पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा....
गेल्या बर्याच दिवसापासून 'संपूर्ण गीतरामायण' आंतरजालावरून डाऊनलोड करत होतो. आज झाले पूर्ण. माझी काही अतिशय आवडीची गाणी आहेत त्या मधे 'पराधीन आहे जगति...' हे गाणे आहे. लगेच ते गाणे सुरू केले.
ह्या गाण्या बद्दल काय सांगू मंडळी... काही वेळा 'आधुनिक वाल्मिकी ग.दि.मा.' इतक्या सोप्या शब्दात इतके मोठे तत्वज्ञान सांगून जातात ना... असामान्य, केवळ असामान्य. आणि बाबूजींनी अशी काही म्हटली आहेत ही गाणी... सोने पे सुहागा. शब्द, सूर वेगळे राहतच नाहित.
अशीच एक ओळ आहे ह्या गाण्यात...
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ
मी तर ते गाणे बंदच केले, मला पुढे ऐकवलेच नाही... छे... असे शब्द, असे सूर, असा समसमा संयोग मला नाही वाटत परत कधी होईल.
बिपिन.
वाचने
4570
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
अगदी खरे आहे..
सहमत..
एकमेवाद्वितीय!