Skip to main content

अवडंबर (कथा)

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 12/09/2008 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
१. कथा काल्पनिक आहे. एखाद्या व्यक्ति वा परिस्थितीशी साम्य वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. २. तात्या, लेखन प्रकारात "कथा" सापडली नाही म्हणून काथ्याकुटात टाकली आहे. चुक झाली असल्यास कथा योग्य त्या प्रकारात हलवण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती. वार्‍याची हळुवार आलेली झुळूक जशी मावळत्या उन्हात लांबच लांब कललेल्या झाडांच्या सावल्यांना झाडाच्या फांद्यांपेक्षा जास्तच हलवत होती तशीच ती लक्ष्मीच्या तगमगत्या देहावर हळूच गारव्याचा भासही देत होती. नेहमीच वक्तशीर असणारी लक्ष्मी आज उशीर होऊ नये म्हणून धडपडत होती.

माफीनामा!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/09/2008 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ संदर्भ : http://www.misalpav.com/node/3441 --------- "अनफर्गेटेबल टूर' संपवून मी परतीच्या प्रवासाला लागलो असताना वाटेत ढीगभर एसएमएस मिळाले. जयानं मुंबईत काहितरी विधान केल्याबद्दल गदारोळ उडाल्याचं कळलं. भावना दुखावल्या गेल्या आहेत, ही माझी त्यावरची पहिली प्रतिक्रिया होती. तसं झालं असेल, तर आम्ही माफी मागतो. महाराष्ट्र ही आमची आई आहे आणि आईचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही. आईच्यान! मराठी आणि महाराष्ट्राने आम्हाला भरपूर काही दिले आहे आणि आम्ही हे उपकार कधीच विसरणार नाही.

आख्खे काश्मीर भारतात!!

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 12/09/2008 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज बीबीसी वाल्यांनी आमचा दिवस आनंदी करायला मदत केली बॉ.... चक्क पाक व्याप्त काश्मीर भारताच्या अख्त्यारीत दाखवून.

हा बाजार बंद करा

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 11/09/2008 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळपासून सातत्याने अनेक वाहिन्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिलेला तिथल्या 'कार्यकर्त्या'ने अक्षरश: ढकलुन, अवमानित करून हाकलले त्याचे प्रक्षेपण करीत आहेत. संपर्क साधला असता उत्सवाचे प्रमुख उपलब्ध नाहीत वा कॅमेर्‍यासमोर येत नाहीत असे काही वाहिन्या सांगत आहेत तर एका वाहिनीवर लालबाग राजा चे श्री. सुनिल जोशी यांनी 'ती महिला चपला घालुन व विशेष महत्वाच्या व्यक्तिंकरीता असलेल्या रांगेत जात होती व तिने सांगुन न ऐकल्यामुळे नाइलाजाने कार्यकर्त्यांना असे वागावे लागले' अशी मल्लिनाथी केली. हे कुणाला पटलेले दिसत नव्हते.

वेड्या आठ्वणी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/09/2008 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
अक्का, आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात."आठवणी येतात",असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात. तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझं बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्षाने आठवली.

मेगा`ब्लॉग'

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/09/2008 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू यॉर्कहून परतीच्या प्रवासात बच्चनसाहेब अस्वस्थ होते. विमानाच्या कॉरिडॉरमध्ये त्यांचा येरझारा चालू होता. सारखा ते कुणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होते (बहुधा अमरसिंहांना असावा), पण लागत नव्हता. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत होती. ""सर, मे आय हेल्प यू? वुड यू लाइक टु हॅव सम कॉफी ऑर ड्रिंक?'' एक हवाईसुंदरी मार्दवी सुरात म्हणाली. मुळात बच्चनसाहेबांशी आपल्याला बोलायला मिळालं, याचंच तिला कौतुक होतं. ""नो, थॅंक्‍स.'' बच्चनसाहेबांनी शक्‍य तेवढ्या सौजन्यानं तिला उडवून लावलं. बच्चनसाहेबांचं सामान वगैरे पुन्हा गायब झालं की काय, असं त्या हवाईसुंदरीला वाटलं.

शाळेत गणवेष असावा की नसावा?

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 11/09/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शाळेत (काही अपवादात्मक कॉलेजातसुद्धा) जाणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेष असावा का? असा माझा प्रश्न आहे. गणवेषाची गरज नक्की काय असते? समुहभावना ही गणवेषामुळे तयार होते असे काही जण म्हणतात तर ते आपल्याला कितपत योग्य वाटते? मुले घरात असताना, इतर वेळी मित्रांसोबत खेळताना वेगवेगळ्या कपड्यात असूनही समुहभावात असतात. तसेच कुठे सहलीला गेली (शाळेबाहेरील मित्रांसोबत तर तेव्हा सुद्धा समुहभावानेच असतात. मग शालेय जीवनात गणवेषाला महत्व द्यावे का? समुहभाव हा मुद्दा असेल तर तो कसा तयार होतो हा सुद्धा उहापोहाचा चांगला आयाम ठरेल. (खेळाडु, कंपनीतले कामगार, सैनिक यांचे सुद्धा गणवेष असतात.

ऋण मातीचे..

लेखक राघव यांनी गुरुवार, 11/09/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी? पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी.. का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे? व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी.. चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे, एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी.. वाट कुणाची बघतो आपण?

(प्रवाह)

लेखक बिनडोक बनी यांनी गुरुवार, 11/09/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आर्यचाणक्य यांच्या प्रवाहात मीही हात धुवून घेतले.. ;) मिसळपाववर कोरडे बसण्यापेक्षा मी जेव्हा मिसळीच्या डोहात बुडी मारली... तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय करायचा प्रयत्न करतोय?