Skip to main content

पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा....

बुधवार, 12/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या बर्‍याच दिवसापासून 'संपूर्ण गीतरामायण' आंतरजालावरून डाऊनलोड करत होतो. आज झाले पूर्ण. माझी काही अतिशय आवडीची गाणी आहेत त्या मधे 'पराधीन आहे जगति...' हे गाणे आहे. लगेच ते गाणे सुरू केले. ह्या गाण्या बद्दल काय सांगू मंडळी... काही वेळा 'आधुनिक वाल्मिकी ग.दि.मा.' इतक्या सोप्या शब्दात इतके मोठे तत्वज्ञान सांगून जातात ना... असामान्य, केवळ असामान्य. आणि बाबूजींनी अशी काही म्हटली आहेत ही गाणी... सोने पे सुहागा.

(अधिकार)

बुधवार, 12/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल अधिकार किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे चार रंगांनी बघा बदले कशी दृष्टी जगाची आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे भाव थोडे वेगळे डोळ्यात माझ्या पाहिले अन लाज थोडी, घाबरे तो काय ही करणार आहे वाट रुळलेली कशाला चालुया दोघे पुन्हा ही ह्या प्रवासाने जगाचे मोडले संसार आहे मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे

मुकुट परत मिळाला..

लेखक विवेकवि
बुधवार, 12/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला. वाचून आन॑द झाला .. पण चोरणारी व्यक्यी कोण ? काय हेतू चोरण्याचा ? आपले काय मत आहे आपली मते कळवावी...

काही दुर्मिळ फोटू...

बुधवार, 12/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सदर फोटू मला बाबुजींच्या घरनं मिळालेले आहेत. आमच्या ललितामावशींनी हे फोटू मला दिले आहेत. मिपाकरांसाठी येथे देत आहे! श्रेय : श्रीमती ललिता फडके, श्री श्रीधर फडके. टिप्पणी : तात्या अभ्यंकर... १) दिदी, मन्नादा आणि बाबूजी! कुणाचा गळा अधिक गोड, या प्रश्नाचं उत्तर मला तरी अद्याप मिळालेलं नाही! २) बहुतेक 'ज्योती कलश छलके'च्या आठवणी ताज्या होत असाव्यात!

खेळ माझा संपला

बुधवार, 12/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बेसनलाडवांने सांगून सुद्धा "केश्या" ने आपला हट्ट सोडला नाही..

...फिरवा चला आरी पुन्हा!!

बुधवार, 12/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल ...त्याचीच ओढा री पुन्हा!! ............................................................. ...फिरवा चला आरी पुन्हा!! ............................................................. सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? सार्‍याच विषयांचे असे पेपर तरी देऊ कसे... लाजू नको नापास हो...येईल रे वारी पुन्हा ! ऐकून माझे घे जरा...मारू नको नुसते मला... खोडी अधी मी काढली,म्हणलेचना सॉरी पुन्हा ! जीमेत मी जातो जरी...

सलाम मुंबई!!!

बुधवार, 12/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज १२ मार्च, मुंबईच्या त्या काळ्याकुट्ट दिवसाला उद्या पंधरा वर्षे होतील. पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही अगदी आठवणीत आहे. दुपारी दोनचा सुमार होता. मी त्यावेळच्या माझ्या वरळी येथील टि व्ही औद्योगिक संकुलातल्या कार्यालयातून नुकताच बाहेर पडलो होतो. दुपारी तीन वाजता कफ परेड येथे आय डी बी आय च्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायचे होते, तशी वेळ ठरली होती. मी इमारतीतुन बाहेर पडलो आणी समोरच उभ्या असलेल्या टॅक्सीत शिरणार इतक्यात एक दणद्णीत स्फोटाचा आवाज आला. मी आत शिरताना थबकलो आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडल्यागत आपोआप बाहेर आलो.