प्रेमाचा भंग तो कुणीही तुला काही म्हणो तू मात्र अभंग हो जळो कुणी , कुणी मरो जगण्यात काय ते जळीस्थळी दुःख ज्याला त्याला मरण्यात काय ते दुःख दुःख दुःख कुणी पहिले नसेल ते सुख सुख सुख कुणी स्पर्शिले नसेल ते वंद तू धर्मास या कर्माचे मर्म जाण मोक्ष असा ना मिळतो विरहाचे कर्मकांड अंतरी तू शोध घे विरहाचे काय ते सोड वस्त्र देहाचे आत्म्याचे पाय ते उडून जा किरणासम भेद घे तू आत्म्याचा मोक्ष प्राप्त होई तुज आवाज हा परमात्म्याचा सिद्धेश्वर विलास पाटणकर C
काव्यरस

वलय (कादंबरी) - प्रकरण १२

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 16/02/2018 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ९, १० आणि ११ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41948 ---- प्रकरण 12 संध्याकाळी साडेसात वाजता दोघे बेडवर एकमेकांच्या पायात पाय अडकवून बाहुपाशात बसलेले होते. न बोलता. शांत. निवांत. “मी कॉफी बनवून आणते!”, रागिणीने शांतता भंग केली. “थांब. बैस अजून! अशीच मला चिटकून बाहुपाशात बसून रहा! तुला क्षणभरसुद्धा दूर होऊ द्यावेसे वाटत नाही!” सूरज तिला आणखी छातीशी ओढत म्हणाला. “मिस्टर सूरज सिंग! आता अप्रेम बास झालं! थोडं प्रेम उद्यासाठी राहू द्या!”, असे म्हणत तिने जवळ पडलेली ब्रा उचली आणि घालायला सुरुवात केली. “ओके रागिणी जी!

पेशवाईतल्या गमतीजमती

लेखक मनो यांनी शुक्रवार, 16/02/2018 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही माहिती मला उल्लेखनीय वाटली म्हणून काही पुस्तकातून जवळपास जशीच्या तशी घेतली आहे. इतिहास संशोधकांना अर्थात ती आधी माहित असेलच. शक्य तिथे मूळ पुस्तकाचे उल्लेख केले आहेत. नवीन संशोधनाबद्दल वाचायचे असेल तर थोडी वाट पहा - दोन लेख नवीन माहितीसह देणार आहे काही दिवसात, एक साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल आणि दुसरा पुण्याच्या शनिवारवाड्याबद्दल ... :). १) श्री. यशवंत नरसिंह केळकर यांनी 'मराठी रियासत - उत्तरविभाग १ - सवाई माधवरावाच्या पूर्वायुष्यक्रम' या गो स सरदेसाई यांच्या पुस्तकात दोन पानी लेख लिहिला आहे.

ग्रामीणांचा आहार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/02/2018 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा.

लाज

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/02/2018 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
******************* पोर वेडी पोट पकडुन झोपते माय दिसता भूक विसरुन नाचते देव सांगा राहतो कुठल्या घरी? बंद दाराच्या गजातुन शोधते एकदा भेटायचे बाबा तुला पत्र कोरे रोज हटकुन टाकते ग्राहकांची नेहमी गर्दी तिथे पोर आहे..., माय विनवुन सांगते भूक त्यां डोळ्यात आहे दाटली वेळ थोडा पदर पसरुन मागते भाकरीचा चंद्र द्या हो ईश्वरा त्याचसाठी देह वाटुन टाकते रोज आत्मा खर्चते माझाच मी लाज माझी मीच उधळुन सोडते ******************* © विशाल विजय कुलकर्णी
काव्यरस

माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 15/02/2018 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

प्रचलित गणनापद्धति, १ ते ९ हे अंक, ० हा अंक आणि स्थानाप्रमाणे अंकाने दर्शविलेले मूल्य असणे ह्या सर्व बाबी अज्ञात अशा प्राचीन हिंदु गणितज्ञांची विश्वाला देणगी आहे हे आता सर्वमान्य झाल्यामध्ये जमा आहे. रोमन, ग्रीक किंवा तत्पूर्वीच्या बाबिलोनियन इत्यादि पद्धतींमध्ये नसलेले गणनाकौशल्य ह्या पद्धतीने जगाला दिले आणि भौतिक शास्त्रांची पुढील सर्व प्रगति ह्या गणनापद्धतीच्या पायावर उभी आहे ह्याविषयी दुमत नाही. आकडा कितीहि मोठा असू दे, ह्या पद्धतीमुळे तो सुतासारखा सरळ होते आणि बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकर असे संस्कार स्वत:वर निमूटपणे करून घेतो.

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ५ - क्बाल स्पीन, तोन्ले साप सरोवर आणि नॉमपेन्ह

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 15/02/2018 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ५ - क्बाल स्पीन, तोन्ले साप सरोवर आणि नॉमपेन्ह.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ ह्या मालेच्या पहिल्या भागामध्ये उल्लेखिल्याप्रमाणे ख्मेर साम्राज्याचा प्रारम्भ ’महेन्द्रपर्वत’ नावाच्या पर्वतावर इ.स.८०२ च्या सुमारास झाला.