Skip to main content

युगांतर - आरंभ अंताचा भाग ८ व ९

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 24/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
देवव्रत.... त्याने हस्तगत केलेल्या शस्त्रांपुढे एकही राजा शस्त्र उचलू धजत नव्हता. त्याची किर्ती सर्वत्र पसरली. शंतनूची राजगादी सांभाळणारा एक उत्तम राजा म्हणून देवव्रत सोडून बाकी कोणी नव्हते. धर्म, न्याय, युद्धकला..... सर्वोत्तम होता देवव्रत! राज्याबद्दल त्याला वाटणारी आपुलकी, जिव्हाळा! राजाला शोभेल असेच त्याचे वर्तन होते. त्याच्या कर्तव्यदक्षपणा बद्दल शंतनूला दाट विश्वास होता. शंतनू आता निश्चिंत झाला होता. वनविहार करत अनेकदा नदी काठी जाऊन बसायचा. प्रवाहाच्या जलावर हात फिरवत जुन्या आठवणी ताज्या करण्यात त्याला रस वाटू लागला. असेच एका दिवशी शंतनू नदीकाठी बसला होता.

आमची धमाल मसुरी - ऋषिकेश सहल!

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 24/07/2019 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा दहा जणांचा गृप. त्यापैकी आठ जण (किरण, दीपक, सचिन, धनंजय, आनंद, केदार, संतोष, आणि मी) एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंते झाले. अस्मादिक त्या आठपैकी एक. राहिलेले दोन जण (गजानन, संजय) नंतर मित्र झाले. अगदी जवळचे! आजदेखील आमचा हा गृप अभेद्य आणि अखंड आहे. काही "सामायिक सद्गुणांच्या आणि आवडींच्या" भक्कम पायावर ही मैत्री गेली २३ वर्षे टिकून आहे. नुसती टिकलेलीच नाही तर बहरलेलीदेखील आहे आणि चविष्ट लोणच्याप्रमाणे मुरलेलीदेखील आहे. इतकी मुरलेली आहे की कुणी नुसतं "कधी?" असं विचारलं की बाकीच्या सगळ्यांना लगेच अचूक संदर्भ लागतो.

पाण्याची शेती कशी कराल ? पाणी पेरलंत, तरंच उगवेल !

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 24/07/2019 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष *पाण्याचीच शेती* करण्याची वेळ आली आहे. 'पेरलंत तरंच उगवेल' हा पारंपरिक शेतीचा मंत्रच ह्या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. *"पाण्याची शेती"*, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल हे संगण्यासाठीच हे *"पागोळी वाचवा अभियान".* आम्ही लोकांपुढे ठेवलेल्या *"पागोळी वाचवा अभियानाला"* लोकांनी खूप सकारात्मक आणि कृतिशील प्रतिसाद दिला. दरम्यान लोकांच्या मनातल्या काही शंकादेखील समोर आल्या ज्यांचे समाधान होणे आवश्यक आहे.

आपल्यातलेच.... पण आदरणीय !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 24/07/2019 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. त्यातले काहीजण त्यांच्या कामात चांगले यश मिळवतात. त्यानुसार त्यांची दखल विविध माध्यमांतून घेतली जाते. गौरव, सत्कार, पुरस्कार अशा अनेक प्रकारे त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यामुळे या व्यक्तींना एक वलय प्राप्त होते. आता थोडे सामान्य पातळीवर येऊ. आपल्या रोजच्या पाहण्यातही काहीजण आपला कामधंदा सोडून अन्य क्षेत्रांत झोकून काम करत असतात. त्यातले काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अशा अनेकांचे कार्य खरोखर समाजोपयोगी असते.

माझं "पलायन" १४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 23/07/2019 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
१४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

हा संभ्रम माझा

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 23/07/2019 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
नकळत ओढून नेतो मिचकावत सोडून देतो स्वतःशीच खिन्न हसतो हा संभ्रम माझा स्वप्नांच्या झुळूकी मनाला तप्त पाऊलवाटा पायाला अनवाणी चालू पाहतो हा संभ्रम माझा अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा - संदीप चांदणे

बनपाव की करवंट्या.......?

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी

लेखक srahul यांनी मंगळवार, 23/07/2019 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी १)बाबाजी भिकाजी गुजर (आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो.) , विवाहीत स्त्री सह “बदअमल” केला म्हणून कोपरा पासून दोन्ही हात तोडले , गुडघ्या पासून दोन्ही पाय तोडले. “चौरंग “ केला...ही शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली तेव्हा त्यांचे वय अवघे १६ वर्षांच्या आसपास होते. २) छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान (पेशवे) शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर यांनी एका प्रकरणात एकाचे कुलकर्णी पद जबरदस्तीने (आपल्या अधिकाराचा गैर वापर करून) आपल्या नावावर करून घेतले.

चित्रपट परीक्षण ताशकंद फाइल्स

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 23/07/2019 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
खरा स्पेलिंग tashkent आहे पण इतिहासाच्या पुस्तकात ताशकंद किंवा तास्कंद असे आहे एकसिडेंटल prime मिनिस्टर पेक्षा काई पटीने उजवा नुसत्या एखाद्या पुस्तकांवर आधारित प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय पल्लवी जोशी ला बर्याच दिवसाने पाहून बरे वाटले ,ती पण निर्मिती मागे आहे पण रोल पण चांगला आहे तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी पहिला भाग किंचित रटाळवाणं पण शेवट एकदम जोर पकडतो ,मला वाट नाही कोणी लौकर चित्रपटगृहाच्या बाहेर जाईल चित्रपट उल्लेख केलेले बुक ऍमेझॉन वरून नक्की मागवेन राजकारणाहून पण काही अवघड आह

किलबील किलबील पक्षी बोलती...

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 23/07/2019 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
"सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे, हा दागीना मिरवायचा की मोडायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे" फळ्यावर हा सुविचार लिहून डोंगरे सर थाम्बले. फळ्यावरच्या त्या अक्षरांकडे पुन्हा एकदा पाहिलं. ओल्या फडक्याने पुसलेल्या काळ्याकुळकुलीत फळ्यावर ती पांढर्‍या खडूने काढलेली अक्षरे टिप्पूर चाम्दण्यासारखी दिसत होती. अक्षरे पहात असताना त्यांना का कोण जाणे रफीचे " फलक पे जितने सितारे है वो भी शरमाये…" हे गाणे आठवले. या फळ्यालाही फलक म्हणतो, आणि त्या आकाशालाही फलक असेच म्हणतो. गंमत आहे ना?