कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ उत्तराखंडमधल्या दुर्गम वाटेवरचा जीप प्रवास ✪ गोरी गंगेच्या तीरावर! ✪ जौलजिबी परिसरातल्या मदतकार्याच्या आठ्वणी ✪ मुन्सियारी- एक विलक्षण गाव ✪ नंदा देवी मंदिराचा ट्रेक ✪ पंचाचुली शिखरांच्या मागे होणारा चंद्रोदय! ६ डिसेंबरच्या पहाटे सत्गडवरून निघालो. जेमतेम उजाडायला लागलं आहे आणि जीप यायची वेळ झाली. आदित्यने मला खाली रोडवर सोडलं. सगळ्यांत मागच्या सीटवर बसून निघालो. सोबत टेलिस्कोप आणि बायनॅक्युलर असल्यामुळे ते सामान माझ्यासोबतच ठेवलं. सत्गडवरून मुन्सियारी अंतराने कमी म्हणजे फक्त १०८ किमी आहे. पण वाटेत सगळा पहाड़ी प्रदेश आणि बिकट रस्ता! त्यामुळे जायला निदान ४-५ तास तरी लागणारच.

अंडा घोटाला-बालकथा

लेखनविषय:
अंडा घोटाला-बालकथा --------------------------------------------------------- रविवार सकाळची वेळ. अनया आणि अनिलला जाम भूक लागली होती. ते आईच्या मागे लागलेच होते ,तोच आईला एक फोन आला. वरच्या आजींना बरं वाटेनासं झालं होतं. आई गडबडीने त्यांच्या घरी गेली. आता काय करायचं ? बाबाही मित्राकडे गेलेले. अनिल मोठा होता. तो म्हणाला , ' अने, घाबरू नकोस. मी आहे ना. मी अंड्याचं ऑम्लेट करतो.एकदम खुसखुशीत !’ ‘ऑम्लेट अन खुसखुशीत ? ओके ! ते खुसखुशीत ऑम्लेट तूच खा हं. मला आपलं साधंच दे,’ तीही बोलायला भारीच होती. अन्याने मोठया ऐटीत आईचा ऍप्रन पोटावर बांधला. काळ्या - पांढऱ्या चौकडीचा.

सी पी बेरार सर्किट

लेखनविषय:
आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली. माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो.

बाई माझी कंबर लचकली..

लेखनप्रकार
हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या "चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे." काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.) "गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?" "कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का?

सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ

लेखनविषय:
लेखनप्रकार
नवरा: तुमच्या रोजच्या कटकटींमुळे मी त्रासून गेलो आहे. आत्महत्येचा विचार मनात येतो आहे. बायको: "खुशाल कर, कुणी रोखले आहे तुला? पण लक्षात ठेव, लग्नात मला जन्म भर पोसण्याचे वचन दिले होते तुझी दोन लेकरं आहेत. त्यांचा उद्धारही तुलाच करायचा आहे. नवरा: माझा कोट्यवधीचा विमा आहे, काही कमी पडणार नाही तुला. बायको: तेवढ्या पैश्यांनी काही ही होणार नाही. ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केली आहे, तिला लग्नाच्या बाजारात खपविण्यासाठी भरपूर हुंडा द्यावा लागेल. मुलीचे लग्न करून ही जवाबदारी संपता नाही. त्यासाठी आठ-दहा कोटी लागतील. बायको: तुझ्या मुलालाही पुढचे शिक्षण अमेरिकेत घ्यायचे आहे.

‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन

लेखनविषय:
लेखनप्रकार
शेवटची (मराठी) कादंबरी वाचली होती त्याला आता १३ वर्षे उलटून गेली होती. ती ग्रंथालयातून आणून आणि पान अन् पान न वाचता काहीशी उडतउडत संपवली होती. आयुष्याच्या त्या टप्प्यावर मनोमन वाटू लागलं होतं की आता कादंबरी व कथावाचन नकोस वाटतंय; कल्पिताचे दीर्घवाचन हा काही आता आपला प्रांत राहिलेला नाही. पुढे 2019मध्ये ग्रंथालय कायमचे बंद केले आणि तिथून पुढे दरवर्षी मोजकी पुस्तके विकत घेऊनच वाचतोय. ग्रंथालयातून पुस्तक आणताना माणूस निवडीबाबत काहीसा शिथिल असतो. परंतु पुस्तक विकत घ्यायचे म्हटल्यानंतर तो (अति) चिकित्सक बनतो !
Subscribe to